पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बार्शी अध्यापक कॉलनीत दूषित व गाळ मिश्रित पाणीपुरवठा |

इमेज
बार्शी शहरात अध्यापक कॉलनी पोकळे हॉस्पिटल जवळील भागात गेले एक महिन्यापासून रोडवरती पाईपलाईन फुटलेली आहे पाईपलाईन मधील पाणी आल्यानंतर महिना भरापासून रस्त्यावर येते आणि तेच रस्त्यावरचे पाणी नंतर त्याच पाईपलाईन मध्ये जाते यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे पाइप लाईन फुटून अनेकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी,तसेच पाईप लाईन फुटून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.लिकेज पाइप लाइनमुळे शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील एक महिन्यापासून पाणी वाया जात असून अद्यापही पालिका प्रशासनाकडून बंद न केल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलीसांनीच टाकला दरोडा; पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

इमेज
पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात दरोडा टाकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा प्रताप असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी विकल्या. याप्रकरणी दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काल या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली या आरोपीने दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने या आरोपीला बाजारात विकण्यास सांगितले. स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्या...

राहुरीत वकील दाम्पत्याची हत्या, पाच जणांना बेड्या, वकील संघटनेचा बेमुदत बंदचा इशारा

इमेज
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील पती पत्नीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील कामकाज बंद ठेवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्य 25 जानेवारीला दोघेही राहुरी कोर्टात गेले. मात्र घरी परतलेच नाही. राजाराम जयवंत आढाव (52) व मनिषा राजाराम आढाव (42) हे दोघे घरी न आल्याने 26 जानेवारीला राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेतली.  सीसीटीव्ही फुटेजमार्फत पटली संशयितांची ओळख पोलीस तपासात राह...

सगेसोयरेरुन अजित पवार गटाने हात झटकले; भुजबळ म्हणतात, 'कोणाला पटो अगर न पटो.

इमेज
सगेसोयरेरुन अजित पवार गटाने हात झटकले; भुजबळ म्हणतात, 'कोणाला पटो अगर न पटो.गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मागण्यांचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सूपर्द केला आहे. या अध्यादेशानुसार आता कुणबी नोंद आढलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरतीत जागा राखीव ठेवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सर्व सवलती मराठा समाजाला लागू होतील अशी मोठी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र आता या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरुन त्यांच्याच पक्षाने हात वर केले आहेत. सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीत अजिबात टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आता सत्ताधारी अजित पवार गटाने छगन भुजबळ यांची कोंडी केल्याचे...

जरांगे पाटलांनी पुन्हा बोलावली मराठा बांधवांची बैठक, समोर आलं कारण

इमेज
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकताच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेढा भरवून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. मागण्या मान्य झाल्यानं मराठा बांधवांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी मोठा संघर्ष उभा केला. या संघर्षाला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळं राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. याच जल्लोषाची जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत. विजयी सभेबाबत चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज गोदापट्ट्यातील 123 गावांतील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे.आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून, जरांग...

मराठा आंदोलकांच्या सोयीसाठी नवी मुंबई सज्ज; प्रत्येक जण देत आहे योगदान!

इमेज
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या या आंदोलनात लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आंदोलकांच्या व्यवस्थेसाठी नवी मुंबईतील स्थानिक मराठा बांधव सरसावला आहे.यासाठी विविध माध्यमांतून मदतीचा ओघ सुरू झाला असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण काहींना काही योगदान देत आहे.नेरूळ येथील पंच परमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईमध्ये आलेल्या मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सीवूड्स सेक्टर ४८ ए येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे सामुदायिकरित्या नागरिकांनी समूह संकलन करून भोजनाची व्यवस्था माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच मोर्चात सहभागी नागरिकांना रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता, पाण्याच्या बाटल्या आदींची व्यवस्था करण्यात आली. याचबरोबर खारघर सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटी, तसेच खारघर सेक्टर ११ येथील बँक ऑफ बडोदासमोरील मैदान येथे एकत्रित भोजन संकलन करण्यात आले आहे. सीबीडीमध्ये मराठा मोर्चाच्या वतीने, तर तुर्भे येथील बाळकृष्ण खोपडे पाटील यांच्या माध्यमातून भोजना...

आरोग्य विम्याच्या नियमात बदल, आता सर्व रुग्णालयांत मिळणार कॅशलेस उपचार, जाणून घ्या कसे?

इमेज
केंद्रातील मोदी सरकारने आरोग्य विम्याच्या नियमात बदल केले आहेत. आरोग्य विमाधारकांनी रुग्णालयात उपचार घेतले असल्यास त्यांना आता कॅशलेसची सुविधा मिळणार आहे. बऱ्याचदा विमा कंपन्यांनी आधीच अनेक रुग्णालयांशी टाय-अप केलेले असते, त्यामुळे नेटवर्कमधील रुग्णालयातच तुम्हाला पूर्वी कॅशलेस उपचाराचा लाभ मिळत होता.परंतु विमा कंपन्यांच्या नेटवर्कच्या बाहेरील म्हणजेच टायअप नसलेल्या रुग्णालयांमधून तुम्हाला आता उपचार करवून घ्यायचा असेल तर ते मिळणार आहेत. तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी जीआयसीने नवीन मोहीम सुरू केली आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) ने आरोग्य विमा पॉलिसी धारकांसाठी Cashless Everywhere हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत आता विमाधारकाला प्रत्येक रुग्णालयांत कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे नेटवर्कमध्ये नसलेल्या रुग्णालयांमध्ये ही कॅशलेस सुविधा त्वरित प्रभावी होणार आहे, असे जनरल इन्शुरन्स कौन्सिलने म्हटले आहे. १५ खाटा असलेली आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायद्यांतर्गत संबंधित राज्य आरोग्य प्राधिकरणांकडे नोंदणीकृत रुग्णालये आ...

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

इमेज
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील  यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात  परवानगी नाकारण्यात आली आहे.खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलं आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. आझाद मैदानात नारळ फुटला एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या 26 जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. "आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती.आम्ही स्टेज बांधण्याचं काम सुरु केलं आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करु" असं वीरेंद्र पवार यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांना नोटीस दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आ...

"मराठ्यांचा वाघ आला", सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा

इमेज
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पहाटे पावणे सहाच्या सुमारास भक्ती शक्ती चौक निगडी येथे पोहोचली. प्रचंड मराठा समाजाचा उत्साह दिसून आला.मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली. पिंपरी चिंचवड मधील सांगवी फाट्यावर बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरांमध्ये जरंगे पाटलांची पदयात्रा पोचली होती. सांगवी फाटा पिंपळे निलक चौक, जगताप डेरी काळेवाडी फाटा डांगे चौक, थेरगाव बिर्ला हॉस्पिटल चौक, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, काळभोर नगर आकुर्डी, खंडोबा माळ चौक, टिळक चौक, शहराच्या सीमेवर भक्ती शक्ती चौक मार्गे शहराचे पोहोचली.  रात्रभर मराठा समाजाने जागून काढली मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी काढलेल्या मुंबई पदयात्रेस पिंपरी चिंचवड शहरात अलोट गर्दीने प्रतिसाद दिला. रात्रभर पदयात्रा मार्गावर गर्दी झाली होती. भक्ती शक्ती चौकामध्ये पदयात्रा गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचली. कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला..., जय भवानी जय शिवाजी... एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आणि ...

मुंबईत ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश; काय आहे कारण? जाणून घ्या

इमेज
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.आणि मिरवणुका काढण्यास ६ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा कार्यकर्त्यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची घोषणा केली असून मुंबईच्या दिशेन येतायेत आहेत. जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गजबजलेल्या मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शांतता भंग होऊ शकते मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन मोर्चे काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश बुधवारपासून लागू झाला असून पुढील 15 दिवस लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थित येणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रशासनानेही आंदोलनाला कोणतीही आडकाठी नसल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाचे सुमारे ...

मारण्याचा प्रयोग केल्यास महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही; जरांगेंचा सरकारला इशारा

इमेज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत थेट इशारा देखील दिला आहे. 'आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, आणि हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा, असा थेट इशारा जरांगे यांनी सरकराला दिला आहे.मराठा आरक्षण यात्रा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असून, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की," मराठा समाज एकत्रित आहे, तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही. शब्द दिल्यामुळे त्यांना यायला लाज वाटत असेल, त्यामुळे सरकारने शहाणपण घेतलं तर बरं राहील. समाजाला वेड्यात काढन सोडावं. आरक्षण मिळालं तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने आहे हे सरकारलापण कळत नाही. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि ज...

मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात, महसूल यंत्रणा सज्ज

इमेज
राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून कऱण्यात येत असलेल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावे असे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच या कालावधीत नागरिकांनी देखील अचूक माहिती देवून सर्वेक्षणास सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिशन सर्वेक्षण मोहिम राबिण्यात येत आहे. 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्ध सैनिक वसाहती (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) यामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. गावनिहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची जबाबदारी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील एकूण 1 लाख 25 हजार पेक्षा अधिक प्रगणक, ...

मराठा समाजाला दिलासा मिळणार? आरक्षणावरील क्युरेटीव्ह याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होणार

इमेज
मराठा आरक्षणावर दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दुपारी 1.30 वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाबाबत हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जातं होतं. त्यामुळे आता या सुनावणीमध्ये मराठा सामजाला दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सरकारच्या आशा पल्लवित होतील. सरकारला तात्पुरता दिलासा देखील मिळाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता 24 जानेवारी रोजी होणाऱ्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठा आरक्षणाबद्दलची क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं होतं.  सर्वोच्च न्याय...

"आता आरक्षणातच माझा राम आणि मुंबई हीच अयोध्या", मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर किरण माने यांची पोस्ट

इमेज
मराठी आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा देशभरात चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत.दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या खरमरीत पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किरण माने याआधी साताऱ्यातील साखळी उपोषणात सहभागी झाले होते. किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post) किरण माने यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या." अशी मागणी करत लाख्खोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडला आहे. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरू आहे. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलं आहे".आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या : किरण माने किरण माने यांनी लिहिलं आहे,"वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत. मी फोन केला,"तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या. लोकां...

500 वर्षांची प्रतिक्षा संपली, आता काही तासांत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा

इमेज
आज 22 जानेवारी आहे. आज रामलल्लांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. लाखो भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.सोहळा सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. श्रीरामांसाठी अयोध्येमध्ये भव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे, या मंदिरात आज रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा विधीला आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्त आणि मृगशिरा नक्षत्राच्या शुभ योगावर करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकूण पाच व्यक्ती मंदिराच्या गर्भगृहात असणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं वेळापत्रक सकाळी 10.25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्या विमानतळावर आगमन होईल. 10 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान अयोध्या हेलिपॅडवर पोहोचतील. 10 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधानांचं श्रीराम जन्मभूमीवर आगमन होईल. 11 ते 12 ही वेळ आरक्षित ठेवण्यात आली आहे. दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठ...

''23 जानेवारीपासून मराठ्यांचं युद्धपातळीवर सर्व्हेक्षण होणार'', मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन दिले 'हे' निर्देश

इमेज
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी निर्देश दिले.गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले.  वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव श्री कलोते, यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव ( साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्य...

मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; मनोज जरांगे पाटलाच्या डोळ्यात पाणी !

इमेज
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार मराठ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने कुच करणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेट संपला आहे. ठरलेल्या निर्णयानुसार ते आणि मराठा समाज आज (20 जानेवारी) मुंबईकडे कूच करणार आहेत. दरम्यान आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. आमचे पोरं जर मोठे करायचे असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही. आरक्षण मुंबईतच आहेत. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं हवं, असे मनोज जरांगे म्हणाले.  जरांगे म्हणाले, मराठा समाजातील पोरांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहा, हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायबाप मराठ्यांना विनंती आहे. ९ वाजता सर्व पोरं मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. २६ तारखेला मुंबईला राज्यातील सर्व...

सोलापूर जिल्हय़ातील प्राथमिक शाळांतील 108 शिक्षक अतिरिक्त

इमेज
पालक आणि विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांकडे काढलेला कल, पटसंख्या काढीची शाळांमधील स्पर्धा या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसह अनुदानित खासगी प्राथमिक शाळा आणि अल्पसंख्याक शाळांमधील पटसंख्या कमी झाली.त्यामुळे सद्यःस्थितीला सोलापूर जिह्यातील 108 शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक शाळांकरील 46, तर बिगर अल्पसंख्याक शाळांमधील 62 शिक्षकांचा समावेश आहे. सोलापूर जिह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे 26 जानेकारीपूर्की समायोजन केले जाणार आहे. 2022-23च्या संचमान्यतेनुसार मंजूर कार्यरत पदांची प्रकर्गनिहाय माहिती शिक्षणाधिकाऱयांकडे प्राप्त झाली आहे. त्याआधारे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. त्यासाठी 18 जानेवारीपर्यंत शिक्षकांच्या हरकती नोंदकिल्या जाणार आहेत. त्यानंतर हरकतींकर सुनाकणी होईल क काही नाकात बदल असल्यास तो करून घेतला जाणार आहे. त्यानंतर खासगी शाळांमधील रिक्त पदांकर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. अतिरिक्तमध्ये सेकानिकृत्तीच्या उंबरठय़ाकरील शिक्षकांची संख्या सर्काधिक आहे. तत्पूर्की, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण किभागाने अतिरिक्त झालेल...

22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा, रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

इमेज
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या दिवशी महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणात आली होती.आता याबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली.  राज्य सरकारने एक पत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे रामभक्तांना आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण रामभक्तांसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवस खूप खास दिवस असणार आहे. दुपारी 12.20 वाजता प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर झाले आहेत. या दिवसासाठी देशभरातील मंदिरांमध्ये सुद्धा विशेष तयारी करण्यात येत आहे. याआधी केंद्र सरकारनेही 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना अर्ध्या दिवसानंतर सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी (18 जानेवारी 2024) केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जनतेच्या ...

माझे रामलला विराजमान झाले! पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला फोटो, बाबरवर साधला निशाणा

इमेज
२२ तारखेला अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी आता उलटी गिनती सुरू झाली असून येत्या सोमवारी हा कार्यक्रम पार पडेल. देशासह परदेशात देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटर म्हणून दानिशची ओळख आहे. दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझे रामलला विराजमान झाले आहेत", असे त्याने प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो शेअर करत म्हटले.याशिवाय कनेरियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युजरला फटकारले. खरं तर फहीम नावाच्या व्यक्तीने पोस्टमध्ये म्हटले की, चोर कधीच मालक बनू शकत नाही. यासोबत त्याने बाबरी मशीद पाडल्याचा फोटो शेअर केला होता. यावर कनेरियाने प्रत्युत्तर देताना म्हटले, "यामुळेच आता त्याच्या हक्काच्या ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे

इमेज
22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील हिंदूंमध्ये मोठा उत्साह आहे. या दिमाखदार कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश

इमेज
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहे. तर, आतापर्यंत शिंदे समितीला राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या असून, जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत.याबाबत मुख्य सचिव यांच्याकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचे देखील आदेश देण्यात अलर आहेत.  मराठा आरक्षणाचा मुद्दा 20 जानेवारीपर्यंत मार्गी लावा अन्यथा मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव सुरु झाली आहे. अशात आता राज्यात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र तात्काळ वाटप करण्याचा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. मुख्य सचिव यांच्याकडून या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकार आता ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. 

राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेच्या विरोधात हायकोर्टात याचिका, उद्घाटन सोहळ्यावर बंदीची मागणी

इमेज
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रकरण कोर्टात गेले आहे. अलाहाबाद हायकोर्टात प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी आणावी अशी मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.उपलब्ध माहितीनुसार याचिकेत शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. यासोबत हा उद्घाटन सोहळा सनातन विरोधी असल्याचेही सांगण्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ही याचिका गाझियाबादचे रहिवासी भोला दास यांनी दाखल केली आहे. 22 जानेवारीला अयोध्येत एक धार्मिक कार्यक्रम होणार आहे निर्माणाधीन मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला असून पौष महिन्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात नाही असेही यात पुढे नमूद करण्यात आले आहे. अपूर्ण मंदिराचा दिला दाखला मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे असल्याचे भोला दास यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे म...

दहावी, बारावीच्या पोरांना दुसरीतले वाचता येईना ; तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागता येईना!!

इमेज
भारतातील ग्रामीण भागातील 14 ते 18 वयोगटातील 25% विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरी दर्जाचे वाचता येत नाही. हा वाचन न येण्याचा प्रकार त्यांच्याच प्रादेशिक भाषेतील आहे. तसेच याच वयोगटातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागता येत नाही.शालेय शिक्षणाच्या संदर्भातील ही आकडेवारी आहे यंदाच्या असर अहवालातील. प्रथम या संस्थेकडून भारतातील शिक्षणाच्या स्थितीसंदर्भात असलेला अहवाल आज प्रकाशित केला गेला. ASER (Annual Status of Education Report 2023) या नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातील आकडेवारी पाहता शिक्षणविषयक सुधारणांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. 2023 या वर्षीचा असर अहवाल भारतातील 26 राज्यांच्या 28 जिल्ह्यांतील सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सगळे जिल्हे ग्रामीण भागातील असून एकूण 34,745 विद्यार्थी यांच्यावर आधारित हा अहवाल तयार केला आहे. यावर्षीचा असर अहवाल तयार करताना चार घटकांचा विचार करण्यात आला आहे. ते पाच घटक म्हणजे, 1) मूलभूत वाचन क्षमता (प्रादेशिक भाषेतील) 2) गणित व इंग्रजी विषयाचे ज्ञान 3) मूलभूत कौशल्ये व त्यांचा रोजच्या जगण्यातील ...

शंकराचार्य अयोध्येला जाण्यासाठी तयार, मात्र समोर ठेवली मोठी अट; म्हणाले, 'पंतप्रधान मोदी..'

इमेज
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती अयोध्येतील राम मंदिरात जाण्यासाठी तयार झाले आहेत. तथापि, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. ते म्हणाले की प्रभू रामाला आणणाऱ्या गोमातेची आज हत्या केली जाते आहे. प्रकार रोखता आलेले नाही हे दुर्दैव आहे. अशा स्थितीत आम्ही कोणत्या तोंडाने प्रभू रामाला सामोरे जायचे असे त्यांनी म्हटले आहे. एका यू ट्यूब चॅनलशी बोलतना अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले की, विधी- विधानासह शिखर तयार झाल्यावर रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आपण अयोध्येला नक्की जाऊ. सर्व कार्यक्रमांत सहभागी होऊ, मात्र प्रभू रामाच्या समक्ष जाणार नाही. जेंव्हा गोहत्येचे प्रकार थांबतील तेंव्हाच आपण तेथे जाऊ. जर २२ जानेवारी २०२४ रोजीच कार्यक्रम घेण्याचा त्यांचा हट्ट असेल तर तोपर्यंत किमान गोहत्या बंदीची घोषणा तरी केली जावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर असे केले तर आम्ही इश्‍वराला सांगू की जी काही त्रुटी राहीली आहे त्याची या ऐवजापोटी कृपा करावी. गोहत्या बंदीचे फार मोठे काम त्यामुळे होऊन जाईल. मोदींच्या विरोधात नाही… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे शत्रुत्व असण्याचे कारणच ...

नार्वेकरांनी दिलेल्या निकालविरोधात या तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी

इमेज
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेला निकाल ठाकरे गटासाठी धक्कादायक होता. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे शिंदे गटाचीच असून त्यांच्या आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आल्यानंतर कायदेतज्ज्ञांनी सल्लासमलत करुन दोन दिवसांनी ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीची तारीख जाहीर केली आहे. ठाकरे गटासाठी शेवटची आशा आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेला आहे. परिणामी शिवसेनेकडे आता शेवटची आशा उरली आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. यावेळी निकाल आल्यानंतर ठाकरे गटाने घाई न करता सावध पावलं टाकली आहेत. आपल्या वकीलांशी चर्चा करुन दोन दिवसांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायालयात 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे ...

मोठी बातमी! CBSC च्या शाळांना महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार, शालेयमंत्री दीपक केसरकर लवकरच नवं धोरण करणार जाहीर

इमेज
राज्यातील अनेक सैनिक शाळांमध्ये राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो. पण एनडीएच्या परीक्षांमध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आपले विद्यार्थी एनडीएच्या परीक्षांमध्ये पास होत नाहीत.त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे. ज्यामुळे सीबीएससीच्या शाळांना देखील महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.  नागपुरातील भोसला सैन्य शाळेच्या 25 व्या वार्षिक उत्सवात शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. भोसला सैनिक शाळेने मुलींच्या सैनिक शाळेला परवानगी मागितली आहे. ती परवानगी एका महिन्याच्या काळात मिळेल, असं देखील दीपक केसरकरांनी म्हटलं.  जगात आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ देण्याची क्षणता भारताकडे - दीपक केसरकर जगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर देशातील भाषा शिकाव्या. महाराष्ट्रातील मुलांमध्ये काहीही कमी नाही.मात्र, एक कमतरता आहे, ती म्हणजे कामाचा कमीपणा मानण्याची वृत्त...

अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात गेली अन् धक्क्याने जिवंत झाली 'मृत' व्यक्ती! हरियाणातील घटनेने डॉक्टरही चकित

इमेज
देशातील रस्त्यांवर खड्डे असणं ही नवी गोष्ट नाहीये. या खड्ड्यांमुळे सर्वच जण त्रस्त असतात, अनेकदा प्रवाशांसाठी हे खड्डे प्राणघातक देखील ठरतात, अशा घटनांमध्ये आजवर अनेकप्रवासीही दगावले देखील आहेत.पण हरियाणातील एका 80 वर्षांच्या वृद्धासाठी हाच रस्त्यावरील खड्डा जीवनदायी ठरला आहे. असा दावा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे.एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दर्शन सिंग ब्रार यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. तसेच त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात होता. दर्शन सिंग यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव पतियाळा येथून कर्नालजवळील निसिंग येथील त्यांच्या घरी घेऊन जात होते. जिथे त्यांचे अंतिम संस्कार होणार होते. अंत्यसंस्कारासाठी गावात लाकडे देखील गोळा करण्यात आली. मात्र, मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर अचानक रस्त्यावरील खड्ड्यात गेलं आणि जोराचा धक्का बसला.ब्रार कुटुंबीयांनी दावा केला आहे की, रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत असलेल्या दर्शन सिंग यांच्या नातवाने त्यानंतर त्यांना त्यांचा हात हलवताना पाहिलं. तसेच हृदयाचे ठोके देखीव जाणवू लागल्याने त्यांनी रुग्णव...

12वी शिकलेले भाडेकरू, दिवसभर घरी असायची लोकांची ये-जा; पोलिसांनी धाड टाकताच...

इमेज
भाडेकरूंनी भाड्याने खोली घेतली. पण ते काही काम करत नव्हते. पण त्यांच्याकडे कामानिमित्त अनेकजण येत होते. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या खोलीवर धाड टाकली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.जयपूरच्या विद्याधर नगर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना अटक केलं. या चारही जणांकडे हायटेक मॉडीफाइड कम्प्युटर सिस्टिम, लॅपटॉप, राउटर, दोन हेडफोन, २ इयरबड, ३ आयफोन, इतर स्मार्टफोन, ७ डेबिट, क्रेडिट कार्ड, २ कोटींहून जास्त लोकांचा सोशल मीडिया युजरनेम-पासवर्डसह आधार कार्ड डेटाही आढळला आहे. डीसीपी नॉर्थ राशी डोगरा यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या चार जणांनी कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करून पैसे कमावले आहेत. धक्कादायक म्हणजे अटक केलेले चौघेही फक्त १२ वी पास आहेत. त्यांनी बिहार, तेलंगना, जाममताडा इथं सायबर गुन्हेगारांशी संपर्क करून हॅकिंग शिकले. त्यानमंतर सायबर टेक्नॉलॉजी एक्सपर्ट बनले आणि सायबर फसवणूक सुरू केली. युट्यूबवर हॅकिंगचे व्हिडीओ पाहून हॅकिंग शिकले. वेगवेगळ्या एप्सच्या माध्यमातून स्वत:चं ऑनलाइन लोकेशन बाऊन्स करत होते. त्यामुळे त्यांचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं. वेगवेगळ्या व...

दोन हेलिपॅड, 75 हजार खुर्च्या अन्‌ 500 ट्रक; मोदींच्या सोलापूर दौऱ्याची जय्यत तयारी...

इमेज
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा अखेर ठरला. पंतप्रधान मोदी हे येत्या 19 जानेवारी रोजी कुंभारी येथील रे नगरमधील घरकुलांचे लोकार्पण करण्यासाठी सोलापुरात येणार आहेत.मोदी यांची रे नगर येथे सभा होणार असून सभेला तब्बल एक लाख लोकांना आणण्याचे नियोजन आहे.कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नसय्या आडम यांच्या संकल्पनेतून विडी आणि इतर कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून सोलापूरमधील कुंभारीच्या रे नगर येथे घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यातील सुमारे 15 हजार घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त मोदी यांची रे नगर येथे जाहीर सभाही होणार आहे. या सभेला येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सुमारे 75 हजार खुर्च्या लागणार आहेत. तसेच, नागरिकांना सभास्थळी आणण्यासाठी 500 ट्रकची सोय करावी लागणार आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही माजी आमदार आडम यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. त्यात मोदी यांची सभा आण...

'शिवसेनाप्रमुखाला कुठल्याही नेत्याला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही'

इमेज
भूकंप होणार का? मुख्यमंत्री बदल होणार का? नवीन समीकरण आकाराला येणार का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मिळू लागली आहे.निकाल वाचनात राहुल नार्वेकर यांनी नोंदवलेली महत्त्वाची निरीक्षणनिवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी (शिवसेनेतील दोन गट) जे संविधान सोपवलं, त्यावर त्यांच्यात एकमत नाहीय. पक्षातील नेतृत्वाची जी रचना आहे, त्यावेळी दोन्ही गटांचा वेगवेगळा दृष्टीकोन आहे. – विधानमंडळातीलल बहुमत हा महत्त्वाचा पैलू आहे. वाद होण्याआधी नेतृत्वाची जी रचना होती, ती लक्षात घेऊन योग्य संविधान कुठलं? हा निर्णय मला घ्यायचा आहे. – रेकॉर्ड्सनुसार, 1999 सालच्या शिवसेनेच्या संविधानाला मी वैध मानतो. – कुठला गट खरा राजकीय पक्ष आहे, ते ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे संविधान स्वीकारलय तेच योग्य आहे असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलय. – शिंदे गटाने 1999 सालच पक्षाच संविधान दिलं होतं, त्याला विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवलय. 2018 सालच संविधान वैध ठरवण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी फेटाळून लावलीय. – 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट अस्तित्वात आले. 22 जून ...

मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?

इमेज
हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांत तीव्र भावना असून नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.त्यामुळं मनमाडमध्ये इंधनपुरवठा ठप्प झाल्याचेही समोर येतेय.  मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. तर सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधना टँकर भरून बाहेर पडला नाही. त्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुडवडा होण्याची शक्यता झाली आहे.  दरम्यान या संपाची कुठल्याही वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळं या संपाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ट्रक चालकाच्या या आंदोलनाची जबाबदारी कोणतीही वाहतूक संघटना स्वीकारायला तयार नसल्याने हे आंदोलन किती यशस्वी होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेक चालक उद्या टँकर भरण्यासाठी येणार नाही मात्र ज्याला टँकर भरायचा आहे त्याला विरोधही केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली ...

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांवर, फक्त दोन आमदार 'सेफ'!

इमेज
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी संध्याकाळी 4 वाजता विधिमंडळात हा निकाल लागणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेले 40 आणि ठाकरेंसोबत असलेल्या 14 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला या निकालावर अवलंबून असणार आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 19 महिन्यांनंतर राज्यातल्या सत्तासंघर्षावर निकाल देणार आहेत. 20 जून 2022 ला शिवसेनेत फूट पडली, यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आधी सुरत आणि मग गुवाहाटीला रवाना झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यातल्या या सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टातही झाली. यानंतर मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याबाबतचा निर्णय घ्यायचे आदेश दिले. फक्त दोन आमदार सेफ शिवसेनेचे फक्त दोन आमदार वगळता इतर सगळ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. ज्या आमदारांना अपात्र व्हायचा धोका नाही त्यात आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे नातू असल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणार नसल्याचं शिवसेन...

राम मंदिराला सोन्याचा दरवाजा; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही, पहिला फोटो आला समोर

इमेज
आयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या भव्यदिव्य मंदिराची देशभर चर्चा सुरु आहे. या मंदिरासाठी दिवसरात्र कर्मचारी काम करत आहेत.या मंदिराला सुवर्ण जडीत दरवाजा लावण्यात येणार आहे. मंदिराला असे एकूण १४ सुवर्णजडीत दरवाजे लावण्यात येणार आहेतमीडिया रिपोर्टनुसार, हैदराबादच्या अनुराधा टिंबर इंटरनॅशनल कंपनीच्या कारागीरांनी राम मंदिरासाठी सुवर्णजडीत दरवाजे तयार केले आहेत. हैदराबादच्या कंपनीचे मालक शरद बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधत या मंदिराच्या दरवाज्याच्या कामाविषयी माहिती दिली. शरद बाबू यांनी सांगितलं की, 'राम मंदिराचे दरवाजे नागर शैलीत तयार करण्यात आले आहेत. आमच्या कारागीरांना दरवाजा तयार करण्याचा चांगला अनुभव आहे'.सुवर्णजडीत दरवाज्याविषयी बोलताना शरद बाबू यांनी सांगितलं की, राम मंदिरासाठी १४ सुवर्णजडीत दरवाजे सोमवारी रामनगरीत पोहोचले आहेत. या मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर मंदिर परिसरातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या सुवर्णजडीत दरवाजे लावण्याचं काम १५ जानेवारीपा...

राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात; BJP चिन्हावर लढण्याबाबत शिंदे गटाचे सूचक वक्तव्य

इमेज
लोकसभा निवडणुकीचे बिगुल हे येत्या काही महिन्यांमध्ये कधीही वाजू शकते. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करण्याचे कामही राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहे.शिवसेनेतील  फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही उमेदवार भाजपाच्या (BJP) कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे. अशातच राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात, असे सूचक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केले आहे. (In politics changes happen overnight Shinde group indicative statement on fighting on BJP symbol krupal tumane) राज्यातील दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधातही आहे आणि सत्तेतही आहे. त्यामुळे मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट आह...

मनोज जरांगेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला, एका वाक्यात विषय संपवला!

इमेज
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची घोषणा केली आहे. त्यांच्या आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणी तरी पाठीमागे आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत, मराठा आंदोलन मोडत नाही, आम्ही मॅनेज होत नाही, असं म्हणत सणसणीत टोला मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.'मराठा आंदोलनाच्या पाठीमागे कुणीतरी आहे, असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'राज ठाकरेंचं बरोबर आहे, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागे गोरगरीब मराठा समाज आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे दुसर कोणीतरी असतं तर मागेच आंदोलन मोडलं असतं. ज्याचं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसावं लागतं. गोरगरीब मराठ्यांचा हा कार्यक्रम आहे, इथं गोरगरीब मराठ्यांची ताकद आहे म्हणून हे आंदोलन मोडत नाही, मॅनेज होत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण शिवाय यांना काहीच कळत नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केला. 'याचिका टाकून कोणीही मराठा समाजाच्या आंदोलनाला थांब...

ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का! रविंद्र वायकर नंतर आता राजन विचारेंच्या घरी आयकर विभागाचा छापा

इमेज
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत.आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आलं आहे, अशी माहिती साम टिव्हीने विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. क...