पोस्ट्स

पेनकिलरपासून अँटिबायोटिक्सपर्यंत; येत्या १ एप्रिलपासून औषधे महागणार,

इमेज
आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना येत्या १ एप्रिलपासून औषधे महागणार आहेत, ज्यात पेनकिलर्सपासून अँटिबायोटिक्स यांसारख्या ८०० औषधांचा समावेश आहे.अशा स्थितीत अ‍ॅनुअल होलसेल प्राइज इंडेक्समधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना त्यांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देण्यासाठी सरकार तयार आहे. वाढत्या महागाईमुळे औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी केली जात होती. ज्या औषधांचा आवश्यक यादीत समावेश केला जातो, ते बहुतेक लोकांसाठी उपयुक्त असते. या औषधांच्या किंमती सरकार ठरवते, ज्यात अँटी कॅन्सरसारख्या औषधांचा समावेश असतो. कंपनी अशा औषधांच्या किंमतीत वर्षभरात १० टक्क्यांनी वाढ करू शकते. कोणत्या औषधांचे दर वाढतील? पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, ॲनिमिया, जीवनसत्त्वे आणि खनिजे औषधांच्या किंमती वाढणार आहेत. कोविड-१९ च्या मध्यम ते गंभीर आजारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधे आणि स्टिरॉइड्स देखील या यादीत आहेत. दर वाढण्यामागचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या औषधांचे दर १५ ते १३० टक्...

घरात अन् गोडाऊनमध्ये आढळला तब्बल नऊ लाखांचा गुटखा अन् तंबाखुजन्य साठा

इमेज
राज्यभर गुटख्यासह तंबाकुजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना शहरातील भवानी पेठ, वैदूवाडी परिसरातील घरात व गोडावूनमध्ये तब्बल ९ लाख २८ हजार रुपयांचा साठा अन्न औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आला. प्रकरणी हा साठा बाळगणाऱ्या महांतेश सिद्राम गुब्याडकर (वय- ३७ वर्षे) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी रेणुका रमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने शेळगी रोडवरील भवानी पेठ येथील रहिवासी महांतेश गुब्याडकर याच्या राहत्या घरी आणि वैदुवाडी परिसरातील भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजता सुमारास छापे टाकले. या छाप्यात रजनीगंधा पानमसाला, राजू इलायची सुपारी, बाबा नवरतन पानमसाला, बाबा १२० तंबाखू, शुध्द प्लस पानमसाला, विना लेबल पानमसाला, आरएमडी पानमसाला, एम सुगंधीत तंबाखू असा प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला. त्याची सरकारी किंमत तब्बल ९,२८,७४५ रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका पाटील यां...

ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला

इमेज
जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील ७०० पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत रविवारी, १७ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार ॲड.आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. जोगेश्वरी पूर्व उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, माजी विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, महिला विभाग अध्यक्षा सायली जाधव, विभाग सचिव विलास म्हेतर, उपविभाग अध्यक्ष मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, महिला उपविभागध्यक्षा कामिनी दळवी, श्रद्धा सागवेकर, शाखाध्यक्ष रमाकांत नर, अमोल पारधी, कुणाल गावडे, किशोर पुंडे, राजेश जाधव, आकाश पाटील असे एकूण ७०० पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानत पक्षाच्या आंदोलनात आक्रमकपणे भाग घेतला. पण पक्षांमध्ये काही लोकांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे माझ्यासारखा कर्मठ निष्ठावान कार्यकर्ता पक्षाच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे प्रवीण मर्गज यांनी सांगितले.

कार्यालयांमध्ये मराठीतून संभाषण न केल्यास कारवाई; राज्य मराठी भाषा धोरण जाहीर

इमेज
आधुनिक तंत्रज्ञान तसेच मराठीतील सर्व बोली भाषांचे जतन व संवर्धनाचा समावेश असलेल्या अद्ययावत मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.मराठीत संभाषण न करणारे अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, बँकामध्ये सूचनाफलक , अर्ज नमुने मराठीत ठेवणे या आस्थापनांवर बंधनकारक असेल. म्हाडा, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज कंपन्या यांना सर्व व्यवहार मराठीतूनच करावे लागतील. शासकीय कार्यालयांमध्ये परदेशी नागरिक किंवा बाहेरच्या राज्यातील नागरिक वगळता अन्य नागरिकांना तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठीतूनच संभाषण करणे अनिवार्य असेल. मराठी भाषेतून संभाषण न करणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या विरोधात कार्यालया प्रमुखांकडे तक्रार करता येईल. झालेली क...

अहमदनगरचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

इमेज
अहमदनगर शहराचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यास आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठरावदेखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची क...

ज्येष्ठांनो! ३ हजार हवेत, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू करा अर्ज...

इमेज
राज्य शासनाकडून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' राबविली जात आहे.ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकरकमी आर्थिक साहाय्य देण्याच्या 'मुख्यमंत्री वयोश्री' योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त समितीचे अध्यक्ष या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभाथ्यर्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बैंक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या...

केबीन रंगवून घेतले, भूमी अभिलेखचा उपअधीक्षक अॅण्टी करप्शनच्या जाळ्यात

इमेज
वडिलोपार्जित जमीनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून भूमी अभिलेख कार्यालय राजापूरचे उपअधीक्षक सुशील पवार यांनी त्यांच्या केबीनचे रंगकाम तक्रारदाराकडून विनामोबदला करुन घेतले.त्यामुळे आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागा रत्नागिरीच्या पथकाने उपअधीक्षक सुशील पवार याला ताब्यात घेतले. तक्रारदार यांना वडिलोपार्जित जमीनीची मोजणी करायची होती. शासकीय मोजणी लवकरात लवकर करुन देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय राजापूरचे उपअधीक्षक सुशील पवार यांनी मोजणी करण्याच्या बदल्यात त्यांच्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करून देण्यास सांगितले. दि.8 आणि 10 मार्च रोजी तक्रारदाराने उपअधीक्षक सुशील पवार यांच्या केबीनचे रंगकाम करून दिले. त्यानंतर आज आरोपी उपअधीक्षक सुशील पवार याला पंचासमक्ष ताब्यांत घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरिक्षक अनंत कांबळे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, हेमंत पवार आणि हुंबरे यांनी केली.