सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन ऐन गणेशोत्सवात कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?
सं सदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता.दरम्यान, आता सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे", अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसंच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.९आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या व...