**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**
**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ** **KDM NEWS प्रतिनिधी वैराग (बार्शी): मित्राला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रामाणिक सल्ला एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. "तू त्याला तक्रार करायला का सांगितलीस?" याच रागातून आरोपीने एका ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. वैराग शहरातील दत्तनगर परिसरात शनिवारी (२ मे) पहाटे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास वैराग येथील एका दुकानाजवळ काही मित्र मद्यप्राशन करण्यासाठी जमले होते. तिथे आरोपी उल्हास मुळे आणि दिनेश चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या उल्हासने हमालीचा लोखंडी ...