शेतीच्या वादांमुळे असे घटनाक्रम घडणे चिंताजनक आहे,न्यायालयाने या प्रकरणातील गंभीरतेचा विचार करून कठोर निर्णय घेतला आहे.
शेतीच्या वादातून खून झाल्याच्या प्रकरणात आरोपीस जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय संबंधित न्यायालयाने दिला असून, या प्रकरणात साक्षीदारांचे मुद्दे आणि पुरावे यावर आधारित शिक्षा निश्चित करण्यात आली. हे प्रकरण सामाजिक स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे, कारण शेतीच्या वादांमुळे असे घटनाक्रम घडणे चिंताजनक आहे. न्यायालयाने या प्रकरणातील गंभीरतेचा विचार करून कठोर निर्णय घेतला आहे. माढा तालुक्यातील मौजे फूटजवळगाव येथील शेतकरी चंद्रकांत हांडे हे दिनांक ५ अक्टोंबर २०१९ रोजी सकाळी १०.४५वा .सुमारास ज्वारी पेरण्यास शेत नीट करण्यासाठी गेले असता, बायडाबाई कोळेकर ही शेतात येणाऱ्या ट्रॅक्टरवर दगड मारून शिवीगाळ करू लागली , तिथेच उभा असलेला हनुमंत दगडू कोळेकर हा ट्रॅक्टर घेऊन आलेला चंद्रकांत हांडे हा जमीन कशी वहीवाटतो ते पाहतो असे म्हणून शिवीगाळ करू लागला तेव्हा तिथेच उभे असणारे हनुमंत कोळेकर यांचे नातेवाईक दत्तात्रय कृष्णा हांडे, अजिनाथ ज्ञानदेव हांडे व हरिदास जनार्दन हांडे यांनी त्याला आज सोडू नको काही घडल्यास आम्ही पाहतो असे म्हणून प्रोत्साहन दिल्याने हनुमंत कोळेकर याने हातातील कुऱ्हा...