पोस्ट्स

शिंदे सरकार जाणार की राहणार? परवा दुपारी 4 वाजता निकाल?

इमेज
आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. या निकालाकडे राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली आहे.निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे. निकालाचे ठळक मुद्दे विधानभवानामध्ये वाचले जाणार आहेत. या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. राहुल नार्वेकर यांनी मागे अनौपचारिक गप्पांदरम्यान याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. शिवसेना आमदार अपात्रतच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार. आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल,असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. कोणाला फटका बसणार? हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजुने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. जर निकाल एकनाथ शिंदे याच्...

बनावट डॉक्टरांविरुध्द कारवाई

इमेज
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना ॲलोपॅथीचा औषधसाठा बाळगून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.सुहास वाघ (४३, रा.प्लॉट दोंडाईचा), राजु मलिक (रिटाणे, साक्री) आणि अमोल सूर्यवंशी (३६, नरव्हाळ,धुळे) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बनावट डॉक्टरांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याने संयुक्तिकपणे ही कारवाई केली. वैद्यकीय व्यवसायाचा परवाना किंवा शिक्षण नसताना या बनावट डॉक्टरांनी स्वतःजवळ ॲलोपॅथीचा औषधसाठा ठेवला होता, असा आरोप आहे. बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धिवरे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाच ते सात जानेवारी या कालावधीत धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये छापा टाकून पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीत नव्याने आढळलेल्या तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनिय...

आरपारची लढाई! सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा निर्धार; जरांगे पटलांच्या मुंबईतील आंदोलनात 'इतके' लोक सहभागी होणार; तालुकानिहाय दौरे करणार

इमेज
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने सामील होण्याचा निर्धार जिल्ह्यातील मराठा बांधवांनी रविवारी केला. आरक्षणासाठी आता आरपारची लढाई होईल, असा इशारा समन्वयकांनी दिला.राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अन्यथा २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. यावर चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाची रविवारी छत्रपती शिवाजी प्रशालेत बैठक झाली. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी समाजाने शांततेत मोर्चे काढले. अनेक तरुणांनी बलिदान दिले. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून उपोषण केले. तरीही सरकार यावर त्वरित निर्णय घ्यायला तयार नाही. यासाठी आता आरपारची लढाई ठरली आहे. २० जानेवारीला मुंबईत एकत्र जमण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला आहे. जिल्ह्यातून शेकडो लोक या आंदोलनात सहभागी होतील. यावेळी प्रा.गणेश देशमुख, प्रा.रामदास झोळ, नाना काळे, श...

रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ

इमेज
रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ#रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ... #कंपन्यांच्या मनमानीने शेतकरी मेटाकुटीस #पिकांचे उत्पादन घटले; केलेला खर्च निघेना याआधी खतांच्या किमतीत सर्वाधिक दरवाढ ही में २०२१ मध्ये झाली होती. मात्र, आता किमान सरासरी चाळीस टक्केहून अधिक खतांच्या किमती भडकल्या आहेत. मात्र, याची शासन पातळीवर काहीच दखल घेतली नाही, यामुळे शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. सर्वसाधारणपणे खतांच्या दरात नोव्हेंबरमध्ये वाढ होते. याचीच पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी प्रथमच विविध कंपन्यांनी खतांचे दर वाढविताना मनमानीपणाचा कळस केला आहे. मे २०२१ मध्ये जाहीर झालेल्या दरवाढीनुसार महाधन, सरदार, आयपीएल या कंपन्यांची आघाडी राहिली होती. अर्थात या वाढीत केंद्र सरकारने युरियाचा दर मात्र काही प्रमाणात आवाक्यात ठेवला आहे. मे २१ मध्ये युरियाचे पनास किलोचे पोते २६६ रुपये होते. आता ते २७८ रुपये झाले आहे. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत जवळपास साडेसात लाख गेल्या चार वर्षांत खतांच्या किमतीत तब्बल ३५ ते ४० टक्केहून अधिक वाढ झाली आहे. यात विविध कंपन्यांच्या खत दरात थ...

मालदीवला मोठा धक्का! पंतप्रधान मोदींच्या अपमानामुळे भारतीय संतप्त, 10 हजार हॉटेल्सचे बुकिंग आणि 5000 उड्डाणे रद्द

इमेज
मालदीवच्या (Maldive) मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भारताबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर भारतीय पर्यटकांचा संताप उसळला आहे. सोशल मीडियापासून ऑनलाइन बुकिंग  प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे.सोशल मीडियावर (Socail Media) दावा केला जात आहे की आतापर्यंत 10,500 हॉटेल बुकिंग आणि 5,520 विमान तिकिटे रद्द करण्यात आली आहेतही आकडेवारी मालदीवच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षीच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी ‘इंडिया आउट’ ही मोहीम सुरू केली होती, ज्याचा उद्देश मालदीवमधील भारतीय लष्करी उपस्थितीला विरोध करणे हा होता. मात्र, या मोहिमेची भारताने आणि भारतीयांच्या मोठ्या वर्गाने नकारात्मक भूमिका घेतली. मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने आता या नाराजीला आणखी उधाण आले आहे. ऑनलाइन आणि प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म निराशा आणि रागाने भरलेल्या टिप्पण्या आणि पुनरावलोकनांनी भरले आहेत. अनेक भारतीय पर्यटकांनी आपला संताप व्यक्त केला असून भविष्यात मालदीवला जाण्याचा आपला इरादा नसल्याचे सांगितले आहे. भारतीय पर्यटकांचा हा बहिष्कार म...

महत्वाची बातमी : B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम

इमेज
अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) ने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बीएड अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमांना आरसीआयकडून मान्यता देण्यात येते. आरसीआयने आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे 1000 संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असे स्पष्ट केलेय. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (RCI) सचिव विकास त्रिवेदी यांनी हे परिपत्रकात जारी केले आहे. या परिपत्रकात NCTE ने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) मध्ये चार वर्षांच्या B.Ed कार्यक्रमाची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही केवळ चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून आरसीआयकडून केवळ चार वर्षांच्या बीएड (विशेष शिक्षण) अभ्यासक्रमालाच मान्यता मिळणार आहे, असे म्हटले आहे. काय आहे विशेष बीएड अभ्यासक्रम? विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये श...

मराठा आरक्षणाविरोधात अजित पवारांनीच छगन भुजबळांना पुढं केलंय; मनोज जरांगेंचा आरोप

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी वेळ दिला होता, आता पुन्हा सरकारने वेळ वाढवून घेतला आहे.मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ नये, गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तरआरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यात मोर्चे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही आता राज्य सरकारला इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत मोर्चा निघणार आहे.२० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रीया देत जरांगे पाटील यांना इशारा दिला. 'मराठा आरक्षणासाठी काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्याबाबत घोषणा करत आहेत. संविधानावर देश चालत आहे, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षी कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला.  दरम्यान, आता या इशाऱ्याला मनोज जरा...