पोस्ट्स

बार्शी अध्यापक कॉलनीत दूषित व गाळ मिश्रित पाणीपुरवठा |

इमेज
बार्शी शहरात अध्यापक कॉलनी पोकळे हॉस्पिटल जवळील भागात गेले एक महिन्यापासून रोडवरती पाईपलाईन फुटलेली आहे पाईपलाईन मधील पाणी आल्यानंतर महिना भरापासून रस्त्यावर येते आणि तेच रस्त्यावरचे पाणी नंतर त्याच पाईपलाईन मध्ये जाते यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे पाइप लाईन फुटून अनेकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी,तसेच पाईप लाईन फुटून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.लिकेज पाइप लाइनमुळे शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील एक महिन्यापासून पाणी वाया जात असून अद्यापही पालिका प्रशासनाकडून बंद न केल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलीसांनीच टाकला दरोडा; पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

इमेज
पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात दरोडा टाकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा प्रताप असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी विकल्या. याप्रकरणी दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काल या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली या आरोपीने दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने या आरोपीला बाजारात विकण्यास सांगितले. स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्या...

राहुरीत वकील दाम्पत्याची हत्या, पाच जणांना बेड्या, वकील संघटनेचा बेमुदत बंदचा इशारा

इमेज
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील पती पत्नीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील कामकाज बंद ठेवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्य 25 जानेवारीला दोघेही राहुरी कोर्टात गेले. मात्र घरी परतलेच नाही. राजाराम जयवंत आढाव (52) व मनिषा राजाराम आढाव (42) हे दोघे घरी न आल्याने 26 जानेवारीला राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेतली.  सीसीटीव्ही फुटेजमार्फत पटली संशयितांची ओळख पोलीस तपासात राह...

सगेसोयरेरुन अजित पवार गटाने हात झटकले; भुजबळ म्हणतात, 'कोणाला पटो अगर न पटो.

इमेज
सगेसोयरेरुन अजित पवार गटाने हात झटकले; भुजबळ म्हणतात, 'कोणाला पटो अगर न पटो.गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मागण्यांचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सूपर्द केला आहे. या अध्यादेशानुसार आता कुणबी नोंद आढलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरतीत जागा राखीव ठेवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सर्व सवलती मराठा समाजाला लागू होतील अशी मोठी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र आता या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरुन त्यांच्याच पक्षाने हात वर केले आहेत. सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीत अजिबात टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आता सत्ताधारी अजित पवार गटाने छगन भुजबळ यांची कोंडी केल्याचे...

जरांगे पाटलांनी पुन्हा बोलावली मराठा बांधवांची बैठक, समोर आलं कारण

इमेज
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकताच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेढा भरवून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. मागण्या मान्य झाल्यानं मराठा बांधवांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी मोठा संघर्ष उभा केला. या संघर्षाला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळं राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. याच जल्लोषाची जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत. विजयी सभेबाबत चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज गोदापट्ट्यातील 123 गावांतील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे.आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून, जरांग...

मराठा आंदोलकांच्या सोयीसाठी नवी मुंबई सज्ज; प्रत्येक जण देत आहे योगदान!

इमेज
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या या आंदोलनात लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आंदोलकांच्या व्यवस्थेसाठी नवी मुंबईतील स्थानिक मराठा बांधव सरसावला आहे.यासाठी विविध माध्यमांतून मदतीचा ओघ सुरू झाला असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण काहींना काही योगदान देत आहे.नेरूळ येथील पंच परमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईमध्ये आलेल्या मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सीवूड्स सेक्टर ४८ ए येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे सामुदायिकरित्या नागरिकांनी समूह संकलन करून भोजनाची व्यवस्था माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच मोर्चात सहभागी नागरिकांना रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता, पाण्याच्या बाटल्या आदींची व्यवस्था करण्यात आली. याचबरोबर खारघर सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटी, तसेच खारघर सेक्टर ११ येथील बँक ऑफ बडोदासमोरील मैदान येथे एकत्रित भोजन संकलन करण्यात आले आहे. सीबीडीमध्ये मराठा मोर्चाच्या वतीने, तर तुर्भे येथील बाळकृष्ण खोपडे पाटील यांच्या माध्यमातून भोजना...

आरोग्य विम्याच्या नियमात बदल, आता सर्व रुग्णालयांत मिळणार कॅशलेस उपचार, जाणून घ्या कसे?

इमेज
केंद्रातील मोदी सरकारने आरोग्य विम्याच्या नियमात बदल केले आहेत. आरोग्य विमाधारकांनी रुग्णालयात उपचार घेतले असल्यास त्यांना आता कॅशलेसची सुविधा मिळणार आहे. बऱ्याचदा विमा कंपन्यांनी आधीच अनेक रुग्णालयांशी टाय-अप केलेले असते, त्यामुळे नेटवर्कमधील रुग्णालयातच तुम्हाला पूर्वी कॅशलेस उपचाराचा लाभ मिळत होता.परंतु विमा कंपन्यांच्या नेटवर्कच्या बाहेरील म्हणजेच टायअप नसलेल्या रुग्णालयांमधून तुम्हाला आता उपचार करवून घ्यायचा असेल तर ते मिळणार आहेत. तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी जीआयसीने नवीन मोहीम सुरू केली आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) ने आरोग्य विमा पॉलिसी धारकांसाठी Cashless Everywhere हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत आता विमाधारकाला प्रत्येक रुग्णालयांत कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे नेटवर्कमध्ये नसलेल्या रुग्णालयांमध्ये ही कॅशलेस सुविधा त्वरित प्रभावी होणार आहे, असे जनरल इन्शुरन्स कौन्सिलने म्हटले आहे. १५ खाटा असलेली आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायद्यांतर्गत संबंधित राज्य आरोग्य प्राधिकरणांकडे नोंदणीकृत रुग्णालये आ...