पोस्ट्स

**ग्रामपंचायत उपनिवडणुकीचे बिगुल वाजले: राज्यातील २,४४४ ग्रामपंचायतींमधील ३,५९१ रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान**

**ग्रामपंचायत उपनिवडणुकीचे बिगुल वाजले: राज्यातील २,४४४ ग्रामपंचायतींमधील ३,५९१ रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान** महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत उपनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील ३४ जिल्ह्यांमधील २,४४४ ग्रामपंचायतींमधील ४७१ सरपंच आणि ३,१२० सदस्य अशा एकूण ३,५९१ रिक्त जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २९ एप्रिलला पार पडेल. निवडणूक कार्यक्रमानुसार ३० मार्चपासून प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे ४ ते १३ एप्रिलपर्यंत स्वीकारली जातील. १५ एप्रिलला छाननी होईल. १७ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेल आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. मतदान सकाळी ७.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालेल. रायगड जिल्ह्यात १२७ ग्रामपंचायतींमधील ३० सरपंच आणि १७० सदस्य अशा २०० जागांसाठी निवडणूक होणार आहे. अनेक ग्रामपंचायती वर्षानुवर्षे रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार चालवला जात आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सांगली, वर्धा, वाशिम, गोंदिया आदी जिल्ह्यांतही मोठ्या संख्येने र...

**बार्शी हादरली! झाडबुके मैदानात एका कुटुंबावर जमावाचा भीषण हल्ला; महिलेसह तिघे जखमी**

इमेज
**बार्शी हादरली! झाडबुके मैदानात एका कुटुंबावर जमावाचा भीषण हल्ला; महिलेसह तिघे जखमी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी येथे ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील झाडबुके मैदान परिसरात एका कुटुंबावर बेकायदेशीर जमावाने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात फिर्यादी महिला, तिची मुलगी व दोन दीर जखमी झाले असून, दोघांच्या डोक्यात वीट मारल्याने गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पुजा चव्हाण झाडबुके मैदान, बार्श  यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आरोही दुकानाकडे जात असताना तुषार लोखंडे, कृष्णा लोखंडे व सुनिल गायकवाड यांनी तिला चिडविले. ही बाब विचारण्यासाठी पुजा तिथे गेल्या असता, सुमन मोहन लोखंडे, नर्मदा नितीन गायकवाड व दिपाली विनोद बनसोडे यांनी त्यांचे केस पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याचवेळी नितीन जालिंदर गायकवाड, तुषार मोहन लोखंडे व सुनिल नितीन गायकवाड यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुजा यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी चव्हाण कुटुंबाच्या घरावर दगड फेकले. यावेळी पुजाच्या दीर संतोष...

**पुण्यात बालविवाहाचा पर्दाफाश: १७ वर्षीय मुलीचे २८ वर्षांच्या तरुणाशी लावले लग्न; ५ जणांवर गुन्हा दाखल**

इमेज
**पुण्यात बालविवाहाचा पर्दाफाश: १७ वर्षीय मुलीचे २८ वर्षांच्या तरुणाशी लावले लग्न; ५ जणांवर गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी वैराग:**बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी होत असतानाही पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी भागातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील एका २८ वर्षीय तरुणाशी लावून दिल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी स्वाती सुभाष पथाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.           **नेमकी घटना काय?** मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर (बिबवेवाडी) येथील रहिवासी असलेल्या राजनंदिनी (नाव बदललेले, वय १७) या बालिकेचा विवाह **५ डिसेंबर २०२५** रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील **संगमनेर** येथे लावून देण्यात आला होता. चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) ला या विवाहाबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला आदेश दिले होते.   ...

​कायद्याला खुंटीवर टांगले! वराचे वय २८, वधू अवघ्या १७ ची; सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

**कायद्याला खुंटीवर टांगले! वराचे वय २८, वधू अवघ्या १७ ची; सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई** सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वैराग पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम १०, ११ व २ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय बालिका राजनंदिनी बालाजी चुंगे (जन्म २८ डिसेंबर २००९) यांचा ५ डिसेंबर २०२५ रोजी २८ वर्षीय अभिमन्यू खंडेराव पाटील यांच्याशी संगमनेर, ता. बार्शी येथे बालविवाह झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहर बालविकास प्रकल्प कार्यालयातील सहायक बालविवाह प्रतिबंध अधिकारी स्वाती सुभाष पथाडे यांनी ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता दिलेल्या लेखी फिर्यादीवरून ही कारवाई सुरू झाली. फिर्यादी स्वाती पथाडे १७ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. २ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी चाईल्ड हेल्पलाइन (१०९८) वर आलेल्या तक्रारीनुसार माहिती दिली होती. त्यानुसार स्वाती पथाडे, सुरेखा सर्जेराव कांबळे (सीसीडीटी संस्था), मोनिका गुलाब जाधव (चाईल्ड हेल्पलाइन) आणि अंगणवाडी सेविका लक्ष्मी मनोज महाले यांनी १ एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील बिबवेवाडी, अप्पर इंदिरान...

**अकुलगाव शिवारात पाण्याच्या वादात नातेवाईकाकडून मारहाण; महिलेच्या मनगटावर काठीचा मार, पतीला धमकी**

इमेज
**अकुलगाव शिवारात पाण्याच्या वादात नातेवाईकाकडून मारहाण; महिलेच्या मनगटावर काठीचा मार, पतीला धमकी**  **KDM NEWS प्रतिनिधी माढा (सोलापूर), १० एप्रिल २०२६ :** माढा तालुक्यातील अकुलगाव शिवारातील सामाईक शेती गट क्रमांक ३२७ येथे ऊस पाण्यासाठी सामाईक विहिरीवर झालेल्या वादात नातेवाईक प्रणय कानिफनाथ घोडके याने फिर्यादी महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटावर लाकडी काठीने मारून जखमी केले. त्याचबरोबर प्रणयच्या वडिलांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजता घडली. फिर्यादी सौ. अनुजा बापूसाहेब घोडके (वय ३२, रा. अकुलगाव, ता. माढा) यांनी माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी जबाबात सांगितले की, त्यांचे कुटुंब (पती बापूसाहेब, सासू रसिका, मुलगा विराज व मुलगी इश्वरी) एकत्र राहते. शेती गट क्र. ३२७ मधील १० एकर शेतीची वहिवाट त्यांच्याकडे आहे. या शेतीसाठी सामाईक विहिरीचे पाणी आळीपाळीने वापरले जाते. दि. ९ एप्रिलला दुपारी ३.४५ वाजता अनुजा विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेल्या असता प्रणय कानिफनाथ घोडके याने मोटरची फ्य...

**माढ्यात सख्या चुलत्याने पुतण्यावर केला काठीने हल्ला; गुन्हा दाखल**

इमेज
**माढ्यात सख्या चुलत्याने पुतण्यावर केला काठीने हल्ला; गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी माढा**अकुलगाव (ता. माढा):** पाण्याच्या पाळीवरून सुरू असलेल्या वादातून सख्या चुलत्याने आपल्या १८ वर्षीय पुतण्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना अकुलगाव (ता. माढा) येथे घडली आहे. या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात चुलता आणि चुलती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                    घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार,  प्रणव कानिफनाथ घोडके (वय १८) हा तरुण ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेती गट नंबर ३२७ मधील सामाईक विहिरीवर गेला होता. प्रणवने पाण्याची मोटर चालू केली असता, त्याचे चुलते  बापू हंबीरराव घोडके आणि चुलती  अणुजा बापू घोडके यांनी मोटर बंद केली. प्रणवने मोटर बंद करण्याचे कारण विचारले असता, दोघांनीही त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आमची शेती भिजवल्याशिवाय तुम्ही विहिरीवर यायचे नाही," असे म्हणत त्यांनी वाद उकरून काढला. ...

**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात**

इमेज
**बार्शीच्या कव्हे गावात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (बार्शी):**बार्शी तालुक्यातील कव्हे गावातील गावठाण क्षेत्रात सध्या अवैध मुरूम उपशाने कळस गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दिवसाढवळ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मुरुमाचे उत्खनन केले जात असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  **नियम धाब्यावर बसवून उत्खनन** मिळालेल्या माहितीनुसार, गावठाण हद्दीत कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी किंवा रॉयल्टी न भरता हा मुरुमाचा उपसा सुरू आहे. उत्खनन माफियांकडून मोठ्या प्रमाणात जमिनीचे खोदकाम केले जात असून, उपसा केलेला मुरूम खासगी कामांसाठी विक्री केला जात आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला जात असतानाही स्थानिक प्रशासन सुस्त असल्याचे चित्र आहे. **प्रशासकीय दुर्लक्ष आणि 'अर्थ'पूर्ण संबंधांची नागरिकांमध्ये चर्चा** स्थानिक नागरिकांनी या उत्खननाबाबत महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्...