पोस्ट्स

**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**

इमेज
**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**  **KDM NEWS प्रतिनिधी वैराग (बार्शी): मित्राला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रामाणिक सल्ला एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. "तू त्याला तक्रार करायला का सांगितलीस?" याच रागातून आरोपीने एका ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. वैराग शहरातील दत्तनगर परिसरात शनिवारी (२ मे) पहाटे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास वैराग येथील एका दुकानाजवळ काही मित्र मद्यप्राशन करण्यासाठी जमले होते. तिथे आरोपी उल्हास मुळे आणि दिनेश चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या उल्हासने हमालीचा लोखंडी ...

**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा**

इमेज
**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), २ मे २०२६:** बार्शी तालुक्यातील कव्हे गावात पैशाच्या वादातून दोघा आरोपींनी एका दलित मजुराला जातीवाचक शिवीगाळ करून दगड, लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण अभिमान चव्हाण (वय २९, धंदा- मजुरी, जात- हिंदू चांभार, रा. कव्हे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (१ मे २०२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कव्हे गावातील अनिल हजारे यांच्या खवा भट्टीजवळ व हनुमान विद्यामंदिर शाळेजवळ ही घटना घडली. आरोपी अनिल दत्तात्रय हजारे व आदित्य शंकर राऊत (दोघे रा. कव्हे) यांनी फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने डोक्यात वार करून जखमी केले आणि जवळील चाकूनेही वार केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. या घटनेत लक्ष्मण चव्हाण यांना गंभीर जखमा झाल्या...

**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**

इमेज
**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी   तालुक्यातील चिखर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन २००४-०५ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, दि. २ मे रोजी चिखर्डे येथील संभाजीराजे भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने अवघा परिसर आनंदाने न्हाऊन निघाला होता. सकाळी ९:३० वाजता ज्या शाळेत शिक्षणाचे बाळकडू मिळाले, त्याच जि. प. शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर संभाजीराजे भवन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. **गुरुजनांचा सन्मान आणि मार्गदर्शन** या सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ शिक्षक गुरव सर यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्...

**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**

इमेज
**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**  **KDM NEWS बार्शी:  प्रतिनिधी**  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ३० एप्रिल रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बार्शीच्या कुमारी प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी दैदिप्यमान यश संपादन करत महसूल विभागात 'महसूल सहाय्यक' (लिपिक-टंकलेखक) पदी आपली मोहोर उमटवली आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील गुणवत्ता कोणत्याही आव्हानावर मात करू शकते, हे बार्शीच्या प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये प्रियांका यांनी 'महसूल सहाय्यक'  पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे बिडवे कुटुंबासह संपूर्ण बार्शी आणि परंडा परिसरात आनंदाचे वातावरण आहे. २६१ गुणांसह 'ओपन' प्रवर्गातून यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक ...

**बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटर बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री; जादा दर आकारल्यास परवाना रद्द**

इमेज
**बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटर बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री; जादा दर आकारल्यास परवाना रद्द**  **KDM NEWS प्रतिनिधी पुणे :** प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली आहे. एसटी बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटरची बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सरनाईक यांनी लोणावळा बसस्थानकाची अनपेक्षित पाहणी केली. यावेळी प्रवाशांशी बोलताना 'नाथजल'च्या बाटलीला २० रुपये आकारले जात असल्याची तक्रार समोर आली. यावर मंत्री सरनाईक यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत विक्रेत्याला दरफलक स्पष्टपणे लावण्याच्या सूचना दिल्या आणि भविष्यात असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. प्रवाशांनी यावेळी आणखी एक समस्या उपस्थित केली. काही बसेस लोणावळा बसस्थानकावर थांबत नसल्याचे आणि जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना महागडे नाश्ता आणि खाद्यपदार्थ घ्यावे ल...

**सोलापूर जिल्ह्यात प्रखर उष्णता कायम; कमाल तापमान ४१-४२ अंशांपर्यंत, पुढील काही दिवसांत थोडीशी घट**

इमेज
**सोलापूर जिल्ह्यात प्रखर उष्णता कायम; कमाल तापमान ४१-४२ अंशांपर्यंत, पुढील काही दिवसांत थोडीशी घट**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : सोलापूर, ३० एप्रिल २०२६:** सोलापूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कडाक्याची उष्णता जाणवत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, काल जिल्ह्यात कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आजही ४१.६ ते ४२ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. कोरडी आणि गरम हवा यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे वेधशाळेप्रमाणे, आज सोलापूरमध्ये मुख्यतः स्वच्छ आकाश राहील. कमाल तापमान ४२ अंश आणि किमान तापमान २६ अंश राहण्याची शक्यता आहे. उद्या १ मे रोजी कमाल ४१ अंश आणि पुढील काही दिवसांत ४० ते ४१ अंशांच्या दरम्यान तापमान राहील. २ ते ५ मे दरम्यान तापमानात १ ते २ अंशांची हळूहळू घट होण्याची चिन्हे आहेत. **अवकाळी पावसाची शक्यता कमी:**   सध्या सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत अवकाळी पावसाची तीव्र शक्यता नाही. मुख्यतः स्वच्छ ते मुख्यतः स्वच्छ आकाश राहील. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हलक्या सरींसह वादळी वाऱ्या...

**भारताची १६वी जनगणना: डिजिटल युगातील ऐतिहासिक पाऊल**

इमेज
**भारताची १६वी जनगणना: डिजिटल युगातील ऐतिहासिक पाऊल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी:  बार्शी देशातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणनेचा (Census 2027) पहिला टप्पा सुरू झाला असून, नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यावर्षी प्रथमच ‘सेल्फ एन्युमरेशन’ (Self Enumeration) सुविधेद्वारे नागरिक घरबसल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतात.  महाराष्ट्रात सेल्फ एन्युमरेशनसाठी १ मे ते १५ मे २०२६ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत अधिकृत पोर्टलवर नोंदणी केल्यास प्रगणकांच्या भेटीवेळी फक्त सत्यापन करावे लागेल, ज्यामुळे प्रक्रिया वेगवान आणि अचूक होईल. महाराष्ट्रात १६ मे ते १४ जूनपर्यंत प्रगणक घरगुती भेटी देतील.  **कसे कराल सेल्फ एन्युमरेशन?**   - अधिकृत संकेतस्थळावर (se.census.gov.in) जा.   - मोबाइल नंबरवर OTP ने लॉगिन करा.   - भाषा निवडा (१६ भाषांपैकी, मराठीसह).   - घराची लोकेशन नकाशावर चिन्हांकित करा.   - घरातील सुविधा, मालमत्ता आणि कुटुंब सदस्यांची माहि...