पोस्ट्स

**प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर आरोग्य मित्रांचे नाव, संपर्क क्रमांक व टोल फ्री तक्रार नंबर असलेला डिस्प्ले बोर्ड लावणे अनिवार्य**

इमेज
**प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर आरोग्य मित्रांचे नाव, संपर्क क्रमांक व टोल फ्री तक्रार नंबर असलेला डिस्प्ले बोर्ड लावणे अनिवार्य**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्ह्यातील १७ धर्मादाय रुग्णालयांमधील गरजू, गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. यासोबतच प्रत्येक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आरोग्य मित्र (आरोग्य सेवक) यांचे नाव, संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक व तक्रार निवारण क्रमांक असलेला डिस्प्ले बोर्ड १५ दिवसांत लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियोजन भवन सभागृहात झालेल्या धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, धर्मादाय निरीक्षक उमेश देशमुख, भागवत फुलसुंदर, समिती सदस्य व सर्व रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. सूर्यवंशी म्हणाले, “राज्य शासनाच्या विधी व न्या...

**बार्शीत धक्कादायक प्रकरण : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार; जबरदस्तीने गर्भपात घडवला**

इमेज
**बार्शीत धक्कादायक प्रकरण : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार; जबरदस्तीने गर्भपात घडवला**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले आणि नंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आरोपीने तिला दोन महिन्यांची गर्भवती असताना पुण्यात नेले आणि स्वतःच्या घरात जबरदस्तीने गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोहेल बाबू शेख (रा. बालाजी सिम्फोनी, पनवेल, नवी मुंबई) याने मे-जून २०२४ पासून २ मार्च २०२६ पर्यंत तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसवले. त्यानंतर बार्शी येथील एका लॉजमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा तिला गर्भधारणा झाल्याचे समजले, तेव्हा आरोपीने तिला पुणे येथे नेले आणि आपल्या राहत्या ठिकाणी एम.टी.पी. संदर्भातील औषधे जबरदस्तीने दिली. या घटनेसंदर्भात पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठा...

**डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून घारी येथे पुरस्कार वितरण**

इमेज
**डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून घारी येथे पुरस्कार वितरण**  **KDM NEWS प्रतिनिधी घारी (बार्शी) | १५ एप्रिल २०२६**भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी मौजे घारी, बार्शी तालुका येथे जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ‘ध्येय जनस्वराज्याचे, मानवतेचे हक्काचे’ असे ब्रीदवाक्य असलेल्या फाउंडेशनने विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांचा सन्मान करून कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी, सरपंच नंदकुमार काशीद, सूर्यकांत देशमुख आणि जनस्वराज्य फाउंडेशनचे संचालक दशरथ उकिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, घारी येथे झालेल्या या सोहळ्यात फाउंडेशन संचालक दशरथ उकिरडे यांनी सांगितले की, महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा फाउंडेशनचा उद्देश आहे. **पुरस्कार विजेते :** - **कलारत्न पुरस्कार** : बार्शी तालुक्यातील अभिनेते व दिग्दर्शक मह...

**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली**

इमेज
**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर - महाराष्ट्र शासनाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस २०२०) यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व आयटीडीपी अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन (आयएएस २०२२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, राज्यातील प्रशासकीय फेरबदलांच्या मालिकेत हा तिसरा मोठा बदल आहे. कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सुमारे दीड वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. अनुकंपा भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवून त्यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवला. शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली. या यशस्वी कामगिर...

**आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पंढरपूरातील विविध ठिकाणांची पाहणी**

इमेज
**आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पंढरपूरातील विविध ठिकाणांची पाहणी**  **KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर (दि. १५ एप्रिल २०२६):** आषाढी शुद्ध एकादशी सोहळा यंदा २५ जुलै २०२६ रोजी साजरा होणार असून, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसह अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक पंढरपूरला येणार आहेत. या सोहळ्यात भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गर्दी व्यवस्थापन सुरळीत व्हावे आणि पायाभूत सुविधा सक्षम व्हाव्यात, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (६५ एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप, नदीपात्र, स्काय वॉक, चंद्रभागा वाळवंट, ज्ञानेश्वर दर्शन मंडप, विसावा मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली. पाहणीवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळा आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालये आदी बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. भक्ती सागर येथेही भाविका...

**बार्शी : रेणुका कला केंद्रात नर्तिकेवर नवऱ्याकडून भाल्यासारख्या चाकूने हल्ला; छाती-पोट-पाठीवर वार, गंभीर जखमी**

इमेज
**बार्शी : रेणुका कला केंद्रात नर्तिकेवर नवऱ्याकडून भाल्यासारख्या चाकूने हल्ला; छाती-पोट-पाठीवर वार, गंभीर जखमी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी  : येथील रेणुका कला केंद्र, जामगाव (आ) तालुका बार्शी येथे राहणाऱ्या २६ वर्षीय नर्तिका अश्विनी नागेश उर्फ नंग्या काळे यांच्यावर तिच्या नवऱ्याने चाकूसारखा दिसणारा लोखंडी भाला घेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. घटना १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अश्विनी यांना छातीच्या उजव्या बाजूला, पोटाच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताच्या बोटावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. सध्या त्यांच्यावर जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार सुरू आहेत. अश्विनी काळे यांचे लग्न जितेंद्र भोसले (रा. घाटपिंपरी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्याशी झाले असून त्यांना वैष्णवी आणि महेश्वरी अशा दोन मुली आहेत. नवरा करण जितेंद्र भोसले यांना कोणतेही कामधंदा नसल्याने आणि दारूच्या व्यसनामुळे अश्विनी यांना उपजीविकेसाठी नर्तिकेचे काम करावे लागत होते. अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवरा करण याने तिला वारंवार फोनवरून “...

**काटेगावच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर गैरहजर; हृदयविकाराने युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप**

इमेज
**काटेगावच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर गैरहजर; हृदयविकाराने युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १४ : बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे एका ३८ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या निष्काळजी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी काटेगाव येथील रमीज (राजू) उमर पटेल यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने आरोग्य उपकेंद्रात नेले, परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. वेळेवर उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर उपस्थित असते तर रमीज पटेल यांचा जीव वाचला असता. यापूर्वी काटेगाव ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांच्या सतत गैरहजेरीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असे ग्रामस्थांचे आरोप आहेत. “सरकार आरोग्य सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करते, पण डॉक्टरच ग...