*सोलापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डिजिटल क्रॉप सर्व्हे केला*
**सोलापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डिजिटल क्रॉप सर्व्हे केला** KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. १२ (जिमाका) : पावसातील प्रदीर्घ खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोण्हाळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर आणि नाविंदगी या गावांना भेट दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रतापनगर व भाटेवाडी येथेही त्यांनी पिकांची पाहणी केली. सोयाबीन, ऊस, मका, तूर, उडीद आणि कागदी लिंबू या पिकांची स्थिती समजून घेतली. शेतकऱ्यांकडून पेरणीची तारीख, शेवटचा पाऊस, पावसाचा खंड आणि जमिनीतील ओलावा याबाबत माहिती घेतली. अनेक ठिकाणी जून-जुलैमध्ये पेरणी झालेल्या पिकांची वाढ थांबली ...