पोस्ट्स

*चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून हिंसक वाद; महिलांवर हल्ले, बार्शी युवा सेनेचे आंदोलन**

इमेज
*चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून हिंसक वाद; महिलांवर हल्ले, बार्शी युवा सेनेचे आंदोलन* **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारलेल्या पुतळ्यावरून वाद चिघळला. विरोधकांनी पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, दगडफेक झाली आणि महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हिंसक घटनेत उबाठा शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांसह अनेक महिलांना मारहाण झाली. गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. या निंदनीय घटनेचा निषेध करत बार्शी युवा सेनेने तहसील कार्यालयात आंदोलन करून निवेदन दिले. सरपंच व सहभागींवर  *मोक्का* अंतर्गत तत्काळ कारवाई आणि अटक करण्याची मागणी केली. शासनाने कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींचा उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन पाटील, युवती सेनेच्या रजनी पाटील, नगरसेवक आकाश राऊत...

**बार्शी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त; तीन आरोपींवर गुन्हा दाखल**

इमेज
*बार्शी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त; तीन आरोपींवर गुन्हा दाखल* **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढोराळे गावातील भोगावती नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करताना तहसीलदारांच्या आदेशानुसार पथकाने धाड टाकली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि एक जेसीबी जप्त करण्यात आले असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. मंडळ अधिकारी सारिका धोंडीराम राऊत (वय ३६, रा कासारवाडी रोड, बार्शी यांनी दिलेल्या जबाबानुसार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता तहसील कार्यालय बार्शी येथून तहसीलदारांच्या आदेशानुसार पथकाने ढोराळे येथील भोगावती नदीपात्राची तपासणी केली. पथकात मंडळ अधिकारी सौंदरे यू. एच. डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी सौंदरे मोहिते, कुसळम औदुंबर शिंदे, वैराग सचिन शिंदे, देवगाव विनोद मुंढे, ढोराळे रमाकांत देशमुख आणि वैराग पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल २२१२ चव्हाण व १०८४ पठाण यांचा...

*बार्शी शहरात पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल, रोकड व दागिने लुटले*

इमेज
*बार्शी शहरात पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल, रोकड व दागिने लुटले*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : शहरातील उपाळाई रोड भागात जुन्या वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला होऊन घराची तोडफोड करण्यात आली. या घटनेत तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत झाली, तसेच १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे १० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट झाली. बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे. फिर्यादी गणेश अरुण बोरगावकर (वय ३८, रा. उपाळाई रोड, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नातेवाईकांसंबंधीचा जुना वाद आरोपींनी उकरून काढला. एक तरुणी पुन्हा बेपत्ता झाल्याच्या संशयावरून आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबावर रोष धरला. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या नातेवाईकांच्या घरासमोर धडकले आणि वाद घालू लागले. यावेळी त्यांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हल्ल्यात तलवारीने वार...

*मुंबई मंत्रालय लाचखोरी प्रकरण: नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन; प्रतिनियुक्ती रद्द, खासगी सचिवही हटवले*

इमेज
*मुंबई मंत्रालय लाचखोरी प्रकरण: नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन; प्रतिनियुक्ती रद्द, खासगी सचिवही हटवले*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० फेब्रुवारी: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक झालेल्या लिपिक राजेंद्र (राजू) ढेरिंगेला मुंबई सत्र न्यायालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ढेरिंगेला १२ फेब्रुवारीला मंत्रालयात रंगेहाथ पकडण्यात आले होते, ज्यात त्याने औषध दुकानाच्या निलंबित परवान्याला स्थगिती देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. न्यायालयाने अटकेनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र जामीन अर्जावर सुनावणी घेत दिलासा दिला. दरम्यान, मंत्री झिरवाळ यांनी ढेरिंगेची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याला मूळ विभागात पाठवले असून, खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांनाही पदमुक्त करून कृषी विभागातील मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुरुवात ७ फेब्रुवारीला झाली, जेव्हा एका तक्रारदाराने (नाम निर्मल शर्मा, एका औषध दुकानाचे मालक) आपल्य...

*तहसीलदार मुंढे लाचखोरी प्रकरणात ACB च्या जाळ्यात; ५० हजारांची मागणी, २० हजारांवर सौदा*

इमेज
*परळी तहसीलदार व्यंकटेश मुंढे लाचखोरी प्रकरणात ACB च्या जाळ्यात; ५० हजारांची मागणी, २० हजारांवर सौदा*  *KDM NEWS प्रतिनिधी बीड, २० फेब्रुवारी :* बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत तहसीलदार व्यंकटेश मुंढे  यांना लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले. एका तक्रारदाराकडून 'सालंसी प्रमाणपत्र' (ऐपतीचे प्रमाणपत्र किंवा solvency certificate) देण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपयांवर आणण्यात आली होती. तक्रारदाराने ACB कडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला आणि मुंडे यांना जाळ्यात अडकवले. कारवाई दुपारी परळी तहसील कार्यालयातच पार पडली. ACB च्या पथकाने तक्रारदाराच्या माध्यमातून पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी पैसे थेट स्वीकारले नाहीत, पण लाच मागितल्याचा पुरावा आणि तक्रार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ACB च्या उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून, पथकाने कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर प...

*एसटी महामंडळाला नवे पंख: ८३०० नवीन बसेस जोडून आर्थिक संकटावर मात करण्याचा निर्धार*

इमेज
*एसटी महामंडळाला नवे पंख: ८३०० नवीन बसेस जोडून आर्थिक संकटावर मात करण्याचा निर्धार*  *KDM NEWS मुंबई, २० फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या योजनेला गती देत आहे. दररोज १ ते १.५ कोटी रुपयांच्या महसुली तुटीत अडकलेल्या एसटीला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न आपोआप वाढेल. वर्षाअखेरपर्यंत महामंडळ आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. कोविडपूर्व काळात एसटीच्या ताफ्यात १८ ते १९ हजार बसेस होत्या आणि दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी प्रवास करत असत. महामारी, कर्मचारी संप आणि बस खरेदी प्रक्रियेच्या मंद गतीमुळे सध्या ताफ्यात फक्त १२,६०० बसेस उपलब्ध आहेत. यामुळे सेवा अपुरी पडत असून, दररोज फक्त ५० लाख प्रवासी लाभ घेत आहेत. खर्च ३४-३५ कोटी रुपये असताना उत्पन्न केवळ ३३...

*अजित पवार निधनानंतर अल्पसंख्याक विभागातील घोटाळा; फडणवीसांची कठोर कारवाई*

इमेज
*अजित पवार निधनानंतर अल्पसंख्याक विभागातील घोटाळा; फडणवीसांची कठोर कारवाई*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६** - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारीच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विकास विभागात घडलेल्या अनियमिततेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच विभागाने स्थगित असलेल्या ७५ शिक्षण संस्थांच्या फाईलींवर स्वाक्षऱ्या करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे जारी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंजुरी तात्काळ स्थगित केल्या असून, दोषी अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अजित पवार यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचे प्रभार होते. मागील वर्षी ऑगस्टपासून या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, २८ जानेवारी दुपारी ३.०९ वाजता पहिले प्रमाणपत्र जारी झाले. त्यानंतर २९-३० जानेवारी आणि २ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७५ संस्थांना दर्जा देण्यात आला. यात काही प्रमाणपत्रे सायंकाळी उशिरा ६.४५ ते ६.५८ वाजता जारी झाली. राज्या...