जरांगेंसह सर्वांनीच...; अजित पवारांनी छगन भुजबळांसह सर्वांनाच दिली तंबी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कराड इथल्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांनी मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणावर बोलताना म्हटलं की, सत्ताधारी असोत की विरोधक, कोणीही भडकाऊ भाषण करू नये.वाचाळवीरांनी एखाद्या शब्दाने समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यात सगळेच आले, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही असं म्हणत अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनाही इशारा दिला आहे.
आयोगाने पैसे मागितल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हलं की, मी पण अयोगाची बातमी वाचली. त्यांनी पैसे मागितले आहेत ती. मी मुबंईला गेल्यावर माहिती घेईन. शेवटी आयोगाला अधिकार दिले आहेत. ते काम करत असतात. मागणी पैशाचे असेल तर चर्चा करू. राज्याच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.
महायुतीच्या जागा वाटपाबाबत विचारले असता अजित पवार यांनी सांगितलं की, निवडून येण्याची क्षमता यावर निर्णय घेतलाा जाईल. अजून जागा वाटप अशी चर्चा झाली नाही. आता चार राज्याच्या निवडणूक आहेत त्यामुळे पूर्ण चर्चा झाली नाही. तसंच २०० आमदार एकत्रित असताना सरकार स्थिर कस नाही? प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयात गेले आहेत. ती एक वेगळी प्रकिया आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चागल काम करत आहे असं म्हणत न्यायालयीन लढाईच्या प्रश्नाला उत्तर दिले.