**बार्शी नगरपरिषदेच्या २६८ विकासकामांवर ठेकेदारांच्या विलंबाबाबत नगरसेवकांची तक्रार**
**बार्शी नगरपरिषदेच्या २६८ विकासकामांवर ठेकेदारांच्या विलंबाबाबत नगरसेवकांची तक्रार** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी शहरातील २६८ विकासकामांची मुदत संपूनही अनेक कामे अपूर्ण किंवा मंद गतीने चालू असल्याबाबत नगरसेवकांनी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्याकडे आज लिखित तक्रार दाखल केली. या कामांमुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. २०२५-२६ च्या सुधारित अर्थसंकल्पात आणि २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पान क्र. ५८ ते ७२, नमुना क्र. ८८ अंतर्गत ही २६८ कामे विविध ठेकेदारांना देण्यात आली होती. प्रत्यक्ष पाहणी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवरून असे दिसून आले की, करारातील निश्चित मुदत संपूनही अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी प्रगती अत्यंत मंद आहे. नगरसेवक आक्कलकोटे यांच्या नेतृत्वात सर्व नगरसेवकांच्या वतीने स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी बारबोले, राहुल कोंढारे, लांडगे, नवनाथ माळगे, मुजमील पठाण, सचिन मांगडे, सौ. पाचपुते , बाळासाहेब पवार, वसंत देवकर, अजय भानवसे, ...