**आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले उद्योगपती कुमार मंगलम बिर्लांचे कुटुंब; कन्या अनन्या बिर्ला स्वतः पोहोचल्या पूरग्रस्त भागात!**
**आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले उद्योगपती कुमार मंगलम बिर्लांचे कुटुंब; कन्या अनन्या बिर्ला स्वतः पोहोचल्या पूरग्रस्त भागात!**
KDM NEWS प्रतिनिधी आसाममधील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबे विस्थापित झाली असताना उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्या अनन्या बिर्ला स्वतः पूरग्रस्त भागात पोहोचल्या आहेत. त्यांनी अनन्या बिर्ला फाउंडेशनच्या स्वयंसेवकांसह वरच्या आसाममधील जोरहाट आणि इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अन्नधान्य, स्वच्छता सामग्री, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले.
जुलैअखेरीस त्यांनी मुंबई, बंगळूरू आणि कोलकाता येथे मदत सामग्री गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यात तांदूळ, डाळ, तेल, साबण, ओआरएस, मच्छरदाणी, स्वच्छता किट आणि शैक्षणिक साहित्य यांचा समावेश होता. गोळा झालेली मदत त्या स्वतः आसाममध्ये पोहोचवून गरजूंपर्यंत पोहोचवत आहेत.
पूरग्रस्त कुटुंबांशी भेट घेताना आणि त्यांच्या अडचणी ऐकतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले आहेत. अनन्या यांनी म्हटले आहे की, आसामच्या लोकांची लढाऊ वृत्ती प्रेरणादायी आहे आणि देणगीदारांच्या मदतीमुळे गरजूंना थेट आधार मिळाला आहे.
आसाम सरकारनेही पूरग्रस्त कुटुंबांसाठी तात्काळ मदत जाहीर केली असून शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट या जिल्ह्यांतील हजारो कुटुंबांना प्रति कुटुंब १५ हजार रुपये देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या बिर्ला यांचे मैदानी काम कौतुकास्पद ठरले आहे.
उद्योग, संगीत आणि समाजसेवेत सक्रिय असलेल्या अनन्या बिर्ला यांची ही कृती संपत्तीपेक्षा मानवतेला प्राधान्य देणारी असल्याचे अनेकांचे मत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
#AnanyaBirla #AssamFloods #AssamFloodRelief #KramMangalamBirla #KDMNews #SocialWork #HumanityFirst #AssamNews
टिप्पण्या