पोस्ट्स

**पावसात भिजले, हिंदुत्वाचे रणशिंग फुंकले; उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा आंदोलना'ने दादर दणाणले!**

इमेज
**पावसात भिजले, हिंदुत्वाचे रणशिंग फुंकले; उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा आंदोलना'ने दादर दणाणले!**  #KDM NEWS प्रतिनिधी मुंबई ५ जुलै : मुंबईतील दादर येथील श्री हनुमान मंदिरात मुसळधार पावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख **उद्धव ठाकरे** यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत महाआरती व भाषण केले. ना छत्री, ना रेनकोट, फक्त भगवा सदरा घालून ते चिंब भिजले तरी कार्यकर्त्यांना संबोधित करत राहिले. या दृश्याने उपस्थित हजारो रामभक्तांच्या मनात हिंदुत्वाची ज्योत अधिक प्रखर केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “हा हिंदू वेडा नाही. पावसात चिंब भिजूनही रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणतोय. ही पावसात पेटलेली ठिणगी आहे.” त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या पार्श्वभूमीवर हा आंदोलन सुरू केल्याचे स्पष्ट केले. “हिंदूंच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन मंदिर लुटणाऱ्यांना आता माफ केले जाणार नाही. आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे, राम सर्वांचा आहे,” असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी हनुमानाच्या मशालीचा उल्लेख करत अन्य...

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

इमेज
**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी पुणे/महाराष्ट्र:** अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य केंद्र मंचर (आंबेगाव तालुका, पुणे) असलेल्या या टोळीने स्किम मिल्क पावडर, डेअरी व्हे पावडर, इमल्सिफायर, पाम तेल, डिटर्जंट आणि शॅम्पूसारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून बनावट दूध तयार केले. हे दूध दिसायला, वासाने आणि चवीने खऱ्या दुधासारखे वाटावे यासाठी विशेष मिश्रण केले जात होते. या कारवाईत पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, जालना आणि ठाणे (भिवंडी) या जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. सुमारे २.५ कोटी रुपयांचा भेसळयुक्त मुद्देमाल, कच्चा माल आणि साहित्य जप्त करण्यात आले. २० हजार लिटर संशयास्पद कृत्रिम दूध जागेवर नष्ट करण्यात आले. मुख्य सूत्रधार सुशांत बबनराव हिंगे (मंचर) याच्यासह १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख...

*"बार्शीत दहशतीचे वातावरण; सौंदरे गावात आई-मुलाला बेदम मारहाण करत फोडला २५ हजारांचा मोबाईल"*

इमेज
*"बार्शीत दहशतीचे वातावरण; सौंदरे गावात आई-मुलाला बेदम मारहाण करत फोडला २५ हजारांचा मोबाईल"*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ६ जुलै २०२६:** बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ नोंद झालेल्या एका धक्कादायक घटनेत स्थानिक गावकऱ्यांनी एका महिलेचा मुलगा विनाकारण शिवीगाळ करतो म्हणून त्याला आणि त्याच्या आईला जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात लोखंडी कोयता, लाकडी पट्टी, काठी आणि दगडांचा वापर करण्यात आला. आरोपींनी फियादीचा मोबाईल फोडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही सांगण्यात आले आहे. फियादी सुनिता दौलत मोरे (४६ वर्षे, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे सौंदरे गावातील अविनाश लोंढे यांच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपींनी फियादीला "तुझा मुलगा आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतो" असे म्हणत हल्ला चढवला. फियादीचा मुलगा किरण दौलत मोरे याला गंभीर मारहाण करण्यात आली. फियादी स्वतः हाताने आणि लाथाबुक्याने मार खाल्ल्याचे सांगितले. हल्ल्यादरम्यान फियादी मोबाईलवर ...

**बार्शी दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ५१ आरोपींना कळंबा कारागृहात स्थलांतर**

इमेज
**बार्शी दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ५१ आरोपींना कळंबा कारागृहात स्थलांतर**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ५ जुलै २०२६:** राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व दुय्यम कारागृहे बंद करण्याच्या प्रक्रियेत आज बार्शी दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद झाले. येथील ५१ आरोपींना सकाळी १०.२० वाजता कळंबा (कोल्हापूर) कारागृहात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. माजी तुरुंगाधिकारी श्री. संदीप नालपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागाच्या नियंत्रणाखालील बार्शी दुय्यम कारागृहाचे अधिक्षक श्री. एफ. आर. शेख यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. राज्य सरकारने जून २०२६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार एकूण ११६ दुय्यम कारागृहे बंद करण्यात येत आहेत. यापैकी अनेक कारागृहे आधीच बंद अवस्थेत होती. उर्वरित कार्यरत कारागृहांतील कैद्यांना जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहांत हलवण्यात येत आहे. बार्शी दुय्यम कारागृह ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या प्रणालीचा भाग होते. येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शिस्त, सुरक्षा आणि पुनर्वसनाची जबाबदारी पार पाडली. बंदीजनांच्या ...

**लातूरच्या निलंग्यात सावकारीचा भयावह प्रकार: मित्रासाठी जामीन राहिल्याने दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची पाच एकर जमीन**

इमेज
**लातूरच्या निलंग्यात सावकारीचा भयावह प्रकार: मित्रासाठी जामीन राहिल्याने दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची पाच एकर जमीन**  **KDM NEWS प्रतिनिधी नणंद (लातूर):** मित्राच्या आर्थिक अडचणीमुळे जामीनदार राहणे एका तरुण शेतकऱ्याला चांगलेच भोवले. खासगी सावकाराने अवघ्या दीड लाख रुपयांच्या कर्जासाठी सव्वा कोटी रुपयांची पाच एकर शेती बळकावली. हा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील नणंद गावात उघडकीस आला आहे. पीडिताचे नाव पुंडलिक भोसले आहे. पुंडलिक भोसले यांच्या एका मित्राने चार वर्षांपूर्वी खासगी सावकाराकडून दीड लाख रुपये कर्ज घेतले. पुंडलिक यांनी या कर्जासाठी जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली. मित्राने कर्ज वेळेत फेडले नाही. त्यामुळे सावकाराने जामीनदार पुंडलिक यांच्यावर दबाव टाकला. व्याजावर व्याज लावत कर्जाचा डोंगर इतका वाढवला की, पुंडलिक यांना नाईलाजाने आपली पाच एकर शेती (अंदाजे सव्वा कोटी रुपये किंमत) सावकाराच्या नावावर रजिस्टर करून द्यावी लागली. जमीन सावकाराच्या नावावर केल्यानंतरही सावकाराचा तगादा थांबला नाही. त्याने अजून ७० ते ८० लाख रुपये व्याज बाकी अ...

**करमाळा-कुर्डुवाडी मार्गावर भीषण अपघात; टँकर आणि पिकअपच्या धडकेत दोन मजुरांचा मृत्यू, आठ जखमी**

इमेज
**करमाळा-कुर्डुवाडी मार्गावर भीषण अपघात; टँकर आणि पिकअपच्या धडकेत दोन मजुरांचा मृत्यू, आठ जखमी**  **KDM NEWS प्रतिनिधी**करमाळा: करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावर वरकुटे गावच्या शिवारात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण मजुरांचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकरने मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.             अपघाताची पार्श्वभूमी पिकअप चालक योगेश शिवाजी घाडगे (रा. शिरगाव, ता. पंढरपूर) हे कासेगाव येथील द्राक्षबागेत काम करणाऱ्या मजुरांना घेऊन त्यांच्या गावी, पेठ (जि. नाशिक) येथे जात होते. रात्री ११:४० च्या सुमारास त्यांचे वाहन वरकुटे शिवारात पोहोचले असता, मागून भरधाव आलेल्या दुधाच्या टँकरने पिकअपला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचे मोठे नुकसान झाले. मृत आणि जखमींची माहिती या अपघातात गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील नाचनखडक (ता. कापराडा) गावचे रहिवासी असलेले दीपकभाई शंकरभाई हिंड (वय १९) आणि लताबेन शंकरभाई हिंड (वय १८) या दोन तरुण मजुरांचा जागीच म...

**बार्शी नगरपरिषद प्रभाग २० : मुजम्मील पठाण यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू**

इमेज
**बार्शी नगरपरिषद प्रभाग २० : मुजम्मील पठाण यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी)** - नुकत्याच पार पडलेल्या बार्शी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मुजम्मील जहांगिर पठाण यांनी विजय मिळवला. मात्र, त्यांना तीन अपत्य असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ अंतर्गत ते नगरसेवक पदासाठी अपात्र ठरल्याची मागणी माजी नगरसेवक अॅड. महेश जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शासनाच्या दोन अपत्य धोरणानुसार तीन किंवा अधिक अपत्य असणाऱ्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करता येत नाही. पठाण यांनी अपत्यांची संख्या लपवून निवडणूक आयोग व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप जगताप यांनी अर्जात केला आहे. यामुळे त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (नगरपरिषद प्रशासन शाखा) यांच्या वतीने आशिष लोकरे यांनी १ जुलै २०२६ रोजी पठाण यांना सात दिवसांत खुलासा व आवश्यक कागदपत्रांसह म्हणणे सादर करण्याची नोट...