पोस्ट्स

शेअर्स मार्केट मधून मोठा परत देतो म्हणून फसवणूक...

इमेज
बार्शी; प्रतिनिधी; सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या अमिशापोटी सुशिक्षित असो वा अडाणी फसणारा ची काही कमी नाही बार्शीतील बातमी सविस्तर एका महिलेनी पुण्याच्या नातेवाइकांमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून सहा महिन्यांत दामदुप्पट करून देतो, असे सांगून १४ लाख २० हजारांची फसवणूक केली, याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनीता विश्वनाथ कोकाटे (वय ४०, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांच्या फिर्यादीवरून सुलताना निजाम शेख रा. ताडसौंदने रोड,  बार्शी व पुणे येथील साथीदारावर गन्हा दाखल केला आहे दाखल केलेल्या तक्रारीत सुलताना शेख हिची सुनीता कोकाटे यांची २०१६ साली ओळख झाली. जानेवारी २०२३ मध्ये सुलताना व तिची आई यांनी घरी येऊन पुण्याचा आमचा जवळचा नातेवाईक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तीन महिन्यात दुपटीने पैसे कमवितो, त्यामुळे तूही गुंतविल्यास सहा महिन्यांत दामदुप्पट परत देतो. त्या मोबदल्यात मला मला ५० टक्के परत दे असे सांगून विश्वास निर्माण केला. त्यानंतर सुनीता कोकाटे व त्यांच्या पतीने जमीन विकीस काढन सौदा करून व प्लॉट विकून, मुलाची विम्याची आलेले...

गांजा विकायला आला आणि जाळ्यात सापडला..

इमेज
गांजा विकायला आले आणि जाळ्यात सापडला बार्शीतील घटणा... बार्शी प्रतिनिधी; बार्शी शहरात गांजा विक्रीस आणून त्यांची विक्री करत असताना शहर पोलिसांनी छापा टाकून काहीना अटक केले आहे . त्याच्याकडून ६२ हजारांचा गांजा व ४५ हजारांची दुचाकी, असा एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवार, दि. १३ रोजी रात्री ९ वाजता बार्शी येथील पोलिसांनी उपळाई रोडवरील माढेश्वरी मंगल कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली.त्याच्याजवळ गेले. असता त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून अडवून अंगझडती घेतल्यानंतर दुचाकीच्या टाकीवरची बॅग पाहून ती उघडून पाहताच त्यात उग्र वासाची पाने कागदात दिसून आली. हा पदार्थ गांजा असल्याची खात्री झाल्याने त्याला गांजाच्या बॅगसह ताब्यात घेण्यात आले.  याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. यानुसार ऋत्विक मानतेश सोनेगार (वय २१, रा. पाछा पेठ, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोनेगार हा गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यास दुचाकीवरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मार्गावर एक अनोळखी इस...

'जर पीएचडी करून दिवे लागणार नसतील तर राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री असून तरी काय दिवे लावले'

इमेज
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील - "पीएचडी घेतील ना." उपमुख्यमंत्री अजित पवार - "पीएचडी घेऊन काय दिवा काय लावणार आहेत."बार्टी, सारथी आणि महाज्योती या सरकारी संस्थेंअंतर्गत पीएचडी करण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्याबाबत विधानपरिषदेत चर्चा सुरू होती. या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केलं. "पीएचडी करून काय दिवे लावणार?" अजित पवार यांच्या या विधानावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका झाली आणि यानंतर त्यांनी याबाबत दिलगीरी सुद्धा व्यक्त केली. पण मूळ प्रश्न आजही कायम आहे. राज्यातील पीएचडी पात्रधारकांनी यासाठी राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील पीएचडी पात्रधारकांची नेमकी मागणी काय आहे? जाणून घेऊया. सभागृहात नेमकं काय झालं? राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. यावेळी विधानपरिषदेत 12 डिसेंबर रोजी आमदार सतेज पाटील यांनी सारथी संस्थेतील पीएचडी धारकांच्या फेलोशिपचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अजित पव...

पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणारच ; न्यायालयाचे निर्देश

इमेज
खासदार गिरीश बापट यांच्या निधानानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी निवडणुका घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यादरम्यान बापट यांच्या निधनानंतर गेले 10 महीने ही जागा रिक्त का ठेवली गेली अशी विचारणाही यावेळी कोर्टाने केली. या दरम्यान अन्य राज्यातील निवडणुका आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकांची तयारी करण्यात प्राथमिकता असल्याने पुण्यात लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली गेली नाही असा दावा आयोगाने केला. त्यावर पुण्यात माणिपूरसारखी अशांत परिस्थिती होती का ? तसे नसल्यास आयोगाचा हा दावा वैध ठरवला जाऊ शकत नाही असे यावेळी न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने आयोगाकडे केली. पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणारी जनहित याचिका पुण्यातील सुघोष जोशी यांनी दाखल केली होती.

संसदेतल्या राड्याचे महाराष्ट्रात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; म्हणाले, "आजपासून प्रत्येक आमदाराला."

इमेज
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा  १० वा दिवस आहे. आज लोकसभेचं कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या.खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघेजण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. दरम्यान, अनेक खासदारांनी या दोन इसमांना घेरलं. त्याचवेळी या दोघांनी त्यांच्या बूटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघे सभागृहापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, संसदेत घडलेल्या या घटनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा मांडला. तसेच आपणही काळजी घ्यायला हवी असं म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका. विधान...

भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? लातूर पोलिसांच्या हाती काय माहिती मिळाली?

इमेज
आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने गोंधळ घातला. त्याच्यासोबत यावेळी एक हरियाणाची महिलादेखील होती. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करुन गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाला खळबळून जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी घोषणाबाजी करणारा आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणाऱ्या तरुणाचं अमोल शिंदे असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर पोलीस अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावात दाखल झाले. अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर चाकूर पोलीस तातडीने झरी गावात दाखल झाले. ते झरी गावात विचारपूस करत अमोल शिंदे याच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी माहिती विचारली. अमोल धनराज शिंदे असं त्...

23 हजार 628 पोलिसांची भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती

इमेज
राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपयांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली.गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील  यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा जास्त पोलिसांची लवकरच भरती होणार असल्याचे सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला. गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारां...