ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत
ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले असून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.यातच आता शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचे एक वैशिष्ट्ये होते की, हा समाज इतर जाती-जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितले तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषत: जरांगे पाटील यांनी स्वत:ही अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, धनगर, मुस्लीम, ल...