**झेलम खवळली, पाकिस्तानात पाणीबाणी, भर उन्हाळ्यात अनेक भागात महापूर! इमरजेंसी जाहीर, भारताच्या नावाने पाकड्यांचा थयथयाट**
**झेलम खवळली, पाकिस्तानात पाणीबाणी, भर उन्हाळ्यात अनेक भागात महापूर! इमरजेंसी जाहीर, भारताच्या नावाने पाकड्यांचा थयथयाट** *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २७ एप्रिल २०२५* पाकिस्तानातील मुजफ्फराबाद आणि परिसरात झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटामुळे पाकिस्तान सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून, भारतावर नदीत पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे आरोप पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. ## पूरस्थिती आणि पाकिस्तानची प्रतिक्रिया पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, झेलम नदीतील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने मुजफ्फराबाद आणि हट्टियन बाला यासह अनेक भागांत पाणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने मशिदींमधून घोषणा करून नागरिकांना सावध केले आहे. नदीकाठच्या रहिवाशांमध्ये भीती आणि घबराट पसरली असून, पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की...