**स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात; ईव्हीएमच्या कमतरतेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी**
**स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात; ईव्हीएमच्या कमतरतेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी** **KDM NEWS प्रतिनिधी** मुंबई, १ जून २०२५* महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचा राज्य सरकारचा मानस असून, यासाठी सुमारे एक लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आवश्यक आहेत. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या केवळ ६४ हजार ईव्हीएम उपलब्ध असल्याने उर्वरित यंत्रांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे. राज्यातील ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर यासह अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर सध्या प्रशासकांचे राजवट आहे. या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असली, तरी ईव्हीएमच्या कमतरतेमुळे निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा विचार आ...