रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ

रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ#रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ...

#कंपन्यांच्या मनमानीने शेतकरी मेटाकुटीस #पिकांचे उत्पादन घटले; केलेला खर्च निघेना याआधी खतांच्या किमतीत सर्वाधिक दरवाढ ही में २०२१ मध्ये झाली होती. मात्र, आता किमान सरासरी चाळीस टक्केहून अधिक खतांच्या किमती भडकल्या आहेत. मात्र, याची शासन पातळीवर काहीच दखल घेतली नाही, यामुळे शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

सर्वसाधारणपणे खतांच्या दरात नोव्हेंबरमध्ये वाढ होते. याचीच पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी प्रथमच विविध कंपन्यांनी खतांचे दर वाढविताना मनमानीपणाचा कळस केला आहे. मे २०२१ मध्ये जाहीर झालेल्या दरवाढीनुसार महाधन, सरदार, आयपीएल या कंपन्यांची आघाडी राहिली होती. अर्थात या वाढीत केंद्र सरकारने युरियाचा दर मात्र काही प्रमाणात आवाक्यात ठेवला आहे. मे २१ मध्ये युरियाचे पनास किलोचे पोते २६६ रुपये होते. आता ते २७८ रुपये झाले आहे.
सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत जवळपास साडेसात लाख गेल्या चार वर्षांत खतांच्या किमतीत तब्बल ३५ ते ४० टक्केहून अधिक वाढ झाली आहे. यात विविध कंपन्यांच्या खत दरात थोडा फरक असला तरी, पोत्यामागे सर्रास सव्वादोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरमसाट वाढला आहे. ऐन हंगामात दरवाढीचा झटका हा शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

हेक्टरच्या घरात उसाचे क्षेत्र आहे. जादा उत्पादन वाढीसाठी खतांचा वापर अपरिहार्य आहे. खतांच्या जोडीला संयुक्त खते देखील वापरण्याकड शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मात्र, आता संयुक्त तसेच मिश्रखतांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.यामुळे खरे तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आधीच महागड्या उत्पादन खचनि मेटाकुटीस आले आहेत. जोडीला नैसर्गिक संकटे आहेतच! शेत मजुरांकडून होणारी आर्थिक मनमानी लूट आणि अडवणूक वेगळीच! त्याचप्रमाणे आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले आहेत. नांगरणी, खुरटणी, पेरणी त्याचप्रमाणे सरी सोडणे यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापर टाळता येत नाही.शेती मेहनतीचे दर भडकणार विविध कंपन्या रासायनिक खतांच्या दरात वाढ करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शेती मशागतीचे दर भडकण्यावर होणार आहे. प्रामुख्याने नांगरट, खुरटणी, रोटर मारणे, सरी सोडणे, ऊस भरणी याचे दर वाढण्याची शक्यता आहे.तुलनेने कमी दर (२७८ रुपये) असल्याने शेतकरी युरियाच्या वापरास अधिक प्राधान्य देण्याचीच शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे केवळ युरियाचा वापर केला तर त्याचा पिकांवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही.

परिणामी मशागतीचे दर वाढू लागले आहेत. याचवेळी पिकांना योग्यवेळी, योग्य प्रमाणात खते वापरली नाहीत, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही, पण, खतांचे दर वाढल्याने शेती करणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल