पोस्ट्स

**श्रीपतपिंपरी येथे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन २८ वर्षीय तरुणाचा आत्महत्या**

इमेज
**श्रीपतपिंपरी येथे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन २८ वर्षीय तरुणाचा आत्महत्या**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर):** श्रीपतपिंपरी (ता. बार्शी) येथील एका शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन २८ वर्षीय स्वप्नील नानासाहेब मोरे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि. ७ मे २०२६ रोजी घडली. स्वप्नील नानासाहेब मोरे हा श्रीपतपिंपरी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण मोरे (वय ५५) यांचा मोठा मुलगा होता. नानासाहेब मोरे यांनी बार्शी पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरी जबाबानुसार, स्वप्नील सकाळी सुमारे १० वाजता नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावचे सरपंच रामराजे ताकभाते यांचा फोन आला आणि स्वप्नीलने शेतात गळफास घेतल्याची माहिती दिली. कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांसह नानासाहेब मोरे तातडीने शेती गट क्र. २८९/१ मधील शेतात गेले. तेथे लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वप्नील आढळला. शाहूराजे घाडगे, रामराजे ताकभाते, अतुल काकडे यांसह उपस्थितांनी दोरी कापून त्याला खाली उतरवले. मात्र, त्याचे शरीर थंड पडले होते आणि तो मयत झाल्याचे स्पष्ट झाले. स्वप्नील ह...

**बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा महापूर: कलेक्टर ते ठाणेदारांपर्यंत लाचखोरीचे सिलसिले, सामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास ढासळला**

इमेज
**बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा महापूर: कलेक्टर ते ठाणेदारांपर्यंत लाचखोरीचे सिलसिले, सामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास ढासळला**  **KDM NEWS प्रतिनिधी बीड, ८ मे २०२६:** बीड जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेवर भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, ठाणेदार ते महावितरणच्या अभियंत्यांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली आहे. गेल्या चार महिन्यांत एसीबीने केलेल्या १० हून अधिक कारवायांमुळे महसूल, पोलिस आणि इतर विभागांमध्ये खळबळ उडाली आहे. 'सामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाकडे?' असा सवाल आता जोर धरत आहे.  ७३ कोटी ते ३१० कोटींचा भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि जायकवाडी प्रकल्पातील भूसंपादनात मोठा घोटाळा उघडकीस आला. तत्कालीन जिल्हाधिकारी **अविनाश पाठक** यांना ७ मे २०२६ रोजी लातूर येथील त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट आदेश, जुन्या तारखा, बनावट सह्या आणि वकिलांच्या संगनमताने शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये मावेजा ...

**बार्शी-धाराशिव रोडवर भीषण अपघात; चुकीच्या बाजूने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक, सासरे-सासू गंभीर जखमी**

इमेज
**बार्शी-धाराशिव रोडवर भीषण अपघात; चुकीच्या बाजूने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक, सासरे-सासू गंभीर जखमी**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** ६ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता बार्शी-धाराशिव रोडवरील कदम वस्ती (डाळ मिल जवळ) येथे भीषण रस्ता अपघात झाला. पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक **MH-12-RN-6846** ने भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने (राँग साईड) येऊन दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. अपघातग्रस्त दुचाकी क्रमांक **MH-25-AA-0516** वर गोसेवाडा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील धनाजी दादाराव मस्के (सासरे) आणि त्यांच्या पत्नी रोहीणी धनाजी मस्के (सासू) होते. ते चिखर्डे (ता. बार्शी) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभातून परतत होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा जावई कुमार सुभाष अंधारे (वय ३२, रा. मानकेश्वर, ता. भुम, जि. धाराशिव) आपल्या दुचाकीवर पत्नीसह येत होता. **प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार,** कारने अत्यंत वेगात राँग साईडने येऊन धडक दिल्याने धनाजी मस्के व रोहीणी मस्के रस्त्यावर पडले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. धनाजी मस्के यांचा उजवा पाय मोडला असू...

**बार्शीत सोनोग्राफी मशीन प्रकरणी मोठी कारवाई; यमुना क्लिनिक व सहयोग हॉस्पिटल प्रशासनाच्या रडारवर**

इमेज
 **बार्शीत सोनोग्राफी मशीन प्रकरणी मोठी कारवाई; यमुना क्लिनिक व सहयोग हॉस्पिटल प्रशासनाच्या रडारवर**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** बार्शी शहरातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सोनोग्राफी मशीन प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. शहरातील **यमुना क्लिनिक** आणि **सहयोग हॉस्पिटल** मधील सोनोग्राफी मशीन संदर्भात प्रशासनाने डॉ. कैवल्य गायकवाड यांच्यावर पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही केली असून, याचा सविस्तर अहवाल जिल्हा समुचित प्राधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.          काय आहे नेमकं प्रकरण? बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते **संदीप चतुर्भुज सुतार** यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी माहिती अधिकारात अर्ज दाखल करून या दोन्ही रुग्णालयांतील सोनोग्राफी मशीनच्या वैधतेबाबत आणि प्रशासकीय कार्यवाहीबाबत माहिती मागवली होती. या अर्जाच्या अनुषंगाने बार्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा जनमाहिती अधिकारी **डॉ. एस. ए. बोपलकर** यांनी लेखी माहिती प्रसिद्ध केली आहे.       प्रशासकीय कार्यवाहीचे प्रमुख मुद्दे: ...

**बळीराजाच्या कष्टाची क्रूर थट्टा: १२ क्विंटल कांदा विकून पदरी शून्य; शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!**

इमेज
**बळीराजाच्या कष्टाची क्रूर थट्टा: १२ क्विंटल कांदा विकून पदरी शून्य; शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!**  **पैठण | विशेष प्रतिनिधी** ज्या हातांनी मातीतून सोनं उगवलं, त्याच हातांवर आज नशिबाने आणि कोसळलेल्या बाजारभावाने पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ आणली आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीतून बळीराजाच्या कष्टाची थट्टा करणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी कष्टाने पिकवलेला १२ क्विंटल कांदा बाजार समितीत विकला, मात्र सर्व खर्च वजा जाता त्यांना एक रुपयाही मिळाला नाही, उलट बाजार समितीलाच आपल्या खिशातून एक रुपया द्यावा लागला. ### **रक्ताचं पाणी केलं, पण कष्टाचं मोल 'शून्य'** वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी मोठ्या आशेने आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या पत्नीने दिवस-रात्र थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता या पिकासाठी कष्ट घेतले होते. घरात दोन मुलांच्या शिक्षणाची फी आणि संसाराचा गाडा या कांद्याच्या पैशांवर अवलंबून होता. मात्र, जेव्हा हिशोबाची पावती हातात पडली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. १२ क्विंटल कांदा विकूनही वाहतूक, ...

**सरपंच द पॉवर मॅन चित्रपटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव; 'टायटल लय पॉवरफुल आहे'**

इमेज
**सरपंच द पॉवर मॅन चित्रपटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव; 'टायटल लय पॉवरफुल आहे'**  **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई:** महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी चित्रपट 'सरपंच द पॉवर मॅन' च्या टीमचे मुंबईतील नंदनवन निवासस्थानी स्वागत केले. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर पाहून कौतुक व्यक्त केले आणि टायटल अतिशय पॉवरफुल असल्याचे मत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सरपंच द पॉवर मॅन चित्रपटाचे टायटल लय पॉवरफुल आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत धमाका करणार आहे.” त्यांनी मुख्य अभिनेता व दिग्दर्शक महादेव जाधवर यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाचे देखील विशेष कौतुक केले.  शिंदे यांनी सरपंच पदाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “सरपंच हा तळागाळातील गावखेड्यातील सर्वात महत्वाची पॉवर आहे. गावाचा विकास करणे, गावाला सर्व सोयींनी सुसज्ज करणे यासाठी सरपंच हे अत्यंत महत्वाचे पद आहे.” त्यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. या भेटीत मुख्य अभिनेते व दिग्दर्शक महादेव जाधवर, मुंबई सरकारी वकील ॲड. अविनाश जाधव, कार्यकारी निर्माते राजेंद्र ...

**बार्शीमध्ये पाणी संकट गंभीर; ७-८ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक संतापले**

इमेज
**बार्शीमध्ये पाणी संकट गंभीर; ७-८ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक संतापले**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, उन्हाळ्यात अनेक भागांत सात ते आठ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांनी या प्रकरणी बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना तातडीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, उजनी आणि चांदणी या दोन्ही प्रमुख पाणीपुरवठा योजना सुरू असतानाही आणि शहरात पुरेशी साठवण क्षमता उपलब्ध असतानाही नियोजनाचा पूर्ण अभाव, गळती, अपुरी मनुष्यबळ आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. निवेदनात अॅड. अक्कलकोटे यांनी सांगितले की, अनेक भागांत पाण्याचा दाब इतका कमी आहे की शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नव्या नळजोडण्यांनुसार वितरण व्यवस्था अद्ययावत करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक नागरिकांना टँकर, खाजगी व...

**बार्शीमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; विनासूचना ९ तास वीज पुरवठा खंडित, नागरिक संतप्त**

इमेज
**बार्शीमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; विनासूचना ९ तास वीज पुरवठा खंडित, नागरिक संतप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ७ मे २०२६:** महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या बार्शी विभागातील बेजबाबदार कारभाराने आजूबाजूच्या परिसरात तीव्र संतापाची लहर निर्माण केली आहे. जाहीर केलेल्या भारनियमनापेक्षा तब्बल ९ तास वीज पुरवठा खंडित ठेवून नागरिकांना प्रचंड उष्णतेत त्रास दिल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. दिनांक ६ मे २०२६ रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत भारनियमन असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत नोटीस न देता सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. यामुळे शहरातील लहान मुले, वृद्ध, आजारी रुग्ण आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. पाणीपुरवठा, रुग्णालये, शासकीय-खासगी कार्यालये आणि दैनंदिन कामकाज ठप्प पडले. बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते **नागेश अक्कलकोटे** यांनी याबाबत अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, व्यवस्थापकीय संचालक महावितरण, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग आणि जिल्ह...

**माढ्यात एसीबीचा धडक कारवाई: मोफत भांडी संचासाठी लाच घेणारे दोन खाजगी ऑपरेटर रंगेहात जाळ्यात**

इमेज
**माढ्यात खळबळ: कामगारांच्या भांडी संचासाठी मागितली लाच; एसीबीच्या जाळ्यात अडकले दोन खासगी ऑपरेटर** **KDM NEWS प्रतिनिधी माढा : ** महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मोफत गृहोपयोगी भांडी संच योजनेचा गैरफायदा घेत कामगारांकडून लाच उकळणाऱ्या दोन खाजगी ऑपरेटरना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर युनिटने बुधवारी (६ मे २०२६) रंगेहात पकडले. उपळाई (बुद्रुक) येथील भांडी वाटप केंद्रावर ही कारवाई करण्यात आली असून, माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.  अटक करण्यात आलेले आरोपी **विनोद विजय गाडेकर** (वय ३७, रा. उपळाई बु., भांडी वाटप केंद्र ऑपरेटर) आणि **दिनेश मनोहर वाघमारे** (वय २३, रा. माळी वस्ती, उपळाई बु., ऑपरेटर) असे आहेत.             नेमके प्रकरण तक्रारदार हे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यांनी २७ मार्च २०२६ रोजी शासनाच्या मोफत भांडी संच योजनेसाठी अर्ज केला होता. ही योजना पूर्णपणे मोफत असतानाही मुख्य आरोपी विनोद गाडेकर याने संच मिळवून देण्यासाठी प्रथम १,२०० रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर ५०० रुपयांवर तडजोड झाली. हक्का...

**बार्शीत आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ; बोगस भाडेकरार-आधार कार्डचा वापर, पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय**

इमेज
**बार्शीत आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ; बोगस भाडेकरार-आधार कार्डचा वापर, पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी तालुक्यात २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी पूर्व प्राथमिक (नर्सरी) व इयत्ता पहिलीच्या आरटीई २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. बोगस भाडेकरार, बनावट आधार कार्ड आणि चुकीचे लोकेशन दाखवून अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने खऱ्या गरजू व पात्र विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला गेल्याची तक्रार संतप्त पालकांनी केली आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, अनेक अर्जदारांनी शाळेजवळील ३ किलोमीटर परिसरात वास्तव्य दाखवण्यासाठी खोटे नोंदणीकृत भाडेकरार सादर केले. काहींनी आधार कार्डमध्ये फेरफार करून किंवा बनावट कागदपत्रे जोडून अर्ज केल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) आणि वंचित घटकातील पात्र मुलांना प्रवेश मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे.      आरटीई कायद्याची अंमलबजावणी आणि नियम Right to Education Act 2009 अंतर्गत Section 1...

**बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धोका; उपळाई ठोंगे येथे रुग्णाचा मृत्यू, जिल्हाभर मोहीम सुरू**

इमेज
**बार्शी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धोका; उपळाई ठोंगे येथे रुग्णाचा मृत्यू, जिल्हाभर मोहीम सुरू**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** बार्शी तालुक्यात वर्षानुवर्षे चालणाऱ्या बोगस वैद्यकीय प्रॅक्टिसला मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय पदवी नसताना ‘प्रिन्स क्लिनिक’ चालवणाऱ्या शंकर मनोहर पाठक (उर्फ डॉ. एस. एम. पाठक) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात उपचारादरम्यान तानाजी नरहरी सुतार (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ५ मे २०२६ रोजी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार ‘प्रिन्स क्लिनिक’ची तपासणी केली. तपासणीत शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्यांनी ‘B.A.M.S.’ पदवी दर्शवून रुग्णांची दिशाभूल केल्याचा संशय आहे. क्लिनिकमधील औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३, महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला...

**बार्शीत मध्यरात्री महिला वकिलाच्या घरावर धाड; ‘डायल ११२’ मुळे अवघ्या ५ मिनिटांत आरोपी जेरबंद**

इमेज
**बार्शीत मध्यरात्री महिला वकिलाच्या घरावर धाड; ‘डायल ११२’ मुळे अवघ्या ५ मिनिटांत आरोपी जेरबंद**  **KDM NEWS बार्शी प्रतिनिधी** बार्शी शहरातील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या भैरवनाथ हौसिंग सोसायटी परिसरात सोमवारी मध्यरात्री एका महिला वकिलाच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरूला बार्शी पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत अटक केली. 'डायल ११२' या आपत्कालीन सेवेच्या प्रभावी वापरामुळे अवघ्या ५ मिनिटांत पोलिसांनी घटनास्थळ गाठल्याने मोठा अनर्थ टळला आहे.            **नेमकी घटना काय?** सोमवारी (४ मे २०२६) रात्री सुमारे अडीच वाजेच्या सुमारास अॅड. उज्वला ज्ञानदेव फरतडे (वय ४५)  या आपल्या घरी एकट्या असताना ही धक्कादायक घटना घडली. मध्यरात्रीच्या शांततेत एका अनोळखी इसमाने त्यांच्या घराचा दरवाजा जोराने ठोठावण्यास आणि लाथा मारण्यास सुरुवात केली. बाहेरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच अॅड. फरतडे यांनी प्रसंगावधान राखले.         **अशी झाली कारवाई** घाबरून न जाता त्यांनी तत्...

**बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निकाल** **झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी**

इमेज
**बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निकाल**   **झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी** **KDM NEWS  बार्शी (विशेष प्रतिनिधी):** बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (५ मे) अल्पवयीन मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात एका २९ वर्षीय आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी दिलेल्या या निकालामुळे केवळ चार महिन्यांत न्याय मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. १ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली. लखन ऊर्फ बापू जोतीबा सावंत (वय २९, रा. सिद्धार्थ नगर, माळशिरस) याने एका घरात चोरट्या मार्गाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याने जाग आल्यावर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आरोपीला घटनास्थळाजवळच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम ३७६ व POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्य...

**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**

इमेज
**सल्ला पडला महागात! वैरागमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; पोलीस तक्रारीचा राग ठरला काळ**  **KDM NEWS प्रतिनिधी वैराग (बार्शी): मित्राला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रामाणिक सल्ला एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. "तू त्याला तक्रार करायला का सांगितलीस?" याच रागातून आरोपीने एका ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. वैराग शहरातील दत्तनगर परिसरात शनिवारी (२ मे) पहाटे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास वैराग येथील एका दुकानाजवळ काही मित्र मद्यप्राशन करण्यासाठी जमले होते. तिथे आरोपी उल्हास मुळे आणि दिनेश चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या उल्हासने हमालीचा लोखंडी ...

**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा**

इमेज
**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), २ मे २०२६:** बार्शी तालुक्यातील कव्हे गावात पैशाच्या वादातून दोघा आरोपींनी एका दलित मजुराला जातीवाचक शिवीगाळ करून दगड, लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण अभिमान चव्हाण (वय २९, धंदा- मजुरी, जात- हिंदू चांभार, रा. कव्हे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (१ मे २०२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कव्हे गावातील अनिल हजारे यांच्या खवा भट्टीजवळ व हनुमान विद्यामंदिर शाळेजवळ ही घटना घडली. आरोपी अनिल दत्तात्रय हजारे व आदित्य शंकर राऊत (दोघे रा. कव्हे) यांनी फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने डोक्यात वार करून जखमी केले आणि जवळील चाकूनेही वार केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. या घटनेत लक्ष्मण चव्हाण यांना गंभीर जखमा झाल्या...

**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**

इमेज
**दोन दशकांनंतर चिखर्डेच्या शाळेत भरला 'मैत्रीचा मेळा'; २००४-०५ बॅचचा स्नेहसोहळा उत्साहात संपन्न**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी   तालुक्यातील चिखर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन २००४-०५ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, दि. २ मे रोजी चिखर्डे येथील संभाजीराजे भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने अवघा परिसर आनंदाने न्हाऊन निघाला होता. सकाळी ९:३० वाजता ज्या शाळेत शिक्षणाचे बाळकडू मिळाले, त्याच जि. प. शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर संभाजीराजे भवन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. **गुरुजनांचा सन्मान आणि मार्गदर्शन** या सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ शिक्षक गुरव सर यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्...

**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**

इमेज
**बार्शीच्या लेकीची 'MPSC' परीक्षेत उत्तुंग भरारी; प्रियांका बिडवे यांची महसूल सहाय्यक पदी निवड!**  **KDM NEWS बार्शी:  प्रतिनिधी**  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ३० एप्रिल रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बार्शीच्या कुमारी प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी दैदिप्यमान यश संपादन करत महसूल विभागात 'महसूल सहाय्यक' (लिपिक-टंकलेखक) पदी आपली मोहोर उमटवली आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील गुणवत्ता कोणत्याही आव्हानावर मात करू शकते, हे बार्शीच्या प्रियांका भाऊसाहेब बिडवे यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये प्रियांका यांनी 'महसूल सहाय्यक'  पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे बिडवे कुटुंबासह संपूर्ण बार्शी आणि परंडा परिसरात आनंदाचे वातावरण आहे. २६१ गुणांसह 'ओपन' प्रवर्गातून यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक ...

**बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटर बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री; जादा दर आकारल्यास परवाना रद्द**

इमेज
**बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटर बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री; जादा दर आकारल्यास परवाना रद्द**  **KDM NEWS प्रतिनिधी पुणे :** प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली आहे. एसटी बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटरची बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सरनाईक यांनी लोणावळा बसस्थानकाची अनपेक्षित पाहणी केली. यावेळी प्रवाशांशी बोलताना 'नाथजल'च्या बाटलीला २० रुपये आकारले जात असल्याची तक्रार समोर आली. यावर मंत्री सरनाईक यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत विक्रेत्याला दरफलक स्पष्टपणे लावण्याच्या सूचना दिल्या आणि भविष्यात असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. प्रवाशांनी यावेळी आणखी एक समस्या उपस्थित केली. काही बसेस लोणावळा बसस्थानकावर थांबत नसल्याचे आणि जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना महागडे नाश्ता आणि खाद्यपदार्थ घ्यावे ल...

**सोलापूर जिल्ह्यात प्रखर उष्णता कायम; कमाल तापमान ४१-४२ अंशांपर्यंत, पुढील काही दिवसांत थोडीशी घट**

इमेज
**सोलापूर जिल्ह्यात प्रखर उष्णता कायम; कमाल तापमान ४१-४२ अंशांपर्यंत, पुढील काही दिवसांत थोडीशी घट**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : सोलापूर, ३० एप्रिल २०२६:** सोलापूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कडाक्याची उष्णता जाणवत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, काल जिल्ह्यात कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आजही ४१.६ ते ४२ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. कोरडी आणि गरम हवा यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे वेधशाळेप्रमाणे, आज सोलापूरमध्ये मुख्यतः स्वच्छ आकाश राहील. कमाल तापमान ४२ अंश आणि किमान तापमान २६ अंश राहण्याची शक्यता आहे. उद्या १ मे रोजी कमाल ४१ अंश आणि पुढील काही दिवसांत ४० ते ४१ अंशांच्या दरम्यान तापमान राहील. २ ते ५ मे दरम्यान तापमानात १ ते २ अंशांची हळूहळू घट होण्याची चिन्हे आहेत. **अवकाळी पावसाची शक्यता कमी:**   सध्या सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत अवकाळी पावसाची तीव्र शक्यता नाही. मुख्यतः स्वच्छ ते मुख्यतः स्वच्छ आकाश राहील. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हलक्या सरींसह वादळी वाऱ्या...

**भारताची १६वी जनगणना: डिजिटल युगातील ऐतिहासिक पाऊल**

इमेज
**भारताची १६वी जनगणना: डिजिटल युगातील ऐतिहासिक पाऊल**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी:  बार्शी देशातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणनेचा (Census 2027) पहिला टप्पा सुरू झाला असून, नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यावर्षी प्रथमच ‘सेल्फ एन्युमरेशन’ (Self Enumeration) सुविधेद्वारे नागरिक घरबसल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतात.  महाराष्ट्रात सेल्फ एन्युमरेशनसाठी १ मे ते १५ मे २०२६ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत अधिकृत पोर्टलवर नोंदणी केल्यास प्रगणकांच्या भेटीवेळी फक्त सत्यापन करावे लागेल, ज्यामुळे प्रक्रिया वेगवान आणि अचूक होईल. महाराष्ट्रात १६ मे ते १४ जूनपर्यंत प्रगणक घरगुती भेटी देतील.  **कसे कराल सेल्फ एन्युमरेशन?**   - अधिकृत संकेतस्थळावर (se.census.gov.in) जा.   - मोबाइल नंबरवर OTP ने लॉगिन करा.   - भाषा निवडा (१६ भाषांपैकी, मराठीसह).   - घराची लोकेशन नकाशावर चिन्हांकित करा.   - घरातील सुविधा, मालमत्ता आणि कुटुंब सदस्यांची माहि...