पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलं होतं आंदोलन

इमेज
पुणे-बंगळूरू (Pune Bangalore Highway) राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवले पुलावर मोठ्या संख्येनं मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या  नवले पुलावर मराठे आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. नवले पुलावर टायरची जाळपोळ करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुण्यातील नवले पुलावर काल दुपारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही तरुणांनी नवले पुलावर आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मुंबई बेंगलोर महामार्गावर टायर जाळण्यात आली होती. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम 336 आणि कलम 441 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  दोन ते अडीच तास वाहतुकीचा खोळंबा पुण्यातील नवले प...

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ओबीसी आरक्षणासाठी कुणबी समाज करणार आंदोलन'

इमेज
बचावासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाज आंदोलन करणार आहेत.खेड : कुणबी समाजाच्या समस्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असून, जातनिहाय जनगणना व ओबीसी आरक्षण  बचावासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाज आंदोलन करणार आहेत, अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष भूषण बरे यांनी दिली.नवभारत हायस्कूल सभागृहात कुणबी समाजाच्या सभेत ते बोलत होते. या वेळी कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम, समाजनेते सुरेश भायजे, नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, शाखा खेड तालुका मुंबईचे अध्यक्ष शंकर बाईत, कृष्णा आगरे, दीपक शिगवण, सचिन गोवळकर, ॲड. डफळे, समाजोन्नती संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृह इमारती लोकार्पण सोहळासंदर्भात चर्चा करण्यात आली. ओबीसी जातीनिहाय जनगणना व ओबीसी सामाजिक व राजकीय आरक्षण बचाव करणे, तिल्लोरी कुणबी समाजाची माहिती जमा करून मागासवर्ग आयोगाला सादर करण्याविषयी नियोजन व खेड तालुक्यातील कुणबी सांस्कृतिक भवनासाठी शासकीय जागा या विषयांवर चर्चा झाली.खेड तालुक्यातील सर्व कुणबी समाज हा आपल्या मातृसंघटनेच्या पाठीशी आहे. ज्या ज्या वेळी संघाध्यक्ष कुणबी स...

"त्या उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय", इंटरनेट बंदीवरून मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, "आमच्या अंगावर."

इमेज
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं सुरू आहेत.तालुक्यांमध्ये-जिल्ह्यांमध्ये बंद पाळणे, आमदारांच्या गाड्या अडवणे, नेत्यांना घेराव घालणे आणि वाहनांची जाळपोळ करण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. ही जाळपोळ मराठा समाजाकडून होत नसून यामागे दुसरेच कुणीतरी असल्याची शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. तर आज, धाराशिवमधील उमरगा येथे कर्नाटकातील बस जाळण्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील सर्व आगारांनी मंगळवारी प्रवासी सेवा बंद ठेवली आहे. राज्यातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यानंतर जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातूनच आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती. जालन्यातील नागरिकांच्या मोबाइलवर “शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, सेवा पुन्हा सुरळीत होताच आम्ही तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती ...

स्वच्छतेची सवय आणि सवयीचं पर्यटन; आशियातील सर्वांत स्वच्छ गावाची कहाणी

इमेज
पर्यटन विकास हा प्रकार नवा नाही. केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून पर्यटनस्थळांच्या विकासावर भर दिला आहे. या अंतर्गत, पर्यटकांना आकर्षित करण्याच्यापण, पर्यटनस्थळ म्हणून एखादं ठिकाण आधीपासूनच नैसर्गिकरित्या परिपूर्ण असणं, आणि त्यातही अख्खं गाव हेच आकर्षणाचा केंद्र असणं, हे दुर्मिळ उदाहरण आहे.  मेघालयमधील मॉलिलोंग हे गाव त्यापैकीच एक आहे आणि स्वच्छता हाच या गावाचा 'यूएसपी' आहे. आशियातील सर्वांत स्वच्छ गाव म्हणून मॉलिलोंग परिचित आहे. पण या गावाने हे साध्य कसं केलं, स्वच्छता राखण्यात इतकं सातत्य कसं, याचं काही प्रमाणात उत्तर केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींसाठी आखलेल्या दौऱ्यादरम्यान शोधण्याचा प्रयत्न केला. आसाम-मेघालयातील विविध विकास प्रकल्पांची, कामकाजाची, पर्यटनस्थळांची माहिती उर्वरित राज्यांतील जनतेला व्हावी, या उद्देशाने 'पीआयबी'ने आम्हाला इथं आणलं आहे. त्याअंतर्गत मेघालयातील मॉलिलोंग गावात आलो होतो. सुंदर चित्र असावं, तसंच हे गाव आहे.  रस्त्यावर झाडाचा पालाही दिसणार नाही. पाला साफ करणाऱ्या महिला कर्मचारीही दिसतच ...

अचानक आले अन् मराठ्यांचे हिरो बनले, मनोज जरांगे पाटील आहे तरी कोण?

इमेज
 अहमदनगर येथे घडलेले ते प्रकरण… १५ वर्षांची निष्पाप मुलगी… तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली गेली. कोपर्डीमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर देशही हादरला.या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ५७ ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चे काढण्यात आले. त्यातील मुंबईत झालेला मोर्चा हा अभूतपूर्व असा होता. मराठा क्रांती मूक मोर्चे जसे राज्यात काढण्यात आले. त्याचप्रमाणे बिदर, इंदोर, देवास, बुऱ्हानपूर, ग्वाल्हेर या अन्य राज्यातील शहरात निघाले. अगदी परदेशातही रशिया, नेदरलँड, दुबई, अमेरिका येथे मराठा क्रांती मूक मोर्चा काढला होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पहिला टप्पा मराठा क्रांती मूक मोर्चाच्या एकूण १५ प्रमुख मागण्या होत्या. या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न संयमी पद्धतीने हाताळला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर मंत्रालयात बैठक घेतली. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते, मराठा मोर्चाचे प्रतिनिधी या सर्वांची एकत्रित बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. १५ पैकी 8 म...

मराठा आंदोलन पेटल्यानंतर केंद्रात हालचालींना वेग, अमित शाहंचा थेट फडणवीसांना फोन

इमेज
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहेजाळपोळीचे अनेक व्हिडीओ आता समोर येत आहे. या घटनानंतर आता केंद्रात हालचाली वाढल्या आहेत. केंद्रीय गृह विभागाने राज्यात मराठा आरक्षणावरून उपस्थित झालेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काल अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक केली, घर, कार्यालय पेटवून देण्यात आलं. तर बस स्थानकातील 60 बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर बीड शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेटही बंद करण्यात आलं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जाळपोळीच्या घटनानंतर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात कलम 144 ल...

अपात्रतेनंतर विधानपरिषदेतूनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री राहता येणार नाही; कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी सांगितला नियम

इमेज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत सुधारित वेळापत्रक सादर करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे अपात्र होतील आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच मोठं विधान केलं आहे. जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरीही ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, त्यांना विधान परिषदेतून निवडून आणलं जाईल, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधानसभेची निवडणूक लढता येणार नाही. शिवाय ते विधानपरिषदेचे सदस्यही बनू शकणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती असीम सरोदे यांनी दिली.असीम सरोदे यांनी फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस हे वकिली शिक्...

प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?

इमेज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला दिलेला 40 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले.त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांनी पाणी, उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. थकलेल्या आवाजाने मनोज जरांगे समाजाशी संवाद साधत आहेत.  जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय. आज सकाळपासून त्यांची हालचालही मंदावलीय.उठायला आणि बसायलाही त्यांना होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून जरांगे झोपूनच आहेत. आजची पत्रकार परिषदही त्यांनी घेतलेली नाहीये. प्रकृती खालावत असली तरीही जरांगे आमरण उपोषणावर ठामच आहेत... तसंच उपचार घेण्यासाठीही त्यांनी नकार दिलाय. गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीयेत आणि तेही जेवण करत नाहीयेत. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. पण गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम के...

: 'मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या...', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

इमेज
मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या...', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा हात थरथरत होता.बोलताना मनोज जरांगे यांच्या हातातून माईक खाली पडला. तर यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या चर्चेसाठी यावं असं जरांगे यांनी म्हटलं आहे.  यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारशी कोणताही संवाद झालेला नाही, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळालेली नाहीत. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असं तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. तर मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असं उपमुख्यमंत्री देवें...

सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्यांचा डोंबिवलीत सत्कार; घराचा पत्ता शोधण्यासाठी सोशल मीडिया वापरल्याची माहिती

इमेज
डोंबिवली : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते  यांच्या गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या  कार्यकर्त्यांकडून 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी करत तोडफोड करण्यात आलेली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केलेली. आता या कार्यकर्त्यांची न्यायालयानं 5 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी-शर्थींसह सुटका करण्यात आली आहे. तीन आरोपींची जामीनावर सुटका झाल्यानंतर डोंबिवलीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तिघांचा भव्य सत्कार केला आहे.  वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांनी गाडीची तोडफोड प्रकरणासंदर्भात माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी जरांगे पाटील हेच दोषी आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मंगेश साबळे हे सरपंच असून त्यांनी अनेक वेगवेगळी आंदोलनं गेवराई तालुक्यामध्ये केली आहेत. कधी पैशांची उधळण, तर कध...

मोठी बातमी! शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आणखी दोन महिने आरक्षण मिळणे अवघड?

इमेज
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.समितीला मुदतवाढ दिल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. मात्र, तेलंगणा सरकारकडून निजामकालीन नोंदी व कागदपत्रे लवकर मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील महसूल सचिवांना पत्र पाठविले आहे. हे जुने दस्तावेज डिसेंबरऐवजी नोव्हेंबरमध्ये मिळाल्यास समितीचा अहवाल नोव्हेंबर अखेरीपर्यंत तयार होऊ शकेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकसत्ता'ला सांगितले.  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत आहे. दरम्यान, या समितीने मराठवाडा दौरा देखील केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या समितीकडून आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे वृत्त एका दैनिकाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आणखी दोन महिने आरक्ष...

'..तर निवडणूक लढवणार नाही'; मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ भाजप आमदाराची मोठी घोषणा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता.

कर्जवसुलीसाठी मनमानी करणाऱ्या एजंट्सच्या मुजोरीला चाप; सकाळी 8 आधी, संध्याकाळी 7 नंतर कर्जदारांशी संपर्क करु नये, RBIचा नवा नियम

इमेज
रिझर्व्ह बँकेची  थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नवी नियमावली. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही.धमकीही देऊ शकणार नाही. वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे निर्देशही आरबीआयनं बँकांना दिले आहेत. बँकेचे रिकव्हरी एजंट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी कोणत्याही वेळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच वसुली एजंट्सना कर्जधारकांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं गुरुवारी थकित कर्जाच्या वसुलीसाठीची नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव दिला. या अंतर्गत, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजंट कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. RBI च्या 'जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मसुदा सूचना  मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, बँका आणि NBFC सारख्या नियमन केलेल्या संस्थांनी (RE) प्रमुख व्यवस्थापनाची कार्य आउटसोर्स करू नयेत. या कामांमध्ये पॉलिसी तयार करणं आणि KYC नियमांचं पालन...

गुणरत्न सदावर्ते भाजपाचा माणूस? रावसाहेब दानवेंचं मोठं विधान, म्हणाले.

इमेज
मागिल  काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. ठरलेल्या वेळेत सरकारने आरक्षण न दिल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.गील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. ठरलेल्या वेळेत सरकारने आरक्षण न दिल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.गुणरत्न सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत रावसाहेब दानवे म्हणाले, “हे पाहा, गुणरत्न सदावर्ते कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं होतं. त्याला आव्हान देणारा हा माणूस आहे. त्यानेच मराठा आरक्षणाला आव्हान दिलं होतं, त्यानंतर हे आरक्षण रद्द झालं. हे रद्द झालेलं आरक्षण आम्हाला पुन्हा मराठा समाजाला द्यायचं आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण द्यायची आमची भूमिका नाही. प्रत्येकाला दिलेलं आरक्षण जसंच्या तसं ठेवून मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण देण्यासाठी कोर्टात याचिका द...

...अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही; मंगेश साबळेंचा सरकारला इशारा

इमेज
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मोडतोड केल्याप्रकरणी मराठा समाजाने गुरूवारी डोंबिवलीत मंगेश साबळे आणि इतर दोघांचा सत्कार केला. याप्रसंगी साबळे यांनी सांगितले की, आम्ही शांततेत आंदोलन करतोय सरकारने तत्काळ टिकणारे आरक्षण दयावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.मराठ्यांना माजलेले म्हणणं, त्यांना मी आरक्षण मिळवून देणार नाही असं म्हणणं, मराठ्यांच्या सभांना जत्रा म्हणणं हे मराठा समाजाच्या अस्मितेला खिजवणं आहे हे मराठा समाज कदापी सहन करणार नाही याकडे साबळे यांनी लक्ष वेधले. साबळे पुढे म्हणाले आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूणांनो आत्महत्या करू नका. शांततेत समाजासाठी झटत राहा, तसं जमत नसेल तर जे आम्ही करतोय ते करा असे आवाहन साबळेंनी केले. आपल्याला स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालेलं नाही स्वातंत्र्य भगतसिंग, राजगुरू यांच्यामुळे सुद्धा मिळालय. समाजाच्या विरोधात बोलणा-या सदावर्तेला कोणताही इशारा नाही मात्र समाजाचे माथे भडकवण्याचे जो काम करेल. त्याच्यामुळे जर समाजाचे नुकसान होत असेल आरक्षणाचा लढा मोडीत निघत असेल तर त्याची किंमत त...

आधी स्वत:ची गाडी जाळली, मग सदावर्तेंची, सरपंच मंगेश साबळेला शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतलं

इमेज
मराठा आरक्षणाच्या मुद्दा चांगलाच पेटलंय. अशात मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध आणि मराठा आरक्षणाच्या मागणीविरुद्ध वक्तव्य केलं म्हणून वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा या आंदोलकांना यावेळी केली. यावेळी तिघांना अटकही करण्यात आली. यातलाचं एक मराठा आंदोलक मंगेश साबळे सध्या चर्चा आलाय. या आंदोलकाने याआधीही आपल्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

मराठा समाजाची मागणी चुकीची."; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत, सदावर्तेंनाही दिला सल्ला

इमेज
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने गुरुवारी सकाळी काही मराठा आंदोलक तरुणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत.यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आजची मागणी नाही. त्या-त्या वेळी तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकवलं पण मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना हे आरक्षण गमावलं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. आम्हाला प्रत्येकाला मराठा असल्याचा स्वाभिमान आहे आणि समाजाला आ...

बाबा महाराज सातारकरांची आठवण ते निळवंडे प्रकल्प कसा मार्गी लागला? वाचा मोदी काय म्हणाले

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिर्डीच्या प्रवित्र भूमीला कोटी कोटी प्रणाम असं म्हणत त्यांनी निळवंडे धरणाचं पाच दशकांपासून रखडलेलं काम आज पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.तसेच ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  मोदी पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या नावावर मताचं राजकारण करणाऱ्यांनी आपल्याला थेंब थेंब पाण्यासाठी वेठीला धरलं. आज निळवंडे धरण प्रकल्पाचं जलपुजन झालं. याला १९७०मध्ये स्विकृती मिळाली. त्यानंतर पाच दशकं ही योजना लटकून राहिली. KDM news  पण जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा यावर वेगानं काम झालं. आता डाव्या कालव्यातून लोकांना पाणी मिळणं सुरु झालं आहे. लवकरच उजव्या कालव्यातून पाणी मिळेल" योजना केंद्र सरकार पूर्ण करणार राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा जलसंजीवनी योजना देखील शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध झाली आहे. दशकांपासून लटकून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणखी ३६ सिंचन योजना केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. याचा खूप मोठा लाभ आपल्या शेतकऱ्यांना, दुष्क...

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाची आत्महत्या

इमेज
मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाउल उचलत आत्महत्यांच्या घटना समोर येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी गेला असून, सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केली आहे.तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने 'मी मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याचे' सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. कृष्णा कल्याणकर (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी हिंगोलीच्या देवजना गावामध्ये गेला आहे. आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाकडून एक सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना मिळाली असून, यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचे मयत कृष्णा कल्याणकर या युवकाने लिहून ठेवले आहे. याबाबत माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे मागील आठवड्यात देखील एका हिंगोली जिल्ह्यातील जिंतुर ताल...

मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

इमेज
सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केली नाही म्हणून पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहे. पहिलं 17 दिवसांचं आमरण उपोषण झालं, आता कोणत्याही आरोग्य सेवा पाणी घेणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे  यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पळापळ सुरू झाल्याचं चित्र समोर येतंय. दोन्ही नेत्यांनी सुपरफास्ट दिल्ली दौरा केलाय. त्यामुळे आता येत्या काळात आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठा राडा होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरु झालीये. अशातच आता संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना समर्थन दिलं आणि एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांग...

मराठ्यांना आरक्षण देणारच.! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

इमेज
 मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलो, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण  देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिले.राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असे सांगत त्यांनी राज्यातील प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली. मुंबईतील आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांची हिंमत घेऊन मी धाडसाने मुख्यमंत्री झालो आहे. परंतु त्यांना वाटते की, त्यांची मक्‍तेदारी आहे. पण त्यांची मालकी कोणामुळे? असा प्रश्न उपस्थित करत लाखो शिवसैनिकांमुळे तुमची मक्‍तेदारी होती. तुमची मालकी नाही, असा जोरदार टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. जसे मोगलांच्या काळात घोड्यांनाही पाणी पिताना संताजी-धनाजी दिसायचे, तसेच तुम्हाला प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतो का? मी सा...

मोठी बातमी! उपोषण सुरू करण्यापूर्वीच जरांगेंना गिरीश महाजनांचा फोन; म्हणाले..

इमेज
मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. हा वेळ आज संपला आहे. दरम्यान पुन्हा एकदा आजपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेतया सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केला आहे. जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांचं फोनवर बोलणं झालं. नेमकं काय म्हणाले महाजन?  गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला. थोडं दिवस थांबा टिकणारं आरक्षण देऊ अशी विनंती महाजन यांनी जरांगे पाटलांना केली आहे. तुमचे तीन ते चार विषय आठवडाभरात मार्गी लावू असं आश्वासन देखील महाजन यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. तुम्ही काय मार्ग काढाल ते सांगा, मुख्यमंत्र्यांशी बोला आता थांबणार नाही. उपोषण सुरू झाल्यानंतर कोणत्या नेत्याशीही बोलणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. काय आहे नेमकी मागणी? मराठी समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र या मागणीला कुणबी आणि ओबीसी समाजामधून विरोध होत आहे. त्यामुळे स...

मोठी बातमी! वाघ बकरी ग्रुपच्या संचालकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पराग देसाई याचं निधन

इमेज
वाघ बकरी चहा ब्रँडसाठी प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड चे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन झालं आहे.त्यांनी अहमदाबाद  मधील खाजगी रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई याचं निधन पराग देसाई  अहमदाबाद) मधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉक  साठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी  हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.  रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास देसाई  यांच्या कुटुंबियांनी सुत्रांना द...

एकाच WhatsApp मध्ये दोन नंबर कसे वापरायचे, जाणून घ्या सोपी आणि नवी पद्धत

इमेज
कसे वापरायचे हे जाणून घेऊया. आता सेटिंगमध्ये जाऊन एका पेक्षा जास्त नंबरचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स वापरता येतील. मार्क जुकेबर्गनं घोषणा केली आहे.तुमच्याकडे एकापेक्षा जास्त WhatsApp अकाऊंट्स आहेत का? कामासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉगिन करण्यासाठी पर्सनल अकाऊंटमधून लॉगआऊट करून थकालात का? तर मग तुमच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं एक चांगली बातमी आणली आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आता तुम्ही समस्या सोडवणार आहे आणि एकाच डिवाइसवर अनेक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अ‍ॅक्सेस करता येणार आहेत.लवकरच हे फिचर उपलब्ध होणार असल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या पॅरेंट कंपनी मेटानं दिली आहे. सोशल मीडिया जायंटचा सीईओ मार्क झुकेबर्गनं फेसबुकवरून माहिती दिली की व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच युजर्सना अनेक अकाऊंट्समध्ये स्विच करता येणार आहे. सध्या युजर्सना एकतर अतिरिक्त फोन किंवा टॅबलेट सोबत बाळगावा लागतो किंवा सतत एका अकाऊंटमधून लॉग आऊट करून दुसऱ्यात लॉगिन करावं लागतं. ह्या फिचरमुळे युजर सहज अकाऊंट्समध्ये स्विच करू शकतात. ‘ड्युअल व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट’ फिचर मुळे वेगवेगळ्या अकाऊंटवर संवाद साधणं सोपं जाईल.फिचर वापरण्यासा...

चक्रीवादळ येतंय, राज्यात पाऊस कोसळणार का? IMD ने दिले उत्तर

परतीचा मान्सून १९ ऑक्टोबर रोजी देशातून गेला. यंदा मान्सूनने सरासरी गाठलीच नाही. मान्सून परतल्यानंतर आता अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार याची माहिती आयएमडीने दिली आहेमान्सून परतला आहे. यावेळी परतीचा पाऊस राज्यात चांगला झाला नाही. यामुळे पावसाची सरासरी कमी राहिली. चार वर्षानंतर राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मान्सून परतल्यानंतर चक्रीवादळाचे संकट आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार आले आहे. यामुळे लक्षद्वीप बेटाच्या पश्चिमेकडे चक्राकार वारे तयार झाले आहेत. यामुळे २१ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात त चक्रीवादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाचे नामकरण ‘तेज’ असे करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार? ही माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ २६ ऑक्टोबरनंतर पुढे ओमानच्या दिशने जाणार आहे. हे चक्रीवादळ दक्षिण पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर या चक्रीवादळचा कोणताच परिणाम होणार नाही, असे हवामान पुण...

भारी ! लहानपणी सहजच मजेमजेत सुरु केले YouTube चॅनल, आता 'तो' दरमहा कमावतोय 30 लाख

इमेज
यू ट्यूब व त्याद्वारे होणारी कामे याबाबत आता सर्वानाच माहिती झाली आहे. युट्युबर्स आजकाल भरपूर कमाई करत आहेत हेही तुम्ही ऐकलं असेलच. आज आम्ही तुम्हाला एका युट्यूबरबद्दल सांगणार आहोत ज्याने लहानपणी आपले पहिले यूट्यूब चॅनेल बनवले आणि मग… आज हाच मुलगा युट्युबच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत आहे.१आज आम्ही तुम्हाला सुप्रसिद्ध युट्यूबर 'कॅरी मिनाटी' म्हणजेच अजय नागरबद्दल सांगणार आहोत. युट्यूबर 'कॅरी मिनाटी'ने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी यूट्यूबच्या दुनियेत प्रवेश केला आणि आज तो वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी लाखो रुपये कमावत आहे. युट्यूबवर कॅरी मिनाटी यांचे 40.5 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. चॅनेलचे नाव बदलल्यानंतर नशीब बदलले- त्याचे मुख्य यूट्यूब चॅनेल 2014 पासून सक्रिय आहे. 2014 मध्ये नागर यांनी एडिक्टेडए1 नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू केले, जिथे त्याने व्हिडिओ गेम क्लिप आणि व्हिडिओ पोस्ट केले. यापूर्वी अजयने कोणताही विचार न करता आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले तेव्हा त्याचे नाव CarryDeol होते, परंतु नंतर 2016 मध्ये त्याने आपल्या चॅनेलचे नाव बदलून CarryMinati असे केले. ...

2023 चा जीआर का काढला? अनिल देशमुख यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

इमेज
फडणवीसांनी 6 सप्टेंबर 2023 चा जीआर का काढला? तोच जीआर रद्द करण्याची आमची मागणी होती. आता दबाव वाढल्याने फडणवीसयांनी कंत्राटी पोलीस भरतीचा जीआर मागे घेतला आहे, असे म्हणत माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिलेअनिल देशमुख म्हणाले, फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, तीन वर्षांपासून पोलीस भरती न झाल्याने पोलिसांचा मोठा बॅकलॉग आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील 3 हजार पोलीस मुंबईत वापरले जातील. त्यामुळे ते कंत्राटीरितीने घेतले जातील. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशमुख म्हणाले की, सिक्‍युरिटी गार्ड जे आहेत त्यांना पोलीस भरतीत का घेतले आहे. त्याऐवजी युवकांना काम द्या. त्यांना पोलीस भरतीत घ्या. त्यामुळे सिक्‍युरिटी गार्ड कंत्राट पद्धतीने भरण्याचा जो निर्णय घेतला आहे तो फडणवीस रद्द करणार का? राज्यातील युवकांना न्याय देणार का? याच उत्तरं आधी त्यांनी द्यावी. तहसीलदार कंत्राटी नेमणार का?  6 सप्टेंबरच्या जीआरनुसार, जळगावात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची कंत्राटी भरती करण्याची जाहीरात आली. म्हणजे आता तहसीलदा...

शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी मोठी बातमी, नार्वेकरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

इमेज
 शिवसेना आणि ठाकरे गटातील अपात्र आमदार प्रकरणाची नवी अपडेट्स समोर आली आहे. आमदार पात्र-अपात्र प्रकरणावर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली.यावेळी सर्व याचिका या एकत्र केल्या जाणार आहे, या प्रकरणावर पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. आज विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी सर्व याचिका एकत्र करा, या ठाकरे गटाच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे. वेगवेगळ्या कारणांनुसार याचिका एकत्र केल्या जाणार आहे, असा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकूण सहा कारणांसाठी याचिका एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस गैरहजर राहणे, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मतदान करणे, बहुमत प्रस्तावावेळी मतदान करणे अशी अधिकची कागदपत्रे 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच, नार्वेकर यांनी काही सूचना दिल्या असून शिंदे गटाला परवानगी दिली आहे. जर मी सुनावणी घ...

३२ हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक फायनल; २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम; जाणून घ्या भरतीचे '३' टप्पे

इमेज
खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे.दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.सोलापूर : राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला आता प्रारंभ झाला आहे. जानेवारीअखेर ३२ हजार पदांची भरती होणार आहे. आता संस्था व जिल्हा परिषद शाळांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तीन आठवड्यांची (७ नोव्हेंबरपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्रत्येक प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषदांच्या जवळपास ६३ हजार शाळांमध्ये ३० हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येही १५ हजारांवर शिक्षक कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतानाही तब्बल साडेसहा-सात वर्षे जिल्हा परिषद शाळांचा गाडा तसाच ओढला जात होता. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी शिक्ष...

छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक,

मुंबई, दि. 20- छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक, अधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्कीट तयार करावे. यातून आपल्या तरुणांना शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरणा मिळेलच आणि आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आज ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात राजभवन येथून रवाना करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, जम्म...

जरांगे पाटलांच्या सभेत तरुणाचा गोंधळ, स्टेजवर जाऊन हिसकावला माईक अन्....

इमेज
मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले मनोज जरांगे यांची राजगुरुनगरमध्ये सभा सुरु असताना तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक तरुण स्टेजवर येऊन त्याने माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला.त्याला काही मराठा बांधव उचलून बाजूला नेत होते. मात्र जरांगे पाटील यांनी त्याला थांबवलं. तेव्हा तो जरांगे पाटलांच्या पाया पडला. यावेळी पोलिसांनीही हस्तक्षेप करत त्याला बाजूला नेलं. दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ गोंधळ झाला होता. जुन्नरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. मराठ्यांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे असं जरांगे पाटील यांनी सभेत म्हटलं. दरम्यान, सभेत तरुणाने गोंधळ का घातला याची माहिती मिळू शकली नाही. काय म्हणाले जरांगे पाटील? सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सभा सुरू आहेत. त्यांची आज जुन्नरमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकद...

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

इमेज
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणाराज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला.त्यामुळे हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. कंत्राटी भरती कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.  कंत्राटी भरतीचा पहिला ...

सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी परीक्षा

इमेज
व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील वर्षी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षांची तयारी करता यावी यासाठी यावर्षीचे प्रवेश संपल्यानंतर येणाऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु केली आहे.पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या तब्बल २० अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) चे संभाव्य ळापत्रक जाहीर केले आहे. तब्बल पाच लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे दरम्यान होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सर्व सामाईक परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीईटी परीक्षांना मार्च २०२४ पासून सुरूवात होणार आहेत. २० पैकी २ परीक्षा या ऑफलाइन असणार आहेत. इतर सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे रोजी होणार आहे. यंदा २२ दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती, असे ६ लाख ३६ हजार ०८९ व...

घरात येशू ख्रिस्ताचा फोटो लावला म्हणून नाकारलं 'SC' प्रमाणपत्र, अमरावती जिल्ह्यात घडला प्रकार

इमेज
मुंबई उच्च न्यायालयात १७ वर्षीय मुलीकडून एक याचिका दाखल करण्यात आली. घरात येशूचा फोटो म्हणून ख्रिश्चन धर्म स्विकारला , असा अर्थ काढत या कुटुंबाला ओबीसीमध्ये सामील करण्यात आलं होतं.त्यामुळे मुलीने कोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने या मुलीची याचिका स्विकारली आहे.  अमरावती जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून तिची जात 'मागासवर्गीय प्रवर्गात' असल्याचे अमान्य केलं होतं. त्यानंतर सप्टेंबर, २०२२मध्ये या निर्णयाला आव्हान देण्यात आलं. यावर चर्चा करताना खंडपीठाक़डून सांगण्यात आलं की पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांचा अहवाल सुरुवातीलाच रद्द करण्याची गरज आहे. कारण, हे स्पष्ट आहे की याचिकाकर्त्यांकडून बौद्ध धर्माच्या परंपरेच पालन करण्यात येत.  याचिकाकर्त्या मुलीने दावा केला की, घरात लावलेला येशूचा फोटो त्यांना भेट म्हणून देण्यात आला होता, म्हणून त्यांनी हा फोटो भिंतीवर लावला. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितलं की पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचिकाकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे...

ललित पाटीलसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा, संबंधित मंत्र्यांची चुप्पी; देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार

इमेज
##ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी विरोधी पक्षाकडून दोन मंत्र्यांवर आरोप होत असताना त्यावर गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.प्रकरणी संबंधित मंत्र्यांनी बैठकीत चुप्पी साधल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. याच प्रकरणावरून आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस आज कोणता मोठा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ललित पाटील आणि त्यावरून राज्याच्या मंत्र्यावर होणाऱ्या आरोपांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी दादा भुसे आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नावं घेतली होती. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमक्या याच विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावेळी संबधित मंत्र्यांनी बैठकित चुप्पी साधल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र यावर शुक्रवारी सविस्तर उत्तर देईन म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ मारून नेल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान याबाबत आज दुपारी देवेंद्र फडणवीस पत्रकार परि...

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी*

इमेज
*कौशल्य विकास प्रशिक्षणात मुंबई, दि. १९:-  कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच राज्यभर...