बाबा महाराज सातारकरांची आठवण ते निळवंडे प्रकल्प कसा मार्गी लागला? वाचा मोदी काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिर्डीच्या प्रवित्र भूमीला कोटी कोटी प्रणाम असं म्हणत त्यांनी निळवंडे धरणाचं पाच दशकांपासून रखडलेलं काम आज पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.तसेच ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

मोदी पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या नावावर मताचं राजकारण करणाऱ्यांनी आपल्याला थेंब थेंब पाण्यासाठी वेठीला धरलं. आज निळवंडे धरण प्रकल्पाचं जलपुजन झालं. याला १९७०मध्ये स्विकृती मिळाली. त्यानंतर पाच दशकं ही योजना लटकून राहिली. KDM news 

पण जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा यावर वेगानं काम झालं. आता डाव्या कालव्यातून लोकांना पाणी मिळणं सुरु झालं आहे. लवकरच उजव्या कालव्यातून पाणी मिळेल" योजना केंद्र सरकार पूर्ण करणार

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा जलसंजीवनी योजना देखील शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध झाली आहे. दशकांपासून लटकून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणखी ३६ सिंचन योजना केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. याचा खूप मोठा लाभ आपल्या शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागांना होईल. निळवंडेंचं पाणी हा परमात्म्याचा प्रसाद

पण आता या धरणातून पाणी मिळणं सुरु झालं आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. त्यामुळं यातील एक थेंबही पाणी वाया जाता कामा नये. 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' याअंतर्गत जेवढी पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर केला पाहजे, असं आवाहनही यावेळी मोदींनी केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल