पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोव्यात नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून; शिक्षण खात्याचे महत्त्वपूर्ण निर्णय

इमेज
गोव्यात नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून; शिक्षण खात्याचे महत्त्वपूर्ण निर्णय गोवा राज्यात १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून, शिक्षण खात्याने यासंदर्भातील महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीच्या वर्गांसाठी एप्रिल महिन्यात सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत शाळा चालविण्यात येणार आहेत. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. १ मे ते ३ जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असेल, आणि ४ जूनपासून सर्व इयत्तांचे वर्ग सामान्य वेळेवर सुरू होतील. शाळा व्यवस्थापनांनी या बदलांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना देणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर परिपत्रक सूचना फलकावर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी या निर्णयाची स्पष्टता दिली आहे. अपार आयडी क्रमांकाची अनिवार्यता शिक्षण खात्याने आणखी एक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. आता शाळा बदलताना किंवा इतर राज्यांतील शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अपार आयडी क्रमांक देणे अनिवार्य असेल. तसेच, मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह आहार आणि इत...

रोग सर्वेक्षण कार्यक्रम - महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग

 रोग सर्वेक्षण कार्यक्रम - महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग GBS आजार सदय स्थिती दिनांक: २९ जानेवारी २०२५ GBS आजाराविषयी माहिती: गुइलिन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा निर्माण होतो आणि गंभीर स्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो. थोडक्यात महत्वाचे: आतापर्यंत एकूण १२७ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी ७२ रुग्णांना GBS म्हणून निदान निश्चिती झाली आहे. २ संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्णांचे वितरण: २३ रुग्ण पुणे मनपा, ७३ रुग्ण पुणे मनपा अंतर्गत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांतील, १३ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा, ९ रुग्ण पुणे ग्रामीण आणि ९ इतर जिल्ह्यांतील आहेत. २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वयानुसार रुग्णांचा तपशील: आज एक नवीन GBS रुग्णाची नोंद झाली आहे, आणि उर्वरित १५ रुग्ण मागील दिवसांमधील आहेत. आजाराची सर्वसाधारण लक्षणे: अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा चालण्यात त्रास किंवा कमजोरी जास्त दिवसांचा डायरिया आतापर्यंत केलेल्या उपाययोजना: राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने ...

सोलापूरात 'जीबीएस'चे आणखी रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

इमेज
सोलापूरात 'जीबीएस'चे आणखी रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती सोलापूर जिल्ह्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे आतापर्यंत पाच रुग्ण नोंदवले गेले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार रुग्णांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चारही रुग्णांबाबत माहिती आहे की ते सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पुण्यात जीबीएसच्या एका रुग्णाचा मृत्यू २६ जानेवारी रोजी उपचारादरम्यान सोलापुरात झाला. प्राथमिक अहवालानुसार, त्या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाला असावा, परंतु व्हिसेरा तपासणी करून अंतिम अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेत जीबीएसबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "सोलापुरात आतापर्यंत जीबीएसचे पाच रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये एक मृत्यू आणि चार जण उपचार घेत आहेत. त्यातले सर्व रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत." सोलापूर जिल्ह्यात जीबीएसवरील भ्रम दूर करण्यासाठी ...

नवीन शैक्षणिक निर्णय: एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम २०२६ पासून सुरू होणार

इमेज
नवीन शैक्षणिक निर्णय: एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम २०२६ पासून सुरू होणार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) ने बी.एड. नंतर एक वर्षाचा मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड.) अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल होईल. आतापर्यंत एम.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता, पण २०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड. अभ्यासक्रम बंद करण्यात येईल. एनसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक पंकज अरोरा यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींच्या आधारे यूजीसीने जून २०२४ मध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली होती. त्यानुसार, एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी पात्र असलेले विद्यार्थी म्हणजेच एक वर्षाचा बी.एड., दोन वर्षांचा पदवी शिक्षण कार्यक्रम (B.Ed.) किंवा चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) पूर्ण केलेले विद्यार्थी, असे प्राध्यापक अरोरा यांनी सांगितले. २०२५ मध्ये शिक्षण संस्थांकडून एक वर्षाच्या एम.एड. अभ्यासक्रमासाठी अर्ज मागवले जातील, आणि हा अभ्यासक्रम २०२६-२७ सत्...

छत्रपती संभाजीनगर: बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उतरवली

इमेज
छत्रपती संभाजीनगर: बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उतरवली  छत्रपती संभाजीनगर शहरात 26 जानेवारी 2025 रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने एक मोठा वाद निर्माण केला. प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवाल ने सुसाट वेगाने गाडी चालवताना वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली आणि त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. "तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या?" अशी अर्वाच्च भाषा वापरून पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि 24 तासांच्या आत कुणाल बाकलीवालला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याची मस्ती उतरवण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने सुरु केले. व्हिडीओमध्ये कुणाल बाकलीवाल पोलिसांना गाडीतून खाली उतरायला नकार देत, "मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो," अशी धमकी देताना दिसत होता. यावेळी त्याने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

बार्शी शहरात चोरीची घटना, चार ते पाच दुकानांमध्ये शटर उचकटून चोरी

इमेज
बार्शी शहरात चोरीची घटना, चार ते पाच दुकानांमध्ये शटर उचकटून चोरी KDM NEWS बार्शी प्रतिनिधी :20 जानेवारी 2025 रोजी बार्शी शहरातील तेलगिरणी चौक, शिवाजी आखाडा , आडवा रस्ता, तुळजापूर रोड, व लातूर रोड परिसरात धक्कादायक चोरीची घटना घडल्या आहेत. पहाटे चार ते साडेचार त्या  वेळेत चोरट्यांनी चार ते पाच या वेळेत दुकानांचे शटर उचकटून दुकानांमधील नगदी, आणि इतर मौल्यवान वस्तू लांबवल्या आहेत. या घटनेमुळे दुकानदारांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे. चोरी झालेल्या दुकानदारांचे नुकसान गंभीर असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या दुकांनांवर बार्शी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, तरीही पोलिसांच्या गस्तीत चोरट्यांनी या दुकानांमध्ये प्रवेश केला असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचलेली नसल्याने, नागरिकांमध्ये अफवांचा पाऊस सुरू झाला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे, तसेच व्यापाऱ्यांनी अधिक कडक सुरक्षेच्या उ...

शाळेतील शिक्षक-शिक्षिकेचे अश्लील कृत्य; व्हिडिओ व्हायरल, शिक्षण विभागाची तातडीची कारवाई

इमेज
शाळेतील शिक्षक-शिक्षिकेचे अश्लील कृत्य; व्हिडिओ व्हायरल, शिक्षण विभागाची तातडीची कारवाई चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील सालेरा गावातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या कार्यालयात शिक्षक आणि शिक्षिकेने अश्लील कृत्य केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत दोघांना निलंबित केले आहे. व्हिडिओमधील गैरवर्तन उघडकीस शाळेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षिकेचे अश्लील कृत्य कैद झाले आहे. विविध कपड्यांमध्ये ते वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये गैरवर्तन करताना दिसले. या कृत्यांमुळे शाळेच्या पवित्रतेला धक्का बसला आहे. ग्रामस्थांचा संताप व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. शनिवारी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात जमाव करत दोषींना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. अशा घटनांमुळे शाळेतील शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. शिक्षण विभागाची कारवाई व तपास सुरू शिक्षण विभागाने तातडीने चौकशी समिती स्थापन केली असून...

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? संपूर्ण यादी

इमेज
पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? संपूर्ण यादी मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिलीयादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. हे निर्णय गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत होते. विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता काढण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी: 1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस 2. ठाणे - एकनाथ शिंदे 3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे 4. पुणे - अजित पवार 5. बीड - अजित पवार 6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे 7. अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे 8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील 9. वाशिम - हसन मुश्रीफ 10. सांगली - चंद्रकांत पाटील 11. नाशिक - गिरीश महाजन 12. पालघर - गणेश नाईक 13. जळगाव - गुलाबराव पाटील 14. यवतमाळ - संजय राठोड 15. मुंबई उपनगर - आशिष शेलार (सहपालकमंत्री: मंगलप्रभात लोढा) 16. रत्नागिरी - उदय सामंत 17. धुळे - जयकुमार रावल 18. जालना - पंकजा मुंडे 19. नांदेड - अतुल सावे ...

केबल टीव्ही नेटवर्क नियमावलीत महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश

इमेज
केबल टीव्ही नेटवर्क नियमावलीत महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश दिल्ली: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल टीव्ही नेटवर्क नियमावलीत महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश केला आहे. या सुधारणा अंतर्गत, स्थानिक केबल ऑपरेटर्स आता ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. ही नियमावली आजपासून लागू करण्यात आलेली असून, पुढील पाच वर्षे ती कायम राहणार आहे. या सुधारणा स्थानिक ऑपरेटर्सना अधिक पारदर्शकता आणि सुविधा प्रदान करणार असून, त्यांचा व्यवसाय सुकर करण्याचा उद्देश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल नेटवर्कच्या कार्यप्रणालीत सुधारणा करून त्याला अधिक सुलभ व प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

मोरक्को के पास नाव पलटने से 44 पाकिस्तानी नागरिकों की मौत, स्पेन जाने की कर रहे थे कोशिश

इमेज
मोरक्को के पास नाव पलटने से 44 पाकिस्तानी नागरिकों की मौत, स्पेन जाने की कर रहे थे कोशिश मोरक्को के पास एक नाव के पलटने के कारण 44 पाकिस्तानी नागरिकों के डूबने की आशंका है, जो अवैध रूप से स्पेन जाने की कोशिश कर रहे थे। यह हादसा गुरुवार को हुआ, जिसमें 50 से अधिक लोगों के मारे जाने की जानकारी मिल रही है। स्थलांतरित हक्क समूह 'वॉकिंग बॉर्डर्स' के अनुसार, दुर्घटना में कुल 80 यात्री सवार थे और इनमें से अधिकांश पाकिस्तानी नागरिक थे। नाव की पलटने की घटना के बाद बचाव कार्य जारी है, लेकिन अभी भी कई लोग लापता हैं। इस दुर्घटना ने अवैध प्रवासन के खतरे और इन यात्राओं के दौरान होने वाली जोखिमों की ओर ध्यान आकर्षित किया है। पुलिस और राहत कार्यों में लगे अधिकारियों का कहना है कि अभी भी तलाश अभियान जारी है और यह आंकड़ा बढ़ भी सकता है।

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, कृषी पंप खरेदीवर घोटाळ्याचा आरोप

इमेज
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, कृषी पंप खरेदीवर घोटाळ्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी पंपांच्या खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावर राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी कृषी पंप २६०० रुपयांऐवजी ३६५० रुपयांना खरेदी केला होता. यासंदर्भात २०१६ मध्ये कृषी विभागाने 'डीबीटी योजना' सुरू केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले जात होते. तथापि, २०२३ मध्ये या धोरणात बदल करून सरकारने कृषी साहित्याची खरेदी अधिक किंमतीत केली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेतील आरोप खरे असल्यास, या प्रकरणात मोठा घोटाळा उजेडात येऊ शकतो. राज्य सरकारने कृषी साहित्य खरेदीसाठी ठराविक धोरणे राबवली होती, परंतु मंत्री मुंडे यांच्या कार्यकाळात त्या धोरणा...

पुणे पोलिसांची धडक कारवाई: झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक, १ कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त

इमेज
पुणे पोलिसांची धडक कारवाई: झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक, १ कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त पुणे पोलिसांची मोठी कारवाई: १ कोटी रुपयांचे चोरीचे मुद्देमाल जप्त, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा उपयोग करत चोरट्यांनी केली घरफोडी पुणे, १५ जानेवारी २०२५: पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून अनेक घरफोड्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी पुण्यातील विविध भागांमध्ये ५० हून अधिक घरफोड्यांमध्ये भाग घेतला आणि १ कोटी रुपयांचे सोनं, चांदी, हिरे, दुचाकी आणि शस्त्रसामग्री चोरली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करत तब्बल ८६ तोळे सोने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, २ पिस्तूल, ५ जिवंत राऊंड्स आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रं जप्त केली आहेत. आरोपी गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत हे पुण्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करत आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून चोरलेल्या घरांच्या ठिकाणी पोहचून चोरी करत होते. चोरट्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी चोरी करत असताना वेगवेगळ्या वेशभूषा बदलल्या, जसे की जॅकेट, केसांचा विग आणि टोप...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'डिजिटल माध्यम धोरण' तयार करण्याचा निर्णय

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'डिजिटल माध्यम धोरण' तयार करण्याचा निर्णय मुंबई: शासनाच्या विविध योजना आणि निर्णयांची माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'डिजिटल माध्यम धोरण' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आगामी १०० दिवसांच्या कार्ययोजनेचा आढावा घेताना यावर विशेष भर दिला. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराची गरज आहे आणि त्याद्वारे शासकीय माहिती अधिक जलद आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमांच्या वापराने शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. यासाठी 'डिजिटल मीडिया धोरण' तयार करण्यात येईल. त्याचबरोबर, 'एआय न्यूजरुम' तयार करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे शासकीय माहिती लवकर प्रसारित केली जाऊ शकते. राज्य सर...

बार्शीच्या रेश्मा पठाण यांचा उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून गौरव

इमेज
बार्शीच्या रेश्मा पठाण यांचा उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून गौरव बार्शी – बार्शी पंचायत समिती येथे महिला बाल कल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रेश्मा पठाण यांना त्यांच्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर आयोजित "सावित्रीच्या लेकी सन्मान" कार्यक्रमात रेश्मा पठाण यांना उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचा पुरस्कार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, श्री. दिलीप स्वामी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन केला गेला. रेश्मा पठाण यांनी महिला व बाल कल्याण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी केली असून, त्यांच्या कार्यशक्तीमुळे अनेक महिलांचे जीवन बदलले आहे. त्या प्रत्येक विभागात प्रगती साधत, महिलांच्या समस्यांवर नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करत...

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने या

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने या योजनेची स्थापना केली आहे. याचा मुख्य उद्देश विविध योजनांद्वारे बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी फायदे पुरवणे आहे. योजनेमध्ये कामकाजी परिस्थिती सुधारून कौशल्य विकास, रोजगार क्षमता वाढविणे, तसेच सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांची अंमलबजावणी केली जाते. योजनेचे वैशिष्ट्य महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना बांधकाम कामगारांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आणि आरोग्यविषयक सहाय्य मिळवून देणे अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असल्यानं फेऱ्या वाचवतात लाभार्थी बांधकाम क्षेत्रातील कामगार, जसे की इमारत बांधणे, रस्ते तयार करणे, रेल्वे व इतर संरचनांसाठी काम करणारे कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांच्या आत असावे ९० दिवसापेक्षा जास्त वेळ बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे लाभ कामगारांना आर्थिक सहाय्य, मोफत ...