पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठी बातमी : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, सदस्यांसाठी नवे नियम जारी

इमेज
संसदेचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठी अनेक नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे.यानुसार आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच, कोणताही राज्यसभा खासदार 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे. राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात अली आहे. राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केली आहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी आहे नवी निय...

अजित पवारांची नाराजी! पुणे झेडपी मुख्याधिकाऱ्यांची सर्जिकल स्ट्राईक; शिक्षण विभागातील दोघे निलंबित

इमेज
पुणे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात सुरू असलेल्या शिक्षण विभागाती गैरप्रकाराबाब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेत भरपूर्वी बैठक घेत सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.तसेच शिक्षण विभागात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती. या नंतर मुख्यकार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी शिक्षण विभागाची चौकशी लावली होती. यात चौकशीत दोन मासे गळाला लागल्याने खळबळ उडाली आहे. चौकशीत शाळांना स्‍वमान्‍यता देण्याचा अहवाल सादर करण्यास दिरंगाइ केल्‍याप्रकरणी व आरटीइचे शुल्‍क शाळांना वितरित करण्यात अनियमितता केल्‍याप्रकरणी दोन शिक्षक विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश रमेश चव्हाण यांनी दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे आणि शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार बाबणे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. राज्‍याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीपूर्वी जिल्‍हा परिषदेत आढावा बैठक घेतली होती. यावेळी पवार यांनी शिक्षण विभागातील कामकाजाबाबत ताशेरे ओढल...

आधी म्हणाले प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, नंतर सारवासारव; नारायण राणे यांची नेमकी भूमिका काय?

इमेज
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेची मागणी केली. पुण्यात बोलताना त्यांनी आधी आंबेडकरांच्या अटकेची मागणी केली.पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला असता नारायण राणे यांना सारवासारव केली. त्यामुळे नारायण राणे यांची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या विधानावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी म्हणाले अटक करा! प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणी असो दंगलीविषयी बोलत असतील तर पोलिसांनी त्याची दखल घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे. ती पोलिसांनी घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी. दंगल रोखण्यासाठी अटक देखील करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले. नंतर सारवासारव प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेबाबतच्या विधानावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला नारायण राणे ...

"माझ्यासाठी देशात फक्त ४ जाती; त्यांच्या विकासासाठी..."; पंतप्रधानांचं मोठं विधान

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित केले. यावेळी, बोलताना मोदींनी जातीय समीकरणावर भाष्य केलं. मात्र, आपण देशात केवळ चार जाती मानत असल्याचं मोदींनी म्हटलं.मोदींनी कुठल्याही जातीचा उल्लेख न करता, केवळ गरीब, युवा, महिला आणि शेतकरी याच चार जाती देशात असल्याचं मोदींनी म्हटलं. या चारही जातींच्या बळकटीसाठी, विकासासाठी आपण काम करत आहोत. आस्था आणि मूळ जाती-धर्माच्या पलिकडे विचार करुन या ४ जातींच्या प्रगतीनेच देशाचा विकास होईल, असेही मोदींनी म्हटले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला असून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जातनिहाय जनगणना करणार असल्याचं आश्वासन काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी दिलं. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्यात आली आहे. तसेच, तेथील नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणनाही केली आहे. त्यामुळे, देशात निवडणुकांच्या तोंडावर जातीय समीकरण जोडली जात आहेत. जातीय व आरक्षणाच्या लाभाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातींबद्दल मोठं विधान केलं आहे.माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे गरीब, यु...

6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, कारण.; प्रकाश आंबेडकर यांचं सगळ्यात मोठं वक्तव्य

इमेज
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना मोठं विधान केलं आहे. 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.देशात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आलं आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकतं. सध्या सुरु असलेल्या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. छगन भुजबळ यांना जेलबाहेर काढणारा मीच आहे. मी जर न्यायाधीशांना शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ जेलबाहेर आले नसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशाच्या पंतप्रधानपदावर भाष्य मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जातंय. देशात सत्ता बदललेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळी भूमीका घेतात. आणि परराष्ट्रमंत्री वेगळा निर्णय युद्धाबाबत घेत आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील भिडे वाड्याला भेट दिली. महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. ...

अवकाळीमुळे पिके मातीमोल, शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अवकाळीची पाणी

इमेज
राज्यात दोन, तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या गारपीटचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला नाही.यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. परंतु अवकाळीने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. रब्बी पिके झोपली आहे. सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुणे जिल्हा | पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने 19 हजार शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 11 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्ष यांचं मोठ नुकसान झाले. सर्वाधिक 4817 हेक्टर नुकसान शिरूर तालुक्यात झाले. खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरुर तालुक्यात गारपीट आणि आवकाळी पावसाच्या संकटानंतर आता शेतकऱ्यांसमोर धुक्यांचे संकट आले आहे. धुक्यामुळे रोगराई निर्माण होणार आहे. त्याचा मोठा फटका पिकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. विदर्भात फटका | वर्धा जिल्ह्यात अवकाळी प...

मराठा आरक्षणासाठीच्या हालचालींना वेग, संभाजीराजे छत्रपती दिल्लीत दाखल

इमेज
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक होणार आहे.तर दुसरीकडे दिल्लीत देखील हालचाली वाढल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची देखील भेट घेतली होती. आता ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आरक्षणासाठी संभाजीराजे देखील प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. त्यानंतर ते आता केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत. ते आज दुपारी तीन वाजता केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आय...

सरकार पडायचं असेल तर... विधानसभा अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

इमेज
सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये,असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी  खासदार संजय राऊतांना  लगावला आहे.आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification) योग्य वेळेत निर्णय घेणार असून विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे देखील राहुल नार्वेकर म्हणाले.सरकार पडायचं असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं.या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असे राहुल नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्या...

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले थोर भारतीय समाजसुधारक

इमेज
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ( थोर भारतीय समाजसुधारक )        #११ एप्रिल १८२७ ला भारतभुमीत उदयाला आलेल्या क्रांतीसुर्याचा म्हणजे सामाजिक शोषणव्यवस्था असलेल्या गुलामीच्या शृंखला तोडणाऱ्या एका महायोध्याचा जन्म झाला.भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरानेच नव्हे तर या देशाच्या खऱ्या मालकांला गुलामीच्या शृंखलेने करकचूनक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले थोर भारतीय समाजसुधारक बांधलेल्या शोषित पिढीतांच्या ह्रदयात कोरुन ठेवलेलं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.*    *भारतीय समाज हा राजकीय गुलामी पेक्षा एका भयंकर सामाजिक गुलामगीरीत मरनयातना भोगत होता मुठभर प्रस्थापितांच्या छळाने आणि शोषणाने पुरता नांगवला होता.त्याच्या मेंदुची चेतनाच नष्ट करुन मानसिक गुलाम केला गेला होता. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी या क्रांतीसुर्याने घडवून आणलेल्या क्रांतीचा हा उजाळा.*    *भारतीय समाजाला गुलाम करण्यासाठी मनुस्मृती नावाचं एक भारतीय समाजव्यवस्थेच संचलन करणारं नियमावलीचं एकप्रकारे कायद्याचं पुस्तक निर्माण केल गेलं. त्यानुसार समाजाची विभागणी चार वर्ण तयार करुन...

राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पुढील दोन दिवस.

इमेज
पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अंरिंज व यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस व गारा पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वा-यांशी संयोग झाला आहेत्यामुळे कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून येत असल्यामुळे अनुकूल वातावरण तयार होऊन पाऊस पडला आहे. नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली. २७ व २८ नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात यलो अलर्ट असून येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पालघरमध्ये दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात गारा पडणार आहेत. विदर्भात ऑरेंज अलर्ट असून अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये अवकाळीचे ८ बळी गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडून ८ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले, गड...

श्रीमंत ते अति श्रीमंत होतात कसे; ते पैसा गुंतवतात तरी कुठे?

जगात अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, सर्वाधिक अतिश्रीमंत लोकसंख्या भारतात तयार होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. तीन कोटी डॉलर्सहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींना अतिश्रीमंत व्यक्ती म्हटले जाते. अतिश्रीमंत लोक नेमके त्यांचे पैसे कशामध्ये गुंतवतात हे जाणून घेऊ.... ५०० पेक्षा अधिक संपत्ती व्यवस्थापक, कौटुंबिक कार्यालये आणि खासगी बँकर्सच्या एकत्रित २.५ ट्रिलियन डॉलर मालमत्तेचे अल्ट्रा हाय नेट वर्थ (यूएचएनडब्ल्यू) ने सर्वेक्षण केले असून, यात जगातील सर्वांत श्रीमंत लोक त्यांचे पैसे कसे गुंतवतात हे जाणून घेतले आहे.  शेअर बाजारात किती गुंतवणूक?  -पहिले आणि सेकंडरी घर घेण्यामध्ये अतिश्रीमंत ३२ टक्के गुंतवणूक करतात. ३.७% अतिश्रीमंतांकडे स्वत:चे घर आहे. शेअर बाजारांमध्ये अतिश्रीमंतांच्या संपत्तीचा जवळपास २० टक्के समावेश आहे.  - ही गुंतवणूक अमेरिकेतील समभागांमध्ये सर्वाधिक आहे. अमेरिकेतील बाजारांत ३३%, युरोप २८%, तर आशियातील शेअर बाजारांमध्ये २६% गुंतवणूक अतिश्रीमंतांची आहे. ५,७९,००० लोक जगभरात असे होते ज्यांची संपत्ती २०२२ मध्ये ३ कोटी डॉलर्सहून अधिक होती....

पावसाची "कृपा" पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!

इमेज
अवकाळी पावसाची "कृपा" पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!, असे चित्र आज नवी मुंबईत पाहायला मिळाले. सगळ्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळतो आहे, पण नेत्यांनी आपले कार्यक्रम रद्द केलेले नाहीतराष्ट्रवादी महिला काँग्रेसने नवी मुंबईत बचत गटांचा मेळावा घेतला. या मेळाव्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी अनेक स्टॉल्स देखील मांडले होते, पण अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरले. sharad pawar rally rain today मात्र या कार्यक्रमात शरद पवारांचे छोटेखानी भाषण झाले. पवार आणि पावसाचे किती अतूट नाते आहे याचे वर्णन सूत्रसंचालकाने केले, पण पवार साताऱ्यात भिजलेला "तो पाऊस वेगळा आणि आजचा अवकाळी पाऊस वेगळा याचे भानही सूत्रसंचालकाला उरले नाही. शेवटी पवारांनी माईक हातात घेऊन आपले छोटेखानी भाषणे केले. महिलांनी कष्ट करून इथे अनेक स्टॉल्स उभारले आहेत. पण अवकाळी पावसामुळे त्यांच्या मनात निराशा येईल, पण आपण निराशेचे वातावरण झटकून टाकून पुन्हा उभे राहिले पाहिजे, असे आवाहन पवारांनी केले. सातारच्या सभेत पवारांच्या डोक्यावर कोणी छत...

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

इमेज
नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराशहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर पार्क करण्यात आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना पाण्याचा वेढा पडला होता. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली होती. तर निफाड परिसरात प्रचंड गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटाका बसला आहे. दरम्यान पुढील तीन तास मुंबई, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाना आणि या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.नाशिकच्या निफाड तालुक्यात गारपीट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. आज सकाळ पासूनच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला होता. विजांचा कडकडाट आणि गारपीट झाली. यातच नाशिकच्या निफाड तालुक्याला देखील या आस्मानी संक...

चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट मोडवर; राज्यांना तयारीचा आढावा घेण्याचे निर्देष

इमेज
गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता पसरली आहे. लहान मुलांमध्ये गूढ न्यूमोनियासारखा आजार पसरत आहे. यादरम्यान भारत सरकार देखील चीनमध्ये पसरत असलेल्या या आजाराच्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.चीनमध्ये कोरोनानंतर सुरू झालेल्या नव्या गूढ आजाराने जगातील अनेक देश भयभीत झाले आहेत. याबद्दल डब्ल्यूएचओने इशाराही दिला आहे. या आजाराचा परिणाम मुलांवर जास्त झाला आहे. परिस्थिती अशी आहे की, सरकारने अनेक शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमिवर भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनासदृश मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त नियमांचे पालन करत राहा, असेही म्हटले आहे. देशात सध्या अलर्टसारखी परिस्थिती नसल्याचेही सरकारने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाने या संबंधीत एक निवेदन जारी करण्यात आले आहे, त्यानुसार श्वसनासंबंधीत या आजार इन्फ्लूएंजा, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या कारणांमुळे होत आहेय आरोग्य मंत्रालय या आजाराच्या स्थितीवर बारकाईने लक्ष देऊन आहे. सध्या काळजी करण...

ओबीसी सभेपूर्वी जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल; वाचा नेमकं काय म्हणाले?

इमेज
हिंगोलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला काही तासांत सुरवात होणार असून, त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे? संताजी, धनाजी सारखा मिच दिसतोय. संताजी, धनाजी जसे त्यांना पाण्यात दिसत होते. तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय अशी टीका जरांगे यांनी केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीस आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज हिंगोलीत ओबीसी मेळावा होत आहे. ज्यात मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती महत्वाची असणार असून, त्यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. "भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे?, संताजी-धनाजी सारखा मिच दिसतोय. जसे संताजी, धनाजी पाण्यात दिसत होते, तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय, असे जरांगे म्हणाले. आजची सभा बघणार नाही... दरम्यान हिंगोलीत होत असलेल्या सभेवर प्रतिक्रिया देतांना जरांगे म्हणाले की, "लोकशाहीत सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे ...

काम करा, पगार मिळवा ! राज्यातील 38 हजार शाळांमधील लाखो शिक्षकांचे पगार रोखणार

इमेज
राज्यातील 38 हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी शिक्षणाधिका-यांना हे आदेश बजावलेत.शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी यू-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यात येते. मात्र, शाळांकडून ही माहिती देताना टाळाटाळ केली जातेय. 2023-24 सत्राची माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्यासाठी 31 ऑक्टोबर मुदत देण्यात आली होती. महिना उलटला तरी 38 हजारांवर शाळांनी पोर्टलकडे दुर्लक्षच केलं. भौतिक सुविधांची माहिती अपडेट न केलेल्या शाळांमधील शिक्षकांचं नोव्हेंबरचं वेतन अदा करण्यात येऊ नये, यू- डायसची माहिती भरल्याचे मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेतल्यानंतरच वेतन अदा करावे, असे आदेश शिक्षण परिषदेनं दिलेत. 30 नोव्हेंबरपर्यंत यू-डायसचे काम न केल्यास संबंधित शाळांचे वेतन थांबवण्याच्या स्पष्ट सूचना वेतन पथकांना देण्यात आल्यात.शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी 'यू- डायस'वरील माहितीच विचारात घेतली जाते. परंतु, ही माहिती देताना शाळांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अशा तब्बल ३८ हजार ७३५ शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्...

मागासवर्ग आयोगाकडून होणारे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा; प्रकाश शेंडगेंची मागणी

इमेज
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी आणि न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे महत्वाचे आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारने मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे.त्यामुळे, शुक्रवारी पुण्यात झालेल्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत मराठा समाजासह इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, आता यालाच ओबीसी नेत्यांकडून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण ताबडतोब थांबवा अशी मागणीच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shedge) यांनी केली आहे. तसेच, मराठा समाजाचे मागासलेपण कितीवेळा तपासणार, आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा असेही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.  दरम्यान, यावर बोलतांना प्रकाश शेंडगे म्हणाले की, "हे सगळं भयानक आहे. मागासलेपण तपासा हे कुणी सांगितले, अशी कुणीही मागणी केलेली नाही. तसेच अशाप्रकारे कोणतेही सर्वेक्षण करण्यात यावे हे ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही. अशाप्रकारचे सर्वेक्षण ताबडतोब थांबविण्या...

जरांगेंसह सर्वांनीच...; अजित पवारांनी छगन भुजबळांसह सर्वांनाच दिली तंबी

इमेज
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कराड इथल्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांनी मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणावर बोलताना म्हटलं की, सत्ताधारी असोत की विरोधक, कोणीही भडकाऊ भाषण करू नये.वाचाळवीरांनी एखाद्या शब्दाने समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यात सगळेच आले, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही असं म्हणत अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनाही इशारा दिला आहे. आयोगाने पैसे मागितल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हलं की, मी पण अयोगाची बातमी वाचली. त्यांनी पैसे मागितले आहेत ती. मी मुबंईला गेल्यावर माहिती घेईन. शेवटी आयोगाला अधिकार दिले आहेत. ते काम करत असतात. मागणी पैशाचे असेल तर चर्चा करू. राज्याच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. महायुतीच्या जागा वाटपाबाबत विचारले असता अजित पवार यांनी सांगितलं की, निवडून येण्याची क्षमता यावर निर्णय घेतलाा जाईल. अजून जागा वाटप अशी चर्चा झाली नाही. आता चार राज्...

DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

इमेज
पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे, पगार मिळवणाऱ्या काही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली आहे. महत्वाचे म्हणजे, सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ऑक्टोबर महिन्यातच वाढ करण्यात आली होती. किती वाढला DA -  सहाव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (CPSEs) कर्मचार्‍यांसाठी, मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता 221% वरून 230% करण्यात आला आहे. अर्थात 9 टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यातील सुधारित दर 1 जुलै 2023 पासून लागू होईल. याच प्रमाणे, पाचव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. यात दोन कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासह डीएच्या 50% विलीनीकरणा मंजुरी देण्यात आलेली नाही. त्या कर्मचाऱ्यांचा डीए सध्याच्या 462% वरून 477% पर्यंत वाढविला जाऊ शकतो. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह डीएच्या 50% विल...

३८ हजार शाळांचे पगार रोखा, एमपीएसपीचे आदेश

इमेज
शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी 'यू-डायस'वरील माहितीच विचारात घेतली जाते. परंतु, ही माहिती देताना शाळांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अशा तब्बल ३८ हजार ७३५ शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेसमग्र शिक्षा अभियानाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने (एमपीएसपी) हे कठोर पाऊल उचलले आहे. याबाबत परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी गुरुवारी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना हे आदेश बजावले आहेत. राज्यात अशैक्षणिक कामांचा अतिरेक होत असल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून शिक्षक संघटना संतप्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता थेट यू-डायसच्या कामांवरून पगार रोखण्याचे आदेश झाल्याने संतापात भर पडली आहे. सन २०२३-२४ सत्राची माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे काम सप्टेंबर महिन्यातच सुरू करण्यात आले होते. त्यासाठी ३१ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीनंतर आता महिना होत आला तरी ३८ हजारांवर शाळांनी पोर्टलकडे दुर्लक्षच केले आहे. नोव्हेंबर संपत आला तरी राज्यातील २५ हजार ७८८ शाळांमधील शिक्षकांची माहिती यू-ड...

सावधान! पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, 'या' भागात पडणार वादळी पाऊस

इमेज
राज्यातील वातावरणात चांगलाच बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD)दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून पावसाचा जोर दिसणार आहे.  डिसेंबरमध्ये चक्रीवादळाची शक्यता आजपासून पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त...

पोलिस पाटील यांच्यासाठी आनंदाची बातमी; मानधनात आता होणार भरघोस वाढ

इमेज
महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजाररुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी व्यक्त केले.राज्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी सांगितले. स्थानिक विश्रामगृह शेगाव येथे आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. स्थानिक विश्रामगृह येथे बुलडाणा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी समितीची आढावा बैठक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्...

धोनीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएलआधीच थाला दिसणार ऍक्शनमध्ये? जाणून घ्या कुठे खेळणार

इमेज
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनी मैदानात उपस्थित नव्हता. धोनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला का आला नाही, असे प्रश्न चाहते विचारत आहेत.सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट  स्पर्धा सुरू आहे. 18 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा सुरू झाली असून 9 डिसेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. तसे वनडे विश्वचषक संपल्यानंतर गुरुवारी (23 नोव्हेंबर) रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका देखील सुरू झाली. क्रिकेटच्या या रणधुमाळीत एमएस धोनी आणि एलएलसीचे सीईओ रमण रहेजा (Raman Raheja) एकत्र दिसले. सोशल मीडियावर धोनी आणि रहेजा यांचे एकत्र फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून धोनी येत्या दिवसांमध्ये एलएलसीमध्ये खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.काही महिन्यांपूर्वीच रमण रहेजा यांनी माध्यमांसमोर धोनीबाबत खास प्रतिक्रिया दिली होती. रहेजा यांनी सांगितल्याप्रमाणे एमएस धोनी याने एलएलसीमध्ये खेळावे अशी त्यांची इच्छा आहे. तसेच येत्या काही वर्षांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या स्पर्धेत सहभाग ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी..महागाई भत्त्यात केली इतकी वाढ

इमेज
राज्य सरकारने राज्य सरकारने ४ टक्के महागाई भत्त्यात वाढ केली आहे. याअगोदर असलेला महागाई भत्ता आता ४२ टक्के होता. आता तो ४६ टक्के करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी होत होती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. याअगोदर ३० जून २०२३ रोजी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती. आता ती पुन्हा वाढवण्यात आली आहे. असा आहे शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. २. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. ३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध...

अंधारेबाईना अचानक का आला भुजबळांचा कळवळा?

इमेज
तारतम्य बाळगण्याचा सल्ला सुषमा अंधारे यांनी द्यावा हाच मोठा विनोद आहे.शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचेकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले होते, त्याला फार दिवस लोटले नाहीत.शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचेकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले होते, त्याला फार दिवस लोटले नाहीत.अचानक या पक्षाला जरांगेंचा फोकस हलला असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. पक्षाचा चेहरा बनलेल्या सुषमा अंधारे यांनी तशी जाहीर टीका केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांची अंधारे बाईंनी जोरदार पाठराखण केली आहे. हे अचानक असे काय घडले? ठाकरेही ही तारेवरची कसरत का करतायत, असा प्रश्न लोकांना पडलाय. रोखठोक भूमिका घेणे हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव नाही. आज एक बोलायचे उद्या दुसरे, आज याच्या बाजूने बोलायचे उद्या त्याच्या ही त्यांची तऱ्हा आहे. परंतु जरांगेंच्या मुद्द्यावर ते इतक्या लवकर पलटी मारतील असे वाटले नव्हते. कारण राज्यात सध्या जरांगेंची हवा आहे. मराठा आंदोलनाच्या सुरूवातीच्या काळात मनोज जरांगे हे आंदोलन योग्य पद्धतीने पुढे नेतायत, या शब्दात त्यांनी कौतुक केले होते. जाल...

तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये अवकाळी पावसाचा कहर; शाळांना सुट्टी देण्याची वेळ; केरळमध्येही कोसळधारा

इमेज
तामिळनाडूमध्ये बऱ्याच भागात तुफान पावसाने हाहाकार माजवला आहे. व अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस बरसत आहेत. या पावसामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे व्रत आहे.तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी, तेनकासी, विरुथुनगर, पुधुकोट्टई, नीलगिरी या भागातील जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे  यंदाच्या ऐन हिवाळ्यात तुफान पाऊस बरसत असल्यामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे आढळून आले आहे.

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, मनोज जरांगे यांचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापणार

इमेज
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून  सुरु असलेले छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता राजकीय व्यासपीठावर जाऊन पोहचले आहेकारण, छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हे वक्तव्य केले आहे.  दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ यांना भाजपकडून काही ऑफर आली असेल. गृहमंत्री काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवत देखील नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का?, याबाबत आम्हाला शंका येत आहे. भुजबळ यांच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नसल्याने आम्ही शंका का घ्यावी नाही. भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना?, कारण त्यांना पलटी मारण्याची सवय आहे. आतापर्यंत त्यांनी दहा ते पंधरा पलट्या मारल्या आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना?," ...

व्हीपचा ट्विस्ट, आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाला मिळाला महत्त्वाचा पुरावा?

इमेज
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधिमंडळामध्ये पार पडली. या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची उलटतपासणी घेतली.या उलटतपासणीवेळी महेश जेठमलानी यांनी व्हीपच्या मुद्द्यावरून सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दिवसभराची सुनावणी पार पडल्यानंतर महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या व्हीपवर आरोप केले. हा व्हीप बनावट असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. 'ठाकरे गटाने 21 जून 2022 ला जारी केलेला व्हीप बनावटी आहे. माझा युक्तीवाद चांगला झाला, सुनिल प्रभू यांनी उत्तरं दिली, आमची केस आणखी मजबूत झाली आहे. 21 जूनला जारी केलेला व्हीप कधीच इश्यू केला गेला नाही. व्हीप बोगस आहे, बनावटी आहे. प्रथमदर्शनी हा व्हीप चुकीचा आहे, असं आमचं म्हणणं आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे,' असं जेठमलानी म्हणाले. शिंदे गटाच्या या युक्तीवादावर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी पलटवार केला आहे. 'व्हीप हा पक्ष प्रमुखाला विचारून जारी केला जातो. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्द...

फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

इमेज
आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) असून, यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांच्या हस्ते संपन्न झाली आहे.तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता वारी करतायत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच, अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र...

महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर...' अजित पवार गटाचे आमदार भुजबळांच्या पाठीशी पण वरिष्ठांकडून देण्यात आल्या खास सूचना

इमेज
आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण पेटलं आहे. मराठा आंदोलक आणि राज्यातील काही नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांचे सत्र सुरू आहे. अशातच काल(मंगळवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरीवरील कालच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना अजित पवार यांनी आमदारांना दिल्याची माहिती आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, हीच आपलीही भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये होणाऱ्या शिबीरासाठी सर्व नेत्यांना हजर राहण्याच्या वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे.दरम्यान, या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. भुजबळांना थ्रोट इंफेक्शन झाल्यामुळे ते संपूर्ण बैठकीत तोंडावर मास्क लावून बसले होते. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.द...

...तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलांनी तुमचा सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर

इमेज
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आक्रमक आंदोलन उभं केलं आहे. या मागणीला विरोधक केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे. आरक्षण प्रश्नावरून वातावरण तापू लागल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत जपून बोलण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. याबाबत प्रश्न विचारताच आता मनोज जरांगेंनी अजित पवारांना खास आवाहन केलं आहे. "आमदार आणि मंत्र्यांना भूमिका मांडताना काळजी घेण्याची तंबी दिली आहे, तर आता आरक्षणाचीही तंबी देऊन टाका. लगेच आरक्षण दिलं तर मी नाशिकमधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो. मराठ्यांची लाखो पोरंही आणतो. आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला?" असं मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे. दरम्यान, मनोज जर...

...अन् 'ती' घटना सरकारच्या फायद्याची ठरली; जरांगेंविरोधात भुजबळांना काढले बाहेर

इमेज
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनानंतर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांमध्ये त्यांच्या जंगी सभा होत आहे.या सभांमधून त्यांनी सरकारसह ओबीसी नेत्यांवरही हल्लाबोल सुरू ठेवला आहे.त्यातच मंत्री छगन भुजबळांवर तर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष पेटला असतानाच आता जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातही वादाची ठिणगी पडली आहे.पण मराठा आंदोलना दरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोळ सरकारच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात अंतरवाली सराटीत (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषणाला सुरुवात केली. उपोषणावर लाठीहल्ल्यानंतर आंदोलन राज्यभर गाजले. त्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी रोज एक मंत्री त्यांची भेट घेत होता. इतर लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे नेते देखील त्यांची भेट घेत होते.मराठा आरक्षणासाठीचं उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी साखळी आंदोलन सुरू केलं आहे.उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची ...

मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल!

इमेज
धाराशिव;मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान नामदेवराव कोकाटे आणि प्रवीण आप्पासाहेब देशमुख यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधि काऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश असूनही सभेचे आयोजन करण्यात आल्याने या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरचा मुदत दिली  असून त्याआधी ते वातावरण निर्मिती करत आहेत. धाराशिवमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमावबंदी असताना ही सभा आयोजित केल्याचा आरोप करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंयदिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन केले, अशा मजकुराची फिर्याद वाशी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर कलम 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळली आहे.

हुशार असूनही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ! मनोज जरांगे यांचे विधान

इमेज
मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते.नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असे धक्कादायक विधान मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी केले.पुण्यातील खराडी येथे आयोजित सभेत जरांगे बोलत होते. ते म्हणाले, की मला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत २९ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आरक्षणात मराठा समाज बसत होता, तर गेली ७० वर्षे कोणी नुकसान केले याचे उत्तर मिळाले पाहिजे. ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आरक्षणाच्या निकषात बसत असतानाही लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. मराठा ओबीसीत असलेले पुरावे समितीला मिळत आहेत. राज्यातील मराठय़ांना सरसकट आरक्षण मिळणा...

तुमचे काही मुद्दा पटले आणि खटकले सुद्धा., सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर छगन भुजबळ

इमेज
आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ओबीसी नेता छगन भुजबळ यांची शनिवारी इगतपुरी येथे सभा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सभेत भुजबळ यांनी केलेल्या भाषणाचे विश्लेषण केले आहे.छगन भुजबळ यांना उद्देशून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया एक अनावृत्त पत्र लिहिले आहे. शनिवारी सभेमधील तुमचे (छगन भुजबळ) भाषण मी किमान दोन-तीन वेळा ऐकले. प्रत्येक मुद्दा फार काळजीपूर्वक ऐकला. काही मुद्दे मला पटलेसुद्धा. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाची चौकट जाणणारा आणि मानणारा असा कोणीही कोणालाही गावबंदी करू शकत नाही. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी अशा सगळ्या प्रकारच्या बंद्या भारतीय संविधानातील कलम 17ने हटवलेल्या आहेत, असे भुजबळ यांनी म्हटल्याचा उल्लेख अंधारे यांच्या पत्रात आहे. तसेच, बीडमधील जाळपोळ हिंसाचार हा पूर्वनियोजितच होता. हे बीडमधील रहिवासी आणि ही घटना बघणारे प्रत्यक्षदर्शीही सांगतात. घरांना नंबर देण्यात आले होते, दंगलखोर पेट्रोलबॉम्ब, वॉकीटॉकी घेऊन मास्क लावून आले होते. हेही वर्णन खरे आहे आणि...