पोस्ट्स

*गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जांना ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा*

इमेज
*गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जांना ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, दि. ७ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. सन २०२५ पासून गणेशोत्सव ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा होत आहे. या अंतर्गत ही वार्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीपासून देशभरातील व देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. जास्तीत जास्त मंडळांना सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळतील. पारितोषिक रचना अशी आहे –   तालुका स्तर : प्रथम ...

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यपदी सतीश वाघोले नियुक्त; अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली शपथ*

इमेज
*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यपदी सतीश वाघोले नियुक्त; अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली शपथ*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी मुंबई :** महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यपदी नव्याने नियुक्त झालेल्या सतीश बबन वाघोले यांना आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी सतीश बबन वाघोले यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आयोगाच्या मुख्यालयात झालेल्या शपथविधी सोहळ्यात अध्यक्ष भीमनवार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आयोगातील सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या नियुक्तीमुळे आयोगातील सदस्यांची संख्या वाढली असून परीक्षा, मुलाखती व शिफारस प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे. KDM NEWS प्रतिनिधी 

*'डोळ्यांदेखत पीक जळालं...'; पावसाअभावी सोयाबीन शेळ्यांच्या चर्रणात, बार्शी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी*

इमेज
*'डोळ्यांदेखत पीक जळालं...'; पावसाअभावी सोयाबीन शेळ्यांच्या चर्रणात, बार्शी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. अल्पभूधारक शेतकरी जयदेव सुखदेव शिंदे (वय ६७) गोरमाळे यांनी आपल्या शेतातील करपून वाळत असलेले उभे सोयाबीन पीक शेळ्यांना चारले. ही घटना परिसरातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता स्पष्ट करते. शिंदे शेतीसोबत सुमारे २० शेळ्यांचे पालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यंदा २० जूनच्या आसपास सोयाबीनची पेरणी केली. उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. फुले येण्याच्या टप्प्यात पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने पिकाची वाढ खुंटली. बार्शी तालुक्यातील अनेक गावांत सोयाबीन जागेवरच करपून वाळू लागले. शेतात विहीर नसल्याने बोअरच्या पाण्यावर शेती होते. यंदा बोअरमधील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने सिंचन शक्य झाले नाही. डोळ्यादेखत पीक वाळताना पाहून शिंदे यांनी ते शेळ्यांना चारण्याचा निर्णय घेतला. बी-बियाणे, मशागत, पेरणी, खते, औषध फवारणीसह एकरी ३० ...

*बार्शी तालुक्यात खळबळ! शेतरस्त्याच्या वादातून महिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा*

इमेज
*बार्शी तालुक्यात खळबळ! शेतरस्त्याच्या वादातून महिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) दुपारी शेतरस्त्याच्या वादातून एका महिलेवर कोयत्यांनी घातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून बार्शी तालुका पोलीस ठाण्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मधुकर बाजीराव गादेकर (वय ६४, रा. शेंद्री, ता. बार्शी) यांच्या म्हणण्यानुसार, घटना उपळाई ठोंगे येथील शेती गट नंबर १११६/२ मध्ये दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गोरख बळीराम कोडलिंगे, वैभव गोरख कोडलिंगे, वैष्णव उर्फ बाल्या गोरख कोडलिंगे, शितल गोरख कोडलिंगे (सर्व रा. शेंद्री) आणि भैया वाणी (रा. बार्शी) हे कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी फिर्यादीच्या पत्नी सौ. कालींदा यांना लक्ष्य करून “हिला जिवंत सोडायचे नाही, जिवे ठार मारू” असे म्हणत हल्ला केला. वैभव, वैष्णव आणि भैया वाणी यांनी कोयत्याने कालींदा यांच्या डोक्यात, दोन्ही हातांच्या दंडांवर, उजव्या हाताच्या खांद्यावर, पोटरीवर आणि डाव्या हाताच...

*बार्शी तालुक्यात थरार! खांडवी शिवारात बंदुकीच्या धाकाने ३.९० लाखांची लुटमार, पती गंभीर जखमी*

इमेज
*बार्शी तालुक्यात थरार! खांडवी शिवारात बंदुकीच्या धाकाने ३.९० लाखांची लुटमार, पती गंभीर जखमी*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ५ सप्टेंबर २०२६: बार्शी तालुक्यातील खांडवी गावच्या शिवारात रात्री रस्त्यावर चार अज्ञात व्यक्तींनी बंदुकीच्या धाकानं चोरी केली. यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून सोन्याचे दागिने लुटले गेले आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंदा रामकिसन लोंढे (वय ३३, रा. माळहिवरा, ता. जि. हिंगोली) यांनी दिलेल्या जबाबानुसार, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २.२० वाजता मौजे खांडवी ता. बार्शी गावच्या शिवारात गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली होती. त्यावेळी चार अज्ञात इसमांनी पाठीमागून येऊन तिचे पती रामकिसन वसंतराव लोंढे यांच्या डोक्याला बंदुक लावून धाक दाखवला, शिवीगाळ केली आणि मंदा यांच्या गालात हाताने मारहाण केली. त्यानंतर रामकिसन यांच्या उजव्या हातावर व पोटात बंदुकीतून गोळी मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील चेन जबरदस्तीने काढून घेऊन अज्ञात व्यक्ती पळून गेले. या चोरीत एकूण ३ लाख ९० हजार रुपयांच्या ...

*खासदार ओमराजे निंबाळकर आणि उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या प्रयत्नांना यश; वैराग अप्पर तहसीलच्या मागणीला महसूल मंत्र्यांचे हिरवा कंदील!*

इमेज
*खासदार ओमराजे निंबाळकर आणि उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या प्रयत्नांना यश; वैराग अप्पर तहसीलच्या मागणीला महसूल मंत्र्यांचे हिरवा कंदील!* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीसाठी धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर यांनी मुंबई मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांनी स्मरणपत्र सादर करून मागणी मांडली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही मंत्र्यांना देण्यात आली. मंत्र्यांनी या मागणीबाबत शंभर टक्के आश्वासन दिले. वैराग हे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे. परिसरातील सुमारे ५७ गावांतील नागरिकांचा दैनंदिन प्रशासकीय आणि व्यावसायिक संपर्क वैरागशी जोडला गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामकाजाचा ताण कमी करण्यासाठी वैराग येथे अप्पर तहसील कार्यालयाची तीव्र गरज असल्याचे खासदार निंबाळकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीला दीर्घ इतिहास आहे. १९६४ पासूनच व...

*"नोकरी करायची तर चार लाख आणा"; बार्शीतील तरुणीचा सासरच्यांकडून छळ, व्हॉट्सअ‍ॅपवरूनही जीवे मारण्याची धमकी*

इमेज
*"नोकरी करायची तर चार लाख आणा"; बार्शीतील तरुणीचा सासरच्यांकडून छळ, व्हॉट्सअ‍ॅपवरूनही जीवे मारण्याची धमकी*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका तरुणीने सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी रूतुजा स्वप्निल मेहेर (माहेरचे नाव रूतुजा राजेंद्र काळे, वय २५, बार्शी हिने गुरुवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब दिला. रूतुजाचे लग्न दि. २४ मे २०२५ रोजी भगवंत मंगल कार्यालय, बार्शी येथे स्वप्निल कैलास मेहेर  यांच्याशी झाले होते. लग्नापूर्वी पतीने तिला नोकरी करण्याची व पुणे येथे राहण्याची संमती दिली होती. लग्नानंतर दोघे कुर्डवाडी येथे रूममध्ये राहत होते. दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजता रूतुजाने खाजगी नोकरी करायची इच्छा व्यक्त केली. त्यावर पतीने तिला हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. काही दिवसांनी रोपळे येथे गेल्यावर रूतुजाने सासू-सासऱ्यांना ही बाब सांगितली. मात्र सासू-सासऱ्यांनी “माझा मुलगा तुला नोकरी करू नको म्हणत आहे, तेच बरोबर आहे” असे सांगून तिलाही...