ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती अयोध्येतील राम मंदिरात जाण्यासाठी तयार झाले आहेत. तथापि, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. ते म्हणाले की प्रभू रामाला आणणाऱ्या गोमातेची आज हत्या केली जाते आहे. प्रकार रोखता आलेले नाही हे दुर्दैव आहे. अशा स्थितीत आम्ही कोणत्या तोंडाने प्रभू रामाला सामोरे जायचे असे त्यांनी म्हटले आहे.
एका यू ट्यूब चॅनलशी
बोलतना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, विधी- विधानासह शिखर तयार झाल्यावर रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आपण अयोध्येला नक्की जाऊ. सर्व कार्यक्रमांत सहभागी होऊ, मात्र प्रभू रामाच्या समक्ष जाणार नाही. जेंव्हा गोहत्येचे प्रकार थांबतील तेंव्हाच आपण तेथे जाऊ.
जर २२ जानेवारी २०२४ रोजीच कार्यक्रम घेण्याचा त्यांचा हट्ट असेल तर तोपर्यंत किमान गोहत्या बंदीची घोषणा तरी केली जावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर असे केले तर आम्ही इश्वराला सांगू की जी काही त्रुटी राहीली आहे त्याची या ऐवजापोटी कृपा करावी. गोहत्या बंदीचे फार मोठे काम त्यामुळे होऊन जाईल.
मोदींच्या विरोधात नाही…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे शत्रुत्व असण्याचे कारणच काय असा सवाल विचारताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, त्यांच्याकडे (टीका करणाऱ्यांकडे ) कोणतेही उत्तर नसल्यामुळे किंवा आम्ही उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढता येत नसल्यामुळे आम्ही मोदी विरोधी आहोत अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मोदी धाडसी आहेत आणि आम्हाला अशा व्यक्ती आवडतातप्रकार रोखता आलेले नाही हे दुर्दैव आहे. अशा स्थितीत आम्ही कोणत्या तोंडाने प्रभू रामाला सामोरे जायचे असे त्यांनी म्हटले आहे.
एका यू ट्यूब चॅनलशी बोलतना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, विधी- विधानासह शिखर तयार झाल्यावर रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आपण अयोध्येला नक्की जाऊ. सर्व कार्यक्रमांत सहभागी होऊ, मात्र प्रभू रामाच्या समक्ष जाणार नाही. जेंव्हा गोहत्येचे प्रकार थांबतील तेंव्हाच आपण तेथे जाऊ.
जर २२ जानेवारी २०२४ रोजीच कार्यक्रम घेण्याचा त्यांचा हट्ट असेल तर तोपर्यंत किमान गोहत्या बंदीची घोषणा तरी केली जावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर असे केले तर आम्ही इश्वराला सांगू की जी काही त्रुटी राहीली आहे त्याची या ऐवजापोटी कृपा करावी. गोहत्या बंदीचे फार मोठे काम त्यामुळे होऊन जाईल.
मोदींच्या विरोधात नाही…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे शत्रुत्व असण्याचे कारणच काय असा सवाल विचारताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, त्यांच्याकडे (टीका करणाऱ्यांकडे ) कोणतेही उत्तर नसल्यामुळे किंवा आम्ही उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढता येत नसल्यामुळे आम्ही मोदी विरोधी आहोत अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मोदी धाडसी आहेत आणि आम्हाला अशा व्यक्ती आवडतात