पोस्ट्स

*हद्दपार आरोपी बार्शीत घुसल्याने गुन्हा दाखल; कलम १४२ अन्वये कारवाई*

इमेज
*हद्दपार आरोपी बार्शीत घुसल्याने गुन्हा दाखल; कलम १४२ अन्वये कारवाई*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : हद्दपार आदेशाचे उल्लंघन करत बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी इब्राहीम राजहमद शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७०/२०२६ दाखल झाला. घटना १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१४ वाजता ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे घडली. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आरोपीने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केला. गुन्हा ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२६ वाजता नोंदविण्यात आला. घटनास्थळ ठाण्यापासून दक्षिणेस सुमारे ३ किलोमीटर अंतरावर आहे. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल १५३ सचिन सोमनाथ राऊत (बार्शी शहर पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवून स्टेशन डायरी रिपोर्ट संबंधित न्यायालयात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार कॉन्स्टेबल ६४९ कोतवाल यांच्याकडे सोपविण्य...

*बार्शी : सिझेरियन दरम्यान निष्काळजीपणाचा आरोप; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल*

इमेज
*बार्शी : सिझेरियन दरम्यान निष्काळजीपणाचा आरोप; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी *शहर पोलीस ठाणे येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी डॉ. रविकिरण भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उमेश हरीभाऊ महानवर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी रात्री त्यांची पत्नी सोनम  (वय ३१) दुसऱ्या प्रसूतीसाठी डॉ. रविकिरण भोसले यांच्या भोसले हॉस्पिटल, परांडा रोड, बार्शी येथे दाखल झाली होती. रिपीट सिझेरियनसाठी आवश्यक कायदेशीर पात्रता नसतानाही डॉक्टराने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. रात्री सुमारे १०.३० वाजता सिझेरियन केल्याच्या वेळी निष्काळजीपणा झाल्याने सोनमची तब्येत बिघडली. त्यानंतर आधार हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारादरम्यान ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.१० वाजता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत नोंद (क्र. ०५/२०२४) होती. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप केल्याने कागदपत्रे वैद्यकीय अधिक्षक, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर यांच्याकडे पाठवण्यात आली होती....

*सोलापूर : एसआयआर अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार*

इमेज
*सोलापूर : एसआयआर अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले की, विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होईल आणि त्यात प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत कार्तिकेयन यांनी सांगितले की, १७ जून २०२६ रोजी जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ३९,४१,०९५ होती. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ही संख्या ३३,१८,४२४ झाली आहे. यासोबत प्रसिद्ध झालेल्या एएसडीडी यादीत ६,२२,६७१ मतदारांचा समावेश आहे.  *प्रारूप यादीतील आकडेवारी - पुरुष मतदार : १७,०९,४७१   - महिला मतदार : १६,०८,७०९   - तृतीयपंथी मतदार : २४४      एएसडीडी यादीतील तपशील - मृत्यू झालेले : १,७०,६९६   - आधीच नोंद असलेले : १,०५,९४१   - अनुपलब्ध/अनुपस्थित : १,३४,३०२...

*महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज!*

इमेज
*महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज!*  *KDM NEWS प्रतिनिधी*ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पिके संकटात सापडली होती. अनेक जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट नोंदवली गेली. अहिल्यानगर आणि बीडसारख्या भागांत तूट ८० टक्क्यांपेक्षाही अधिक होती. या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोठा दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. डख यांच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. १ आणि २ सप्टेंबर तसेच ६, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी सांगली, सोलापूर, सातारा, बारामती, पुणे आणि पंढरपूर परिसरात मध्यम ते चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पेंडवळत्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. या पावसामुळे शेतात पाणी जमा होईल आणि पिकांना दिलासा मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, घाटमाथा आणि कोकणपट्टीतही याच काळात चांगला पाऊस अपेक्षित आहे. कोल्हापूरपासून पालघरपर्यंतच्या पट्ट्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्ह्यांतही पा...

*सोलापूरचा चमत्कार! ३ किलो वजनाचा 'शरद मँगो' बाजारात दाखल; शेतकऱ्याच्या प्रयोगशीलतेला यश*

इमेज
*सोलापूरचा चमत्कार! ३ किलो वजनाचा 'शरद मँगो' बाजारात दाखल; शेतकऱ्याच्या प्रयोगशीलतेला यश*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकरी दत्तात्रय बाबुराव घाडगे यांनी विकसित केलेला २.५ ते ३ किलो वजनाचा आंबा ‘शरद मँगो’ नावाने चर्चा आणि बाजारात मागणी वाढवत आहे. हा आंबा केवळ आकारानेच नव्हे तर विशेष वाण म्हणूनही ओळखला जात आहे. **मुख्य बाबी** - आंब्याचे वजन साधारण २.५ ते ३ किलोपर्यंत जाते. काही फळे कलिंगडाइतकी मोठी दिसतात. - घाडगे यांनी केशरसह विविध आंबा जातींचे ग्राफ्टिंग (कलम) करून आणि होमिओपॅथिक खते/औषधांचा वापर करून हा नवीन वाण तयार केला. - त्यांच्या ८ एकर बागेत सुमारे १० हजार झाडे आहेत. त्यात १७ विविध आंबा जातींचा समावेश आहे. ‘शरद मँगो’साठी काही झाडे विशेष आहेत. - या वाणाला पेटंट मिळाले आहे. त्यांना संत सावता माळी यांच्या नावावरून आणखी एका आंब्यालाही पेटंट मिळाले आहे. - नाव का दिले? १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात सुरू झालेल्या फळबाग योजनेचा लाभ घेऊन घाडगे यांनी ही बाग उभी केली. त्या कृतज्ञतेपोटी आणि पवारांच्या पू...

*बार्शी तालुक्यात सोयाबीनसह खरीप पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकरी संकटात*

इमेज
*बार्शी तालुक्यात सोयाबीनसह खरीप पिके करपण्याच्या मार्गावर; कव्हे येथील शेतकरी संकटात*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दांडी मारल्याने सोयाबीन, उडीद, मूग आणि मका यांसारखी खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. जुलै-ऑगस्टच्या महत्त्वाच्या कालावधीत थेंबभर पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. #बार्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. पिके फुलोऱ्यात आणि वाढीच्या टप्प्यात असतानाच जमिनीतील ओलावा संपला. सोयाबीनची पाने वाळू लागली असून, जमिनीला भेगा पडलेल्या दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी वाया गेलेल्या सोयाबीन,उडीद पिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट केले आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पुन्हा थेंबही पडला नाही, त्यामुळे पीक सुकले. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बियाणे, खते, कोळपणी-उपणी यांचा खर्च आधीच वाढला आहे. त्यात पावसाअभावी उत्पादनात मोठी घट किंवा पूर्ण नुकसान होण्याची भीती आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची गरज भासण्याच...

*बार्शी पोलिसांची मोठी कारवाई! दीड वर्षांपासून फरारी असलेली महिला आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद*

इमेज
*बार्शी पोलिसांची मोठी कारवाई! दीड वर्षांपासून फरारी असलेली महिला आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*बार्शी तालुका पोलिसांनी दीड वर्षांपासून फरारी असलेल्या महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून अटक केली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात तक्रारदार मिसाळ यांच्या बॅगेतून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आरोपीने ठावठिकाणे व मोबाईल क्रमांक वारंवार बदलून पोलिसांना गुंगारा दिला. ती नृत्य कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या भागात फिरत होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाठवण्यात आले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी बहुसिंगपुरा येथील डोंगराळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. डोंगराळ भागातील मोबाईल लोकेशन अडचणींमुळे पथकाने दीड दिवस शेतकरी व कामगार यांच्या वेशभूषेत पर...