पोस्ट्स

**देहूगावात अधिक पुरुषोत्तम मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम महाराज गाथा पारायणाचे भव्य आयोजन**

इमेज
**देहूगावात अधिक पुरुषोत्तम मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम महाराज गाथा पारायणाचे भव्य आयोजन**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी/पुणे:** श्रीसंत माणकोजी महाराज बोधले व सद् गुरु प्रभाकर दादा बोधले महाराज यांच्या प्रेरणेने आणि डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या ज्येष्ठ अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या गाथा पारायणासह अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन श्रीक्षेत्र देहूगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे करण्यात आले आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावरील संत तुकाराम महाराजांच्या अवतार आणि वैकुंठगमन स्थळी हा १६वा अधिक मास सप्ताह संपन्न होणार आहे. अधिक मास हा दर तीन वर्षांनी येतो. या काळात विविध धार्मिक विधी, कीर्तन, हरिनाम आणि पारायण यांचे महत्त्व वाढते. बोधले महाराजांच्या सांप्रदायिक परंपरेनुसार प्रत्येक अधिक मासात वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत हम्पी, कुडल-संगम, गणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, काशी, पैठण, आळंदी आदी १५ पवित्र स्थळांवर हे सप्ताह यशस्वी झाले आहेत. यंदा १६व...

**महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय: तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच सोडवावेत**

इमेज
**महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय: तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच सोडवावेत**  **KDM NEWS प्रतिनिधी करमाळा (सोलापूर) :** जनतेला मंत्रालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन समस्या सोडवण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात नियमित भेटी देऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. करमाळा येथे सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी घरकुल बांधकामासाठी वाळूचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, रश्मीताई बागल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सह दुय्यम निबंधक एस. एस. कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्र...

**बार्शीत ‘कडक’ वातावरण; IPS अंजना कृष्णा यांच्या अतिरिक्त कार्यभाराने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ**

इमेज
**बार्शीत ‘कडक’ वातावरण; IPS अंजना कृष्णा यांच्या अतिरिक्त कार्यभाराने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार IPS अंजना कृष्णा यांच्याकडे आल्यानंतर शहर व तालुक्यात अवैध व्यवसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गुटखा, मटका, अवैध दारू, जुगार क्लब, गांजा विक्री आणि लॉजमधील वेश्या व्यवसाय यांसारख्या ‘दोन नंबर’ धंद्यांवर कठोर कारवाईचा धाक बसल्याने धंदेवाल्यांची झोप उडाली आहे. सध्या शहरात “वातावरण कडक आहे” अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त भार करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS अंजना कृष्णा यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्या धडाकेबाज, निडर आणि कठोर कार्यशैलीमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. अनेक व्यावसायिकांनी आपले धंदे छुप्या पद्धतीने चालवण्यास सुरुवात केली असून, काहींनी तात्पुरते व्यवहार बंद ठेवल्याची माहिती समोर येत आहे.     ...

**बार्शीत हिट अँड रनचा थरार! २१ वर्षीय मूर्तीकार युवकाला रस्त्यावर चिरडून चालक फरार**

इमेज
**बार्शीत हिट अँड रनचा थरार! २१ वर्षीय मूर्तीकार युवकाला रस्त्यावर चिरडून चालक फरार**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी  :** शहरातील गाडेगाव रोड परिसरात गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक देऊन पळ काढल्याने उत्तर प्रदेशातील २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अपघातानंतर वाहन चालकाने जखमी युवकाला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार होण्याची ही हिट अँड रनची घटना स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. मृत युवकाचे नाव **सुरज रामकिशोर गौतम** (वय २१) असून, तो उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड तालुक्यातील जौरासा येथील रहिवासी आहे. तो गेल्या नऊ महिन्यांपासून आपल्या चुलत भावासोबत बार्शीत वास्तव्याला होता. दोघेही गाडेगाव रोडवरील अँपल हॉटेलच्या मागे राहत होते आणि उत्तरेश्वर भगवान कांबळे यांच्या कार्यशाळेत मूर्ती कारागीर म्हणून काम करत होते. **घटना कशी घडली?**   सुरज गुरुवारी रात्री मालकांच्या **हीरो होंडा स्प्लेंडर प्लस** दुचाकी (क्र. MH 25 C 2756) घेऊन किराणा सामान आणण्यासाठी गाडेगाव रो...

**बार्शी न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली; सुमारे २ कोटींची वसुली**

इमेज
**बार्शी न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली; सुमारे २ कोटींची वसुली**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय महा-लोकअदालतीत एकूण २४५७ प्रकरणे तडजोडीने सोडवण्यात आली. यात प्रलंबित प्रकरणांतून १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रुपये आणि दाखलपूर्व प्रकरणांतून ७५ लाख ६६ हजार ७४ रुपये अशी एकूण जवळपास २ कोटी रुपयांची वसुली झाली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका विधी सेवा समिती व बार्शी वकिल संघाच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत पार पडली. या महालोकअदालतीत बार्शी न्यायालयातील ३७२१ प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे आणि ६५०४ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण १०२२५ प्रकरणे तडजोडीसाठी समोर आणण्यात आली होती. यापैकी २४५७ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली. **चार पॅनल्समध्ये कामकाज** लोकअदालतीसाठी चार पॅनल्स तयार करण्यात आले होते. जिल्हा न...

**सोलापूर कृषी बाजारात कांद्याची दयनीय विक्री; ४१ पोत्यांवरून शेतकऱ्याच्या हातात केवळ ५१९ रुपये!**

इमेज
**सोलापूर कृषी बाजारात कांद्याची दयनीय विक्री; ४१ पोत्यांवरून शेतकऱ्याच्या हातात केवळ ५१९ रुपये!**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**सोलापूर, ९ मे २०२६:** महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. उत्पादन खर्च हजारो रुपयांपर्यंत गेला असताना बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  सोलापूर कृषी उत्पादन बाजार समितीत एका शेतकऱ्याने ४१ पोते कांदा विक्रीसाठी आणला. मात्र, विक्री झाल्यानंतर मजुरी, हमाली, कमिशन, बाजार शुल्क, वाहतूक खर्च वगैरे सर्व कपातीनंतर त्याच्या हातात केवळ ५१९ रुपये पडले. ही घटना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथेचे ज्वलंत उदाहरण बनली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, ४१ पोत्यांपैकी फक्त २० पोत्यांचीच विक्री झाली. उरलेली २१ पोते विक्रीसाठी पडून राहिली. इतक्या मोठ्या प्रमाणात मेहनत, खते, बियाणे, पाणी आणि मजुरी खर्च करूनही हातात येणारे पैसे पाहून शेतकरी संतापले आहेत. या भीषण परिस्थितीमुळे सोलापूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सरकारला स्प...

**बार्शी तालुक्यात सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत बदल; १३ मे रोजी दुपारी १२ वाजता सोडत**

इमेज
**बार्शी तालुक्यात सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत बदल; १३ मे रोजी दुपारी १२ वाजता सोडत**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**सोलापूर, ७ मे २०२६ :** जिल्हाधिकारी कार्तकियन एस. यांनी आज एक महत्वाचा आदेश जारी करत बार्शी तालुक्यातील सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शुध्दीपत्रकानुसार (दिनांक ३० एप्रिल २०२६) आरक्षण संख्येत झालेल्या बदलामुळे बार्शी तालुक्यात नव्याने आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार, बार्शी तालुक्यात एकूण **१२९ सरपंच पदे** आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे : - **अनुसूचित जाती (SC)** : ११ पदे (महिला : ६) - **अनुसूचित जमाती (ST)** : ०५ पदे (महिला : १) - **नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)** : ३४ पदे (महिला : १७) - **सर्वसाधारण (Open)** : ८३ पदे (महिला : ४१) (महिलांसहित एकूण महिला आरक्षण ४२ पदे) **शासनाच्या दुरुस्तीनुसार बदल :**   महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शुध्दीपत्रकानुसार, संपूर्ण जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील सरपंच पदे २७७ वरू...