पोस्ट्स

**जेसीबीने उखडला शेतरस्ता, न्यायालयीन प्रक्रिया डावलली श्रीपतपिंपरीत महसूल प्रशासनाच्या ‘सिलेक्टिव’ कारवाईला विरोध**

इमेज
**बार्शीत जेसीबीने उखडला शेतरस्ता, न्यायालयीन प्रक्रिया डावलली श्रीपतपिंपरीत महसूल प्रशासनाच्या ‘सिलेक्टिव’ कारवाईला विरोध**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी श्रीपतपिंपरी येथील गट नंबर १४८ आणि १४९ मधील शेतरस्त्याच्या वादात महसूल प्रशासनाने न्यायालयीन सुनावणी सुरू असताना जेसीबीने कारवाई करून रस्ता उखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त न्यायालयात प्रकरणाचा निकाल राखून ठेवलेला असताना बार्शी तालुक्यातील महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. या शेतरस्त्याचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याचे कारण देत नवीन रस्त्याची मागणी फेटाळली होती. मात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता मंजूर केल्यानंतर शेतकरी बाजीराव साखरे, माजी सैनिक राजाभाऊ जुगदार आणि मंदाकिनी पाटील यांनी पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे पुनर्तपासणी अर्ज (क्र. १९६/२०२५) दाखल केला होता. २४ एप्रिल रोजी या प्रकरणातील स्थगिती अर्जावर न्यायालयात कामकाज पूर्ण झाले आणि निकाल राखून ठेवण्यात आला. निकाल येण्याची अपेक्...

**बार्शीत गोमांस वाहतूक प्रकरण उघड; दोन जणांना अटक, १७५ किलो मांसासह वाहने जप्त**

इमेज
**बार्शीत गोमांस वाहतूक प्रकरण उघड; दोन जणांना अटक, १७५ किलो मांसासह वाहने जप्त**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी शहर पोलिसांनी डायल ११२ वर मिळालेल्या नागरिकांच्या टिपण्णीवरून मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे १७५ किलो मांस (अंदाजे ३५ हजार रुपयांचे) आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिस शिपाई शरद दत्तू साळवी यांच्या डायल ११२ ड्यूटीदरम्यान २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सात वाजून चार मिनिटांनी एका नागरिकाने फोन करून माणकेश्वर (ता. भूम, जि. धाराशिव) येथून बार्शीकडे गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत संशयित मार्गावर सतर्कता बाळगली. यावेळी एमएच ०९ ईएल ०८६३ क्रमांकाची ऑटो रिक्षा आणि एमएच १३ बीवाय ८५४० क्रमांकाची मोटारसायकल अडवण्यात आली. वाहनांची तपासणी केल्यावर त्यात पांढऱ्या पिशव्यांमध्ये भरलेले गोवंशीय जनावरांचे कापलेले मांस सापडले. एकूण १७५ किलो मांस जप्त करण्यात आले. ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल मिळून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घ...

**बार्शी: जमीन वादातून कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस हस्तक्षेपाने अनर्थ टळला**

इमेज
**बार्शी: जमीन वादातून कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस हस्तक्षेपाने अनर्थ टळला** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील एका कुटुंबीयांनी जमिनीच्या वादातून पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी (२४ एप्रिल) दुपारी सुमारे १२.५० वाजता घडली. संतोष साठे यांचा जागेच्या वादावरून प्रशासकीय स्तरावर दीर्घकाळ पाठपुरावा सुरू होता. तोडगा न निघाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी पंचायत समिती परिसरात आधीच बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, संतोष साठे, त्यांची पत्नी जगदेवी साठे आणि सखाराम साठे हे तिघे पेट्रोलची बाटली घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तिघांना ताब्यात घेतले. यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला गेला. या प्रकरणी तिघांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घातल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधि...

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

इमेज
**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुक्यातील खांडवी महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या श्रीपतपिंपरी परिसरात आज दुपारी निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला. पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी झाडाचा आसरा घेणे एका ४५ वर्षीय शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे. अंगावर वीज पडल्याने बाळासाहेब तानाजी गरदडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.                नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपतपिंपरी येथील घाडगे अण्णा वस्ती परिसरात बाळासाहेब गरदडे हे आपल्या शेतात (गट नंबर ७३/२) काम करत होते. दुपारी ४:४५ ते ५:०० च्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव व्हावा यासाठी बाळासाहेब शेतातील एका आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. मात्र, याच वेळी नियतीने घाला घातला. अत्यंत वेगाने या झाडावर वीज कोसळली आणि त्याखाली बसलेल्या बाळासाहेबांचा जागीच मृत्यू झाला.              प्रशासकीय कार्यवाही घटनेची...

**महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ,सुरू १७ लाख कर्मचारी-शिक्षक रस्त्यावर; प्रशासन ठप्प, महसूल-आरोग्य-शिक्षण विभागांचे कामकाज विस्कळीत**

इमेज
**महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ,सुरू १७ लाख कर्मचारी-शिक्षक रस्त्यावर; प्रशासन ठप्प, महसूल-आरोग्य-शिक्षण विभागांचे कामकाज विस्कळीत**  **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २१ एप्रिल २०२६ : राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून जुन्या पेन्शन योजनेसह प्रलंबित १८ मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. सुमारे १७ लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून, सकाळपासूनच अनेक कार्यालये ठप्प झाली आहेत. महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास विभागांसह जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि मंत्रालयातील कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या नेतृत्वाखालील समन्वय समितीने २१ एप्रिलपासून हा संप पुकारला. अधिकारी संघटनांचाही पाठिंबा मिळाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. **मुख्य मागण्या काय?**   कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे – सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) रद्द करून १९८२ च्या जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या ...

**भेंडवळच्या घटमांडणीचे २०२६ चे भाकित: राजा खुर्चीवर कायम, पण तणावात; संरक्षणावर दबाव, पाऊस अनियमित अन् शेतकऱ्यांसाठी आव्हान**

इमेज
**भेंडवळच्या घटमांडणीचे २०२६ चे भाकित: राजा खुर्चीवर कायम, पण तणावात; संरक्षणावर दबाव, पाऊस अनियमित अन् शेतकऱ्यांसाठी आव्हान**  **KDM NEWS प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेल्या भेंडवळ गावात ३५० वर्षांची अखंड परंपरा आजही जिवंत आहे. चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केलेल्या या घटमांडणीमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मातीचा घट, पाणी, विविध खाद्यपदार्थ आणि १८ प्रकारची धान्ये मांडली जातात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी वाघ कुटुंबातील वंशज सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी या बदलांचे निरीक्षण करून यंदाचे भाकित जाहीर केले. **देशाचे नेतृत्व**   देशाचा राजा (पंतप्रधान) आपल्या पदावर कायम राहील. सत्तेत मोठा बदल होणार नाही, राजकीय स्थैर्य टिकेल. मात्र, राजाला प्रचंड मानसिक व राजकीय तणावाचा सामना करावा लागेल. आंतरराष्ट्रीय दबाव, विरोधकांची नाराजी आणि कारभारातील आव्हानांमुळे नेतृत्वावर दबाव वाढेल. **युद्ध व संरक्षण परिस्थिती**   देशाची संरक्षण व्यवस्था कमकुवत दिसेल. संरक्षण खात्यावर मोठा ताण येईल. सीमेवर शत्रूंच्या कार...

**बार्शी : मित्रप्रेम युवा ग्रुप व सकल लिंगायत समाजाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिपूजन**

इमेज
**बार्शी : मित्रप्रेम युवा ग्रुप व सकल लिंगायत समाजाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिपूजन**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** मित्रप्रेम युवा ग्रुप व सकल लिंगायत समाज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष सौ. तेजस्विनी कथले, लिंगायत बोर्डिंग ट्रस्टी रावसाहेब मनगिरे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके ऍड., वासुदेव ढगे, माजी नगरसेवक प्रशांत कथले, नगरसेवक नवनाथ तात्या माळगे, मुजम्मील पठाण, अजय भानवसे, प्रशांत जाधव, आर्यन पाचपुते, ऍड. माणिक धारूरकर, ऍड. संजय साखरे, सकल लिंगायत समाज अध्यक्ष आण्णासाहेब पेठकर, दादासाहेब बगले, मल्लीनाथ गाढवे, गिरीश बरीदे, गिरीश नायकोजी, सागर स्वामी, प्रा. मयूर डोईफोडे, नानासाहेब थळकरी, दादासाहेब नष्टे, सतीश होनराव आदी मान्यवर उपस्थित होते.  मित्रप्रेम युवा मंडळाचे शशिकांत दसंगे, विठ्ठल गुडे, प्रवीण ग...