*बार्शी तालुक्यात पावसाचा ३१ दिवसांचा मोठा खंड; खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू!*
*बार्शी तालुक्यात पावसाचा ३१ दिवसांचा मोठा खंड; खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू!*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ९ सप्टेंबर २०२६ * खरीप हंगाम २०२६ मध्ये बार्शी तालुक्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला असून मोठा खंड पडल्याने पिकांवर ताण आला आहे. मा. आयुक्त कृषी तथा अध्यक्ष राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती यांच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समितीने पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे.
**समितीची रचना**
- अध्यक्ष : श्री. सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय दुष्काळ देखरेख समिती
- श्री. एफ. आर. शेख, तहसीलदार बार्शी
- श्री. एस. एस. कोयले, तालुका कृषी अधिकारी
- श्री. विवेक जमदाडे, गटविकास अधिकारी
- श्री. उमाकांत शंकर भोंडटे व श्री. विनोद शिवाजी धुमाळ, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी
- श्री. पी. ए. गोजारी, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर
या दौऱ्यात संबंधित गावांचे ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. दीपक वैद्य यांनीही पाहणीला हजेरी लावली.
**आज पाहणी झालेली गावे**
अलिपूर, पिंपळगाव धस, घारी-पुरी, उपळाई ठोंगे, कुसळंब, धोत्रे, पानगाव, वैराग, मालेगाव, उपळे दुमाला आणि काळेगाव.
तालुक्यातील सर्व ११ महसूल मंडळांमध्ये शेतात जाऊन पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड, पाण्याचा ताण आणि संभाव्य नुकसान याबाबत वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यात आली. ही माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार असून शासनाच्या प्रचलित निकषांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड नोंदला गेला असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसह काही तालुक्यांत ३१ दिवसांचा खंड झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही पाहणी महत्त्वाची ठरते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या