**राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या रिक्त जागांचे निकाल जाहीर; निवडणूक शांततेत पूर्ण**
**राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या रिक्त जागांचे निकाल जाहीर; निवडणूक शांततेत पूर्ण** **८ उमेदवार बिनविरोध; सार्वत्रिक निवडणुकीत ७२.१२% तर पोटनिवडणुकीत ७१.५५% मतदान** **KDM NEWS विशेष प्रतिनिधी / मुंबई** राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगर परिषदा आणि १४ नगर पंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रिया आज रविवारी (दि. २१ जून २०२६) मतमोजणीनंतर शांततेत संपन्न झाली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व जागांचे अधिकृत निकाल घोषित केले आहेत. या निवडणुकीत एकूण ४७ जागांपैकी ८ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते, तर जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी नगरपंचायतीमधील एका जागेसाठी एकही नामनिर्देशन पत्र (अर्ज) प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी शनिवारी थेट मतदान घेण्यात आले होते. **मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद** राज्यातील १० जिल्ह्यांतील ७ नगर परिषदा आणि ७ नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. सार्वत्रिक निवडणुकांसा...