पोस्ट्स

**माढा | अंजनगांव खे. येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव; दोन गटांत सामाजिक वाद, प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त**

इमेज
**माढा | अंजनगांव खे. येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव; दोन गटांत सामाजिक वाद, प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त**  **KDM NEWS प्रतिनिधी माढा** सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खे. (खेलोबा) गावात मंगळवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याने दोन गटांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. शिवभक्तांनी गावातील मुख्य चौकात पुतळा बसवला, तर दुसऱ्या गटाने खेळोबा देवस्थानाच्या जागेवर हा पुतळा असल्याने त्याला विरोध दर्शवला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, गावात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. घटना अशी: पहाटे साडेचारच्या सुमारास काही शिवभक्तांनी अश्वारूढ शिवरायांचा पुतळा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारला. सकाळी पाच वाजता ग्रामपंचायत पोलिस पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर माढा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत गावकऱ्यांची गर्दी वाढली. सकाळी नऊ वाजता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. उपविभागीय अधिकारी ,उपअधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपा...

**पती-पत्नीच्या वादात पतीने तीन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही विष प्राशन करून घेतला जीव**

इमेज
**पती-पत्नीच्या वादात पतीने तीन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही विष प्राशन करून घेतला जीव**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर ** : सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नी घर सोडून माहेरी गेल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या भीमा अण्णा वाघमारे (३४) या तरुणाने आपल्या तीन लहान मुलांना वळसंगजवळील शेतात नेऊन विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. भीमा यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिन्ही मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. भीमा अण्णा वाघमारे हे एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात व पत्नीमध्ये घरगुती आणि कौटुंबिक कारणांवरून सतत वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी पत्नीने तीन मुलांसह घर सोडले आणि माहेरी निघून गेली. नातेवाईकांनी दोघांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने सासरी परत येण्यास स्पष्ट नकार दिला होता. या घटनेमुळे भीमा यांच्यावर मोठा मानसिक ताण आला होता. रात्रीच्या वेळी भीमा वाघमारे...

**गुळपोळीची भैरवनाथ यात्रा: २ एप्रिलपासून चार दिवसांचा धार्मिक उत्साह!*

इमेज
**गुळपोळीची भैरवनाथ यात्रा: २ एप्रिलपासून चार दिवसांचा धार्मिक उत्साह!*   **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**:बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ (जोगेश्वरी) महाराजांची यात्रा गुरुवार, २ एप्रिल २०२६ पासून चार दिवस मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रेला प्रारंभ होईल. यात्रेची सुरुवात शुध्द चैत्र पौर्णिमेला मध्यरात्री श्री भैरवनाथ देवाला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन होणार आहे. सकाळी ९ वाजता गुळाच्या शेरण्या देवास न्याहाळण्यास सुरुवात होईल. गाजत-गाजत भैरवनाथाची काठी घेऊन शेरण्या न्याहाळल्या जातील. सायंकाळी मंदिरात भैरवनाथाची आरती होईल. गावातील भाविकांसह बाहेरगावाहून आलेले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. दररोज मंदिरात महाप्रसाद वाटप सुरू असून, भक्तांची मोठी गर्दी असते. **यात्रेचा कार्यक्रम**   २ एप्रिल २०२६ : सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव, सकाळी १० वाजता शेरणी कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता धुमधडाका ऑर्केस्ट्रा.   ३ एप्रिल २०२६ : सकाळी ७...

**२१ वर्षांत २५ बदल्या; मुंडे यांना आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल आणि वन विभागाची अतिरिक्त जबाबदारी**

इमेज
**२१ वर्षांत २५ बदल्या; मुंडे यांना आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल आणि वन विभागाची अतिरिक्त जबाबदारी**  **KDM NEWS मुंबई| प्रतिनिधी** राज्य शासनाने ३१ मार्च २०२६ रोजी प्रशासकीय फेरबदल करत १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यामध्ये कडक शिस्त, निर्णयक्षमता आणि गैरव्यवहाराविरोधात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे २००५ बॅचचे आयएएस अधिकारी **तुकाराम मुंडे** यांचाही समावेश आहे. सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मुंडे यांना आता **आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल आणि वन विभाग** या तीन महत्त्वाच्या विभागांची सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीतील **२५वी बदली** ठरली आहे.      ..*वारंवार बदल्यांचा विक्रम गेल्या २१ वर्षांत मुंडे यांची ही २५वी बदली आहे. प्रशासनात इतक्या वारंवार बदल्या होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये असंघटित कामगार विकास आयुक्त पदावरून त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. अवघ्या आठ महिन्यांतच त्...

**कामगारच निघाला दरोडेखोर: धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १ लाख १४ हजारांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक**

इमेज
**कामगारच निघाला दरोडेखोर: धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १ लाख १४ हजारांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक**  **KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव**धाराशिव, १ एप्रिल २०२६: सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील दाळींब येथे २८ मार्चला घडलेल्या फिल्मी स्टाइल दरोड्यात १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम लुटण्याच्या गुन्ह्याचा छडा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत लावला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. २८ मार्च २०२६ रोजी लातूर येथील फिर्यादी हृषिकेश जाधव हे मुरूम येथून माल उतरवून मिळालेली १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गाडीतून जात होते. दाळींब परिसरात मोटारसायकल व पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधील सहा इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी जाधव व चालकाला मारहाण करून रोख रक्कम हिसकावून घेतली व पळ काढला. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने त...

**सोलापूर : ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण**

इमेज
**सोलापूर : ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर ** :सोलापूर शहरातील मड्डी वस्ती (भवानी पेठ, जुना तुळजापूर नाका परिसर) येथे वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने वडार समाजाने ५१ फुटी उंचीची भव्य बजरंगबली (हनुमान) मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती तब्बल १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर साकारली असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचे अनावरण होणार आहे. वडार महाराष्ट्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले की, “प्रत्येक समाजाचे एक श्रद्धास्थान असते. वडार समाजाचे आराध्य दैवत बजरंगबली असल्याने राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला. मूर्तिकार शेखर शहाणे यांनी ही मूर्ती साकारली आहे.” यानिमित्ताने समाज बांधवांना संघटित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दुग्धाभिषेक करण्यात आला. जयंतीदिनी महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला. यासोबत धार्मिक कार्यक्रम व संघटनेचे मेळावे आयोजित करून समाजात जागृती ...

**तब्बल १५ वर्षांनंतर आजपासून देशभरात जनगणनेचा प्रारंभ**

इमेज
**तब्बल १५ वर्षांनंतर आजपासून देशभरात जनगणनेचा प्रारंभ**  ** KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, १ एप्रिल २०२६: २०११ नंतर प्रथमच आजपासून भारताची जनगणना सुरू होत आहे. ही १६वी राष्ट्रीय जनगणना असून, ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. केंद्र सरकारने दोन टप्प्यांत जनगणना घेण्याचे जाहीर केले आहे. पहिला टप्पा (घर-सूचीकरण आणि आवास जनगणना) आज १ एप्रिलपासून सुरू होऊन ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत चालेल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या सोयीनुसार या कालावधीत ३० दिवसांचा कालखंड निवडेल. दुसरा टप्पा (लोकसंख्या गणना) फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. पहिल्या टप्प्यात घराची स्थिती, सुविधा आणि घरगुती मालमत्ता याविषयी **३३ प्रश्न** विचारले जातील. ही जनगणना पहिल्यांदाच मोबाइल अॅपद्वारे (ऑफलाइन काम करणारे, १६ भाषांत उपलब्ध) घेतली जाणार आहे. सुमारे ३० लाख गणक घराघरात जाऊन माहिती घेतील. नागरिकांना स्व-गणना (सेल्फ-एन्युमरेशन) पोर्टलवर १५ दिवस आधी स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही कागदपत्र दाखवण्याची गरज नाही. सर्व माहिती गोपनीय राहील आणि फक्त विकास नियोजनास...