**माळशिरस: भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ६ जखमी**
**माळशिरस: भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ६ जखमी** **KDM NEWS प्रतिनिधी माळशिरस सोलापूर:** सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावच्या भाविकांची पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत कोसळली. या दुर्घनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जणांना वाचवण्यात यश आले. मृतांमध्ये ४ महिलांसह ४ लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी गावातील १४-१५ भाविक दर्शनासाठी म्हसवडला गेले होते. दर्शन आटोपून ते पिकअप वाहनाने गावाकडे परतत होते. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव पिकअप थेट रस्त्याशेजारच्या विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी असल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघाताचा आवाज ऐकताच तांदूळवाडी गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशामक दल, क्रेन व बचाव पथकांच्या साहाय्याने वाहन आणि मृतदेह बाहेर...