पोस्ट्स

*दत्तक गावातच अवैध दारूचा बाजार; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या गावातील कारवाईने उडाली खळबळ*

इमेज
*एसपींचे दत्तक गाव अन् दारूचा महापूर! बार्शीच्या धस पिंपळगावमध्ये ८० हजारांच्या अवैध दारूसह दोघांवर कारवाई*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी *सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आज धस पिंपळगाव येथे धडक कारवाई केली. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन आरोपींना अटक केली असून देशी-विदेशी दारू मिळून एकूण ८० हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धस पिंपळगाव येथे काही इसम अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून छापा टाकला. या कारवाईत संतोष अर्जुन धस आणि दिनेश कैलास धस (दोघेही राहणार धस पिंपळगाव, ता. बार्शी, ) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून दारू, मटका, जुगार आणि इतर अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवल्या आहेत. धस पिंपळगाव हे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक...

*"तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस?"; बार्शीत सफाई कामगारावर चार जणांचा जीवघेणा हल्ला*

इमेज
*"तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस?"; बार्शीत सफाई कामगारावर चार जणांचा जीवघेणा हल्ला*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २७ ऑगस्ट** : शहरातील बस स्टँडजवळ बुधवार सायंकाळी एका सफाई कामगाराला चार जणांनी मिळून शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संदेश अरुण ननवरे (वय ३५, रा. भीमनगर बार्शी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता प्रमोद कांबळे यांच्या पानटपरीजवळ (बस स्टँड बार्शी) आधी झालेल्या किरकोळ वादाबाबत बोलावून आरोपींनी “तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस, तुला लय माज आला आहे” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर रोहन भैरवनाथ सुपेकर, अतिश रमेश चव्हाण, रमजान गनी शेख आणि मोहमद रफिक शेख (सर्व रा. बार्शी) यांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यापैकी एकाने हातातील स्टीलचे गोल कडे काढून फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यामुळे तो जखमी झाला. पोलीस ठाण्यापासून पूर्वेस सुमारे १०० मीटर अंतरावर ही घटना घडली. गुन्ह्यात वापरलेले हत्या...

*बार्शी शहर पोलिसांची कारवाई: अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल*

इमेज
*बार्शी शहर पोलिसांची कारवाई: अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २७ ऑगस्ट २०२६ – बार्शी शहर पोलीस ठाण्याने गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ५३५० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल सचिन भारत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १.२० वाजता उपळाई रोडवरील रणवीर हॉटेलच्या पाठीमागील बाजूस दशरथ अर्जुन गोंदील (वय ३८, रा. शेंदरी, ता. बार्शी) याला बुलेट डार्क रमच्या १८० मिलीच्या १५ बाटल्या विक्री करताना पकडण्यात आले. प्रत्येक बाटलीची किंमत १५० रुपये असून एकूण २२५० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा क्रमांक ६४०/२०२६ दाखल करण्यात आला. त्यानंतर दुपारी सुमारे २ वाजता गाडेगाव चौकातील रंगत हॉटेलच्या पाठीमागे कैलास हानुमंत कांदे (वय ३९, रा. बोरगाव, ता. बार्शी) याला दारू विक्री करताना अटक करण्यात आली. त्याच्याकडून क्लासिक गोल्ड व्ह...

**प्रेमभंगानं उघडला एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीचा घोटाळा; सहा जण अटकेत, भरती रद्द**

इमेज
*प्रेमभंगानं उघडला एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीचा घोटाळा; सहा जण अटकेत, भरती रद्द*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या चाळणी परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार प्रेमभंगानं उघडकीस आला. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून एमपीएससीने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे ४४,५०० उमेदवार बसले होते. १५४ राजपत्रित पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर ऋतुजा पाटील यांना सातवी क्रमांक मिळाला. मात्र त्यांचा प्रियकर लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील (२४, नंदुरबार) अपात्र ठरला. पोलिसांच्या तपासात समोर आले की, परीक्षेच्या दोन-तीन दिवस आधी नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यामार्फत प्रश्नपत्रिका मिळवली गेली. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील यांना सुमारे पाच लाख रुपये देऊन ही व्यवस्था केली. प्रश्नपत्रिका एमपीएससीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने मिळवली गेल्याचा आरोप आहे. ऋतुजाने ही प्रश्...

*तीन पिढ्यांचे वैराख्य संपले! कव्हे गावातील हजारे परिवारांमधील ४२ वर्षांचा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला*

इमेज
*तीन पिढ्यांचे वैराख्य संपले! कव्हे गावातील हजारे परिवारांमधील ४२ वर्षांचा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी** | कव्हे गावातील सागर हजारे आणि सत्यवान हजारे यांच्या परिवारांमधील तब्बल ४२ वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. तीन पिढ्यांमध्ये चालत आलेल्या या वैरामध्ये गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यात कलम ३०७ सारख्या प्रयत्नपूर्वक हत्येच्या प्रकरणांचाही समावेश होता. वर्षानुवर्षे न्यायालयीन खटले चालत राहिल्याने दोन्ही बाजू त्रस्त झाल्या होत्या. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दोन्ही परिवारांशी थेट संवाद साधला. कायदेशीर परिणाम, भविष्यातील अडचणी आणि या वादामुळे झालेले नुकसान स्पष्टपणे समजावून सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गवळी, अमित घाडगे,  वैभव शिंदे, बाबासाहेब पाटील, डॉ. बुरगुटे तसेच इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही मध्यस्थीत सहभाग घेतला. दोन्ही पक्षांनी जुना राग बाजूला ठेवून पोलिसांसमोर एकमेकांना गळाभेट घेतली. त्यांनी यापुढे शांततेने, सलोख्याने आणि बंधुभावाने राहण...

*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: बोगस ठरावांच्या आरोपावरून राजकारण तापले; आमदार सुभाष देशमुख यांची सहनिबंधकांकडे तक्रार*

इमेज
*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: बोगस ठरावांच्या आरोपावरून राजकारण तापले; आमदार सुभाष देशमुख यांची सहनिबंधकांकडे तक्रार*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रात राजकीय तणाव वाढला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये कथित बोगस ठराव मंजूर करून मतदार यादी तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप करत आमदार सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. या ठराव सादर करण्याची मुदत ११ सप्टेंबरपर्यंत आहे. आमदार देशमुख यांच्या तक्रारीनुसार, काही संस्थांमध्ये सभासद व संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडिंग बुकवर सह्या घेतल्या जात आहेत. अधिकृत कार्यालयाबाहेर नियमबाह्य ठराव घेण्याचे प्रकारही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बोगस ठरावांच्या आधारे मतदार यादी तयार झाल्यास पात्र सभासद व संस्थांच्या संचालकांवर अन्याय होईल आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेवर ...

*बार्शी हादरली! कॉलेजला जाते म्हणून निघालेली १७ वर्षीय विद्यार्थिनी गूढ रीतीने बेपत्ता; आईची पोलिसांत तक्रार*

इमेज
*बार्शी हादरली! कॉलेजला जाते म्हणून निघालेली १७ वर्षीय विद्यार्थिनी गूढ रीतीने बेपत्ता; आईची पोलिसांत तक्रार*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** शहरातील अलीपूर रोड परिसरातील १७ वर्षीय बारावी सायन्स शाखेतील विद्यार्थिनी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. कॉलेजला जाते असे सांगून सकाळी सायकलवरून घराबाहेर पडलेली मुलगी रात्रीपर्यंत परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला, पण तिचा ठावठिकाणा लागला नाही. तिच्या आईने बार्शी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ही अल्पवयीन विद्यार्थिनी महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी सायन्स शाखेत शिकते. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते, असे सांगून ती सायकलवरून घरातून निघाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत ती घरी परतत असे. मात्र त्या दिवशी ती न आल्याने आईने सायंकाळी ७.१५ वाजता तिच्या मोबाईलवर फोन केला. अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि लगेच कट केला. नंतर मोबाईल बंद आढळला. वडिलांनी कॉलेज व स्टडी क्लासमध्ये चौकशी केली. वर्गातील विद्यार्थिनींनी सांगितले की, ती त्या दिवशी कॉलेजमध्ये आली...