पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, पण त्यानंतर काय?

इमेज
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा  व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.  आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.  आरबीआयनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.  7 ऑक्टोबरनंतर काय? आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण...

पाकिस्तानात आत्मघाती बॉम्बस्फोट, पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार

इमेज
पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे आज शुक्रवारी मशिदीजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान ५२ जण ठार झाले, तर सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त पाकिस्तानमधील dawn ने दिले आहे. वृत्तानुसार, 'बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान ५२ जण ठार झाले, तर ५० जण जखमी झाले. मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त लोक जमत असलेल्या मशिदीजवळ हा स्फोट झाला.'शहीद नवाब घोस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सईद मिरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तर २२ मृतदेह मस्तुंग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनीर अहमद यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, "आत्मघाती बॉम्बरने पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या वाहनाजवळ स्फोट घडवून आणला." हा स्फोट एका मशिदीजवळ झाला जिथे लोक ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्तच्या मिरवणुकीसाठी जमले होते. स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) जावेद लेहरी यांनी सांगितले की, ...

मध्यरात्रीच्या नोटीसनंतर रोहित पवारांचं दोन बड्या नेत्यांकडे बोट, शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर!

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देत बारामती ॲग्रोचे  दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र यावर सविस्तर बोलण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. "मी कारवाईबाबत बोलणार नाही," असं शरद पवार म्हणाले. कारवाईवर बोलणार नाही : शरद पवार शरद पवार हे आज बारामतीतील (Baramati) गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं ते म्हणाले. रोहित पवारांना नोटीस, बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदा...

पितृ पक्षाचा उद्यापासून आरंभ; जाणून घ्या श्राद्धाच्या सर्व तिथी आणि पद्धती,

इमेज
पितृ पक्षाचा उद्यापासून आरंभ; जाणून घ्या श्राद्धाच्या सर्व तिथी आणि पद्धती,पितृ पक्ष किंवा पितृ पंधरवडा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि पितृमोक्षम अमावस्येपर्यंत चालू असतो. पितृ पक्ष उद्यापासून म्हणजेच 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जो 14 ऑक्टोबरला संपेल.पितृ पक्षादरम्यान, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध केले जाते. हरिद्वार, गया इत्यादी देशातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन पिंडदान करून पित्र प्रसन्न होतात.ृ 'या' कृती चुकूनही करु नका श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसांत केस व नखे कापू नयेत. त्यांनीही ब्रह्मचर्य पाळावे. श्राद्ध विधी नेहमी दिवसा करा. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे, मोहरी हे खाऊ नयेत. प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नये. पितृ पक्ष 2023 महत्त्वाच्या तारखा 29 सप्टेंबर 2023, शुक्रवार: पौर्णिमा श्राद्ध 30 सप्टेंबर 2023, शनिवार: द्वितीया श्राद्ध 01 ऑक्टोबर 2023, रविवार: तृतीया श्राद्ध 02 ऑक्टोबर 2023, सोमवार: चतुर्थी श्राद्ध 03 ऑक्टोबर 2023, मंगळवार: पंचमी श्र...

महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला गालबोट! ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक गणेशभक्तांचा मृत्यू, जखमींची संख्याही अधिक

इमेज
महाराष्ट्र;  राज्यात आज  चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जनाची धामधुम पाहायला मिळत आहे. गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी योग्य ते नियोजन करण्यात आले आहेत.परंतू राज्यातील अनेक भागातून गंभीर आणि किरकोळ स्वरुपाच्या दुर्घटना व अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात सर्वाधिक दुर्घटना या कोकणात झाल्याचे समोर आले आहे. ज्यात एकूण 4 गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी – गणपती विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर इथे ही दुर्घटना घडली. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. तेव्हा नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी अचानक एक ब्रेक निकामी झालेला टेम्पो गर्दीत घुसला. हा टेम्पो वेगाने गर्दीत घुसल्याने अनेकजण चिरडले गेले. त्यात 15 हून अधिक लोक जखमी झालेत. तर दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला, मात्र पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आ...

नदीवर पार्किंगसाठी ६० फूट स्लॅब टाकल्याने नागपुरात पूर,ॲक्वा पार्कसाठी नदीवर अतिक्रमण

इमेज
अंबाझरी तलावाच्या विसर्गाचा भाग अरुंद करणे, वाहनतळासाठी चक्क नदीवर ५० फुटांचे सिमेंट काँक्रिटचे स्लॅब टाकण्यासारखे प्रकार नागपूर सुधार प्रन्यास आणि बड्या व्यावसायिकांनी सत्ताधाऱ्यांच्या मदतीने केले आहे.यामुळे उत्तर अंबाझरी मार्गावरील अंबाझरी ले-आऊट, डागा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी या वस्तांमध्ये पुराचे पाणी शिरले आणि कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. क्रेझी कॅसल ॲक्वा पार्कच्या मालकाने नदीपात्रावर अतिक्रमण केले. त्यामुळे नदीची रुंदी कमी झाली. तर एनआयटीला लागून असलेल्या डागा ले-आऊटमध्ये नाग नदीजवळ नागपूर सुधार प्रन्यासने 'स्केटिंग ग्राऊंड' उभारले आहे. या ग्राऊंडच्या वाहनतळासाठी अंबाझरी तलावाकडून येणाऱ्या नाग नदीवर सिमेंट काँक्रिटचे स्लॅब टाकण्यात आले आहे. शुक्रवारी उत्तर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अंबाझरी तलावातून अचानक विसर्गाचे पाणी वाढले आणि हे या स्लॅबमुळे अडले. परिणामी डागा ले-आऊट आणि कॉर्पोरेशन कॉलनीमधील घरांमध्ये पाणी शिरले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, स्केटिंग ग्राऊंडवरील पार्किंगच्या नावाने नाल्यावर नियमबाह्य ...

पृथ्वीवरून मानव प्रजाती केव्हा अन कशी नष्ट होणार? शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

इमेज
डायनासोरच्या संपुष्टीनंतर इतर अनेक प्राणी, पृथ्वीवरून नष्ट झाले आहेत. आणि आता मानवावर हीच वेळ येणार आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे.त्यांनी केलेल्या संशोधनात हे भाकीत करण्यात आले आहे. पृथीवरून मानव प्रजाती कशी नष्ट होणार? त्यांसाठी कोणकोणती कारणे जबाबदार राहतील याबाबतची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. चला जाणून घेऊयात. मानव जातीने निर्माण केलेल्या प्रगती सदृश्य गोष्टी जसे की, कारखाने, विविध स्वरूपातील उद्योग, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर चालणारी वाहने , मोठे रस्ते या सर्वासाठी लागणारी जागा आणि त्यासाठी होणारी वृक्ष्याची मोठ्या प्रमाणात होणारी तोड ही सर्व कारणे मानव जातीसाठी धोका निर्माण करत आहेत. माणसाने आपल्या प्रगतीसाठी केलेल्या ह्या गोष्टीतुन मोठ्या प्रमाणात दूषित वायूचे प्रमाण पृथ्वीवर वाढत चालले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ज्यांना हरित वायू म्हणून ओळखले जाते. जे की पृथ्वीच्या तापमान वाढीत सर्वात मोठा वाटा उचलतात. ज्यांच्या वातावरणातील वाढीमुळे ...

राज्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक, उपयुक्त पाणीसाठा जाणून घ्या सविस्तर

इमेज
मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान आज  रोजी सकाळी सहा वाजता धरणातीलपाणीसाठा असा होता...ए)=एकुण. (ऊ)=उपयुक्त -------- अ.नगर(उत्तर) --------- भंडारदरा:(ए)::१०९७४ ९९.४१% निळवंडे ::::(ए)::८१९९ ९८.५५% मुळा:(ए):::::::२२११९ ८५.०७% आढळा:(ए)::::::१०६० १००.००% भोजापुर::(ऊ):::::३६१ १००.००% ----- अ.नगर(दक्षिण) ----- पिंप.जो(उ):::३५९० ९२.४२% येडगाव:::::(उ)::१४०० ६६.७०% वडज:::::::::(उ)::११७० १००.००%  माणिकडोह:(ऊ)::७९७० ७८.३५% डिंभे:::::(उ)::१२४९० १००.००% घोड::::::::::(ए)::४०९६ ६८.६१% मां.ओहोळ(ए):::::३५.०० ८.८३% घा.पारगाव(ए):::::२५.०० ५.७२% सीना::(ए)::१२०७.०० ५०.२९% खैरी :::(ए)::::७७.०० १४.४१ % विसापुर:(ए)::२५५.०० २८.२३% ---- नासिक/जळगाव जिल्हा ----गंगापुर::(ऊ):::: ५५१६ ९७.९८% दारणा::(ऊ):::: ७१४५ १००.००% कडवा:(ऊ)::: १६८८ १००.००% पालखेड(ऊ):: ६४२ ९८.३२% मुकणे(ऊ):::: ६५८१ ९०.९१% करंजवण:(ऊ):: ५३७१ १००.००% गिरणा::(ऊ):::: १०.२०६ TMC/५५.४६% हतनुर(ऊ):::::::: ६.९४३ TMC/७७.१०% ‌वाघुर(ऊ):::::::::८.७७७ TMC/१००.००% मन्याड:(ऊ):::::०...

निजामकालीन कुणबी दाखले कसे शोधले जात आहेत? अशी आहे संपूर्ण प्रोसेस

इमेज
मराठा आरक्षणाचा मुद्दा एक महिन्यात मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. तर, मराठा समाजाच्या निजामकालीन वंशावळीतील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याचा जीआर सरकारने काढलेला आहे. निर्णयानंतर गेल्या दीड महिन्यापासून महसूल प्रशासनाने कुणबी नोंदी असलेले अभिलेख तपासण्याचे काम हाती घेतले आहे. यात गेल्या 45 दिवसांत सुमारे 65 लाख अभिलेख तपासल्यानंतर केवळ 5 हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून वेगवेगळ्या विभागातील कार्यालयात या नोंदी शोधल्या जात असून, यासाठी एक विशेष ड्राफ्ट तयार करण्यात आले आहे. जन्म मृत्यू नोंदी: जन्म मृत्यू नोंदी रजिस्टर (गाव नमुना 14) शैक्षणिक अभिलेख : प्रवेश निर्गम उतारा, जनरल रजिस्टर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क : अनुज्ञप्ती नोंदवहया, मळी नोंदवही, तोंडी नोंदवही, आस्थापना कारागृह अधीक्षक : कैद्यांची नोंदणी, शिक्षा झालेल्या कैद्यांचे वर्णन इत्यादी दर्शविणारी नोंदणी पोलीस विभाग : गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर रजिस्टर सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ...

जामखेड तालुक्यातील दिपाली पठाडे यांची पशुधन विकास अधिकारी पदी निवड

इमेज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत जामखेड तालुक्यातील जवळा येथील कन्या डाॅ. दिपाली सुरेश पठाडे यांची पशुधन विकास अधिकारी (वर्ग-१) पदी निवड झाली आहे.पठाडे या ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात नवव्या आल्या आहेत. डाॅ.दिपाली सुरेश पठाडे यांचे प्राथमिक शिक्षण इंदौर येथील शारदा रामकृष्ण विद्यामंदिर येथे झाले.माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात,उच्च माध्यमिक शिक्षण कर्जत येथील दादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. नागपुर येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयात पदवी मिळवल्यानंतर,परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात पॅथालाजी डिपार्टमेंट या याविषयात पदवीत्तर शिक्षण पुर्ण केले. यादरम्यान डाॅ.दिपाली पठाडे यांनी स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास सूरू केला होता.डाॅ.दिपाली पठाडे या जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन सुरेश पठाडे यांच्या जेष्ठ कन्या आहेत. या यशाबद्दल डाॅ.दिपाली पठाडे यांचे आमदार प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार , चेअरमन आजीनाथ हजारे, माजी उपसभापती दिपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे ,जवळा सेवा संस्थेचे चेअरमन शहाजी पाटील...

महाराष्ट्रीयन अलाऊड नाही" म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं?

इमेज
मराठी माणूस किती टक्के राहिलाय? यावर मुंबईत वेळोवेळी चर्चा होत असते. काही राजकीय नेतेमंडळी प्रत्येक वेळी इथे प्रत्येकाला येण्याचं, राहण्याचं, काम करण्याचं स्वातंत्र्य आहे या भूमिकेचं समर्थन करताना दिसतात., प्रत्यक्षात मुंबईत काही ठिकाणी काही इमारतींमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्तींना घरं नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशीच एक तक्रार एका महिलेनं सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. हा प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी इमारतीतल्या संबंधित व्यक्तींना जाब विचारल्यावर या दोघांनी माफीही मागितली. पण नेमकं या महिलेसोबत काय घडलं होतं? याचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. नेमका प्रकार काय? तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुलुंड वेस्टमधल्या 'शिवसदन' नावाच्या इमारतीमध्ये घर बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी 'महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही घर देत नाही' असं सांगून नकार दिला. यातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ ...

PPF-सुकन्या समृद्धीबाबत मोठी अपडेट, अर्थ मंत्रालयाच्या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केल्यास...

इमेज
तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलीकडेच, PPF, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) चे नियम अर्थ मंत्रालयाने बदलले आहेत. होय, सरकार 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तुम्हाला आनंदाची बातमी देऊ शकते. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी, आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदरात वाढ केली नाही. आरडी किंवा एफडीवर बँकांकडून दिले जाणारे व्याज सर्वाधिक आहे. व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा अशा परिस्थितीत या महिन्याच्या अखेरीस छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. अल्पबचत योजनेवर देण्यात येणाऱ्या व्याजदराचा वित्त मंत्रालयाकडून दर तिमाहीत आढावा घेतला जातो. जूननंतर आता हा आढावा सप्टेंबरअखेर होणार आहे. तत्पूर्वी, 30 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत काही अल्पबचत योजनेच्या (एसएसवाय) व्याजदरातही (Interest Rate) वाढ करण्यात आली होती. यापूर्वी एप्रिल-जून 2023 या कालावधीसाठीही दर वाढवण्यात आले होते.आरडीचे व्याजदरही वाढले दरम्यान, 30 जून रोजी केलेल्या...

सरकारी नोकऱ्या आहेत कुठे?

प्रशासकीय खर्च तसेच कर्ज बोजा कमी करून विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याच्या नावाखाली कंत्राटी सरकारी नोकरभरतीचा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारकडून केला जातोय खरा, परंतु राज्याचा वेतन व निवृत्ती वेतनावरील खर्च एकूण खर्चाच्या 40 टक्के आहे.तोच अमेरिका व इतर प्रगत देशात 40 ते 45 टक्के आहे. कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी एवढा खर्च आवश्यक मानला जातो. प्रगत देशांचे जाऊ द्या, आपल्याकडील उत्तर प्रदेश, केरळ ही राज्येदेखील 40 टक्क्यांपेक्षा अधिक निधी प्रशासनावर खर्च करतात, तरीही त्यांच्याकडून असे पाऊल उचलले जात नाही. स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थानचा उल्लेख तरुणांचा देश असा केला. तसेच देशात तरुणांना प्रचंड संधी असल्याचेही ते म्हणाले. त्यांचे पहिले विधान जगमान्य आहे, परंतु देशात सध्या असलेल्या प्रचंड बेरोजगारीमुळे त्यांच्या दुसऱया विधानाशी सहमत होता येत नाही. तरुणांच्या हाताला काम दिल्यास देश सुजलाम् सुफलाम् बनू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, परंतु इथेच आपले घोडे पेंड खातेय. चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीत सातत्याने वाढ होतेय. ...

51 हजार तरुणांना मिळालं नियुक्ती पत्र; PM मोदी म्हणाले, 2047 पर्यंत भारत...

इमेज
देशातील तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 51,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.नवीन नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज नियुक्तीपत्रे मिळाल्या बद्दल सर्वांचं अभिनंदन केले. पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचा संकल्प केला आहे. येत्या काही वर्षात आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. या काळात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची खूप मोठी भूमिका असणार आहे. नागरिक-प्रथम या भावनेने काम करणे गरजेचे आहे. तुम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढलेल्या पिढीचा भाग आहात, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असेगी पीएम मोदी म्हणाले.देशात 46 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्याअंतर्गत 2023...

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अभिलेख तपासणीतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

इमेज
मनोज जरांगे पाटील ; यांच्या उपोषणानंतर मराठवाड्यातील   कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी प्रशासनाला दिले आहेत.त्यानंतर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून महसूल प्रशासनाच्या वतीने कुणबी असलेल्या नोंदीचे अभिलेख तपासण्यात येत आहेत. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 45 दिवसांत ६५ लाख अभिलेख मराठवाड्यात तपासण्यात आले. त्यात केवळ पाच हजार कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.  मराठवाड्यात विदर्भालगतच्या जिल्हा आणि तालुक्यातच कुणबीच्या नोंदी सापडत आहेत. सुरुवातीला जालना जिल्ह्यापासून हे अभिलेख तपासण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा या भागातून झालेले रोटीबेटीचे व्यवहार या माध्यमातून काही नोंदी आढळत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधून काही गावातले लोक धाराशिव परिसरात आले होते. त्या वेळी काही गावांत कुणबी नोंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. कन्नड भागातदेखील कुणबीच्या नोंदी आढळत आहेत. तहसील कार्यालय, अभिलेख कार्यालय, शाळा,इतर सर्व कार्यालय तसेच जेलमधील नोंदीदेखील तपासण्यात येत आहेत. ...

निगेटिव्ह अर्थ काढणे चुकीचे ; चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

इमेज
भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी, यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे, या संदर्भाने मी बोललो आणि त्यात गैर काही नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.नागपुरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ तर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाल्याने राजकारण तापले. यावर बावनकुळे आज माध्यमांशी बोलत होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा असे व्यंगात्मक बोलावे लागते, बावनकुळे यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये, अशी पाठराखण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, कोणत्याही गोष्टीचा निगेटिव्ह अर्थ काढणे चुकीचेच असल्याचे ते  म्हणाले. नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उप...

सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

इमेज
ठेकेदार व्हायची अनेकजणांना इच्छा असते. कारण की, दररोज किंवा दर महिन्याला ठेकेदार हजारो-लाख कमवतात असे आपण बऱ्याचदा ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की ठेकेदार बनणे हे आपल्या सर्वांना वाटते तितके सोपे नाही.आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. माहितीनुसार अनेक प्रकारचे ठेकेदार आहेत. आज आपण रस्ते बांधणीचे ठेकेदार कसे बनतात आणि त्यांना कंत्राट कसे मिळते याची माहिती घेणार आहोत. ठेकेदार कसे व्हायचे ? रस्ते बांधणीचे कंत्राट कोण देते? कंत्राटदार परवान्यासाठी कागदपत्रे परवान्यासाठी नोंदणी कशी करावी? ठेकेदार कसे व्हायचे ? ठेकेदाराला कंत्राटदार असे देखील म्हंटले जाते. रस्ता कंत्राटदार होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही, असा विचार करत असाल तर तुमची चूक आहे. यासाठी तुम्ही सिव्हिल इंजिनीअरिंग पास केले पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी डिप्लोमाही केला पाहिजे. यानंतर तुम्हाला काही महिने किंवा काही वर्षे इतर कोणत्याही कंत्राटदारासोबत काम करावे लागेल. जेणेकरुन तुम्हाला या कामाचा थोडाफार अनुभव घेता येईल. कारण सरकारचे रस्तेबांधणीचे कंत्राट अशाच लोकांना दिले जाते ज्यांना या कामातील ...

निकालाच्या प्रतीक्षेत असताना तलाठी भरती परीक्षा स्थगित होणार? न्यायालयात याचिका दाखल, काय आहे मागणी.

इमेज
निकालाच्या प्रतीक्षेत असताना तलाठी भरती परीक्षा स्थगित होणार? न्यायालयात याचिका दाखल, काय आहे मागणी.तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबरला संपली. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.मात्र सुरुवातीपासूनच तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या परिक्षेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निकालाची अपेक्षा असताना आता परीक्षेवर स्थगिती येण्याची शंका उपस्थित केली जात आहे. स्पर्धा परीक्षा समितीचे निलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी भरती घोटाळा आणि इतर नोकर भरती मधील पेपरफुटी घोटाळ्याबाबत अनेक पुरावे समितीकडे आहेत. सरकारला वारंवार निवेदने आणि विनंत्या करूनही नोकर भरती घोटाळ्याबाबत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. ...

पेट्रोल पंप कसा सुरू करावा? लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे व नफा किती असतो? वाचा माहिती

इमेज
अनेक प्रकारचे व्यवसाय असतात व या व्यवसायांमध्ये काही व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक आणि जागा देखील खूप कमी लागते तसेच कुठल्याही प्रकारच्या परवानगी घेण्याची गरज नसते .परंतु काही व्यवसाय असे असतात की याकरिता लाखो रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते व त्याकरिता जागा व इतर बाबींची पूर्तता तसेच परवाना देखील लागतो. याच प्रकारातला एक व्यवसाय म्हणजे पेट्रोल पंप व्यवसाय होय.हा व्यवसाय एक चांगला नफा देणारा व्यवसाय आहेच परंतु यासाठी लागणारी गुंतवणूक देखील महत्त्वाची असून काही आवश्यक परवाने मिळवणे देखील गरजेचे असते. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण पेट्रोल पंप कसा सुरू करावा व त्यासाठीची प्रक्रिया कशी असते? याबद्दलची महत्त्वाची माहिती घेऊ. पेट्रोलपंपकुणालासुरूकरतायेऊशकतो? सार्वजनिक व खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू करण्याकरिता परवाने दिले जातात व या कंपन्या म्हणजे बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल, रिलायन्स तसेच एस्सार ऑइल यांचा यामध्ये समावेश होतो. 21 वर्ष ते 55 वर्ष वयातील कोणत्याही भारतीय व्यक्तीला पेट्रोल पंप सुरू करता येऊ शकतो. याकरिता काही शैक्षणिक अटी असून त्य...

आजचा दिवस फार्मासिस्टचं कौतुक करण्याचा दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

इमेज
एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच डॉक्टरांकडे जाते आणि औषधे घेते. बरे झाल्यानंतर, तो डॉक्टरांचे आभार मानतो कारण त्याने त्याला बरे होण्यास मदत करणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला. पण या सगळ्यात ही जीवनदायी औषधे कोण बनवतात आणि शोधून काढतात याचा विचार कोणी करत नाही. फार्मासिस्ट ही अशी व्यक्ती आहे जी औषधे तयार करून रोगांचे निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते.दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आणि थीम :जागतिक फार्मासिस्ट दिवस 2023 ची थीम "फार्मसी स्ट्रेंथनिंग हेल्थ सिस्टम" आहे. ही थीम जागतिक स्तरावर हेल्थकेअर सिस्टीम वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी फार्मासिस्ट आणि फार्मसी व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर देते. वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिस्टचे कौतुक करणे आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हा संदेशही देणे.जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास :जागतिक फार्मासिस्ट दिन 25 सप्टेंबर 2009 रोजी सुरू झाल...

जागतिक फार्मासिस्ट दिन 2023 :जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

इमेज
जागतिक फार्मासिस्ट दिन 2023 :आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध रोगांवर उपचार करण्यात डॉक्टरांसोबतच फार्मासिस्टचीही मोठी आहे, फार्मासिस्टना 'केमिस्ट' देखील म्हटले जाते. ही अशी व्यक्ती आहे ज्याला औषधांबद्दल पूर्ण माहिती आहे . फार्मासिस्ट लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात .   आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) च्या नेतृत्वाखाली दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो , त्याचा उद्देश जगातील सर्व फार्मासिस्टचे आभार मानणे आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे हा आहे. यासोबतच 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान जागतिक फार्मासिस्ट सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास 2009 पासून, दरवर्षी 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो ज्यांनी आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या फार्मासिस्टचा सन्मान केला जातो आणि त्यांचे योगदान अधोरेखित केले जाते.इस्तंबूल (तुर्की) येथे आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन ( एफआयपी ) द्वारे 2009 मध्ये याची सुरुवात...

अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट! विधानसभा अध्यक्षांनी.

इमेज
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलीये. सुप्रीम कोर्टाने वेगाने सुनावणी घेण्यास सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे.त्याबद्दलची तारीख शिवसेनेच्या संबंधित आमदारांना कळवण्यात आली असून, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीस हजर राहण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे वेळापत्रक मागितलं असून, सुनावणी वेगाने घेण्यास सांगितलं आहे. विधानसभा अध्यक्षांची दिल्लीवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला गेले होतो. दिल्लीतून परतल्यानंतर विधिमंडळाकडून आज सुनावणीबद्दल माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेच्या संबंधित आमदारांना याबद्दल कळवण्यात आले असून, सुनावणीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हेही वाचा >> 'शरद पवारांचे दोन नेते लवकरच आमच्याकडे येणार', गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट विधिमंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेना आम...

बँक ऑफ 'महाराष्ट्र'चा बेजबाबदारपणा; तब्बल 3 दिवस बँक उघडीच

इमेज
मावळ तालुक्यातील कामशेत मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कामशेत येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शटरला तब्बल तीन दिवसापासून टाळे लावले नसल्यामुळे उघडीच राहिली होती. ही बाब सकाळी नऊच्या सुमारास स्थानिक व्यापारी विलास बटेवरा यांच्या लक्षात आली. त्यांनतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यानां सांगितला. यानंतर बँकेचे कर्मचारी ननावरे यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेला कुलूप लावले. या घटनेतून पुन्हा एकदा बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजार पेठेत ही बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकरत आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे खाते असून पेन्शनर्स, नोकरदा, बचतगट, शेतकरी, व्यावसायिक, यांची खाती आहेत. कामशेत परिसरात एकमेव नॅशनल बँक असल्यामुळे लोकांना या बँकेशिवाय दुसरा पर्याय नाही. आधीच या बँकेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच या घटनेमुळे बँकेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यानंतर शटर खाली ओढून टाळे न लावताच बँके...

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील १४ हजार शाळा बंद होणार

इमेज
राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे.तसेच याबाबतचे प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळा बंद होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे.शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते २० पटसंख्येच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. त्यात १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी, तर २९ हजार ७०७ शिक्षक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून, समूह शाळा निर्णा करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपचा मेगाप्लॅन! लोकसभेसाठी माधुरी दिक्षीत, उज्ज्वल निकम, सुनिल देवधर यांची 'या' मतदारसंघासाठी चाचपणी

इमेज
केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा केली. तब्बल ४५ मिनिटे त्यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.या बैठकीमध्ये आमदार अपात्रता विषय आणि लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून माधुरी दिक्षीत, जळगावमधून उज्ज्वल निकम, तर धुळ्यातून प्रतापराव दिघावकर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनिल देवधर यांच्या नावाची चर्चा झाली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याचं 'साम'च्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.अमित शहांनी चार नावांची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याचं सांगितलं जातं. यातील दोन नावांची चर्चा यापूर्वीपासूनच सुरु होती. सुनिल देवधर यांना पुण्यातून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रतापराव दिघावकर हे माजी अधिकारी असून तिकीट मिळण्याच्या अटीवरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जातं. त्यांना धुळ्यातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.जळगावमध्ये एटी पाटील यांचे तिकीट कापून उ...

एचडीएफसी बँकेचे मोठं नुकसान! चार दिवसात १ लाख कोटी रुपयांचे नुकसान; नेमकं कारण काय?

इमेज
शातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या शेअर्समध्ये चार दिवसांत ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या काळात बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सध्या एचडीएफसी बँकेचे एमकॅप ११.५९ लाख कोटी रुपये आहे. HDFC बँकेचे शेअर्स शुक्रवारी १५५७ रुपयांवर उघडले आणि २.११ टक्क्यांच्या घसरणीसह १५२४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले. शेअर बाजार बंद झाला तेव्हा बँकेचे शेअर्स १.५७ टक्क्यांच्या घसरणीसह १,५६२९.२९ रुपयांवर बंद झाले. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी घसरत राहिले, निफ्टी ५० ६८ अंकांनी किंवा ०.३४ टक्क्यांनी घसरून १९,६७४.२५ वर, तर सेन्सेक्स २२१ अंकांनी किंवा ०.३३ टक्क्यांनी घसरून ६६,००९.१५ वर बंद झाला. तज्ज्ञांच्या मते, परदेशी निधीचा प्रवाह आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांची प्रचंड विक्री यामुळेही गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. निफ्टी ५० मध्ये २.६ टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये २.७ टक्क्यांची घसरण झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, बीएसई मिडकॅप निर्देशांक १.७ टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक २ टक...

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या 'टॉप ५' योजना; तुम्ही लाभ घेतला का?

इमेज
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या 'टॉप ५' योजना; तुम्ही लाभ घेतला का?)     छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम-(CSMS-DEEP)- या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील ३० हजार उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. MKCL मार्फत उमेदवारांना ४ module अंतर्गत spoken English, soft skills, IT skills, accounting with Tally, Hardware and Networking, web designing, data management, digital freelancing, mobile app development कोर्सेस शिकवले जातात. लक्षित गटातील उमेदवारांसाठी सारथी मार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी.२६ हजार ३६०/- रुपये खर्च येतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये २३ हजार ७१८ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२३ अखेर सांगली जिल्ह्यांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या ५७६ इतकी आहे. २) श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम-इंडो-जर्मन टूल रूम (IGTR)-  इंडो-जर्मन टूल रूम(IGTR), छत्रपती संभाजीनगर ह...

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

इमेज
महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?येत्या २५ व २६ सप्टेंबरला राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. पुण्यात पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी)दिले आहेत. झारखंड तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून सध्या ते चक्रीय स्थितीमध्ये आहे. याच वेळी सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा रेषा सक्रीय झाले आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्याच्या चौफेर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. सप्टेंबरचे तीन आठवडे पावसाने दडी मारली असली तरी पुढील आठवडा पावसाचा ठरणार आहे. आयएमडी पुणे कार्यालयातील हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, प्रामुख्याने रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर ...

उद्या दिवस आणि रात्र समान नसणार, का माहितेय.?

इमेज
उद्या दिवस आणि रात्र समान नसणार, का माहितेय.? दरवर्षी २१, २२ मार्च तसेच २२, २३ सप्टेंबरला विषुव दिन असतो, म्हणजेच सूर्य अगदी विषुववृत्तावर असतो. मात्र, आपल्याकडे उत्तर गोलार्धात २३ सप्टेंबरला दिवसरात्र समान नसते.पाठ्यपुस्तकातील आणि सर्वसामान्य माहितीप्रमाणे २३ सप्टेंबरला दिवस रात्र समान असतात, पण ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक व खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचे असून ते बदलले पाहीजे, असे सांगितले. पृथ्वी सूर्याकडे २३.५ अंशाने कललेली असल्याने वर्षभर पृथ्वीच्या २३.५ अक्षांशावर उत्तर-दक्षिणेला दर रोज जागा बदलताना दिसते. याला क्रांती वृत्त म्हणतात. सूर्याच्या कर्कवृत्तावरून मकर वृत्ताकडे जाण्याच्या भासमान मार्गाला दक्षिणायन आणि मकर ते कर्कवृत्ताकडे जाण्याचा मार्गाला उत्तरायण म्हणतात. या दोन्ही मार्गक्रमणावेळी सूर्य २१,२२ मार्च आणि २२,२३ सप्टेंबरला दोनदा विषुववृत्त पार करीत असतो. त्या दिवसांना विषुवदिन किंवा संपात दिन (Equinox) म्हटले जाते. २०२३ ला विषुवदिन २३ सप्टेंबरला दुपारी १२.२० वाजता आहे. आपण याच दिवशी दिवस रात्र समान असते, असे ...

'या' तारखेनंतर परतीचा मान्सून माघारी फिरणार, भारतीय हवामान विभागाची मोठी घोषणा

इमेज
'या' तारखेनंतर परतीचा मान्सून माघारी फिरणार, भारतीय हवामान विभागाची मोठी घोषणानैऋत्य मान्सूनसंदर्भातभारतीय हवामान विभागानं  मोठी घोषणा केली आहे. 25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.  सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. अद्यापही शेती पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतच परतीच्या मान्सून अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  राज्यात चांगल्या पावसाची शक्यता राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या ...