पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन ऐन गणेशोत्सवात कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

इमेज
सं सदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता.दरम्यान,  आता सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत ​​काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे", अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसंच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.९आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या व...

महाराष्ट्रात दुष्काळ ?

इमेज
ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापत आहे. खरीप हंगामातील पिकेच करपू लागलीत. त्यामुळे रब्बीचीही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी ऑगस्ट कोरडा गेला.  आता सप्टेंबरमध्ये तरी भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे राज्यात यंदा अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याची भीती कृषी खात्यातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. 'एल निनो'चा फटका बसून देशातील पाऊसमान कमी राहण्याचे अंदाज खरे ठरले आहेत. मुळात गेली काही वर्षे जूनमध्ये पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक सातत्याने चुकते आहे, त्याची यंदाही पुनरावृत्ती झाली. जुलैमध्ये अनेक भागांत चांगला पाऊस झाला, पण पुन्हा ऑगस्ट महिन्यात त्याने विश्रांती घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यंदा दुष्काळाचे सावट पडले आहे,पिके चांगली बहरू लागली असतानाच ऑगस्ट ५७ महिन्यात पावसाने पूर्णत: ओढ दिल्याने ती करपू लागली आहेत. पाऊस लांबल्याने अशी पिके वाया जाऊ लागल्याने आता जनावरांच्या चाऱ्यावर परिण...

आयुष्यमान भव मोहिमेला उद्यापासून प्रारंभ जिल्हाधिकारींनी घेतला आढावा

इमेज
नागपूर : जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.  बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ.आसिफ इनामदार, डॉ. गणेश कांबळे, डॉ. संगीता इंदूरकर यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष मोहीमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक उपक्रम, मोहीमा राबविताना सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी यावेळी मोहीमेचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले. 'आयुष्मान आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आजतागायत देशभरात २५ कोटी आयुष्मान कार्डचे...

पाक नेपाळ सामन्यातील रिकाम्या स्टेडियम वरून चाहत्यांनी केले पीसीबीला ट्रोल

इमेज
आशिया चषक २०२३ ची सुरुवात आजपासून घरचा संघ पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने झाली आहे. मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पाकिस्तानसाठी आजचा दिवस मोठा आहे, कारण १५ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळला जात आहे. मात्र, सामन्यादरम्यान मुलतान क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या खूपच कमी होती. असे म्हणता येईल की संपूर्ण स्टेडियम रिकामे दिसते. एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये स्टेडियममधील खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अनेक वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहे, पण प्रेक्षकांची संख्या नगण्य आहे.यजमान संघाने प्रेक्षकांच्या संख्येचा अधिकृत आकडा अद्याप शेअर केलेला नाही, परंतु सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये स्टेडियम रिकामे दिसत आहे. त्यामुळे चाहते त्यांनी ट्रोल करत आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२ षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या आहेत. सध्या अहमद (८) आणि बाबर (७०) खेळपट्टीवर आहेत. मोहम्मद रिझवान ४४ धावांवर बाद...

RBI ने UPI ची लिमिट पुन्हा बदलली, नवीन लिमिट आजपासून सर्व APP वर लागू होणार

इमेज
RBI ने UPI ची लिमिट पुन्हा बदलली, नवीन लिमिट आजपासून सर्व APP वर लागू होणारकमी किंवा इंटरनेट सुविधा नसलेल्या भागात राहणारे लोक आता UPI Lite Wallet वापरून 500 रुपयांपर्यंतचे ऑफलाइन पेमेंट करू शकतील. UPI Lite हे वॉलेटचा संदर्भ देते जे इंटरनेटवर प्रवेश न करता वापरले जाऊ शकते.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने हे सुलभ करण्यासाठी गुरुवारी UPI लाइट वॉलेट वापरून ऑफलाइन पेमेंटची कमाल रक्कम 200 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढवली.तथापि, हे वैशिष्ट्य कोणत्याही पेमेंट प्लॅटफॉर्मवर दररोज 2,000 रुपयांच्या एकूण व्यवहार मर्यादेला अनुमती देते. आरबीआयने आपल्या अलीकडील परिपत्रकात ऑफलाइन मोडद्वारे केलेल्या लहान रकमेच्या डिजिटल पेमेंटची कमाल मर्यादा वाढवण्यामध्ये म्हटले आहे की लहान मूल्याचे व्यवहार सक्षम करण्यासाठी ऑफलाइन पेमेंटची कमाल मर्यादा 500 रुपये करण्यात आली आहे.UPI Lite वॉलेट मूलभूत मोबाइल फोन वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे, या पेमेंट प्लॅटफॉर्मसह आता दरमहा एक कोटी व्यवहारांवर प्रक्रिया केली जाते. तरीही, UPI लाइटचा अवलंब वाढवण्यासाठी, RBI ने NFC तंत्रज्ञानाद्वारे ऑफलाइन व्यवहारा...

रक्षाबंधनाला भद्रा योग तरीही पंचांग करते म्हणतात काळजी करू नका, नेमका आहे तरी काय भद्रा योग?

इमेज
      श्रावण सुरू झाला आणि सणांची सुरुवात झाली. यंदा  रक्षाबंधनापेक्षा   अधिक चर्चा होत आहे ती त्यादिवशी येणाऱ्या भद्रायोगाची... रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य असल्याची सध्या चर्चा आहे.परंतु पंचागकर्ते दाते गुरूजी म्हणतात भद्रा योगात देखील तुम्हाला रक्षाबंधन साजरे करता येणार आहे  भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेलं आहे. ज्या भद्राकाळाची जोरदार चर्चा आहे नेमका काय असतो हा भद्रा काळ? काय आहे त्यामागील पौराणिक कथा? या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. पंचाग अभ्यासक प्रितम पुरोहित यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कालमापन पद्धतीत महिना हा चंद्रावरून मोजला जातो. अमावास्येला संपणारा (अमावास्यांत मास) किंवा पौर्णिमेला संपणारा ( पौर्णिमांत मास ) अशी मासगणना केली जाते.आपले बहुतेक सण, उत्सव, चांद्रमासानुसार म्हणजे तिथीनुसार साजरे केले जातात.पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त परिणाम पृथ्वीवर होतो. हिंदू धर्मात दिनांकाऐवजी चंद्राच्या तिथीला महत्त्व दिले गेले आहे. त...

महाराष्ट्र शासनाकडून 11000 पदाची बंपर भरती जाहीर

इमेज
मुं बई | 28 ऑगस्ट 2023 :  आपल्याला  सरकारी नोकरी  मिळावी, अशी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची इच्छा आहे. अनेक विद्यार्थी वर्षोनुवर्षे सरकारी नोकरीसाठी अभ्यास करतात. हे विद्यार्थी नोकरीसाठी योग्य भरतीची प्रतिक्षा करतात.त्यानंतर भरती जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करुन नोकरी  मिळवतात. राज्यात कोरोना संकट काळात दोन वर्ष कोणतीही भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. पण कोरोना संकटानंतर सातत्याने वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरी जाहीर होत आहे. आतादेखील अशी भरती जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गृह विभागाकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. नंतर वन विभागाकडून वन संरक्षक आणि मसहूल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. तलाठी भरतीच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. राज्यात सध्या तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. स्वत: आरोग्य मंत्री तानाजी सावं...

ऑनलाइन कर्ज घेताना ?

इमेज
ऑनलाईन कर्ज घेतल्याने तत्काळ आर्थिक दिलासा मिळतो; मात्र या प्रक्रियेत खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. ऑनलाईन कर्जाबाबत सातत्याने ग्राहकांना फोन येत असतात; मात्र ते सर्वच खात्रीशीर आणि विश्वासार्ह असतातच असे नाही. आजकाल सायबर हॅकिंगचे आणि फसवणुकीचे प्रकार पाहता ऑनलाईन कर्ज घेताना सजग राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या डिजिटल युगात तातडीची आर्थिक निकड भागविण्यासाठी ऑनलाईन लोन हा एक सोपा आणि सुविधाजनक मार्ग आहे. अर्थात, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक निर्णयाप्रमाणेच ऑनलाईन कर्ज घेताना काही खबरदारी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. काय काळजी घ्यावी, हे पाहू!   वेगवेगळ्या ऑनलाईन लेंडर्सची माहिती मिळवण्यासाठी आणि तुलना करण्यासाठी वेळ काढा. बाजारात संबंधित लेंडर्सची स्थिती काय आहे, हे जाणून घ्या. ग्राहकांचे मत, व्याज दर, अटी पाहा. लेंडर हा योग्य आणि विश्वासार्ह आहे की नाही, हे तपासा. ऑनलाईन लेंडर्समध्ये व्याज दरात फरक राहू शकतो. वार्षिक दर आकारणी आणि कर्जाशी संबंधित कोणतेही अतिरिक्त शुल्क जाणून असाल, तर कर्ज घेण्यासाठीच्या संभाव्य खर्चाचे स्पष्टपणे आकलन करता येईल  कर्ज घ...

तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड जगभरात खळबळ

इमेज
दे शातील महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्राने अटींसह बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. यामुळे देशातील तांदळाचा साठा वाढेल आणि भाव घसरतील, अशी सरकारला आशा आहे. पण, भारत सरकारच्या या पावलामुळे जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किमती वधारल्या आहेत. भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाची किंमत 12 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत बिगर बासमती तांदळाच्या नावाखाली मोठा घोटाळा होत असल्याचे सरकारला वाटत होते. बासमती तांदळाच्या नावाखाली व्यापारी बिगर बासमतीची निर्यात करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी काही अटींसह बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या पाऊलामुळे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला ब्रेक लागेल, अशी सरकारला आशा आहे. विशेष म्हणजे, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक बाजारपेठेत 40 टक्...

न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस?

इमेज
न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस... Maharashtra Weather Forecast Today: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता पावसाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना ही दिलासा देणारी बातमी आहे. पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापुरात अत्यल्प पाऊस पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे ०५ ते १.५ मीमी पाऊस असणार आहे. तसेच, कोकण भागात जेसे की सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे. ०१ मिलिमीटर तर काही दिवशी १५ मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे.काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अ...

सायलेंट मोडवर असलेला फोन शोधता येईल .

इमेज
आजच्या काळात फोनशिवाय कोणतेच काम होत नाही. पण याच फोनमुळे अनेकदा कामे खोळंबून राहतात आणि अशा वेळी काय करावे लक्षात येत नाही.  कित्येकदा आपण घाईगडबडीत बाहेर पडतो आणि नेमका त्याचवेळी फोन हरवतो.कधी कधी फोन आपण  Silent Mode वर टाकतो. मग अशा वेळी मात्र हरवलेला फोन शोधणं अवघड होऊ शकतं. परंतु सायलेंट मोडवर गेल्यानंतर, समस्या उद्भवते. अशावेळी आपण दुसऱ्या लोकांच्या फोनवरून कॉलकरून डिवाइस शोधण्याचा प्रयत्न करतो. पण नेमका फोन सायलेंट मोडवर असतो. पण आता टेन्शन घेऊ नका, आता ही समस्या दूर होणार आहे. अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनसह, गुगल ही समस्या सोडवणार आहे. परंतु, याकरता नेमके काय करायचे, हे जाणून घ्या... अँड्रॉइडच्या नवीन व्हर्जनच्या साहाय्याने तुम्ही तुमचा  अँड्राॅईड  फोन शोधू शकता. याचाच अर्थ फोन Silent Mode मध्ये असेल तरीही त्याला ट्रॅक करता येणार आहे.  Google  मध्ये Find My Device हे एक भन्नाट फिचर आहे. अनेकांना याची कल्पना नाही, मात्र हे फिचर खूप फायद्याचे आहे. याच फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन ट्रॅक केला जाऊ शकतो. तुमच्या फोनमध्ये Google अकाउंच असल्य...

शेती जोडधंदा साठी मिळेल 50 लाखाचे अनुदान, वाचा काय आहे प्रोसेस

इमेज
भारतामध्ये पूर्वापार शेतकरी शेतीसोबत अनेक प्रकारचे जोडधंदे करतात. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन तसेच शेळीपालन व मेंढी पालन आणि कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात.शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या जोडधंद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. म्हणूनच या शेतीपूरक व्यवसायांचा विकास व्हावा व प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या शेती पूरक व्यवसायांच्या बाबतीत विविध गोष्टींकरिता अनुदान दिले जाते. याकरिता अनेक प्रकारच्या योजना असून त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान हे होय. याच महत्त्वाच्या अशा अभियानाच्या बाबतीत शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून याचा नक्कीच फायदा शेतीपूरक व्यवसायांना होणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेती पूरक व्यवसायासाठी मिळेल अनुदान राष्ट्रीय पशुधन अभियान हे एक महत्त्वपूर्ण अभियान असून या अंतर्गत आता शेती पूरक व्यवसायांकरिता किमान दहा तर कमाल 50 लाख रुपयांचे अनुदान देण्याच...

गदर 2 एक कहानी

इमेज
ग़दर 2 एक आगामी बॉलीवुड ड्रामा फिल्म है, जिसका निर्देशन अनिल शर्मा द्वारा किया गया है। पूरे 20 साल बाद अभिनेता सनी देओल और अमीषा पटेल एक बार फिर सुनहरे परदे पर नजर आये हैं। फिल्म में उत्कर्ष शर्मा भी मुख्य भूमिका में नजर आये हैं।  आपको बता दें के यह फिल्म 'ग़दर एक प्रेम कथा' फिल्म की सीक्वल फिल्म है।  यह फिल्म ज़ी स्टूडियो के बैनर तलेबनी है।  कहानी  कहानी शुरू होती है और दिखाया जाता है साल 1971 का समय जहाँ "क्रश इंडिया" अभियान की पृष्ठभूमि के दौरान, तारा सिंह अपने बेटे चरणजीत "जीते" सिंह को बचाने के लिए एक निजी मिशन पर पाकिस्तान वापस जाते हैं, जिसे मेजर जनरल हामिद इकबाल के नेतृत्व में पाकिस्तानी सैनिकों ने कैद कर लिया है और और लगातार प्रताड़ित कर रहा है। क्या तारा सिंह अपने बेटे को सही सलामत हिन्दुस्तान वापस लाने में कामयाब रहेगा यही इस फिल्म की कहानी का प्लॉट है।  देखें फिल्म के पोस्टर और तस्वीरें फिल्म 'गदर' की कहानी जहां 1947 के विभाजन के बैकड्रॉप में थी। वहीं 'गदर 2' की कहानी 1971 का भारत-पाकिस्तान युद्ध शुरू होने से ...

ट्रेनला भीषण आग!8 मृत्यू ,20 जखमी

इमेज
तामिळनाडूच्या मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. लखनऊ- रामेश्वर ट्रेनला ही आग लागली असून या घटनेत ८ जण ठार झाले असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत.  ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे.तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आठही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण ५५ प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.दरम्यान पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे ५:१५ वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप आहे ज्यामुळे आग लागली दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.पीटीआय य़ा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत 8 जण ठार, 20 जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांच्या...

ब्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय ,?

आजच्या लेखामध्ये आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blogging information in Marathi) आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत असतात. तसेच त्याविषयी इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती मिळत असते. ही माहिती ब्लॉग किंवा वेबसाईट मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जाते. ही माहिती आर्टिकल स्वरूपात ऑनलाईन पोस्ट केली जाते. अश्याच प्रकारे वेगवेगळ्या विषयांची माहिती आपल्या ब्लॉग मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जातेएखाद्या विषयाची माहिती सोप्या व सविस्तर भाषेत लिहून  इंटरनेट  च्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवणे ह्यालाच ब्लॉग असे म्हणतात. ब्लॉग हे एका डायरी प्रमाणे आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची माहिती व तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल लिहू शकता. ब्लॉग चे दोन प्रकार असतात. पर्सनल ब्लॉग (Personal Blog) आणि प्रोफेशनल ब्लॉग (Professional Blog).ह्या प्रकारच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या विचारांना, आपल्या भावनांना व जीवनात घडलेल्या अनुभवांना इंटरनेट च्या माध्यमाने ब्लॉग वर प्रसारित करू शकतो. तसेच ह्या मार्फत आपण लोकां...

मध्येच बंद करू शकतो का एलआयसी पॉलिसी, काय आहे प्रक्रिया, किती होईल नुकसान?

इमेज
आ जकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक म्हणजे LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ. करोडो लोकांचा LIC वर विश्वास आहे. यामध्ये तुमच्या बचतीसह जीवन विमा संरक्षण उपलब्ध आहे.परंतु अनेक वेळा पैशाअभावी आम्ही आमचे धोरण राबवू शकत नाही.  अशा परिस्थितीत ते बंद करणे चांगले. परंतु एलआयसीच्या अनेक पॉलिसी लॉक इन कालावधीसह येतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची पॉलिसी मध्यंतरी बंद करू शकता का? तो बंद झाला तर किती पैसे मिळतील आणि त्यामुळे किती नुकसान होईल. आज आपण या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. LIC पॉलिसी मध्येच थांबवण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. प्रश्न: कधी बंद केली जाऊ शकते पॉलिसी ? उत्तरः तुम्हाला एलआयसी पॉलिसी घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत बंद करायची असेल, तर तुम्ही ती सहज बंद करू शकता. दुसरीकडे, 15 दिवसांपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही पॉलिसी 3 वर्षांनी बंद केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. प्रश्‍न : 3 वर्षांपूर्वी बंद झाल्यास काय होईल? उत्तर: जर तुम्ही तुमची पॉलिसी 3 वर्षापूर्वी बंद केली, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच, तुम्ही जितका प्रीमियम...

तीन लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदान होणार जमा , छगन भुजबळ यांची माहिती

इमेज
रा ज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ३ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६५.९९ कोटींचे कांदा अनुदान जमा होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जबळ म्हणाले की, राज्याच्या पणन विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्याशी कांदा अनुदानाबाबत चर्चा करून अनुदान वितरण करण्याबाबत माहिती घेतली असून, त्यानुसार ४६५.९९ कोटीची रक्कम वित्त विभागाने पणन विभागाला वर्ग केली आहे. येत्या दोन-तीन लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला होता. राज्यातील सुमारे ३ लाख ३६ हजार ४०० शेतकऱ्यांसाठी ८४४ कोटी रुपये अनुदान अपेक्षित होते. त्यापैकी पुरवणी अर्थसंकल्पात ५५० कोटींची मागणी मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वित्त विभागाने ४६५.९९ कोटींचा निधी वितरित केला आहे. अजूनही ३७८ कोटी निधी आवश्यक आहे. उर्वरित निधी लवकरच आकस्मिक खर्चातून किंवा डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पातून दिला ज...

राज्यातील २१६ महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा अधिक पावसाची हुलकावणी

इमेज
पावसाच्या हुलकावणीमुळे काही भागातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशात, कृषी विभागाने पीक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यात राज्यातील ७९ तालुक्यांतील २१६ मंडळांमध्ये २१ दिवसांहून अधिक पावसाने खंड दिल्याचे स्पष्ट झाले.१५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड १७७ तालुक्यांतील ५२८ मंडळांमध्ये राहिला आहे. शिवाय, १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. (no rainfall for in 216 revenue circles of state maharashtra rain crisis news) राज्यात १ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीतील सरासरी पाऊस ७३२.२ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात ८९ टक्के म्हणजे, ६५१.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनमध्ये ५३.६०, जुलैमध्ये १३८.७०, तर ऑगस्टमध्ये २१ दिवसांत ४१.७० टक्के पाऊस झाला आहे. २५ ते ५० टक्के पाऊस झालेले तालुके जिल्हानिहाय असे : नाशिक- सिन्नर, चांदवड, नांदगाव. नंदुरबार- नंदुरबार. अहमदनगर-श्रीरामपूर, राहुरी. पुणे- बारामती, पुरंदर, हवेली. सातारा- कोरेगाव, फलटण. सांगली- कडेगाव, खानापूर, विटा. कोल्हापूर- राधानगरी. अमरावती- दर्यापूर. १५ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस नाशिक, धुळे, नंदुरबार, ...

साडेसात लाख लाभार्थ्यांना गणेश उत्सव आणि दिवाळीमध्ये मिळणार आनंदाचा शिधा

इमेज
पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र गरजू लाभार्थ्यांचा गौरी-गणपती उत्सव तसेच दिवाळी सण गोड होणार असून, जिल्ह्यातील तब्बल सात लाख ७८ हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होईल. गौरी-गणपती उत्सवानिमित्त १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा संच वितरित होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच १०० रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे.  अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबाला (बीपीएल, पिवळे, प्राधान्य केशरी शिधापत्रिका) याचा लाभ होईल. राज्यातील एक कोटी ६५ लाख ६० हजार शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह ४९३ कोटी रुपये शासन खर्च करणार असून, प्रतिसंच २३९ रुपये या दराने हा शिधा संच खरेदी होईल. जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या एक लाख ७५ हजार २१५ शिधापत्रिका, तर प्राधान...

मुलांच्या स्किनसाठी सॉफ्ट आहेत हे baby wipes, स्वच्छतेसोबत सुरक्षादेखील

इमेज
मुलांच्या स्किनसाठी सॉफ्ट आहेत हे baby wipes, स्वच्छतेसोबत सुरक्षादेखील येथे मी तुमच्यासाठी अतिशय सॉफ्ट आणि कम्फर्टेबल, 80 टक्‍क्‍यांपर्यंत वॉटर बेस असणारे वेट वाइप्स घेऊन आलो आहोत.  लहान मुलांसाठी तुम्ही यांचा वापर करू शकतात. हे सर्व वाइप्स मॉइश्चराइजरसह आहेत. हे लहान मुलांच्या सेंसिटिव स्किनवर वापरायला योग्य आहेत. या सर्व हे baby wipes ला डर्मेटोलॉजीकली टेस्ट सुद्धा केले गेले आहेलहान मुलांची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. परंतु त्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील असल्याने ती स्वच्छ करण्यासाठी, आपल्याकडे सॉफ्ट आणि चांगल्या दर्जाचे best baby wipes असले पाहिजेत. लो क्वालिटीचे क्लीनिंग वाइप वापरल्याने मुलांच्या त्वचेवर पुरळ निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या अती संवेदनशील त्वचेसाठी आम्ही अतिशय सॉफ्ट आणि हाय क्वालिटी असलेले वाईप घेऊन आलो आहोत. लहान मुलांच्या सेन्सिटिव्ह स्किन विषयीच्या सर्व समस्या लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी एलोवेरा सारखे नॅचरल एक्सट्रॅक्ट असणारे बेबी वाइप्स घेऊन आलो आहोत. हे सर्व अतिशय सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहेत ज्यामुळे बाळाचा त्वचेला कोणतीही हानी पोचवणार ...

तुमचा स्मार्टफोन रेकाॅर्ड करतोय तुमचं खाजगी बोलणं? तुमच्या स्मार्टफोनमधील ‘ही’ सेटिंग लगेच करा बंद

इमेज
आजकाल तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. लोक या तंत्रज्ञानाचा विविध सकारात्मक हेतूंसाठी वापर करतात. तथापि, अशा व्यक्ती आहेत जे या तंत्रज्ञानाचा गैरवापर करतात, परिणामी आपल्या आजूबाजूला असंख्य नकारात्मक घटना  घडतात.  नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लोक फसवणुकीला बळी पडतात. अशा परिस्थितीत, व्यक्तींना वारंवार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते.आम्ही आमच्या फोनवर एक नवीन अँप डाउनलोड करतो आणि ते वापरणे सुरू करण्यासाठी, आम्हाला कधीकधी मायक्रोफोन चालू करण्याची परवानगी देण्यास सूचित केले जाते. मायक्रोफोन प्रवेश मंजूर करून, आम्ही आमचे फोन कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अँपला परमिशन देत आहोत. ‘या’ पद्धतीने ठेवा सुरक्षित डेटा संगणकावर हि सेटिंग बंद करा : तुमच्या Google खात्यामध्ये जा. वरच्या डाव्या कोपऱ्यात, “Data & privacy” वर क्लिक करा. “History settings” अंतर्गत, “Web & App Activity” वर क्लिक करा. “Include voice and audio activity” शेजारी, बॉक्स अनचेक करा. तुमच्या Android फोनसाठी हे करा : तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्ज अ‍ॅप उघडा. “Google” वर टॅप करा. तुमच्या Google खात...

एस एस सी एच एस सी एक्झाम बोर्डाची परीक्षा वर्षातून होणार दोनदा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

पुणे दहावी बारावी बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे त्यामुळे आगामी शैक्षणिक शैक्षणिक  वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दहावी बारावी परीक्षा दोनदा घेण्यात येणार असल्याचे बुधवारी अधिकृत रित्या स्पष्ट केले आहे विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देणे सुलभ व्हावे आणि अधिक अधिक चांगले गुण मिळवण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येईल याकरिता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अशा स्वरूपाचा अभ्यासक्रमाचे आखणी करून 2024 या शैक्षणिक 17 साठी पाठ्यपुस्तके तयार करण्यात येत आहेत अभ्यास पूर्ण झालेल्या विषयाचाच फक्त पेपर देण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले जाईल याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्यानुसार नजीकच्या भविष्यात मागणीनुसार...

आज पर्यंतच्या चंद्रयान मोहिमांमधून आपल्याला मिळाल्या आहेत. रोजच्या आयुष्यातल्या पाच वस्तू चला तर घ्या जाणून

इमेज
अ खेर भारताने चंद्रावर यशस्वीरीत्या चंद्रयान-3 लँड करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश बनला आहे. पण हो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान लँड करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. दरम्यान, तुमच्या अवतीभवतीसुद्धा कुणी कधी ना कधी असं म्हटलं असेलच - 'कशाला जायचंय चंद्रावर? तिथे पोहोचवून काय घरं बांधणार आहोत? त्यापेक्षा सरकारने जनतेच्या कल्याणासाठी तो पैसा खर्च करायला पाहिजे.' चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही. अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय, किंवा ज्यांचा वापर आपण तंत्रज्ञान पुढे न्यायला, नवनवीन गोष्टींचा शोध लावायला करतो. पाहू या अशा 5 गोष्टी - 1. डिजिटल फ्लाईट नियंत्रणएक काळ होता की लोक सांगायचे, आमच्या घरात तर एवढा मोठ्ठा कॉम्प्युटर आहे की अख्खी खोली व्यापेल. "पण 1960च्या दशकातल्या चांद्र मोहिमा तो काळ होता, जेव्हापासून लोक सांगू लागले की त्यांचे कॉम्प्युटर कित...

सरकारच्या निर्णयामुळे टीव्ही पाहने होणार स्वस्त. केबलचे बिल पूर्वीपेक्षा येणार कमी.

देशात टीव्ही विकत घेण्यापेक्षा टीव्ही पाहणे जास्त महाग झाले आहे. केबलचे/DTH चे बिल भरण्यासाठी लोकांना दरमहा मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत कमी उत्पन्न असलेल्या अनेकांनी टीव्ही पाहणेही बंद केले आहे.पण, आता अगदी कमी पैशात केबल रिचार्ज करता येणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2027 नंतर DTH परवाना शुल्क रद्द करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने ट्रायच्या शिफारशीला मान्यता दिल्यास केबल बिल खूपच स्वस्त होईल, असे बोलले जात आहे. TRAI ने केंद्र सरकारला शिफारस केली आहे की, आर्थिक वर्ष 2026-2027 नंतर DTH ऑपरेटर्सकडून परवाना शुल्क आकारले जाऊ नये. केंद्र सरकार परवाना शुल्क रद्द करेल तेव्हाच केबलच्या किमती कमी होतील. याशिवाय ट्रायने केंद्र सरकारला पुढील तीन वर्षांत डायरेक्ट-टू-होम (DTH) ऑपरेटरसाठी परवाना शुल्क रद्द करण्याची विनंतीही केली आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. दरवर्षी 1,000 कोटींहून अधिक रक्कम गेल्या काही वर्षांत केबल टीव्ही ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. डीडी फ्री डिश, प्रसार भारतीचे मोफत डीटीएच प्लॅटफॉर्म ...

चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीन्सचा पाऊस.

C handrayaan-3 Landing Memes:  जगाच्या अंतराळ इतिहासात भारताने आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा ठरला. चांद्रयान-3 (chandrayaan 3) आज (बुधवार) चंद्रावर यशस्वीपणे उतरले.विक्रम लँडरने 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लँडिंग यशस्वी झाले, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. दुसरीकडे, चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीम्स पाऊस पडला आहे. यूजर्स आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करु लागले आहेत. चांद्रयान-3 चा प्रवास 14 जुलै रोजी भारताने LVM3 रॉकेटद्वारे 600 कोटी रुपयांचा खर्च करत 'चांद्रयान-3' प्रक्षेपित केले. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आणि आज सध्याकाळी 6:04 मिनिटांनी चांद्रयान 3 च्या विक्रम लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग केले. दरम्यान, जुलैमध्ये प्रक्षेपण मोहीम सुरु झाल्यापासून ते चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नापर्यंत, भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेने बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताने हा पराक्रम केला तेव्हा 80,59,688 हून अधि...

Chandrayaan 3 mission Vikram lander soft land successfully on Moon 23 August) चंद्रयान ३ लँडिंग मोहीम फत्ते.

इमेज
C handrayaan 3 Soft Landing : भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं कौतुक केलं आहे. त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. (Chandrayaan 3 mission Vikram lander soft land successfully on Moon 23 August) तीन मिनिटांत कसा घडला चांद्रयानाचा प्रवास? लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या पूर्ण 5.34 वाजता : लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळाली. पॉवर डिसेंटला सुरुवात! 5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता. रफ ब्रेकिंग फेज...

लँडिंगआधी या सरकारी कंपनीने रचला इतिहास, शेअर्स मधे इतकी तेजी कशी?

इमेज
आज भारतच नाही, जगभरात चांद्रयान-3 मिशनची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच मून मिशन फेल झालं होतं. आता सगळ्यांच्या नजरा चांद्रयान-3 वर आहेत. सगळं जग या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहे.या यशासोबत काही कंपन्यांच यश जोडलेलं आहे.  ज्यांनी इस्रोच्या मिशनमध्ये योगदान दिलय. आज चांद्रयान-3च्या बळावर एका सरकारी कंपनीने इतिहास रचला आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड हे त्या कंपनीच नाव आहे. शेअर बाजारात या कंपनीचा शेअर रेकॉर्ड हाय किंमतीला पोहोचला होता. HAL जगातील एक जुनी एयरो स्पेस कंपनी आहे. चांद्रयान-3 च्या मून मिशनमध्ये या कंपनीने मोलाची मदत केलीय. चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंगमध्ये यशस्वी ठरल्यास हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला फायदा होईल. आपलाच रेकॉर्ड 25 दिवसात मोडला मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील आकड्यांनुसार कंपनीचा शेअर 4,024 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने आपलाच रेकॉर्ड 25 दिवसात मोडला. याआधी 31 जुलैला कंपनीचा शेअर रेकॉर्ड हाय किंमतीला पोहोचला होता. एचएएलच्या शेअरमध्ये सकाळपासून वाढ पहायला मिळतेय. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी HAL च्या शेअर्सचा भाव 124.05 रुपये वाढीस...

महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, किती दिवस बरसणार ? पुणे वेधशाळेने स्पष्टच सांगितले

इमेज
महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, किती दिवस बरसणार ? पुणे वेधशाळेने स्पष्टच सांगितले.पावसाने तब्बल 15 ते 16 दिवसांच्या रजेनंतर पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा लाली पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्टपणे झळकू लागले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती. मात्र आता खरिपातील ही पिके देखील नवीन उभारी घेण्यासाठी सज्ज झाली असून पिकांमध्ये कमालीचा टवटवीतपणा पाहायला मिळत आहे. अधिक मास मधील श्रावणात राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती. पण निज श्रावण सुरू झाल्यानंतर राज्यात सर्वत्र श्रावण सऱ्या बरसत आहेत. राज्यात पावसाचे कमबॅक झालेले असले तरीदेखील राज्यात कुठेच मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. राज्यात अजूनही रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. पण रिमझिम स्वरूपाचा का पाऊस होईना पण पिकांना यामुळे जीवदान मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच पुणे वेधशाळेने राज्यातील हवामानाबाबत एक म...

पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात?

इमेज
Rakesh Sharma : पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात? राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते, ते अंतराळात गेलेले एकमेव भारतीय नागरिक आहेत.सध्या अवघ्या जगाच्या नजरा चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) वर आहेत. अंतराळाचा विषय निघाला तर आपण, राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांना विसरू शकत नाही. अंतराळात प्रवास करणाने पहिले आणि एकमेव भारतीय नागरिक राकेश शर्मा (Indian Astronaut Rakesh Sharma) यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांच्यानंतर आजपर्यंत एकही भारतीय अंतराळात गेला नाही. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स याही अंतराळात गेल्या पण त्या भारतीय वंशाच्या आहेत, भारतीय नागरिक नाही. पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा विंग कमांडर राकेश शर्मा हे सोव्हिएत इंटरकोसमॉस या अंतराळ मोहिमेचा भाग होते. 3 एप्रिल 1984 रोजी राकेश शर्मा यांची अंतराळ प्रवासासाठी निवड झाली. अंतराळात जाण्याची संधी मिळालेले ते पहिले भारतीय नागरिक होते.  अंतराळवीर राकेश शर्मा सध्या काय करतात? आजही जेव्हा एखादी अंतराळ मोहीम राबवल...

चंद्रयान-३ लँडिंग कधी करणार ,कुठे पाहता येणार थेट प्रसारण. जाणून घ्या सविस्तर

इमेज
Chandrayaan-३ : 'चांद्रयान-३' मोहिमेवर संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांत चांद्रयान-३ चंद्रावर उतरणार आहे. इस्त्रोने एक नवीन व्हिडीओ शोअर करत या मिशनबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे.मिशन निर्धारीत वेळेतच पूर्ण होणार असल्याच इस्त्रोने म्हटलं आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-३' ची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग ठरलेल्या वेळेत होणार आहे. भारतीय विज्ञान, इंजीनिअरिंग, औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. अंतराळातील भारताच्या प्रगतीचं हे प्रतिक असेल. मिशन वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे सिस्टिमची वारंवार पाहणी केली जात आहे. तसेच या मिशनमध्ये भाग घेणारी लोक अत्यंत उत्साहाने काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाखणण्यासारखा आहे. 'चांद्रयान-३' आज बुधवारी २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार. त्यामुळे संपूर्ण देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे सॉफ्ट लँडिंग याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशवासिय उत्सुक आहेत. 'चांद्रयान-३' आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटाने चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. चांद्रयान-३ चं कसं होणार लँडिंग? पह...

आता या बँकांच्या खात्यात मिनिमम बॅलन्स इतकी रक्कम ठेवावी लागेल,जाणून घ्या नवीन नियम.

इमेज
तुमचे बँक खाते असल्यास तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेषत: यापैकी एखाद्या संस्थेत तुमचे खाते असल्यास, आता तुमच्या खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक आहे; असे करण्यात अयशस्वी झाल्यास आर्थिक नुकसान होईल… कृपया प्रेसमध्ये उदयास येणाऱ्या कोणत्याही नवीन बँकिंग नियमांबद्दल आम्हाला अपडेट ठेवा. बँका प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहेत कारण त्या आम्हाला न घाबरता पैसे साठवण्याची परवानगी देतात. बँका त्यांच्या ग्राहकांना सेव्हिंग अकाउंट मिनिमम बॅलन्सबद्दल विविध सेवा देतात, परंतु ग्राहकांनी काही महत्त्वपूर्ण नियम आणि नियमांचे देखील पालन केले पाहिजे समजावून सांगा की किमान शिल्लक ही रक्कम आहे जी प्रत्येकाने त्यांच्या खात्यात नेहमी ठेवली पाहिजे.प्रत्येक बँकेनुसार किमान शिल्लक रक्कम बदलते. तुम्ही तुमच्या खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास बँक तुमच्याकडून दंड आकारू शकते. देशातील दोन सर्वात मोठ्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडियाआणि ICICI बँक यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळी किमान शिल्लक रक्कम सेट केली आहे. जर तुम्ही दोन्ही बँकांच्या लाखो ग्राहकांपैकी एक असाल, तर आम्ही तुम्हाला दोन्...

दोन वर्षापेक्षा लहान मुलांना मोबाईल स्क्रीन टीवी स्क्रीन दाखवता;व्हा सावधान मुलांना होऊ शकता तीन गंभीर त्रास तज्ञ सांगतात....

इमेज
आ जकाल सगळ्याच पालकांच्या हातात मोबाईल दिसतो. त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासूनच मुलं मोबाईल बघतात. मोबाईल बघतच ती मोठी होत आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.  त्यात मुलं जर खात नसतील, बाहेर गेल्यावर त्रास देत असतील, पालकांना काम करू देत नसतील, तर अनेक पालक स्वतःहून मुलांना मोबाईल देऊन टाकतात.अगदी बोलता न येणारी मुलंही तासनतास मोबाईल बघत बसतात  तुमचीही मुलं याच प्रकारातली असतील,  तर वेळीच सावध व्हा.  कारण याविषयी बघा ही तज्ञांनी दिलेली विशेष माहिती.ही माहिती इंस्टाग्रामच्या the Kidzeeया पेजवर शेअर करण्यात आलेली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात की मुलांचा बौद्धिक मानसिक विकास ० ते २ या दरम्यान झपाट्याने होत असतो. पण नेमकं याच काळात जर मुलांना मोबाईल दाखवला तर मात्र त्याचे गंभीर परिणाम मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक आरोग्यावर होऊ शकतात. अमेरिकन बालरोगतज्ज्ञ संघटना आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना यांच्यामते ० ते २ या वयोगटातली मुलं खूप स्क्रीन बघत असतील तर त्यांची मानसिक आणि बौद्धिक वाढ कमी वेगात होऊ लागते. यामुळे मुलांना बोलण्यात अडचण येणे,  भाषा शिक...

Asia Cup 2023 Team India Squad :2023 प्रतीक्षा संपली टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूंना मिळणार संधी

इमेज
A sia Cup 2023 Team India Squad : प्रतीक्षा संपली आहे. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. आशिया कपसाठी टीम इंडिया रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव. संजू सॅमसन (बॅकअप)

अलीबाबा चालिस चोर की कहानी | Alibaba Aur 40 Chor Ki Kahani

इमेज
  सालों पहले फारस देश में अलीबाबा और कासिम नाम के दो भाई रहते थे। पिता की मृत्यु के बाद से दोनों भाई मिलकर अपने पिता का व्यापार संभालते थे। बड़ा भाई कासिम बहुत लालची था। उसने धोखे से पूरा व्यापार हथिया कर अलीबाबा को घर से निकाल दिया।  इसके बाद अलीबाबा किसी बस्ती में जाकर अपनी पत्नी के साथ झोपड़ी में गरीबी की जिंदगी व्यतीत करने लगा। वह रोजाना जंगल जाकर लकड़ियां काटकर लाता और बाजार में उन्हें बेचकर जैसे कैसे घर का गुजारा चलाता था।सालों पहले फारस देश में अलीबाबा और कासिम नाम के दो भाई रहते थे।  पिता की मृत्यु के बाद से दोनों भाई मिलकर अपने पिता का व्यापार संभालते थे। बड़ा भाई कासिम बहुत लालची था। उसने धोखे से पूरा व्यापार हथिया कर अलीबाबा को घर से निकाल दिया। इसके बाद अलीबाबा किसी बस्ती में जाकर अपनी पत्नी के साथ झोपड़ी में गरीबी की जिंदगी व्यतीत करने लगा। वह रोजाना जंगल जाकर लकड़ियां काटकर लाता और बाजार में उन्हें बेचकर जैसे कैसे घर का गुजारा चलाता था।एक दिन अलीबाबा ने जंगल में लकड़ी काटते समय 40 घुड़सवार को वहां आते हुए देखा। सभी घुड़सवार के पास धन ...