पोस्ट्स

**प्रशासनाला जाग आली! ग्रामस्थांच्या अनोख्या आंदोलनानंतर साकत चौकातील ड्रेनेज पुलाची दुरुस्ती सुरू**

इमेज
**प्रशासनाला जाग आली! ग्रामस्थांच्या अनोख्या आंदोलनानंतर साकत चौकातील ड्रेनेज पुलाची दुरुस्ती सुरू**  **KDM NEWS प्रतिनिधी पानगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर):** बार्शी–सोलापूर महामार्गावरील साकत चौकातील खंडोबा नगर परिसरात अनेक दिवसांपासून तुटलेल्या ड्रेनेज पुलाच्या स्लॅबमुळे निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले आहे. ग्रामस्थांनी खड्ड्यात झाड लावून केलेल्या आंदोलनानंतर प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने तातडीने काम हाती घेतले. साकत चौकातील हा ड्रेनेज पुलाचा स्लॅब तुटल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. विशेषतः रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत होते. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या तरी दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. खड्ड्यात झाड लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दुरुस्तीचे आदेश दिले. सध्या काम युद्धपातळीवर सुरू असून, आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पुलाच्या स्लॅबची पूर्ण दुरुस्ती करण्याचे काम वेगाने चालू आहे. काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी स...

**सोलापूर ग्रामीण : देशी बनावट पिस्तुलांसह ४ जणांना अटक; ३ पिस्तुल, ६ काडतुसे जप्त**

इमेज
**सोलापूर ग्रामीण : देशी बनावट पिस्तुलांसह ४ जणांना अटक; ३ पिस्तुल, ६ काडतुसे जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला तालुक्यातील हातीद येथे सांगोला-मिरज महामार्गावरील ब्रिजखाली छापा टाकून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या चार संशयितांना अटक केली. या कारवाईत तीन देशी बनावट पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे आणि चार मोबाइल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४६ हजार २०० रुपये आहे. मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या देखरेखीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपनिरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने हातीद गावाजवळील ब्रिजखाली तीन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे : - अवधूत सुभाष कैगार (२७), रा. कोळा, ता. सांगोला - हर्शवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (२४), रा. किडेभीसरी, ता. सांगोला - आबा धोंडीराम नरळे (२९), रा. जुनोनी, ता. सां...

**बार्शी शहर पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना: सरकारी CCTV ची स्क्रीन फोडली, सात जणांवर गुन्हा दाखल**

इमेज
**बार्शी शहर पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना: सरकारी CCTV ची स्क्रीन फोडली, सात जणांवर गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर)**: कायद्याचे रक्षण करणाऱ्या ठाण्यातच कायद्याला आव्हान देणारी घटना घडली आहे. मंगळवारी (५ जुलै २०२६) मध्यरात्री मांगडे चाळ परिसरातील भांडणातून दोन गटांतील व्यक्तींना चौकशीसाठी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर, ठाण्यातच धिंगाणा घालून सरकारी CCTV च्या LED स्क्रीनची तोडफोड करण्यात आली. या प्रकारात प्लास्टिकची खुर्ची आणि CCTV स्क्रीनचे सुमारे १०,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस नोंदीनुसार, रात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास मांगडे चाळ येथे दोन गटांमध्ये जोरदार भांडण सुरू असल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाली. पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही गटातील सात जणांना चौकशीसाठी ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान दोन्ही गटांतील व्यक्तींमध्ये पुन्हा वाद चिघळला. आरडाओरडा, शिवीगाळ आणि धमक्या सुरू झाल्या. पोलिसांच्या समजावणीकडे दुर्लक्ष करत आरोपींनी ठाण्यात गोंधळ घातला. संतापाच्या भरात आरबाज रज्जाक सय्यद याने प्लास्टिकची खुर्ची उचलून द...

**पावसात भिजले, हिंदुत्वाचे रणशिंग फुंकले; उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा आंदोलना'ने दादर दणाणले!**

इमेज
**पावसात भिजले, हिंदुत्वाचे रणशिंग फुंकले; उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा आंदोलना'ने दादर दणाणले!**  #KDM NEWS प्रतिनिधी मुंबई ५ जुलै : मुंबईतील दादर येथील श्री हनुमान मंदिरात मुसळधार पावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख **उद्धव ठाकरे** यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत महाआरती व भाषण केले. ना छत्री, ना रेनकोट, फक्त भगवा सदरा घालून ते चिंब भिजले तरी कार्यकर्त्यांना संबोधित करत राहिले. या दृश्याने उपस्थित हजारो रामभक्तांच्या मनात हिंदुत्वाची ज्योत अधिक प्रखर केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “हा हिंदू वेडा नाही. पावसात चिंब भिजूनही रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणतोय. ही पावसात पेटलेली ठिणगी आहे.” त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या पार्श्वभूमीवर हा आंदोलन सुरू केल्याचे स्पष्ट केले. “हिंदूंच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन मंदिर लुटणाऱ्यांना आता माफ केले जाणार नाही. आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे, राम सर्वांचा आहे,” असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी हनुमानाच्या मशालीचा उल्लेख करत अन्य...

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

इमेज
**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी पुणे/महाराष्ट्र:** अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य केंद्र मंचर (आंबेगाव तालुका, पुणे) असलेल्या या टोळीने स्किम मिल्क पावडर, डेअरी व्हे पावडर, इमल्सिफायर, पाम तेल, डिटर्जंट आणि शॅम्पूसारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून बनावट दूध तयार केले. हे दूध दिसायला, वासाने आणि चवीने खऱ्या दुधासारखे वाटावे यासाठी विशेष मिश्रण केले जात होते. या कारवाईत पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, जालना आणि ठाणे (भिवंडी) या जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. सुमारे २.५ कोटी रुपयांचा भेसळयुक्त मुद्देमाल, कच्चा माल आणि साहित्य जप्त करण्यात आले. २० हजार लिटर संशयास्पद कृत्रिम दूध जागेवर नष्ट करण्यात आले. मुख्य सूत्रधार सुशांत बबनराव हिंगे (मंचर) याच्यासह १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख...

*"बार्शीत दहशतीचे वातावरण; सौंदरे गावात आई-मुलाला बेदम मारहाण करत फोडला २५ हजारांचा मोबाईल"*

इमेज
*"बार्शीत दहशतीचे वातावरण; सौंदरे गावात आई-मुलाला बेदम मारहाण करत फोडला २५ हजारांचा मोबाईल"*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ६ जुलै २०२६:** बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ नोंद झालेल्या एका धक्कादायक घटनेत स्थानिक गावकऱ्यांनी एका महिलेचा मुलगा विनाकारण शिवीगाळ करतो म्हणून त्याला आणि त्याच्या आईला जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात लोखंडी कोयता, लाकडी पट्टी, काठी आणि दगडांचा वापर करण्यात आला. आरोपींनी फियादीचा मोबाईल फोडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही सांगण्यात आले आहे. फियादी सुनिता दौलत मोरे (४६ वर्षे, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे सौंदरे गावातील अविनाश लोंढे यांच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपींनी फियादीला "तुझा मुलगा आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतो" असे म्हणत हल्ला चढवला. फियादीचा मुलगा किरण दौलत मोरे याला गंभीर मारहाण करण्यात आली. फियादी स्वतः हाताने आणि लाथाबुक्याने मार खाल्ल्याचे सांगितले. हल्ल्यादरम्यान फियादी मोबाईलवर ...

**बार्शी दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ५१ आरोपींना कळंबा कारागृहात स्थलांतर**

इमेज
**बार्शी दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ५१ आरोपींना कळंबा कारागृहात स्थलांतर**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ५ जुलै २०२६:** राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व दुय्यम कारागृहे बंद करण्याच्या प्रक्रियेत आज बार्शी दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद झाले. येथील ५१ आरोपींना सकाळी १०.२० वाजता कळंबा (कोल्हापूर) कारागृहात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. माजी तुरुंगाधिकारी श्री. संदीप नालपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागाच्या नियंत्रणाखालील बार्शी दुय्यम कारागृहाचे अधिक्षक श्री. एफ. आर. शेख यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. राज्य सरकारने जून २०२६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार एकूण ११६ दुय्यम कारागृहे बंद करण्यात येत आहेत. यापैकी अनेक कारागृहे आधीच बंद अवस्थेत होती. उर्वरित कार्यरत कारागृहांतील कैद्यांना जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहांत हलवण्यात येत आहे. बार्शी दुय्यम कारागृह ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या प्रणालीचा भाग होते. येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शिस्त, सुरक्षा आणि पुनर्वसनाची जबाबदारी पार पाडली. बंदीजनांच्या ...