पोस्ट्स

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून

इमेज
*राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून               राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले. गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्...

एक नाही तर दोन चक्रीवादळाचे संकट, अरबी समुद्रासोबतच बंगालचा उपसागर आणि अंदमानजवळ चक्राकार वारे

इमेज
मान्सून परतीच्या वाटेला लागला असतानाच एक नाही तर दोन चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याठिकाणी चक्रीवादळ तयार होत आहे. तर त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अरबी समुद्राच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असते. आता मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. १६ ऑक्टोबरला दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले आहेत. तर १८ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या काही तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.  मान्सूननंतरचे हे पहिले चक्रीवादळ असेल. यानंतर पश्चिम ते उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन २१ ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ २०-३० किलोमीटर प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. पण, चक्रीवादळ कु...

आंबेडकर आणि ठाकरे यांचं अखेर ठरलं. सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारा निर्णय काय?

इमेज
महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटप कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.महाविकास आघाडीतील शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप झाल्यानंतर त्यांच्या मित्र पक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आघाडीतील मित्र पक्षही या जागा वाटपाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रकाश आंबेडकर हे पुण्यात मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर भाष्य केलं. ठाकरे गट आणि आमचं जागा वाटप झालं असं मी मानतो. बाकी आघाडीतील त्रिकुटाबाबत त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी परस्परच ठाकरे गटाबाबतचं जागा वाटप फायनल झालं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपावर भाष्य करतील असं सांगितलं जात होतं. कुणाला किती जागा मिळाल्या? कोण कुठून लढणार? निवड...

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आठ धडाकेबाज निर्णय!

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली.मंत्रिमंडळाची  मंत्रालयात आज बैठक पार पडलीया बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार ( वित्त विभाग) महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार ( सामाजिक न्याय ) राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार ( सहकार व वस्त्रोद्योग) कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग) इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार( कामगार विभाग) बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण  सामाजिक न्याय)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या

इमेज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षणासाठी तरुणाने केली होती आत्महत्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण असतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारला आरक्षणावर विचार करून कृ...

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबाच्या सुनबाई देणार आव्हान?

इमेज
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबाच्या सुनबाई देणार आव्हान? बारामतीच्या खासदार, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक कोण लढविणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.अजित पवार यांनी शरद पवार यांची साथसोबत सोडली. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले. यामुळे राष्ट्रवादी पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला. येथून अनेक वर्ष शरद पवार हे खासदार म्हणूण ते अजित पवार हे आमदार म्हणून निवडून आलेत. मात्र, दोन गट पडल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात बॅनर लागले आहेत. या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना संसदेचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश'; शासन निर्णय जाहीर

इमेज
राज्यात आता पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 'एक राज्य, एक गणवेश' या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाच्या दोन गणवेशांचा  लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे.मोफत गणवेश योजने संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे कार्यवाही करू नये अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने  दिल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे असा असणार नवा गणवेश नवा गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाची रचना असेल. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवरती शोल्डर स...