'कशी चर्चा करायची तुमच्याशी', महाजनांना ती गोष्ट आठवण करून देत जरांगे पाटीलांनी व्यक्त केली नाराजी

अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ, असं तुम्ही सांगितलं आणि तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत.असं असताना कशी चर्चा कार्याची तुमच्याशी?, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातच आज संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा केली. त्यावेळी जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''अंतरवाली सराटीबद्दल आम्ही बोललो होतो, ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, ते 132 हून अधिक आहेत. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. मग आम्ही सांगत आहोत त्यांच्यावरही तुम्ही गुन्हे दाखल करायला हवे. त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी तुम्ही (राज्य सरकार) म्हणालात द्या विषय सोडून तो आता.''म्हणाले, ''अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ. आता तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत. आम्ही काय चूक केली, तुमचा शब्द आम्ही मोडला नाही, मात्र आमचा एक-एक माणसाला तुम्ही अटक करत आहेत. कितीतरी लोकांना नोटीसही गेली आहे. असं असताना कशी चर्चा कार्याची तुमच्याशी?''दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान सरकारच्या दोन मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आहे. यातच उद्या म्हणजे रविवारी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची मराठा नेत्यांची बैठकही होणार आहे. या बैठकीत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर आंदोलन कसं पुढे घेऊन जावं, यावर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल