राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेच्या विरोधात हायकोर्टात याचिका, उद्घाटन सोहळ्यावर बंदीची मागणी

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रकरण कोर्टात गेले आहे. अलाहाबाद हायकोर्टात प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी आणावी अशी मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.उपलब्ध माहितीनुसार याचिकेत शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. यासोबत हा उद्घाटन सोहळा सनातन विरोधी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, ही याचिका गाझियाबादचे रहिवासी भोला दास यांनी दाखल केली आहे. 22 जानेवारीला अयोध्येत एक धार्मिक कार्यक्रम होणार आहे निर्माणाधीन मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला असून पौष महिन्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात नाही असेही यात पुढे नमूद करण्यात आले आहे.

अपूर्ण मंदिराचा दिला दाखला

मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे असल्याचे भोला दास यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूजा करणार आहेत. बांधकाम अपूर्ण असलेल्या मंदिरात कोणत्याही देवतेची प्राण प्रतिष्ठा करण्यात येत नाही असेही पुढे म्हटले आहे. याचिकेत प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करत संपूर्ण कार्यक्रम हा सनातन विरोधी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूका डोळ्यासमोरठेवून याचा फायदा व्हावा यासाठी या कार्यक्रमाचा घाट घातला असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

मंगळवारपासून सुरु झालेत विधी

राम मंदिर उद्घाटन सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. यापूर्वी गेल्या मंगळवारपासून मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीचे विधी सुरू करण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, 11 पुजाऱ्यांच्या हस्ते हे विधी संपन्न होत आहेत. मंदिर ट्रस्टचे यजमान अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा यांच्या हस्ते हे विधी पार पडत आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अन्य अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल