पोस्ट्स

*जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत!*

इमेज
*जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत!*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २४ ऑगस्ट : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन त्यांचे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्गखोल्यांची प्रत्यक्ष स्थिती तपासून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सोमवारी मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शाळांचे वर्गीकरण करताना मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेशा व सुव्यवस्थित वर्गखोल्या तसेच वीज सुविधा यांचा प्राधान्याने विचार करण्याचे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले. ...

*बार्शी तालुक्यात समाजकारणाच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला; तलवार, लोखंडी पाईप व रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!*

इमेज
*बार्शी तालुक्यात समाजकारणाच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला; तलवार, लोखंडी पाईप व रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!*  *KDM_NEWS_प्रतिनिधी बार्शी, २४ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास समाजकारणाच्या कारणावरून एका युवकावर तलवार, लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला करण्यात आला. फिर्यादी संजय विलास आरगडे (वय ३१, रियल इस्टेट व्यवसाय, रा. तावडी ता. बार्शी) यांना डोक्यात, हातांवर, नडग्यांवर आणि पाठीवर जखमा झाल्या असून ते सध्या बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटलच्या न्युरो स्टेप डाउन युनिटमध्ये उपचार घेत आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७०/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १०९, ११८ (२), ११८ (१), १२६ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून १) समाधान दादाराव मोरे (रा. तावडी), २) लक्ष्मण यादव (रा. जामगाव पा) आणि ३) महादेव झोडगे (रा. आरणगाव) यांची नोंद झाली आहे. हकिकतीनुसार, फिर्यादी मोटारसायकलवरून घरातून बार्शीकडे जात असताना मौजे फपाळवाडी येथील दत्ता दळवी यांच्या घरासमोरील रस्त्यावर आरोपींनी पांढऱ्या...

*बार्शी: 'तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस' म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर चाकूने वार; आरोपीवर गुन्हा दाखल*

इमेज
*बार्शी: 'तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस' म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर चाकूने वार; आरोपीवर गुन्हा दाखल*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २५ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता एका शेतकऱ्यावर चाकूने हल्ला करून जखमी करण्यात आले. आरोपीने पीडिताच्या पाठीवर वार केला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी केली आणि शर्टच्या खिशातून ४२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी समाधान दादाराव मोरे (वय ३५, शेती, रा. तावडी, ता. बार्शी) सध्या सुवीधा हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार घेत आहेत. आरोपी संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची हकिकत अशी : १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुमारास मौजे फपाळवाडी येथील सागर चव्हाण यांच्या किराणा दुकानाजवळ तावडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी होता. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडे येऊन म्हटले, “तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस, तुला लय नाज आला आहे.” त्यानंतर आरोपीने जवळील चाकूने फिर्यादीच्या पाठीवर वार केला. लाथाबुक्क्या...

*इन्स्टाग्रामची ओळख ठरली जीवघेणी; विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाची बेदम मारहाणीत हत्या*

इमेज
**इन्स्टाग्रामची ओळख ठरली जीवघेणी; विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाची बेदम मारहाणीत हत्या**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या ४२ वर्षीय विवाहित महिलेसोबतचे संबंध अखेर २७ वर्षीय तरुणाला महागात पडले. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगाव येथील ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के याची महिलेच्या पती, मुलगा आणि साथीदारांकडून बेदम मारहाण झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अरविंदचा शनिवारी (२२ ऑगस्ट) सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी अरविंदची माळुंब्रा (तालुका तुळजापूर) येथील ४२ वर्षीय विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तीन महिने फोनवर बोलण्यानंतर एप्रिलमध्ये ती अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस राहिली. नंतर पुन्हा येऊन तिने लग्नाचा आग्रह धरला. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली आणि सासरी परत गेलीच नाही. पती तिला न्यायला आला तेव्हा तिने नकार दिला आणि जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. काही दिवसांनी महिला पतीच्या घरी गेली. १३ ऑगस्टला अरविंदने आईला सांगितले की महिला भेटायला बोलवत आहे. १५ ऑगस्ट...

**५७ तहसिलदारांना उप जिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती; मतदार याद्यांच्या पुनरिक्षणानंतर पदस्थापना**

इमेज
**५७ तहसिलदारांना उप जिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती; मतदार याद्यांच्या पुनरिक्षणानंतर पदस्थापना**  KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० ऑगस्ट २०२६ : महसूल व वन विभागाने निवडसूची वर्ष २०२५-२६ साठी तहसिलदार संवर्गातील ५७ पात्र अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी संवर्गात निव्वळ तात्पुरत्या (तदर्थ) स्वरूपात पदोन्नती देण्याचे शासन आदेश जारी केले आहेत. **शासन आदेशाचे मुख्य मुद्दे :** - शासन आदेश क्र. पदोन्नती-१०२५/प्र.क्र. २४६/आस्था-२, दिनांक २० ऑगस्ट २०२६. - तहसिलदार (एस-१९ : रु. ५५,१००-१,७५,१००) यांना उप जिल्हाधिकारी (एस-२० : रु. ५६,१००-१,७७,५००) पदावर तात्पुरती पदोन्नती. - जेष्ठता क्रमांक २१२६ ते २४९९ पर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश. यात खुला, इ.मा.व., अ.जा., अ.ज., भ.ज.(क/ब/ड) आणि वि.जा.अ. प्रवर्गातील अधिकारी आहेत. - काही प्रमुख नावे : संदिपकुमार भोसले, महेश सावंत, मनिषा मेने, अमोल कदम, पुरुषोत्तम भुसारी, सुरेश काशीद, जयराज सुर्यवंशी, सुशील बेल्हेकर, सुरेंद्र देशमुख, जीवक्कुमार कांबळे, अनिलकुमार हेळकर, संतोष डोईफोडे, रविंद्र होळी, सुरेखा स्वामी, हरिश्चंद्र गाडे, प्रशांत सांगडे, सी...

**जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अंतरमशागत करा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन**

इमेज
**जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अंतरमशागत करा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑगस्ट :** बार्शी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीचा वेग वाढला असून एकूण पेरणी क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त झाले आहे. तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या साप्ताहिक अहवालानुसार, एकूण ७३ हजार १७७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी आतापर्यंत ८७ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ११९.५५ टक्के आहे. सोयाबीनने सर्वाधिक वाढ दाखवली आहे. सरासरी ५६ हजार ४७२ हेक्टर क्षेत्राऐवजी ८२ हजार ८७५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हे प्रमाण तब्बल १४६.७५ टक्के आहे. एकूण गळीतधान्यांचे पेरणी क्षेत्रही १४६.४६ टक्के गाठले आहे. अन्नधान्यांच्या पेरणीत मात्र मंदी दिसून येत आहे. एकूण अन्नधान्य पेरणी केवळ २७.७३ टक्के झाली आहे. यात तूर ३९.५६ टक्के, उडीद १७.७४ टक्के तर मूग केवळ ९.३६ टक्के पेरणी झाली आहे. मक्याची पेरणी ६३.८२ टक्के पूर्ण झाली आहे. भात, ज्वारी, बाजरी, राळा आणि राजगिरा या पिकांची पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. तालुका कृषि अधिकाऱ्यांनी पावसाचा खंड अस...

**नागपुरात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान**

इमेज
**नागपुरात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान**  **KDM NEWS प्रतिनिधी नागपूर :** महाराष्ट्रभूषण, पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ८० व्या वर्षात पदार्पण निमित्ताने बुधवारी (१९ ऑगस्ट) येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्हासोबत नागपूर महानगरपालिकेतर्फे पाच लाख रुपये, विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे ५१ हजार रुपये आणि सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे एक लाख रुपये असे धनादेश देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्य...