नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराशहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर पार्क करण्यात आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना पाण्याचा वेढा पडला होता. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली होती. तर निफाड परिसरात प्रचंड गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटाका बसला आहे.
दरम्यान पुढील तीन तास मुंबई, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाना आणि या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.नाशिकच्या निफाड तालुक्यात गारपीट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. आज सकाळ पासूनच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला होता. विजांचा कडकडाट आणि गारपीट झाली. यातच नाशिकच्या निफाड तालुक्याला देखील या आस्मानी संकटाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला असून द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या गारा पडल्याने द्राक्षांचे घड देखील तुटून पडले आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.