**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी**
**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी** **KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, २४ सप्टेंबर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ सीना या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून, शेती, जनावरे, घरे आणि व्यवसायातील नुकसानीसाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री म्हणाले, "संकटकाळात धीर धरा. सरकार तुमच्यासोबत आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी, घरांच्या दुरुस्तीसाठी आणि अन्नधान्यासाठी मदत मिळेल. व्यावसायिकांसाठीही स्वतंत्र पॅकेज जाहीर केले जाईल." त्यांनी नुकत्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्तांसाठी २ हजार कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. ओल्या दुष्काळाच्या निकषांप्रमाणे ही मदत वितरित केली जाईल, असेही ते म्हणाले. दारफळ गावात नदीने पात्र बदलल्याने मोठा भाग पाण्यात बुडाला. घरांमध्ये पाणी शिरून ...