एकाला वाचवायला गेले आणि चार बुडाले, गुढीपाडव्याला दुर्दैवी घटना !
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. विरार पश्चिमेकडील रुस्तुम जी शाळेच्या बाजूला सेफ्टी टँकची सफाई सुरू असताना 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ चारही कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथील S.T.P. प्लांटमधील चोकअप झाला होता. त्यामुळे दुरस्ती करण्यासाठी तेथील कर्मचारी गेला होता. पण बराच वेळ झाला तो काही परत आला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. पण तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे चौघेही एसटीपी प्लांटमध्ये 4 जण मृत्युमुखी पडले.सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचारी तत्काळ दुर्घटनास्थळी धाव घेतली. ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून पाण्यात उतरले आणि बुडीत मृत व्यक्तींना बाहेर काढले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये शुभम पारकर (वय 28), अमोल घाटाळ (वय 27), निखिल घाटाळ (वय 24), सागर तेंडुलकर (वय 29) अशी मृतांची नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आले नाही.