पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

इमेज
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे. निवडणूक काळात फोन टॅपिंगसाठी भाजप सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केलीय.रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत.फोन टॅपिंगचे आरोप झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर वारंवार टीका होत असते.  रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सवोच्च न्यायलयाच्या संदर्भाधीन न्यायनिर्णय आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात नोटिफिकेशन काढून माहिती दिली आहे. पदावरील नियुक्तीपासून पुढे 2 वर्षे हा कालावधी असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर हा शासन निर्णय पाहता येणार आहे.  मराठा आरक्षण पुरस्कर्ते मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे? हे पहावं लागेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्वाच्या भाजप नेत्यांन...

मराठा आरक्षणाबाबत आणखी आनंदाची बातमी..! राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय

इमेज
मराठा आंदोलनाचा मुद्दा गाजत असतांना मराठा आरक्षणाबाबत एक आंनदाची बातमी समोर आली आहे. मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग आणखी मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळायला हवं, या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम राहिले आहेत. अशातच आता सरकारने मांडलेल्या विधेयकांचं कायद्यात रूंपातर करण्यात आलं आहे. दरम्यान, आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. मराठा आंदोलनाच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे ? याची चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लावून धरली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष...

फोन आला अन् जरांगे सलाईन काढून अंतरवालीला निघाले, हॉस्पिटलमध्ये मोठा ड्रामा

इमेज
आमरण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, पण आज दुपारच्या सुमारास जरांगे सलाईन काढून थेट अंतरवालीला जायला निघाले.अंतरवालीमध्ये उपोषणाचा मंडप काढायला पोलीस पोहोचल्यामुळे जरांगे संतप्त झाले, यानंतर त्यांनी सलाईन काढलं आणि ते हॉस्पिटलच्या रूममधून बाहेर निघाले. अंतरवालीमध्ये मंडप काढत असल्याचा फोन आल्यानंतर जरांगे आक्रमक झाले. जरांगे अंतरवालीमध्ये येण्यासाठी निघाल्याचं समजताच जरांगे पाटील यांना पोलीस अधिक्षकांचा फोन आला. पोलिसांकडून मंडप हलवणार नसल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा त्यांच्या रूममध्ये गेले, त्यामुळे जरांगे यांच्यावर पुन्हा उपचार सुरू होणार आहेत. काय म्हणाले जरांगे? 'मी इकडे हॉस्पिटलला आलोय आणि तिकडे मंडप काढायला लागले. पोलीस दबाव आणायला लागले आहेत की तुमच्या मराठ्यांच्या आंदोलनाचा मंडप काढा, गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री ही कामंही करायला लागला का? इकडे उपचार घेऊन मी काय करू? उपचार घेऊन तिकडे मराठे वाऱ्यावर सोडायचे का? गृहमंत्र्यांचं सांगून गावात दहशत निर्माण करायला लागले आहेत. तुम्ही क...

'आयुष्मान भारत'चा गवगवा, पेशंटला उपचार मात्र मिळेना; कार्ड काढण्यासाठी मात्र यंत्रणेवर प्रेशर

इमेज
'आयुष्मान भारत कार्ड काढून घ्या, सरकारीसह खासगी दवाखान्यांतही पाच लाखापर्यंतचे माेफत उपचार मिळवा' 'आता उपचारांच्या खर्चाची चिंता मिटली' अशा जाहिराती शासनाकडून केल्या जातात.मात्र, प्रत्यक्षात आयुष्मान भारत कार्डचा मात्र सर्वसामान्य नागरिकांना काडीचाही उपयाेग हाेत नसल्याचे समाेर आले आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिक त्यांना माेफत उपचार मिळतील याचा विचार करून हाॅस्पिटलचे उंबरे झिजवत आहेत. दुसरीकडे हाॅस्पिटल या कार्डधारकांना अक्षरश: हाकलून लावत आहेत. त्यामुळे त्यांना पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यासाठी व योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलकृत रुग्णालयांद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार देण्यात येतील, अशी घाेषणा करत केंद्र शासनाने २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही याेजना सुरू केली होती. परंतू, ते कार्ड केवळ शाेभेची ठरत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. तसेच या याेजनेच्या समन्वयाचे काम महात्मा फुले जन आराेग्य याेजनेकडे दिले आहे. कार्ड काढण्यासाठी यंत्रणेवर दबाव आयुष्मान भारत याेजनेचा महाराष्ट्रात...

शाळेमध्ये प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली | केंद्र सरकारच्या आदेशानुसार या मुलांना प्रवेश मिळणार नाही |

इमेज
 पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.कारण केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करत असल्याचे दिसून येत आहे. आता शिक्षण मंत्रालयाने या बाबतीत पहिलीतील प्रवेशाचे वय बदलले आहे. केंद्राने भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय 6 वर्षे इतके निश्चित करावे, असे आदेश दिले आहेत.शिक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा 6 वर्षे इतके निश्चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही वयोमर्यादा NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित आहे, यावर गेल्या वर्षी देखील चर्चा झाली होती. गेल्यावर्षीही असेच पत्र पाठवण्यात आले होते, आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना आठवण करुन दिली आहे. जॉइंट सेक्रेटरी अर्चना शर्मा अवस्थी यांनी राज्यांना हे पत्र पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले की, 'नवीन शैक्षणिक सत्र 2024-25 लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. आम्हाला आशा आहे की तुमच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात ग्रेड-1 प्रवेशाचे वय 6+ वर ठेवले जाईल.' अर्चना शर्मा अवस्थी यांनी या पत्रात पुढे सांगितले की, या पत्राची प्रत्येक सरका...

प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

इमेज
राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून  पुन्हा राज्यव्यापी संपाची  हाक देण्यात आली असून, आजपासून हे डॉक्टर संपावर जात आहेत. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आज (22 फेब्रुवारी) रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत (Ajit Pawar) झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला होता. मात्र, आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या... निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे. मागच्या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल 'मार्ड'ची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री...

आजच्या बैठकीत काय झाले

#महत्वाचे आज मौजे.अंतरवाली सराटी येथे श्री.मनोजजी #जरांगे #पाटलांनी महराष्ट्रातून आलेल्या मराठा #बांधवांसोबत झालेल्या #बैठकीत #खालील #निर्णय घेण्यात आले. निर्णय नंबर ०१ - #येत्या दोन दिवसात जर सगेसोयरे अधिनियम लागू नाही केला तर गावागावात बेमुदत आदर्श रस्ता रोको सकाळी १०:३० ते दुपारी ०१ पर्यंत. निर्णय नंबर ०२ - #राजकीय नेते त्यात आमदार खासदार मंत्रांनी दरात यायचं नाही आणि गाडी घेऊन आमच्या शेताच्या समोरून सुद्धा जायचं नाही. निर्णय नंबर ०३ - #आदर्श आचारसंहिता पालन आम्हाला करता यावी यासाठी मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या, जर घेतल्याचं तर त्यांना प्रेमाने सांगा गावात प्रचाराला येऊ नका जर आलेच प्रचाराला तर प्रचाराला आलेल्या गाड्या कोठ्यात लावल्या जातील याची नोंद घ्यावी. निर्णय नंबर ०४ - #२९ फेब्रुवारी नंतर अती वयस्कर लोकांनी सराटी येथे आमरण उपोषणाला बसावे. निर्णय नंबर ०५ - #कुणी राजकीय लोकांनी दूमदाटी केली तर जशास तसे उत्तर मराठा जातीने मुळून द्यावे. निर्णय नंबर ०६ - #०३ मार्चला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा एकच रस्ता रोको. निर्णय नंबर ०७ - #सर्व मराठा सरपंच ते नगरसेवक ते...

राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने गुटखा-तंबाखू तस्करी, ५५ लाखांचा गुटखा जप्त

इमेज
उत्तरप्रदेशातून नागपुरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी तब्बल ५५ लाखांचा गुटखा तस्करी करून आणला. मात्र, वाडी पोलिसांच्या पथकाने या ट्रकला सापळा रचून कारवाई केली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तो गुटखा तहसीलमधील व्यापारी आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तस्करी करण्यात आल्याची चर्चा आहे.विशाल सरोज (उत्तरप्रदेश) आणि प्रीन्स वर्मा यांना पोलिसांनी अटक केली. नागपुरात दर महिन्याला कोटी रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा तस्करी करून आणल्या जाते. नागपुरातून संपूर्ण विदर्भात गुटखा पुरविल्या जाते. तस्करांची मोठी साखळी असून या तस्करीला पोलीस ठाण्यातील आणि गुन्हे शाखेच्या पथकासह एनडीपीएस पथकातील काही कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागपुरात एकही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता नवीन ठाणेदार आल्यामुळे ती साखळी तोडण्यासाठी जोरात कारवाई करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातून ५५ लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा घेऊन ट्रक शनिवारी सायंकाळी वडधामना हद्दीत पोहोचताच वाडीचे सहायक निरीक्षक राहुल सावंत यांनी छापा घालून ट्रक ताब्यात घेतला. मात्र, गुन्हा दाखल ...

सुप्रीम कोर्टातच झाली मतमोजणी, भाजपला मोठा धक्का |

इमेज
ग्रामपंचायत असो की लोकसभा निवकणूक सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. निवडणुकीनंतर मतमोजणी ही मजमोजणी केंद्रातच होते. मात्र, देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मतमोजणी थेट कोर्टरूममध्ये झाली आहे.हो, तुम्ही बरोबर वाचलत. चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने जुना निकाल रद्द करत नवीन निर्णय दिला आहे. यासाठी पहिल्यांदाच मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरुममध्ये करण्यात आली. याचा 20 मिनिटांचा व्हिडीओ देखील सरन्यायाधीशांनी दाखवला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने रचला इतिहास चंदीगड महापौर निवडणुकीत पहिल्यांदाच मतमोजणी मतमोजणी केंद्रात न करता न्यायालयाच्या खोलीत (कोर्टरुम) झाली. न्याय देण्यासाठी कोर्टरूममधून महापौर निवडीची घोषणा करण्यात आली. जुना निकाल रद्द करत आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांना महापौर घोषित करण्यात आले आहे. CJI DY चंद्रचूड यांनी 20 मिनिटांचा व्हिडिओ सर्वांना दाखवला. निवणूक अधिकाऱ्याला फटकारलं सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान CJI DY चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना विचारले की...

राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने गुटखा-तंबाखू तस्करी, ५५ लाखांचा गुटखा जप्त

इमेज
उत्तरप्रदेशातून नागपुरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी तब्बल ५५ लाखांचा गुटखा तस्करी करून आणला. मात्र, वाडी पोलिसांच्या पथकाने या ट्रकला सापळा रचून कारवाई केली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तो गुटखा तहसीलमधील व्यापारी आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तस्करी करण्यात आल्याची चर्चा आहे.विशाल सरोज (उत्तरप्रदेश) आणि प्रीन्स वर्मा यांना पोलिसांनी अटक केली. नागपुरात दर महिन्याला कोटी रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा तस्करी करून आणल्या जाते. नागपुरातून संपूर्ण विदर्भात गुटखा पुरविल्या जाते. तस्करांची मोठी साखळी असून या तस्करीला पोलीस ठाण्यातील आणि गुन्हे शाखेच्या पथकासह एनडीपीएस पथकातील काही कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागपुरात एकही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता नवीन ठाणेदार आल्यामुळे ती साखळी तोडण्यासाठी जोरात कारवाई करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातून ५५ लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा घेऊन ट्रक शनिवारी सायंकाळी वडधामना हद्दीत पोहोचताच वाडीचे सहायक निरीक्षक राहुल सावंत यांनी छापा घालून ट्रक ताब्यात घेतला. मात्र, गुन्हा दाखल ...

ओबीसीतून तर आरक्षण नाहीच, जरांगे यांच्या मूळ मागणीला वाटाण्याच्या अक्षता, मसुद्यात नेमके काय ?

इमेज
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मागणीलाच राज्य सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सरकारकडून मान्य करण्यात आलेली नाही.ओबीसी आरक्षणऐवजी सरकार मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण निर्माण करणार आहे. शिक्षण आणि नोकरीत 10 आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे. मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्विकारला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालास मंजुरी दिली आहे. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे म्हटले गेले आहे. मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा मसुदा मंजूर झाला. या बैठकीत महायुतीच्या तिन्ही पक्षातील मंत्री उपस्थित होते  मसुद्यात काय आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण मराठा समाजासाठी करण्यात आले आहे. मराठा समाजाचे हे आरक्षण राज्यापुरते मर्यादत असणार आहे. म...

सगेसोयरे वर ठाम | पुढच्या आंदोलनाची दिशा...'' मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केली भूमिका

इमेज
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मांडलं जाणार असल्याची माहिती आहे.एकीकडे राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावलेलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, स्वतंत्र आरक्षण नको. कारण ते टिकेल की नाही याची शाश्वती नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला सगेसोयऱ्याचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा उद्या निश्चित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय झाला तर उद्या पुन्हा मनोज जरांगे पाटील पुढील आंदोलनाचा इशारा देणार आहेत. त्यामुळे आजच्या अधिवेसनाच्या माध्यमातून सरकारने चालवलेला खटाटोप कामी येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. महाराष्ट्रात मराठा समाज किती? मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे माजी न्यायमूर्ती शुक्रे...

डान्सबारवर छापा टाकून सोलापूर जिल्ह्यातील 24 खत बी-बियाणे विक्रेते ताब्यात; डॉक्टर, व्यापारी सापडले 33 जणांवर गुन्हा

इमेज
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीतील खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबाला नाचवल्याप्रकरणी टेन्टमालक, बारबालांसह खते बी-बियाणे विक्रेते व डिलर 25 जण अशा 37 जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. विजय दिघे यांच्या मालकीचे पाचगणीत खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस असून, येथील एका हॉलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांना मिळाली. या माहितीवरून सातार्‍यावरून पोलिसांचे एक विशेष पथक पाचगणी खिंगरकडे रवाना करण्यात आले. पाचगणी खिंगर टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबालांची 'छमछम' सुरू असतानाच सातारा पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी तेथे एका हॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते-डिलर बारबालांसमवेत डान्स करत असल्याचे पोलिसांना आढळले. सातारा पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्या ठिकाणी ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलसह आलिशान कार जप्त करण्यात आल्या. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही का...

महाराष्ट्रातही 'बिहार' पॅटर्न; मराठा समाजाला मिळणार असं आरक्षण?

इमेज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर राज्य सरकारकडून हे अधिवेशन बोलावलं आहे. राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या शिफारसीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षण देण्याची शक्यता आहे.बिहारमध्येही जातीय जनगणना केल्यानंतर अशाप्रकारचं आरक्षण देण्यात आलं होतं. आरक्षणाचा बिहार पॅटर्न बिहार सरकारने त्यांच्या राज्यात जातीय जनगणनेनंतर आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून वाढवत 65 टक्के केली, यासाठी बिहारच्या विधानसभेत विधेयक मंजूर केलं गेलं. केंद्राने लागू केलेल्या इडब्ल्यूएसच्या 10 टक्के आरक्षणासह बिहारमध्ये सध्या 75 टक्के आरक्षण आहे. महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण? महाराष्ट्रात सध्या अनुसूचित जातींसाठी 13 टक्के, अनुसूचित जमातींसाठी 7 टक्के, ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गासाठी 32 टक्के आरक्षण आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं 10 टक्के आरक्षणही आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 62 टक्के आरक्षण आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला 10 ते 13 टक्क्यांच्या मध्ये आरक्षण दिलं तर महाराष्ट्...

मराठा समाजाची पाचंही बोटं तुपात, मनोज जरांगेंनी सांगितलं आरक्षणाचा तिहेरी लाभ कसा मिळणार?

इमेज
देशात आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर केल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.गावातील एखाद्या नदीला बारमाही पाणी असेल आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी वाट नसेल तेव्हा पर्यायी मार्ग काढावा लागतो. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण  मिळेल. तर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळतच आहे. तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सगेसोयरे या निकषाचा वापर करत कुणबी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा तिहेरी लाभ होणार आहे. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नको त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या स्वतंत्र आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि त्यांनी मांडलेल्या आरक्षणाच्या प्रस्तावाचे स्वागत केले. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जात असले तरी कुणबी नोंदी असलेल्या...

मोबाईलमधील 'या' पाच अ‍ॅप्सला लगेच काढून टाका नाहीतर तुमच्या पैशांवर मारतील डल्ला

इमेज
आनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढले आहे, दररोज ऑनलाईन स्कॅमच्या बातमी येत असतात. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत असते. सायबर गुन्ह्यांमुळे लोकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झालेले आपण अनेकदा ऐकले आहे.अशा फसवणुकीविषयी सायबर क्राईम पोलीस नेहमीची नागरिकांना सुचना देत असतात. तसेच याबाबत सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 'ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम' संदर्भात काही माहिती देण्यात आली आहेफ्रॉड करणारे लोक व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले शिकार शोधत असतात. स्कॅम करणारे फोनवर जाहिरातीचा मेसेज पाठवत असतात. यामध्ये मोफत ट्रेडिंग टिप्स क्लास देण्याचे सांगितले जाते. या यानंतर ते युझर्सशी संवाद साधतात आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या टिप्स देतात. 'हे' अॅप लगेच डिलीट करा युझर्सचा विश्वास संपादन केल्यानंतर स्कॅम करणारे युझर्सला ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात. हे ॲपच्या मदतीने स्कॅम करणारे युझर्सचे मोबाईल हॅक करतात. युझर्सची सर्व वैयक्तिक माहिती या अॅपच्या मदतीने मिळवत असतात. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ' युझर्सने INSEC...

जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त. टेन्शन वाढलं, अंतरवलीकडे देशाचं लक्ष |

इमेज
मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे.१० तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. रांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत. जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्यपथक अंतरवलीमध्ये दाखल झालं. मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला. आमचे डॉक्टर्स दर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहे, तपासणीसाठी त्यांच्यासाठी बोलण्याच प्रयत्न करत आहेत. त्यांनी पाणी तरी घ्याय...

भाजपात प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया काय? सोबत किती आमदार?

इमेज
भाजपाप्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी या वृत्ताच खंडन केलं होतं. आता अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये आज प्रवेश करणार असल्याच म्हटलं आहे. भाजपा प्रवेशाआधी त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधीशीं संवाद साधला.“आज मी माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय. आज मी रीतसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले. अन्य जिल्ह्यातील काही संभाव्य लोक माझ्यासोबत प्रवेश करतील असं ते म्हणाले. तुमच्यासोबत किती आमदार प्रवेश करणार? यावर एका वाक्यात अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं. ‘मी कोणालाही बोलावलेलं नाही’. काँग्रेसबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘तो चॅप्टर ओव्हर झालाय. मी नवीन सुरुवात करतोय’ आजच पक्षप्रवेश का? अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. मराठवाडा खासकरुन नांदेड जिल्ह्यातील ते एक वजनदार नेते आहेत. अशा नेत्याची सोडचिठ्ठी हा काँग्रेसला धक्का आणि भाजपाची ताकद वाढवणारा आहे. अशोक चव्हाण यांना भाजपा प्रवेश नं...

टोलनाके होणार गायब, फास्ट टॅग सुद्धा विसरा,

इमेज
महामार्गावरून कार किंवा मोठ्या वाहनातून प्रवास करताना टोल भरावा लागतो. यासाठी विशिष्ट अंतरावर टोलनाके उभारण्यात आले; पण टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, वाहन चालकांची गैरसोय पाहून सरकारने फास्टॅग सुविधा लाँच केली.आता केंद्र सरकार या संदर्भात आणखी एक सुविधा सुरू करण्याच्या विचारात आहे. सरकार उपग्रहावर आधारित टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली आहे. तसंच बीओटी प्रकल्प आणि धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देण्याकरिता सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, यासंदर्भातदेखील गडकरी यांनी माहिती दिली. 'आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकार टोल वसुलीसाठी सॅटेलाइट बेस्ड टोल टॅक्स अर्थात उपग्रहावर आधारित टोल प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे. ही प्रणाली सुरू होताच सर्व टोल नाके हटवले जातील आणि वाहनचालकांना ते जितका प्रवास करणार आहेत तितक्याच अंतरासाठी टोल भरावा लागेल,' अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी राज्यसभेत प्रश...

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; तीन पैकी 'या' नावावर शिक्कामोर्तब

इमेज
शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; तीन पैकी 'या' नावावर शिक्कामोर्तब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे.निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे त्यांच्या पक्षाचं नवं नाव असणार आहे.

राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाच्या निकालात मोठा ट्विस्ट, 1 खासदार, 5 आमदार..

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर महत्त्वाचा निकाल जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाची ऑर्डरदेखील समोर आली आहे. विधीमंडळातील संख्याबळाच्या आधारावर हा निकाल देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ट्विस्ट आणणारा एक महत्त्वाची गोष्ट देखील या निकालात समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींचा दोन्ही गटांना पाठिंबा आहे. या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक आयोगात दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्याचा विचार आता राष्ट्रवादीच्या पुढच्या न्यायालयीन लढ्यासाठी देखील महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या ऑर्डरमधून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आमदार आणि 1 खासदार यांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. याबाबत अजित पवार यांनादेखील प्रश्न विच...

आरक्षण आंदोलन पेटलं. रस्त्यावर दिसेल त्या वाहनांची तोडफोड; जळगावात रास्ता रोको

इमेज
आरक्षण आंदोलन पेटलं आहे. जळगावातील पहूर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्याने आंदोलन चिघळलं आहे.आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाजबांधवानी जळगावाच्या पहूर येथे रास्तारोको आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत. या सर्वांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे. गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडलं आहे. विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. महिलांही आंदोलनात उतरल्या या आंदोलनात तरुणांसह महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झ...

अनेक बँकांचे सर्व्हर कोलमडले; आर्थिक व्यवहारांना फटका बसला |पेमेंट फेल !

इमेज
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) payment आज देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट प्रणाली बनली आहे. आपल्यापैकी बहुतेकजण आज UPI वापरत असतील. अनेक वेळा UPI पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो.दुसरे काही नाही तर, आठवड्यातून एकदा UPI पेमेंट अयशस्वी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. UPI पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे, अनेक वेळा आपण 2-3 वेळा पेमेंट करतो आणि कधीकधी UPI व्यवहार होत नाहीत, ज्यामुळे खूप त्रास होतो. दरम्यान, ग्राहकांना पुन्हा एकदा UPI पेमेंट करताना समस्या आली आहे. विशेष म्हणजे, ग्राहक X (पूर्वीचे ट्विटर) वर या समस्येबद्दल पोस्ट करत आहेत. Downdetector, आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्मनुसार, आता ही समस्या HDFC बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना प्रभावित करत आहे. एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), कोटक महिंद्रा बँकसह अनेक बँकांचे UPI सर्व्हर डाउन झाल्याने, वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  डाउनडिटेक्टरवरील आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्मनुसार, सुमारे 250 अहवालांपैकी 60 टक्के अहवाल निधी हस्तांतरणातील समस्या, 35...

सेवाज्येष्ठता डावलून शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्ती! संस्थेतील वाद शिक्षणाधिकाऱ्यांकडे; पगारासाठी तात्पुरते मुख्याध्यापक नेमण्याची नामुष्की

इमेज
मुख्याध्यापकास पात्र असलेल्या शिक्षकाची सेवाज्येष्ठता डावलून संस्थेअंतर्गत वादातून किंवा आपल्या खास संबंधातील शिक्षकाला मुख्याध्यापक केल्याचे वाद आता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे येत आहेत.काही संस्थांमधील वाद शिक्षण आयुक्त, संचालक, उपसंचालक यांच्यापर्यंतच सुद्धा पोचले आहेत. त्यामुळे अनेकांना शाळांमधील शिक्षकांच्या पगारासाठी तात्पुरता मुख्याध्यापक नेमावा लागल्याची असंख्य उदाहरणे आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दररोजच शेकडो शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिकांची वर्दळ सुरूच असते. त्याठिकाणी स्वतंत्र शिपाई नसल्याने अनेकजण थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करतात अशी तेथील वस्तुस्थिती आहे. काहीजण अतिरिक्त शिक्षक तर काहीजण मुख्याध्यापक पदासाठी पात्र असूनही संस्थेने डावलले अशा तक्रारी घेऊन येत आहेत. तसेच निवृत्त होऊन दोन महिने झाले, प्रस्तावातील त्रुटी दूर करूनही पेन्शनच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही म्हणून तर काहीजण अतिरिक्तच्या समायोजनाचा निकाल शिक्षणाधिकाऱ्यांनी देऊनही संस्था समायोजन करून घेत नसल्याच्या तक्रारी घेऊन त्याठिकाणी येत आहेत. दुसरीकडे कार्यालयात...

केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार यांना दिले हे नवीन निर्देश...

इमेज
प्रचारसभांमध्ये केल्या जाणाऱ्या भाषणांच्या घसरत्या दर्जावर उपाय योजण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींप्रति (पीडब्ल्यूडीएस) आदरयुक्त भाषणे करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित कोणत्याही उपक्रमामध्ये बालकांचा वापर करण्यासंदर्भात कठोर निर्देश जारी केले आहेत.भित्तीपत्रिका/पत्रके यांचे वाटप करणे अथवा घोषणा देणे, प्रचार फेऱ्या, निवडणुकीसाठी आयोजित बैठका इत्यादींमध्ये भाग घेण्यासह निवडणूक प्रचार मोहिमांमधील कोणत्याही उपक्रमात बालकांचा वापर करू नये अशा सूचना सर्व राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत.राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणारे उमेदवार यांच्या द्वारे निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारे केलेला बालकांचा वापर खपवून घेतला जाणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या सूचनांमध्ये खालील बाबींवर अधिक भर देण्यात आला आहे: निवडणुकीशी संबंधित उपक्रमांमध्ये बालकांच्या सहभागाला प्रतिबंध: प्रचार सभा, घोषणाबाजी, भित्तीपत्रिका अथवा पत्रके यांचे वाटप अथवा निवडणुकीशी संबंधित इतर कोणत्याही कामांसह निवडणूक प्रचाराच्या कोणत्याही पद्ध...

कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना पूर्ण शुल्क माफी; शिंदे सरकार

8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे.  महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थाना या खर्चाची परतफेड करेल. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रकात पाटील यांनी कुलगुरुंच्या बैठकीत शुक्रवारी याची घोषणा केली. सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात ५० टक्के शुल्क माफी होती. आता ही शुक्लमाफी १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.चंद्रकात पाटील म्हणाले की, 'उच्च शिक्षणातील विविध कोर्सेससाठी मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच कुलगुरुंनी वेळेवर निकाल लागावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.' सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुलगुरुंच्या बैठकीला ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण

इमेज
शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला 'शिवसन्मान पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.पुरस्कार वितरणाचा सोहळा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. या जागेची बुधवारी दुपारी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाहणी करून कार्यक्रमाची तयारी, त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, सुरक्षा आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या. यावेळी सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनीत पाटील आदी उपस्थित होते.