शेतीच्या वादांमुळे असे घटनाक्रम घडणे चिंताजनक आहे,न्यायालयाने या प्रकरणातील गंभीरतेचा विचार करून कठोर निर्णय घेतला आहे.

शेतीच्या वादातून खून झाल्याच्या प्रकरणात आरोपीस जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय संबंधित न्यायालयाने दिला असून, या प्रकरणात साक्षीदारांचे मुद्दे आणि पुरावे यावर आधारित शिक्षा निश्चित करण्यात आली. हे प्रकरण सामाजिक स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे, कारण शेतीच्या वादांमुळे असे घटनाक्रम घडणे चिंताजनक आहे. न्यायालयाने या प्रकरणातील गंभीरतेचा विचार करून कठोर निर्णय घेतला आहे.
 माढा तालुक्यातील मौजे फूटजवळगाव येथील शेतकरी चंद्रकांत हांडे  हे दिनांक ५ अक्टोंबर २०१९ रोजी सकाळी १०.४५वा .सुमारास ज्वारी पेरण्यास शेत नीट करण्यासाठी गेले असता, बायडाबाई कोळेकर ही शेतात येणाऱ्या ट्रॅक्टरवर दगड मारून शिवीगाळ करू लागली , तिथेच उभा असलेला हनुमंत दगडू कोळेकर हा ट्रॅक्टर घेऊन आलेला चंद्रकांत हांडे हा जमीन कशी वहीवाटतो ते पाहतो असे म्हणून शिवीगाळ करू लागला तेव्हा तिथेच उभे असणारे हनुमंत कोळेकर यांचे नातेवाईक दत्तात्रय कृष्णा हांडे, अजिनाथ ज्ञानदेव हांडे व हरिदास जनार्दन हांडे यांनी त्याला आज सोडू नको काही घडल्यास आम्ही पाहतो असे म्हणून प्रोत्साहन दिल्याने हनुमंत कोळेकर याने हातातील कुऱ्हाडीने चंद्रकांत हांडे  यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात घाव घातला, त्यातच ते गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मयताचा मुलगा सूर्यकांत चंद्रकांत हांडे यांनी  आरोपी 1) हनुमंत दगडू कोळेकर, 2) बायडाबाई हनुमंत कोळेकर, 3) दत्तात्रय कृष्णा हांडे, 4) अजिनाथ ज्ञानदेव हांडे व 5) हरिदास जनार्दन हांडे यांचे विरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं 457/2019 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास उ विपोआ. विशाल हिरे यांनी करुन आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
        सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी १४ साक्षीदार तपासण्यात आले.
       यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष, डॉ. इनामदार यांची साक्ष  तसेच  त  अंमलदार उ  विं  पो.आ विशाल हिरे  यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी मा न्यायालयासमोर मांडले.
         सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा.जिल्हा न्यायाधीश श्री. एल.एस चव्हाण साहेब यांनी आरोपी  हनुमंत दगडू कोळेकर रा. फूटजवळगाव ता माढा यास भादविक 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व  10,000/- रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. 
      उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.सरकार पक्षा तर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.
या केसमध्ये  अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व  दिपक पाटील पोलीस निरीक्षक  टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल