मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; मनोज जरांगे पाटलाच्या डोळ्यात पाणी !

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार मराठ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने कुच करणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेट संपला आहे. ठरलेल्या निर्णयानुसार ते आणि मराठा समाज आज (20 जानेवारी) मुंबईकडे कूच करणार आहेत.

दरम्यान आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. आमचे पोरं जर मोठे करायचे असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही. आरक्षण मुंबईतच आहेत. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं हवं, असे मनोज जरांगे म्हणाले. 

जरांगे म्हणाले, मराठा समाजातील पोरांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहा, हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायबाप मराठ्यांना विनंती आहे. ९ वाजता सर्व पोरं मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. २६ तारखेला मुंबईला राज्यातील सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं. माझ शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेन पण मला माहित नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका. 

सरकारला ७ महिने वेळ दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही दोन ते तीन खिंडा लढवणार आहेत. मुंबईत मराठ्यांचाकोटींचा आकडा दिसेल. शेवटची लढाई आहे. त्यामुळे सर्व मराठ्यांनी घराबाहेर पडा. छातीवर गोळ्या पडल्या तरी मी आता मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. अंतरवाली सराटीतूनच मी उपोषण करत निघणार आहे. सरकार मराठ्यांना वेठीस धरत असलेत तर आम्ही देखील आता मागे हटणार आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी सरकार आरक्षण देत नसेल तर लढावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबच चर्चेत काही नाही. चर्चा होते पण आरक्षण मिळत नाही. सर्वांनी शांततेत आंदोलन करावे, कोणी उद्रेक,जाळपोळ केली तर पोलिसांच्या स्वाधीन करा, असे मनोज जरांगे म्हणाले. करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. ३०० पेक्षा जास्त बळी गेले. आई-बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. सरकार एवढं निर्दयी कसं असू शकतं. ज्या मराठ्यांनी गादीवर बसवलं. त्यांनाच नोदीं असूनही आरक्षण मिळत नाही. हा अन्यायाचा कळस झाला. आपल्या परोरांच्या नरड्यावर पाय देण्याचं सरकारने ठरवलं असेल तर यांच्या राजकीय करीअरचा सुपडा साफ करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या, सरकारला तर झोप यायला नको. मात्र सरकार निर्दयी आहे. मी आता असेल नसेल पण मराठ्यांनी एकत्र राहावं. छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची पोरं मोठे झालेली बघायची आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आरक्षण असून सुद्धा आपले पोरं संपले पाहीजेत, असा घाट रचण्यात आला आहे. उपोषणामुळे शरीर आता साथ देत नाही. पण तुम्ही विचार मरु देऊ नका. आता आरक्षण देऊन पोरांच्या डोक्यावर गुलाल टाकायचं आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल