पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस घेणार मोची समाजाचे अडीचशे ३५३सारखे गुन्हे माघार

इमेज
लोकसभा उमेदवार राम सातपुते यांनी बैठकीतून लावला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन मोची समाजाची मागणी होणार पूर्ण समाजातील तब्बल २५० युवकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून निष्कारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत या युवकांना न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी करताच लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मोची समाजाच्या समस्या मांडल्या. मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या मोची समाजातील सुमारे २५० युवकांवर ३५३ कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली असता 'पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत' असे उडवा...

मनोज जरांगे पाटील अखेर निवडणुकीच्या रणांगणात !

इमेज
जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्याला पाडायचे त्याला पाडा, असं विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष गॅसवर गेले आहेत.एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत धाकधूक वाढलेली असतानाच जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान करून सर्वांनाच धक्का दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट राजकारणात येण्याचंच सूतोवाच केलं आहे. विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर करतानाच उद्यापासूनच विधानसभेच्या कामाला लागा, असे आदेशच मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यामुळे अनेकांची राजकीय खेळी उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी घोषण केली आहे. मराठा समाज आता हुशार झाला आहे आणि लोक म्हणाले म्हणून आता काम करायचे नाही. आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकत नाही आणि आणि आमच्याकडे 40 उमेदवार उभे करण्याचा डेटा नाही. काहीही करायला लागलो तर जात संपेल, समाजाची हानी होईल, असं सांगतानाच राहिलेले आरक्षण द्यायला मी खंबीर...

नणंद विरुद्ध भावजय सामना निश्चित ! बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर..

इमेज
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे  यांना उमेदवारी देण्यात आली.शरद पवार यांच्या गटाची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाने देखील सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करत उमेदवारी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी काम सुरु केल्याचे पाहायला मिळत होते.त्यामुळे बारामतीमध्ये खरच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज राष्ट्रवादीच्या दोन्हही गटांनी बारामतीमधील आपले उमेदवार जाहीर केले.  सुप्रिया सुळे यांच्या उमेद्वारीनंतर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील निश्चित झाल्याने बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केल्या 5 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी  पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे...

विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता? मुंबईत निघणार घामाच्या धारा

इमेज
 आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईत उष्णतेसह घामाच्या धारा निघणार आहेत. मुंबईसह राज्यात या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पारा 35 अंशाच्या वर गेला असून राज्यात अनेक ठिकाणी 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे राज्यात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री उकाडा जाणवत आहे. मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने या आठवड्यात मुंबईत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणाशिवाय राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 40 अंशांवर गेले आहे. ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. या आठवड्यात दिवसा उष्णतेची काहिली, तर रात्री उकाडा जाणवणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे अखेर उमेदवार ठरले, ही यादी आली समोर आज होणार घोषणा

इमेज
महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, शरद पवार यांनी अद्यापही आपली यादी जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला 19, काँग्रेस 16 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा असे जागावाटप झाले आहेत.तर चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे. यातील ठाकरे गटाने 17 जागांची यादी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसनेही 10 जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकताही आता संपणार आहे. शरद पवार गटाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांच्या गटाला जागावाटपामध्ये बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा आणि माढा हे मतदारसंघ मिळाले आहे. यातील बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, अन्य उमेदवार कोण असणार याची यादी शनिवारी जाहीर केली जाणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी...

ग्रामसेवकास 5000 ची लाच घेताना अँटी करप्शन च्या जाळ्यात...

इमेज
लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होतानाच दिसते, वडिलोपार्जित घराच्या वारस नोंदीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजार (५०००)रुपयांची लाच घेताना वरसगाव ( ता.वेल्हे, राजगड)चे ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे ( वय ४४, रा. वरसगाव ) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.हा प्रकार परवा बुधवारी ( ता. २७) बुधवार रोजी पुण्यातील राजाराम पुला जवळील कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमा जवळ घडला आहे. या ठिकाणी  तक्रारदार शेतकरी यांचे वरसगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्ती  करुन घराच्या ८ उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी रीतसर ग्रामपंचायतीत अर्ज दाखल केला होता. त्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल घाडगे यानी तक्रारदार यांच्याकडे ५ हजारांची लाच मागितली होती. पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घाडगे याला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण या तपास करीत आहेत.

लोकसभेचा उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा प्रणिती शिंदे

इमेज
#लोकसभेला उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा, #आमदार प्रणिती शिंदे यांची #सातपुतेंवर सडकून टीका...      #सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभा राहिलेले आहे. सुशीलकुमार शिंदे #साहेब नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर #प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा, माझ्या #वडिलांवर काय आरोप करताय, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे #उमेदवार राम सातपुते यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.                    #आगामी लोकसभा #निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार #प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा #मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजपावर सडकून टीका केली. #यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार,...

६० टक्के मुलांना डिजिटल व्यसनाचा धोका ?

इमेज
     डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी त्याचा वाईट परिणाम होण्याचे धोकेही निर्माण होण्याची शक्यता आहे. एका नवीन सर्वेक्षणामध्ये ५ ते १६ वर्षे वयोगटातील सुमारे ६० टक्के मुलांमध्ये संभाव्य डिजिटल व्यसनाचे संकेत देणारी वर्तणूक दिसण्यात आली. डिजिटल व्यसनाचा हा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी धोरण लवकर राबवण्याची गरज या सर्वेक्षणामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. एका कंपनीने एक हजार पालकांच्या आधारावर असे सर्वेक्षण केले आहे. मोबाईल वापरावर जास्त वेळ घालवण्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, शारीरिक हालचाली कमी करणे, सामाजिक अंतर कमी होणे आणि शैक्षणिक कामगिरीतीळ घसरण यासह विविध धोके कसे उद्भवतात, हे अधोरेखित करणे हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. या सर्वेक्षणात जवळपास ६० टक्के मुले संभाव्य डिजिटल व्यसनाचे सूचक वर्तन दर्शवतात आणि जवळ जवळ ८५ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन सामग्रीचा वापर व्यवस्थापित करण्यात अडचण येत असल्याचे मान्य केले. या सर्वेक्षणात मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर व्यतीत करत असून, जवळपास ७० ते ८०...

एक एप्रिल पासून शासकीय कर्मचाऱ्यांना करावा लागणार रजेसाठी ऑनलाईन अर्ज !

इमेज
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे.सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश आज (गुरुवारी) काढले आहेत. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबीसंदर्भात 'ई-एचआरएमएस' (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या नवीन प्रणालीत करण्यात येत आहे. या प्रणालीवर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ३ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. या नवीन प्रणालीमध्ये सुटी (leave) या पर्यायात रजेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्...

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी ,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने उत्साहात कार्यकारणीची वार्षिक सभा संपन्न

इमेज
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची #जयंती तिथीप्रमाणे साजरी!  डिजिटल मीडिया संपादक #lपत्रकार संघटनेच्या बार्शी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न! KDM NEWS बार्शी, प्रतिनिधी दि.28/03/24  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. तसेच बार्शी येथील खमक्या इंडिया च्या प्रधान कार्यालयामध्ये बार्शी तालुका कार्यकारणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य संघटक #मुरलीधर चव्हाण हे होते तर राज्य कार्यकारणी सदस्य संतोष सूर्यवंशी, कोर कमिटीचे मार्गदर्शक तथा खमक्या इंडियाचे कार्यकारी संपादक अमित इंगोले, संघटनेचे कार्यालयीन सचिव शशांक शिंगाडे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्...

माढा मतदारसंघासाठी शरद पवार यांची शांत व संयमी भूमिका...

इमेज
सोलापूर ; गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत शरद पवार यांच्या हातून घड्याळ चिन्ह गेले. मतदारसंघात ज्यांना मोठे केले, ते पण सोडून गेले. एकही आमदार वा माजी आमदार आज सोबत नाही, अशी कागदोपत्री स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे. मतदारसंघात 'माढा आणि शरद पवारांना पाडा' घोषणेचा उगम झाला, २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नावाबद्दल प्रचंड रोष होत; आज त्याच मतदारसंघात शरद पवारांची तुतारी सामान्यांच्या मुखात दिसत आहे. माढ्याच्या बाबतीत शरद पवार आजही शांत आणि संयमी भूमिका घेताना दिसत आहेत. येथे गुलाल उधळण्याची संधी आहे पण उमेदवार योग्य पाहिजे, हा जनमानसाचा अंदाज पवारांपर्यंत नक्कीच गेलेला असावा, त्यामुळे माढ्याचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात निश्चित होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील स्वत:ची उमेदवारी असो की, २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व २०१९ मध्ये संजय शिंदे यांची उमेदवारी, उमेदवारी देताना शरद पवार कुठपर्यंत अंत पाहतात, किती जणांचा कशा, कशा पद्धतीने अंत पाहतात ? याचा चांगलाच अनुभव मोहिते-पाटील व शिंदे बंधू या दोघ...

राज्यातील वडार समाज लोकसभा निवडणूकिवर बहिष्कार टाकणार , शंकर चौगुले

इमेज
 सोलापूर ;प्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती. राज्यात समाजाची लोकसंख्या ८० लाखापेक्षाही जास्त आहे.राज्यात अनेक जिल्ह्यात वडार समाजाचे निर्णायक मते आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने' मी वडार महाराष्ट्राचा 'या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेव्दारे दिला आहे. दरम्यान, सोलापूर येथे २०१८ मध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. फडणवीस यांनी वडार समाजाला एस.टी प्रवर्गात समावेश करु, समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करु, समाजातील तरुणांना रोजगार देऊ, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा व वसतिगृह सुरु करु, मजूर सोसायट्यांना दहा टक्के कामे आरक्षित ठेऊ, तरुणांनी उद्योग व्यवसाय कराव...

सोशल मीडिया जपुन वापरा, नाहीतर होईल लाखांचा दंड ,तीन वर्षापर्यंत शिक्षा सायबर पोलिसांचे व्हिडिओ मेसेजवर लक्ष !

इमेज
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आपण एकमेकांना प्रसारित करणारे मेसेज, व्हिडिओ, फोटो कोणालाही समजणार नाही हा गैरसमज मनातून काढून टाकावा. सोशल मीडियावरील प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टवर (मेसेज किंवा फोटो, व्हिडिओ) पोलिसांच्या सोशल मीडिया नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवले जात आहे.पोलिसांचे खबरे देखील अलर्ट झाले आहेत. काही दिवसांत पोलिसांनी २० जणांविरुद्ध कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्‌सॲप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. एकाचवेळी असंख्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी सोशल मिडियाचा वापर होतो. दुसरीकडे व्हॉट्‌सॲपवरूनही अनेकजण आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, मेसेज प्रसारित करतात. पण, ज्यातून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते, दोन गटात, जातीत, धर्मात वाद निर्माण होऊ शकतो, अशा बाबींवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. मोबाइल स्टेट्‌सद्वारे सांकेतिक भाषेतून मेसेज पोचविले जातात, त्यावरही विविध वेबसाईटद्वारे लक्ष आहे. त्यासाठी खबरी देखील कामाला लावले आहेत. दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी खास सोशल मिडिया नियं...

सोलापूर शहरात तापमान 40प ार मोसमातील सर्वाधिक तापमान

इमेज
शहराचे तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. सोमवार २५ मार्च रोजी वाढत जाणाऱ्या तापमानाने चाळीशी पार केली. सोमवारी सोलापूरचे कमाल तापमान हे ४०.६ अंश सेल्सिअसवर इतके होते.यापूर्वी १६ मार्च २०२४ रोजी ४०.२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोलापूरकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील पाच दिवसातील कमाल तापमान २१ मार्च - ३७.४ २२ मार्च - ३८.६ २३ मार्च - ३९.७ २४ मार्च - ३९.७ २५ मार्च - ४०.६

पाच वर्षात लाच प्रकरणात निम्म्याने घट; महसूल, पोलीस विभाग अव्वलच...

इमेज
सरकारी कार्यालयांबाहेर लाच घेणार नाही, घेऊ देणार नाही असे फलक लावलेले असतानाही लाच घेणे बंद झालेले नाही हे विशेष. सरकारी नोकरदारांना लाखांची पगार असते, तरीदेखील अनैतिक मार्गाने पैसा कमविण्याची काही अधिकाऱ्यांची हाव सुटत नसल्याचे चित्र दिसतेपण, बऱ्याच शासकीय कार्यालयांचे कामकाज ऑनलाइन झाल्याने २०१४ ते २०१९ च्या तुलनेत २०२० ते मार्च २०२४ या काळातील लाच प्रकरणांमध्ये निम्म्याने घट झाली आहे. सेवा हमी कायद्यानुसार कोणत्याही कामाची मुदत निश्चित झालेली आहे. तरीदेखील, काहीतरी त्रुटी काढून समोरील लाभार्थीला हेलपाटे मारायला लावले जातात. तर पोलिस खात्यातील काहीजण गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागतात अशीही उदाहरणे समोर आली आहेत. बहुतेक शासकीय विभागांचे कामकाज ऑनलाइन होऊनही लाभार्थींना संबंधित कार्यालयात जावे लागते. समोरील व्यक्तीला कामाची गरज असते, पण काम वेळेत होत नाही. अशावेळी पैसे दिल्यावर लवकर काम होते असल्याचे सांगितले जाते. मध्यस्थांमार्फत पैसे दिल्यावर तेच काम लगेचच होते, अशीही स्थिती आहे. 'झाकली मुठ सव्वा लाखांची' म्हणून काम झाल्यावर अनेकजण तक्रार करत नाहीत. ...

सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई, निवडणूक आयोगाने आचारसंहितेतून मुभा द्यावी...

इमेज
सोलापूर;जिल्ह्यात  दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात.मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. हीच अडचण ओळखून आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी, अशी विनंती करणारे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना पायपीट करावी लागत आहे. शेतीसाठी दूरचीच गोष्ट, पण जनावरांसाठी पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. यासाठी प्रतिवर्षी पाणी टंचाईच्या काळात अनेक सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, ...

प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे पाटलासोबत नवीन आघाडी... उमेदवारांची यादी जाहीर

इमेज
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा करण्यात आले. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब झाला . वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मत...

मेळघाटात वातावरण तापलं; राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी केली होळी

इमेज
मेळघाटातील आदिवासी महिला खासदार नवनीत राणा विरोधात आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली आहे.बामादेही, कोरडा, चुरणी,ढाणा या गावात आदिवासी महिलांनी साड्यांची होळी केली  आहे. निकृष्ठ दर्जाच्या साड्या दिल्याचा आरोप आदिवासी महिलांनी खासदार राणांवर केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. नवनीत राणा यांनी मेळघाटात महिलांना वाटलेल्या साड्यांची होळी  केली आहे. खासदार नवनीत राणांनी निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला.मेळघाटातील आदिवासी महिला खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. बामादेही, कोरडा, चुरणी, ढाणा या गावात महिलांनी साड्यांची होळी केलीय. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. राणांनी वाटलेल्या साड्या मच्छदानीसारख्या आहेत. त्या साड्या घालण्यायोग्य नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केलाय. आमची नवनीत राणा यांनी थट्टा केली असा आरोपही या महिलांनी केलाआहे. त्यांनी नवनीत र...

डिजिटल_मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचरसंहिता महत्त्वाची:राजा_माने

इमेज
सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे कसे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन खिशातच अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे हे अत्यंत प्रभावी असून यातून देवाण-घेवाणही तेवढ्याच तत्परपणे काही क्षणामध्ये मिळत असल्याने आगामी काळात या डिजिटल मीडिया या नव्या माध्यमाचे भविष्य उज्वल असल्याचे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार व संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित होते. आजच्या काळामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती काही सेकंदामध्ये आपल्या हातातील मोबाईल मध्ये मिळत असली तरी सुद्धा त्याची सत्यता ही निर्मित संस्थेवरती अवलंबून असते सध्या जगामध्ये अनेक नवनवीन तंत...

अभिजीत बिचकुले साताऱ्यातून निवडणूक लढविणार लोकसभेची

इमेज
साताऱ्यातून अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून उदयनराजे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लोकसभेची रणधुमाळी उडणार या चर्चा तर आहेतच. पण यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. आणि ते नाव म्हणजे अभिजीत बिचुकले. आपण साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्वतः म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सातारा जिल्ह्यामधील आहेत. याच साताऱ्यातून अभिजीत बिचुकले आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या विषयी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणतात की, “लोकांनी मला मतदान करावं मी नक्कीच विकास करेन. मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही. माझ्याकडेच अनेक लोक येणार आहे. मी कुठेही गेलो तरी अनेक लोक माझ्याजवळ येऊन फोटो, सेल्फी काढतात .मात्र मतदान का करत नाही हा प्रश्न मलाही पडतोय.’ असं ते म्हणाले. दरम्यान, कसब्याच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाची चर्चा सुरु होती. त्यावेळेस दुसरीकडे अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळाली? असा प्रश्न विचारणारेही अनेकजण होते. कसबा पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना तब्बल 4...

सोलापूर मध्ये राम सातपुते यांना उमेदवारी भाजपकडून 111 उमेदवाराची पाचवी यादी जाहीर; कंगनालाही उतरवलं मैदानात

इमेज
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज ५ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. १११ उमेदवारांच्या यादीत भाजपााने अभिनेत्री कंगणा रणौतलाही उमेदवारी देण्यात आली असून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या उद्योजक नवीन जिंदाल यांनाही हरयाणातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही भाजपासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार, ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

येत्या लोकसभेबाबत म्हणून जरांगे पाटलांनी टाकला नवा डाव;

इमेज
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये आला आहे. बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. नेमकं पाहूया काय म्हणाले जरांगे पाटील? 'आपला विषय लोकसभेचा नाही तर राज्यातील आहे. आरक्षण देण्याचं काम राज्याच्या हातात आहे. कमीत कमी आठरा मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. पण आपला विषय केंद्रात नाही, राज्यात आहे. मग त्याचवेळेस समिकरण बदलू शकतं. आपण जर लोकसभेला एकाचवेळी इतके फॉर्म भरले तर समाजच अडचणीत येऊ शकतो. मतदानाचं विभाजन होईल. त्याचा फायदा आपल्याला होणार नाही  त्याला एक पर्याय करा, अपक्ष म्हणून फक्त एकानेच एका जिल्ह्यात फाॅम भरा. मात्र तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे,' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 'पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, लोकसभेचा आपल्याला काहीही उपयोग नाहीये, आपलं आरक्षण तिथे नाहीये, तिथे आवाज जाऊन काहीही उपयोग नाही. याला दुसरा पर्याय आहे, आ...

उन्हाळ्यात चवीने खाल्लं जाणारा फळ सर्वात विषारी नाव ऐकून वाटत नाही |

इमेज
क्षे पिकवण्यासाठी, कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कुजण्यापासून रोखण्यासाठी सुमारे 15 प्रकारची कीटकनाशके वापरली जातात. ही 15 कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.उन्हाळ्यात प्रत्येक घरात द्राक्षे दिसतात. पण ते किती धोकादायक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञ म्हणतात की, कीटकनाशके बहुतेक द्राक्षे कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जातात. परदेशातून येणाऱ्या द्राक्षांमध्ये कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळेच ही फळे सर्वाधिक विषारी आहेत. जर तुम्ही त्यांना व्यवस्थित धुवून खाल्ले नाही तर ते तुम्हाला गंभीर आरोग्य समस्यांना बळी पडू शकतात. किती प्रकारची कीटकनाशके वापरली जातात? द हेल्थ साइटच्या अहवालानुसार, द्राक्षे पिकवण्यासाठी, त्यांना कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लवकर कुजण्यापासून रोखण्यासाठी सुमारे 15 प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. ही 15 कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. जर ते कमी प्रमाणात तुमच्या शरीरात प्रवेश करत असतील तर ते तुम्हाला कालांतराने आजारी बनवू शकतात. कीटकनाशकांचे तोटे जर तुम्ही दररोज कीटकनाशक...

देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे चां करेक्ट कार्यक्रम केला ! मुंडे समोर मराठा समाजाचे कडवे आव्हान...

इमेज
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, शरद पवार गटाकडून विनायक मेटेंच्या  पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय होण्याची शक्यता आहेत.पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंडे लोकसभेच्या प्रचाराला लागल्या आहेत. तर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर व्हावी नंतरच पक्ष प्रवेश करेल, अशी अट शरद पवारांना घातल्याची सूत्रांची माहिती आहे. बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे, यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील एक गट आग्रही आहे. पण निवडणूका फक्त पैशाच्या जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाही याचा दांडगा अनुभव शरद पवारांना आहे. तसेच बीड येथील जागा भाजपकडे आहे, महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याने सोनवणे यांना निवडणूक लढवता आली नसती म्हणून राजकीय वेळ साधत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट आहे. २०१९ ला भाजपाकडे जाऊन आलेले अजित पवारांचे उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी पुनर्वसन केले, त्या चुकीने आज पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शर...

पुणे १२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई ,

इमेज
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ चार हद्दीतील १२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळचे चारचे पोलीस उप आयुक्त यांनी ही कारवाई केली.पोलीस उप आयुक्त परिमंडळ चारमधील पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडयाची तयारी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, दुखापत करुन मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर अग्निशस्त्र व प्राणघातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे, दहशत करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी व घरफोडी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकार्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा म्हणुन संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. परिमंडळ चारचे उपायुक्त यांनी या प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे ११ गुन्हेगारावर व कलम ५७ प्रमाणे ०१ गुन्हेगार असे एकुण १२ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्...

तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार !महिलेला पोलिस कोठडी...

इमेज
प्रेमविवाह केल्यानंतर पतीने पत्नीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पत्नीने धक्कादायक कृत्य केलं आहे. शारीरिक संबंधाला नकार देताच पत्नीने पतीचं गुप्तांग कापल्याची घटना बार्शीत समोर आली आहे.तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. तर या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून एका महिलेने तरुणाला लॉजवर नेऊन शरीर संबंध ठेवण्यास लावले. यासाठी तरुण तयार नसतानाही बळजबरीने त्याला विवस्त्र करून गुप्तांगावर चाकूने वार करून जखमी केलं. तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कमलेश काकासाहेब सांगळे (वय २४ रा. शिरूर घाट ता. केज जि. बीड) याचे मोबाइलचे दुकान होते. या दुकानात महिला कामानिमित्त आल्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आधीपासून विवाहित असलेल्या महिलेने तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सांगळे याने नकार दिल्यानंतर ब्लॅकमेल केलं. महिलेने मार्च २०२३ मध्ये तरुणावर शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बलात्कार प्रकरणी त्य...

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

इमेज
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप             मुंबई,: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.             आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सु...

खटल्याशिवाय व्यक्तींना अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवू शकत नाहीत | सर्वोच्च न्यायालयाची ईडीला चपराक

इमेज
एखाद्या आरोपीला डिफॉल्ट जामीन नाकारण्यासाठी आणि अशा व्यक्तींना अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवण्यासाठी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) प्रश्न विचारला आहे.न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं केंद्रीय यंत्रणेला चपराक लगावली आहे की – आरोपींना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात ठेवण्याची पद्धत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला त्रासदायक ठरते. अशा प्रकारे खटल्याशिवाय अनिश्चित काळासाठी व्यक्तींना तुरुंगात ठेवण्याची पद्धत योग्य नसल्याचं त्यांनी बजावलं आहे. ‘तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही (आरोपीला) अटक करू शकत नाही हा डिफॉल्ट जामीनाचा संपूर्ण उद्देश आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत खटला सुरू होणार नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही पुरवणी आरोपपत्रे दाखल करत राहू शकत नाही. आणि मग ती व्यक्ती खटल्याशिवाय तुरुंगात असते’, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी ईडीकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर-जनरल एसव्ही राजू यांना स्पष्ट शब्दात सांगितलं. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं सांगितलं की, ...

मनोज जरांगे पाटील यांना पहाटे तीन वाजता फडणवीस यांचा फोन...

इमेज
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अद्याप सुरूच आहे. अंतरवाली सराटी इथं २४ मार्चला मनोज जरांगे पाटील बैठक घेणार असून या बैठकीत मराठा समाजाच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय होणार आहे.या बैठकीनंतर ९०० एकर परिसरात सभेचे आयोजन केले आहे. या सभेची तयारीही केली जात असून लवकरच तारखेची घोषणा होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचा खुलासा केला आहे. पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे तीन वाजता फोनवर बोलण झाल्याची कबुली पाटील यांनी दिली. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे सुरूच आहे. त्यामुळे एकीकडून विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे ही गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असे देखील जरांगे सुनावलं. मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असं पुन्हा एकदा मनोज जरांग...

सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खामीतकर निलंबित

इमेज
सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेश पुणे विभागीय समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी काढले आहेत.निलंबन कालावधीत खमितकर यांना प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग पुणे येथे मुख्यालय देण्यात आले आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्तावित केल्यानुसार खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत , आढावा बैठकीस वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहणे, सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेणे तसेच त्यांचे काम असमाधानकारक असणे . याबाबत मसुदा शासनास सादर करण्यात आला होता. तसेच खमितकर यांच्या कामकाजात अनुषंगाने विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषद कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटीच्या अनुषंगाने तसेच वारंवार चुकीचे काम करण्याची सवय व शासकीय अधिकाऱ्यांना अशोभनीय वर्तन असल...

महिला पोलीस गाडी रस्त्यावर आडवी लावून गेल्या बाजाराला...

इमेज
भंडारा शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणत आहे. सायंकाळच्या सुमारास गांधी चौक ते एस टी स्टँड पर्यंत दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र या समस्या सोडवण्याऐवजी त्यात आणखी भर घालण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे.भंडाऱ्यात एका महिला पोलीस निरीक्षिकाने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकाराचे रेकॉर्डिंग करत असताना महिला पोलीस निरीक्षकाने पत्रकरालाच उर्मट प्रश्न करत पहिल्या पेजवर बातमी येईल का असं म्हटलं. भंडाऱ्यात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी भर पडली ते राष्ट्रीय महामार्ग सहायक पोलीस निरीक्षिका रजनी तुमसरे यांनी. रजनी तुमसरे या बाजारात खरेदी करायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरच पार्क केली. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.  महत्त्वाची बाब म्हणजे रजनी तुमसरे यांच्या रस्त्यातील गाडीमुळे अँब्युलन्ससुध्दा या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. जवळपास एक तास वाहतू...

सगळेच पैशात नाहून निघाले या दोन बड्या पक्षांना एकही इलेक्ट्रॉल बॉण्ड मिळाला नाही

इमेज
न्यायालयाने इलेक्टोरल बाँडवर कठोर भूमिका घेतल्यावर आता हे प्रकरण शेकण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी वेगवेगळी कारणे सांगून हात वर करण्यास सुरुवात केली आहे. यात पहिला नंबर पलटूराम म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितिशकुमारांच्या पक्षाचा लागला आहे. पक्षाला २४ कोटी रुपये इलेक्ट्रोरल बाँडमधून मिळाल्याचे जगजाहीर झाल्यानंतर आयोगाला १० कोटी कुठून आले त्याचे हास्यास्पद कारण दिले आहे. दुसरा नंबर सपाचा लागला आहे. परंतू, असे दोन महत्वाचे पक्ष आहेत ज्यांना एकही इलेक्टोरल बाँड मिळालेला नाही.  निवडणूक आयोगाने रविवारी विविध राजकीय पक्षांद्वारे सोपविण्यात आलेल्या बंद लिफाफ्यांबाबत खुलासा केला आहे. यामध्ये जदयूला २४ कोटी रुपये बाँडद्वारे मिळाल्याचे म्हटले आहे. यामध्ये भारती एअरटेल आणि श्री सिमेंटकडून अनुक्रमे १ कोटी आणि २ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड मिळाल्याचे जदयूने म्हटले आहे. ३ एप्रिल २०१९ ला कोणीतरी कार्यालयात येऊन लिफाफा दिला, तो उघडून पाहिला असता त्यात १० कोटींचे बाँड होते, असे जदयूने म्हटले आहे. हे दान कोणी दिले माहिती नाही. पक्षाकडे याची माहिती नाही आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा असा काही ...

इलेक्टोरल बाँड्समुळे काळा पैसा भारतात येईल असं वक्तव्य केलं होतं.

इमेज
       देशात इलेक्टोरल बाँड्सवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो यासंदर्भात सध्या देशभर चर्चेचा मुद्दा बनला आहे. नुकताच अमित शहा यांनी इलेक्टोरल बाँड्समुळे काळा पैसा भारतात येईल असं वक्तव्य केलं होतं.त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर लगेचच नितिन गडकरी यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक रोखे नसतील तर काळा पैसा निवडणुकीत वापरला जाईल, असा दावा केला आहे. इलेक्टोरल बाँड्स चांगले कसे यावर चर्चा व्हावी यावरही त्यांनी भर दिला आहे.एक गोष्ट खरी आहे की, निवडणुकीत पैसा खर्च होतो आणि तो सर्व पक्ष खर्च करतात. जर ही अर्थव्यवस्था सुधारून पहिल्या क्रमांकावर नेली, तर राजकीय पक्षांना बाँडच्या रूपाने पहिल्या क्रमांकावर पैसे दिले जातात. अरुण जेटली मंत्री असताना अशी योजना बनवण्यात आली होती. त्यात चुकीचं काय आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करण्याचं नितिन गडकरींनी टाळलं.जर तुम्ही बाँड मंजूर केले नाहीत तर लोक दोन नंबरचा पैसा वापरतील. सर्व पक्षांना असा स्रोत मिळाला तर ते चांगलं...

इलेक्ट्रॉल बॉण्ड चा कोणताही तपशील लपवू नका सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले!

इमेज
इलेक्टोरल बाँड्सचा ( निवडणूक रोखे ) सर्व तपशील जाहीर करण्‍यो आदेश स्‍टेट बँक ऑफ इंडियालादिले होते. यामध्‍ये इलेक्टोरल बाँड क्रमांकांचाही समावेश आहे. निवडणूक रोखे तपशील उघड करताना SBIने तपशील उघड करताना निवडक नसावे.निवडणूक रोख्यांबाबत काेणताही तपशील लपवू नका, अशा शब्‍दांमध्‍ये आज ( दि. १८ मार्च) सर्वोच्‍च न्‍यायालयाने पुन्‍हा एकदा SBIला फटकारले.इलेक्टोरल बाँड्सवर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात पुन्‍हा एकदा सुनावणी सुरु झाली आहे. सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्‍यक्षतेखालील न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचे घटनापीठ स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बाँड्सचे अनन्य क्रमांक जाहीर करण्याचे निर्देश द्यायचे की नाही यावर निर्णय घेणार आहे. गेल्या शुक्रवारी, खंडपीठाने SBI ने युनिक अल्फान्यूमेरिक नंबर न सांगता इलेक्टोरल बाँड तपशील जाहीर केल्याबद्दल अपवाद घेतला होता, त्याशिवाय राजकीय पक्षांशी देणगीदारांची जुळणी करणे कठीण आहे. एसबीआयला खुलासा करावा लागला, असेही स्‍पष्‍ट केले होते. निवडणूक रोख्यांबाबत काेणतीही माहिती लपवू नका निवडणूक रोख्यांबाबत काही...