सोलापूरात 'जीबीएस'चे आणखी रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

सोलापूरात 'जीबीएस'चे आणखी रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

सोलापूर जिल्ह्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे आतापर्यंत पाच रुग्ण नोंदवले गेले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार रुग्णांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चारही रुग्णांबाबत माहिती आहे की ते सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पुण्यात जीबीएसच्या एका रुग्णाचा मृत्यू २६ जानेवारी रोजी उपचारादरम्यान सोलापुरात झाला. प्राथमिक अहवालानुसार, त्या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाला असावा, परंतु व्हिसेरा तपासणी करून अंतिम अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेत जीबीएसबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "सोलापुरात आतापर्यंत जीबीएसचे पाच रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये एक मृत्यू आणि चार जण उपचार घेत आहेत. त्यातले सर्व रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत."

सोलापूर जिल्ह्यात जीबीएसवरील भ्रम दूर करण्यासाठी आणि त्याची लक्षणं, उपचारविषयक माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषद घेतली आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नागरिकांना आवाहन केले की, "नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जीबीएस रुग्णांसाठी मोफत उपचार दिले जातील."

आगामी ३० तारखेस सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 'हाऊस टू हाऊस' सर्वेक्षण केले जाणार आहे. यानंतर नागरिकांनी शिळं अन्न खाऊ नये, व्यवस्थित शिजलेलं अन्न खावे आणि बिस्लरीचे पाणी प्यावे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. संजीव ठाकूर, डॉ. वैशंपायन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, यांनी जीबीएसबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या आजाराच्या लक्षणांमध्ये पायांच्या शक्तीचा कमी होणे, गिळायला त्रास होणे आणि हाथ-पायाला मुंग्या येणे समाविष्ट आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जीबीएस रुग्णांसाठी १० व्हेटिलेटर मोठ्यांसाठी आणि ५ व्हेटिलेटर लहान मुलांसाठी राखीव ठेवले आहेत, तसेच जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जीबीएस रुग्णांसाठी दोन कोटी रुपये खर्च करून आवश्यक औषधांची व्यवस्था केली आहे.

नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी आणि योग्य माहितीच्या आधारे योग्य उपचार घ्यावेत, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल