**अंजनगाव खे .मंदिरात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; मनोज जरांगे यांचे दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन**
**अंजनगाव खे. मंदिरात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; मनोज जरांगे यांचे दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन** **KDM NEWS प्रतिनिधी माढा (सोलापूर), ३ एप्रिल २०२६** – सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील जागृत देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून मराठा आणि धनगर समाजात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक धनगर समाजाने पुतळा हटवण्याची मागणी केली असून, मराठा समाजाने त्याला विरोध दर्शवला आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. प्रकरणाची माहिती अशी: तीन आठवड्यांपूर्वी दत्तात्रेय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाल यांनी ग्रामपंचायतीकडे पुतळा बसवण्यासाठी परवानगी मागितली होती. ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली आणि पोलिसांना कळवले. तरीही रात्री अपरात्री पुतळा बसवण्यात आला. मंदिर समिती आणि मुख्य पुजारी राजाभाऊ वाघमोडे महाराज यांचे म्हणणे आहे की, ही जागा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर येते आणि धार्मिक विधींना अडथळा निर्माण होतो...