पोस्ट्स

*सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ*

इमेज
*सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, ३१ जानेवारी २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) नेत्या आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत ही शपथविधी पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोक भवन येथे दुपारी ५ वाजता शपथ दिली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एनसीपीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि इतर मंत्री व नेते उपस्थित होते. ६२ वर्षीय सुनेत्रा पवार यांना आज सकाळी एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने पक्षाचे विधिमंडळ नेते म्हणून निवडण्यात आले. छगन भुजबळ यांनी त्यांचे नाव सुचवले, तर दिलीप पाटील आणि इतर आमदारांनी त्याला अनुमोदन दिले. यानंतर पक्षाने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांची निवड कळवली, ज्यावरून राज्यपालांकडे शिफारस करण्य...

*सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? छगन भुजबळांचे स्पष्ट संकेत, राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची*

इमेज
*सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? छगन भुजबळांचे स्पष्ट संकेत, राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, ३० जानेवारी २०२६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, उद्या (३१ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयानंतर त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही उद्याच होऊ शकतो, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, "अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं? याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे. टीव्हीलाही मी ऐकत आहे. ते काही चूक आहे असं वाटत नाही. उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्...

*बार्शी (पांगरी) : प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याकडून भाऊजीचा खून*

इमेज
*बार्शी (पांगरी) : प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याकडून भाऊजीचा खून*  *KDM NEWS प्रतिनिधी पांगरी (ता. बार्शी) : प्रेमविवाहामुळे मनात राग असलेल्या मेहुण्याने बहिणीच्या पतीला हॉटेलमध्ये जेवायला बोलावून दारूच्या नशेत बियरची बाटली फोडून गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८ जानेवारी २०२६) रात्री सुमारे ८ वाजता पांगरीतील शिवनेरी हॉटेलमध्ये घडली. मृतकाचे नाव सुशील दिलीप क्षीरसागर (वय २६, रा. अरणगाव, ता. बार्शी) असे आहे. आरोपी ऋषीकेश मरीबा क्षीरसागर (मृतकाचा मेव्हणा) असून, त्याने बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवला होता. घटनेच्या रात्री सुशील, त्याची पत्नी रेशमा, ऋषीकेश, त्याची मैत्रीण काजल निसाळ व इतर नातेवाईक हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. हॉटेलच्या मागील बाजूच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जेवण करताना सुशील आणि ऋषीकेश यांच्यात दारू पिताना वाद झाला. वाद प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून तीव्र झाला. यात ऋषीकेशने हातातील बियरची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर जोरदार वार केला. गंभीर जखमांमुळे सुशील रक्तस्त्रावाने जागीच कोसळला. हॉटेलमालक व उपस्थितांनी...

**महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; मतदान आता ७ फेब्रुवारीला**

इमेज
*महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; मतदान आता ७ फेब्रुवारीला*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २९ जानेवारी २०२६  – उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उर्वरित कार्यक्रम बदलण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, मतदान ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी होईल. मतमोजणी ९ फेब्रुवारी (सोमवार) रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारीपर्यंत राजपत्रात प्रसिद्ध केली जातील. मूळ कार्यक्रमानुसार मतदान ५ फेब्रुवारीला आणि मतमोजणी ७ फेब्रुवारीला होणार होती. मात्र, २८ जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने प्रचारासाठी उपलब्ध दिवस कमी पडले. उमेदवारांना शोककाळात (२८ ते ३० जानेवारी) प्रचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे नियम ११(२अ) आणि १३(३) अंतर्गत बदल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जानेवारीला सुधारित सूचना प्र...

*बारामती विमान अपघात: धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी, लँडिंग प्रयत्न अयशस्वी; अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू*

इमेज
*बारामती विमान अपघात: धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी, लँडिंग प्रयत्न अयशस्वी; अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू*  *KDM NEWS प्रतिनिधी बारामती (पुणे) - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येणारे चार्टर्ड लिअरजेट ४५ हे विमान लँडिंगच्या प्रयत्नात कोसळले. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवाल सांगतात. सकाळी सुमारे ८:४५ वाजता हा अपघात झाला. विमान मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी निघाले होते. बारामती विमानतळ हा टेबलटॉप प्रकारचा आहे आणि त्यावर आयएलएस (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) नाही. त्यामुळे वैमानिकांना पूर्णपणे दृश्यमानतेवर अवलंबून राहावे लागते. त्यादिवशी दाट धुके असल्याने धावपट्टी दिसत नव्हती. फ्लाइट डेटानुसार, विमानाने पहिला लँडिंगचा प्रयत्न केला, पण धावपट्टी दिसली नाही म्हणून गो-अराउंड (माघार घेतली). दुसऱ्या प्रयत्नातही विमान धावपट्टीजवळ येऊ शकले नाही आणि ते जवळपास १०० फूट उंच...

*बारामतीत विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू*

इमेज
*बारामतीत विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू*  *KDM NEWS प्रतिनिधी बारामती, २८ जानेवारी २०२६: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा आज सकाळी बारामती विमानतळाजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येणारे खाजगी चार्टर्ड विमान (Learjet 45, नोंदणी VT-SSK) लँडिंगदरम्यान रनवेवरून फिसले, कोसळले आणि लगेच आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झाले. अपघाताच्या वेळी विमानात अजित पवार, दोन पायलट, एक पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) आणि एक अटेंडंट असा एकूण पाच जण होते. या दुर्घटनेत कुणीही वाचला नाही, अशी माहिती नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) दिली. अपघात सकाळी सुमारे ८.४५ ते ८.४८ वाजण्याच्या सुमारास झाला. विमान मुंबईहून सकाळी ८.१० च्या सुमारास उड्डाण केले होते. बारामती विमानतळावर लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना हे विमान रनवेवरून घसरले आणि लगेचच आग लागली. अपघात स्थळी धूर आणि जळालेल्या अवशेषांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. विमान VSR एव्हिएशन या खाजगी कंपनीचे होते. DGCAच्या...

*प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात शोककळा,उमरगा तालुक्यातील तलमोड चेकपोस्टवर दारूबंदी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू*

इमेज
*प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात शोककळा,उमरगा तालुक्यातील तलमोड चेकपोस्टवर दारूबंदी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू*  *KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव, २६ जानेवारी : देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे एक हृदयद्रावक घटना घडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (दारूबंदी) अधिकारी मोहन भीमा जाधव (वय ५५, मूळचे सोलापूर) यांचा ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.   तलमोड सीमा तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) कर्तव्यावर असलेले जाधव हे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले होते. राष्ट्रध्वज फडकवून सलामी दिल्यानंतर किंवा ग्रुप फोटोसाठी उभे राहिल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. उपस्थित सहकाऱ्यांनी तात्काळ मदत केली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.   शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे कारण तीव्र हृदयविकार...