दोन वर्षापेक्षा लहान मुलांना मोबाईल स्क्रीन टीवी स्क्रीन दाखवता;व्हा सावधान मुलांना होऊ शकता तीन गंभीर त्रास तज्ञ सांगतात....

जकाल सगळ्याच पालकांच्या हातात मोबाईल दिसतो. त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासूनच मुलं मोबाईल बघतात. मोबाईल बघतच ती मोठी होत आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. 
त्यात मुलं जर खात नसतील, बाहेर गेल्यावर त्रास देत असतील, पालकांना काम करू देत नसतील, तर अनेक पालक स्वतःहून मुलांना मोबाईल देऊन टाकतात.अगदी बोलता न येणारी मुलंही तासनतास मोबाईल बघत बसतात  तुमचीही मुलं याच प्रकारातली असतील, 
तर वेळीच सावध व्हा. 
कारण याविषयी बघा ही तज्ञांनी दिलेली विशेष माहिती.ही माहिती इंस्टाग्रामच्या the Kidzeeया पेजवर शेअर करण्यात आलेली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात की मुलांचा बौद्धिक मानसिक विकास ० ते २ या दरम्यान झपाट्याने होत असतो. पण नेमकं याच काळात जर मुलांना मोबाईल दाखवला तर मात्र त्याचे गंभीर परिणाम मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक आरोग्यावर होऊ शकतात.
अमेरिकन बालरोगतज्ज्ञ संघटना आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना यांच्यामते ० ते २ या वयोगटातली मुलं खूप स्क्रीन बघत असतील तर त्यांची मानसिक आणि बौद्धिक वाढ कमी वेगात होऊ लागते. यामुळे मुलांना बोलण्यात अडचण येणे,
 भाषा शिकण्यात अडचण येते तसेच त्यांच्या वागणुकीतही अनेक दोष दिसू लागतात. यालाच व्हर्च्युअल ऑटीझम असं म्हणतात.असं होण्याचं कारण म्हणजे मुलं स्क्रिन बघत राहिली की मेंदुचा वापर करणे थांबवतात. त्यामुळे या काळात त्यांना स्क्रिनपासून दूर तर ठेवावेच.पण त्यासोबतच त्यांचा बौद्धिक, मानसिक विकास होईल, असे खेळ त्यांच्यासोबत खेळावेत. त्यांना गोष्टी सांगाव्या, पुस्तकातील चित्रे दाखवावीत तसेच त्यांच्या वयोगटानुसार असणारी विविध खेळणी त्यांना आणून द्यावीत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल