पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोदी व ठाकरे यांची एकाच दिवशी सोलापूर मध्ये सभा

इमेज
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. आज (शुक्रवारी) 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभांकडे जनतेचे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे येत्या 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहे. सोलापुरात या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.  सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दोन आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. या दोन्हीही सभा एकाच दिवशी सोमवारी 29 एप्र...

छत्रपती शिवरायांच्या वंशजांची संपत्ती किती ?

इमेज
यंदाची लोकसभा निवडणूक देशासह राज्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडला. राज्यातील तिसरा मतदानाचा टप्पा अधिक रंजक असणार आहे.या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन वंशज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूरमधून उमेदवारी देण्यात आलीय. तर सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे संपत्ती काय हे जाणून घेऊ.महाराष्ट्रात कोणत्याही सभेला किंवा भाषणाला सुरुवात होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय घोष केला जातो. मग कोणत्याही पक्षाची सभा किंवा कोणत्याही पक्षातील नेता असो सर्वजण महाराजांचा जय घोष करत असतात. आता महाराजांचे वंशज निवचडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देते ते पाहून औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान गुरुवारी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यामध्ये साताऱ्याचे राजे आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनीही उमेदवारी भरला. या अर्जासह त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्...

चैत्री पौर्णिमा यात्रा येरमाळा 24 पासून प्रारंभ , 24 पासून चुना वेचानार

इमेज
शिराळा माहेर असलेली तुळजाभवानी मातेची थोरली बहीण येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेतला 24 एप्रिल ला चुना वेचायचायं..  येरमाळ्यात श्रावणी पौर्णिमेला आणि चैत्र पोर्णिमेला आशा वर्षातून दोन वेळेस श्री येडेश्वरी देवीची यात्रा भरते ,त्या अनुषंगाने श्री येडेश्वरी देवीचा अल्पसा परिचय  चैत्र महिन्यात भरणारी राज्यातील सर्वात मोठी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची यात्रा आहे  ही यात्रा चैत्र महिन्यात चैत्र पोर्णिमे पासून पाच दिवस असते गावच्या दक्षिणेकडील पश्चिम बाजूस असलेल्या आंबराईत साधारणता 50 एकर जागेत  ही यात्रा भरते येरमळयाची यात्रा ही दोन चमत्कारामुळे प्रसिद्ध आहे एक म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाला कवड्या येत होत्या आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये चुण्याच्या शेतात श्री  येडेश्वरी देवी च्या पालखीचे आगमन होताच तिथील शेतात आपोआप चुनखडीचे खडे प्रगट होतात आज ही हे खडे चुन्याच्या शेतात प्रगट होतात या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक...

प्रभू श्रीरामाचे वंशज आजही जिवंत ? या राज्याच्या राजकारणात थेट सक्रिय दिले पुरावेच

इमेज
जानेवारी महिन्यात अयोध्येत मोठ्या थाटामाटात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती. हा सोहळा जगभर चर्चिला गेला; पण प्रभू श्रीराम यांचा विषय निघाला की अनेकांना प्रश्न पडतो की त्यांचे वंशज आता आहेत का?ते कुठे आहेत, काय करतात? याबाबत जाणून घेऊ या. आज रामाचे वंशज अयोध्येपासून सुमारे 700 किमी दूर असलेल्या राजस्थानची राजधानीच्या शहरात म्हणजे जयपूर इथं राहतात. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी दावा केला आहे, की त्या आणि त्यांचं कुटुंब भगवान रामाचे वंशज आहेत. दिया कुमारी यांचा दावा राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्या दिया कुमारी यांनी चार वर्षांपूर्वी दावा केला होता, की जयपूर राजघराणं रघुकुल कुटुंबाचा एक भाग आहे. म्हणजेच ते प्रभू रामाचे वंशज आहेत. भगवान श्रीरामांना दोन पुत्र होते. एक लव आणि दुसरे कुश. जयपूर राजघराणं कुशचे वंशज असल्याचा दावा दिया कुमारी यांनी केला होता. दिया यांचे वडील प्रभू श्री राम यांची 309वी पिढी होती आणि त्या 310 व्या पिढीतल्या आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. प्रभू रामाचे जगभर अनेक वंशज आहेत. पुरावेही दिले दिया कुमा...

मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती

इमेज
महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे धाराशीवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ओमराजे यांच्या शिवाय महायुतीच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आहेत. ओमराजे (Omprakash Rajenimbalkar) आणि अर्चना पाटील यांनी आज (दि.16) उमेदवारी अर्ज भरला होता. ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. शिवाय इतर काही त्रुटीही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी स्पष्ट केल्या आहेत. 19 एप्रिलपर्यंत त्रुटीची पूर्तता करण्याची दिली नोटीस  ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि अर्चना पाटील यांना चूका दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पुर्तता झाली नाही तर, ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांना समज दिली आहे.  ओमराजेंचा अर्ज भरण्...

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पुन्हा धक्का, मोहिते पाटला नंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा राजीनामा

इमेज
माढा लोकसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.शरद पवारांच्या पक्षाने मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारीही दिली आहे. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे माढ्यासोबतच सोलापूरचं गणितही बदलण्याची शक्यता आहे, कारण मोहिते पाटील कुटुंबाचा या दोन्ही मतदारसंघात प्रभाव आहे. मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी जगताप यांची भेट घेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. सांगलीमधून भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले आणि त्यांनी भाजपला इशारा दिला होता. जतमध्ये विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या ...

बार्शी बस स्थानकातील वर्कशॉप मध्ये दुर्दैवी घटना!

इमेज
KDM NEWS बार्शी:- प्रतिनिधी दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी अंदाजे ९ च्या दरम्यान बार्शी बस स्थानकातील गॅरेज मध्ये एका हृदयद्रावक घटना घडली त्यामध्ये वाहक सतीश इंगळे मुक्काम पोस्ट येडशी तालुका जिल्हा धाराशिव नावाचा बसवाहक जागीच ठार झाला. धाराशिव (उस्मानाबाद)जिल्ह्यातील येडशी येथील रहिवासी असलेले वाहक सतीश इंगळे हे पाठीमागे असलेल्या आरोमध्ये पाणी नेण्यासाठी आले असता बस वर्कशॉप मध्ये दुरुस्ती झाल्यानंतर रॅम्पवरून बस बाहेर काढत असताना, इंगळे यांना अचानक धक्का लागून ते सरळ बसच्या चाकाखाली गेले . या दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेने बस स्थानकात शोककळा पसरली होती. या अपघातासाठी डेपो मॅनेजरच्या हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. या अगोदरही अशा घटना घडल्या आहेत यातून काही धडा घेतलेला नाही. चालक जेव्हा बस पाठीमाग घेतो तेव्हा वाहक हजर नसतो का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत? बस वर्कशॉप मधून ( रॅम्प वरून) पाठीमागे घेतील घेताना कुठल्या सूचना दिल्या जात नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे आणि...

कोटायेथील एका वसतिगृहात रविवारी सकाळी ६ वाजता ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग

इमेज
कोटा येथील एका वसतिगृहात रविवारी सकाळी ६ वाजता ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. घटनेच्या वेळी 6 मजली वसतिगृहात एकूण 70 विद्यार्थी होते. सकाळी बहुतांश विद्यार्थी गाढ झोपेत होते.गोंधळ सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, 7 जण जखमी आहेत. पहिल्या मजल्यावरील काही विद्यार्थ्यांनी बाल्कनीला चादर बांधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक विद्यार्थी पडून जखमी झाला. एक विद्यार्थी पायऱ्यांवर घसरल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. इंजिनीअरिंग आणि मेडिसिनची तयारी करणारे विद्यार्थी येथे राहत होते. तळमजल्यावर ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कुन्हडी भागातील लक्ष्मण विहार येथील आदर्श वसतिगृहात ही घटना घडली. सकाळी सहा वाजता तळमजल्यावर लावलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडली. यानंतर आगीने हळूहळू उग्र रूप धारण केले. आग वेगाने वर पसरली. विद्यार्थ्यांनी खिडक्यांना पत्रे बांधून इमारतीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्य प्रदेशातील भविष्य नावाची विद्यार्थिनी पहिल्या मजल्यावरून पडली. पायाला दुखापत झाली आहे. भविष्य N...

स्पर्धा परीक्षा फी कमी न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

इमेज
स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करून प्रशासनात काम करण्याचे सर्व मुलांचे स्वप्न असते बऱ्याच मुला-मुलींचे स्वप्न असते. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणारे हे विद्यार्थी  गरीब असल्याने ते ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे काहींकडे तर स्पर्धा परीक्षेची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. आणि जेवणासाठीी ही तरीही अफाट कष्ट आणि मेहनत करण्यासाठी ग्रामीण भागातील ही मुलं-मुली तयार असतात. मात्र महाराष्ट्र शासन एक हजार रुपये फी स्पर्धा परीक्षेसाठी आकारात असते यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. तसेच 120 रुपयात वर्षभरातील पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात,पेपर फुटीसह भरती प्रक्रियेला येणारी स्थगिती, शासन निर्णयानुसार वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांची मुदत वाढ करण्यात यावी. अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. प्रशासनाने वयोमर्यादेसह परीक्षा फी कमी करण्याच्या प्रश्नावर लवकर निर्णय न घेतल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकू असा इशारा विद्यार्थ्यांनी या वेळेस केला आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी पोलीस भरतीत जास्त...

अकलूज अकलूज तालमीतला पट्ट्या धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून उमेदवारी

इमेज
राज्यात यंदा सर्वाधिक चर्चेत राहिला आणि अजूनही चर्चेत राहतोय तो मतदारसंघ म्हणजे माढा  एकेकाळी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसतंय.पण सुरुवातीला काहीसे माघार घेतलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) आता माढ्यामध्ये पुन्हा जोमाने फासे टाकायला सुरूवात केली आहे, आणि त्याला बळ मिळतंय ते अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबीयाचं. भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे आता शरद पवार गटात सामील होणार असून त्यांच्यामार्फत शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबीयांनी पुन्हा एकदा माढ्याचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव माहिती होतं, आता धैर्यशील मोहिते पाटलांचंही नाव चर्चेत...

एकाला वाचवायला गेले आणि चार बुडाले, गुढीपाडव्याला दुर्दैवी घटना !

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. विरार पश्चिमेकडील रुस्तुम जी शाळेच्या बाजूला सेफ्टी टँकची सफाई सुरू असताना 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ चारही कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथील S.T.P. प्लांटमधील चोकअप झाला होता. त्यामुळे दुरस्ती करण्यासाठी तेथील कर्मचारी गेला होता. पण बराच वेळ झाला तो काही परत आला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. पण तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे चौघेही एसटीपी प्लांटमध्ये 4 जण मृत्युमुखी पडले.सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचारी तत्काळ दुर्घटनास्थळी धाव घेतली. ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून पाण्यात उतरले आणि बुडीत मृत व्यक्तींना बाहेर काढले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये शुभम पारकर (वय 28), अमोल घाटाळ (वय 27), निखिल घाटाळ (वय 24), सागर तेंडुलकर (वय 29) अशी मृतांची नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या कर्म...