पोस्ट्स

खटले समयमर्यादेत निकाली काढण्‍यासाठी 'कायद्याचे राज्‍य' आणण्‍याची वेळ आली आहे !

इमेज
न्यायालयात प्रलंबित राहिलेल्‍या खटल्‍यांमध्‍ये अनेक वेळा स्‍थगिती आणण्‍याची विनंती करणे आणि सहजपणे स्‍थगितीसाठी अनुज्ञप्‍ती देणे यांविषयी भारताचे मुख्‍य न्‍यायाधिशांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेल्‍या त्रिसदस्‍यीय खंडपिठाने अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली अन् अशा परिस्‍थितीविषयी कडक( अंमलबजावनी )शब्‍दांत टीका केली आहे.कदाचित् आता जनतेच्‍या भावना लक्षात घेऊन 'वेगवेगळ्‍या न्‍यायालयांमध्‍ये प्रलंबित राहिलेले खटले निकालात काढण्‍यासाठी न्‍यायक्षेत्रातील व्‍यावसायिकांनी सहकार्य करावे', असे आवाहन सर्वोच्‍च न्‍यायालयाने केले आहे. १. खटला निकालात काढण्‍यासाठी समयमर्यादा ठरवायला हवी ! बर्‍याच वेळा अधिवक्‍ते खटल्‍याची सुनावणी लवकर व्‍हावी, यासाठी विनंती करतात आणि जेव्‍हा ही सुनावणी घेण्‍यास अनुमती दिली जाते, तेव्‍हा खटला पुन्‍हा स्‍थगित ठेवण्‍याची विनंती करतात. ही स्‍थिती चिंताजनक आहे. 'न्‍याय द्यायला विलंब करणे, म्‍हणजे न्‍याय देण्‍यास नाकारणे', अशी म्‍हण आहे आणि ती आताच्‍या दयनीय स्‍थितीला लागू पडते. या समस्‍येवर उपाय, म्‍हणजे वैधानिक दृष्‍टीने अशी स्‍थगिती आणण्‍यावर मर्यादा आ...

"...म्हणून कपिल देवला बोलवलं नाही"; वर्ल्डकपच्या सामन्यावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका

इमेज
वर्ल्डकपच्या  अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतेय.दुसरीकडे भारताच्या पराभवामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. अनेकांनी भारताच्या पराभवानंतर आपलं दुःख व्यक्त केले आहे. दुसरीकडे आता वर्ल्डकपच्या सामन्यावरुन राजकारण देखील सुरु झालं आहे. हा सामना भाजपाचा होता अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी केली आहे. माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी सामन्याच्या आयोजनावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. "भारताचा पराभव झाला याचं दुःख सगळ्यांनाच आहे. देशामध्ये खिलाडूवृत्ती आहे. पण जो संघ सलग 10 सामने जिंकला तो अंतिम सामन्यात पराभूत झाला. या सारखे सामने अंतिम सामने दिल्लीत किंवा मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होतात. क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी घुसली आहे त्याने आधी स्टेडिअमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडिअम केले. मग तिथे सामना घेऊन त्याचे सगळं श्रेय भाजपा घेण्याच्या विचारात होतं. असं शक्यता होत नाही. जगाला हा सामना भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया ...

प्रक्षोभक वक्तव्यांविरोधात संताप, मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक; मतदारसंघातच काढली अंत्ययात्रा

इमेज
मराठा योद्धा; मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या येवला मतदारसंघातच त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला तर जळगावात भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढली आहे असा संताप व्यक्त करत येवला येथे मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी छगन भुजबळ चले जाव, छगन भुजबळ मुर्दाबाद, मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारून ती प्रतिमा जाळण्यात आली. मंत्रिमंडळात संवैधानिक पदावर बसून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून जातीयवाद निर्माण करणाऱ्या भुजबळांचा आम्ही निषेध करतो तसेच जालन्यातील सभेला संबोधित करतांना मराठा समाजावर बेताल वक्तव्य करून भुजबळांनी राजकीय आत्महत्याच केली आहे, अशी प्रतिक्रिया मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. जळगाव शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी...

भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर झाली? आर्थिक अंधभक्ती सुसाट, फडणवीसांनी केली शेअर, अदाणींनी पोस्ट डिलीट केली

इमेज
रविवारी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था (जीडीपी) पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा, देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.गौतम अदानी यांनी फेक न्यूज शेअर केली… नंतर पोस्ट डिलीट केली गौतम अदानी यांनी ही भारताला 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र, भारत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेल्याच्या व्हायरल सोशल मीडिया पोस्टवर अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्व देशांच्या जीडीपीच्या आकडेवारीचा मागोवा घेणे खूप अवघड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीच्या आधारे सर्व देशांसाठी लाइव्ह ट्रॅकिंग जीडीपी फीडचा एक अप्रमाणित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात...

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळाले 33 कोटी; भारतीय संघाला 'एवढ्या' रकमेवरच.

इमेज
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. आठ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन बनला आहे.ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते. हा सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. कांगारू संघाला 33.31 कोटी रुपये मिळाले आहेत. तर भारताला 16.65 कोटींवर समाधान मानावे लागले.(33 crores for world champion Australia Indian team only on this amount…) आयसीसीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बक्षिसांची रक्कम जाहीर केली होती. 83.29 कोटी रुपये या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेचे बजेट होते. यातील विजेत्या संघाला 33.31 कोटी रुपये (चार दशलक्ष अमेरिकन डॉलर) मिळतील. त्याचवेळी, अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 16.65 कोटी रुपये (दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर) मिळणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.या संघांवरही बक्षिसांची लयलूट उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 6.66 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ...

महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर

इमेज
सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे तसेच सामान्य नागरिकांच्या, बेरोजगारांच्या बाबतीत महत्वाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने 14 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.सरकारला पुरेशी संधी देऊन देखील सरकार निर्णय घेत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे. असे प्रतिपादन रायगड जिल्हा कर्मचारी शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर यांनी शनिवारी (ता.18) अलिबाग येथील निर्धार सभेत केले. व हा संप यशस्वी करण्याचा एकमताने निर्धार केला. जुनी पेन्शन योजना (OPS) सर्वाना लागू करा अशी प्रधान मागणी व इतर 17 प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च, 2023 पासून 20 मार्च, 2023 पर्यंत कर्मचारी-शिक्षकांनी संप केला. राज्याच्या मुख्यमंत्री यांचा मान ठेवुन कर्मचारी शिक्षकांच्या सुकाणू समितीने बेमुदत सुरु केलेला हा संप स्थगित केला. मुख्यमंत्री महोदय यांच्या आश्वासनाला सहा महिने उलटून गेले. जुनी पेन्शन करीता नेमलेल्या अभ्यास समितीने तीन महिन्यात अहवाल देणे अपेक्षीत असताना मुदतवाढ घेऊन देखील अद्याप शासनाकडून सदर समितीचा अहवाल जाहिर केला नाही. सरकार कडून कर्मचारी...

नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांवरील वक्तव्याचा विरोध

इमेज
प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना काळं फासत निषेध नोंदवला.नामदेव जाधव यांनी शरद पवारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काळं फासण्यात आलं. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. तसंच शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नामदेव जाधव यांना गाठलं आणि काळं फासत घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विरोध झाल्यानंतर नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यानंतर पुण्याच्या पत्रकार भवनबाहेर ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. "लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार आहे. कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आपण पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये राहतो का असा प्रश्न निर्माण होतो. मी पोलिसांकडे विचारणा करणार आहे. जर मी पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसेच बोलले पाहिजे. विचारांची लढाई आहे विचाराने लढली पाहिजे," असं यावेळी त्यांनी सांगितलं...