पोस्ट्स

*बार्शी ग्रामीण भागात अघोषित वीजखंड; कासारवाडी सबस्टेशनच्या अनियमित कारभाराने नागरिक हैराण*

इमेज
*बार्शी ग्रामीण भागात अघोषित वीजखंड; कासारवाडी सबस्टेशनच्या अनियमित कारभाराने नागरिक हैराण*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषित भारनियमनामुळे विजेचा लपंडाव वाढला आहे. कासारवाडी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीज कधी बंद होईल आणि कधी येईल, याचा ठराविक वेळापत्रक नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर येथील महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून भारनियमन आदेश आले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्याबाबत स्थानिक पातळीवर कोणतीही पूर्वसूचना किंवा निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. परिणामी घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि जोडधंदे प्रभावित होत आहेत. परिसरात वीज चोरीची चर्चा असतानाही त्यावर ठोस कारवाई दिसत नाही. वेळेवर बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लक्ष घालून निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची आणि वीज चोरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. KDM NEWS प्रतिनिधी 

*जरांगेंनी उपोषण स्थगित केले; सरकारला ९० दिवसांचा अल्टीमेटम*

इमेज
*जरांगेंनी उपोषण स्थगित केले; सरकारला ९० दिवसांचा अल्टीमेटम*  *KDM NEWS प्रतिनिधी पाटोदा (बीड) :* मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे २० दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केले. सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शिष्टमंडळात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादाजी भुसे, आमदार सुरेश धस आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता. बीडचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सकाळी पाच वाजता शिष्टमंडळ पाटोदा येथे दाखल झाले. सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी थेट कॅमेऱ्यासमोरच बोलणी सुरू होती. जरांगे पाटील अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले होते. प्रकृती खालावल्याने ते पाटोदा येथे थांबले होते. उपोषणाचा २०वा दिवस सुरू असताना शिष्टमंडळाने त्यांना मराठा आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि औंध गॅझेट तीन महिन्यांत शासन निर्णय काढून लागू करण्याचे, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे आणि शिंदे समितीने शोध...

*संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर*

इमेज
*संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर*  *KDM NEWS प्रतिनिधी पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संतोष गजानन पंडित  नारायण पेठ यांना अखेर पुणे सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३६१/२०२६ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी बुधवार (१६ सप्टेंबर) रोजी जामीन अर्ज क्रमांक ४८८८/२०२६ मंजूर केला. पंडित यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर व तितक्याच रकमेच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. **न्यायालयाच्या अटी**   फिर्यादीशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये. अभियोजन पुराव्यात हस्तक्षेप करू नये. **प्रकरणाची पार्श्वभूमी**   सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पंडित यांनी युट्युब व सोशल मीडियावर अपलोड केलेल्या रील्स-व्हिडिओंमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, एक महिला पुणे महानगरपालिक...

*बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल*

इमेज
*बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल* *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १६ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ८ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे दोन वाजता खांडवी ते उपळाई ठोंगे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीआईच्या छोट्या मंदिराजवळ घडली. उपळाई ठोंगे येथील अनिल मधुकर ढेरे (३६) यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-१३-एफई-५६९९) चालवत असताना पाठीमागे सुनिल पाडुरंग जाधव (३०, रा. उपळाई ठोंगे) बसले होते. दोघे खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता हायस्पीडने, अविचाराने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ब्रेक लावताना मोटारसायकल स्लीप होऊन दोघेही पडले. अपघातात पाठीमागे बसलेल्या सुनिल जाधव यांच्या पोटास गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.१६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मोटारस...

*मान्सूनची माघार शनिवारपासून सुरू; महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाऊस निरोप घेण्याची शक्यता*

इमेज
*मान्सूनची माघार शनिवारपासून सुरू; महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाऊस निरोप घेण्याची शक्यता* KDM NEWS प्रतिनिधी दिल्ली/मुंबई : नैऋत्य मान्सूनची माघार शनिवार (१९ सप्टेंबर) पासून पश्चिम राजस्थानातून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असली तरी यंदा दोन दिवस उशिरा माघार सुरू होईल. देशभरात १ जून ते १४ सप्टेंबर दरम्यान १५ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रात ही तूट १६ टक्के आहे. मराठवाड्यात ३६ टक्के तर विदर्भात २७ टक्के तूट नोंदवली गेली आहे. बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ४० टक्क्यांहून अधिक तूट आहे. २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत ३० दिवसांहून अधिक पावसाचा खंड पडला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनची माघार २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. माघार सुरू झाली तरी काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. पुढील काही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होईल. एल निनोचा प्रभाव आणि असमान पावसामुळे खरीप हंगाम धोक्य...

**बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल** सोलापूर, १६ सप्टेंबर : बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात प्रथम खबर नोंदणी क्रमांक ३०६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१), ३२४(४)(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता खांडवी ते उपळाई ठोंगे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीआईच्या छोट्या मंदिराजवळ घडली. उपळाई ठोंगे येथील अनिल मधुकर ढेरे (वय ३६) यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-१३-एफई-५६९९) चालवत असताना पाठीमागे सुनिल पाडुरंग जाधव (वय ३०, रा. उपळाई ठोंगे) बसले होते. दोघे खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता हायस्पीड, अविचाराने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ब्रेक लावताना मोटारसायकल स्लीप होऊन दोघेही पडले. अपघातात पाठीमागे बसलेल्या सुनिल जाधव यांच्या पोटास गंभीर इजा झाली. त्...

*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीणमध्ये मनाई आदेश; ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी*

इमेज
*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीणमध्ये मनाई आदेश; ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर*सोलापूर, १६ सप्टेंबर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश आज रात्री ८ वाजतांपासून ३० सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहील. अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून अधिक लोकांचे एकत्र येणे, सभा, मिरवणूक यांना बंदी आहे. तसेच शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, झेंडा लावलेली काठी किंवा शरीराला इजा पोहोचवू शकणारी कोणतीही वस्तू बाळगणे, ज्वालाग्राही वा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकण्याची उपकरणे बाळगणे यांनाही मनाई आहे. व्यक्ती, प्रेतयात्रा किंवा प्रतिमांचे प्रदर्शन, सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा वापरणे, जाती-जमातींच्या भावना दुखावणारे कृत्य, सोंगे किंवा चिन्हे तयार करून प्रसार करणे यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्य...