पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारसांच्या नोंदीसाठी भूमापन कार्यालयातल्या एजंटला तीन हजारांची लाच घेताना पकडले

इमेज
वडिलांच्या मृत्यूनंतर वारस नोंद लावून देतो म्हणून भू मापन कार्यालयातील एजंट (खासगी इसम) तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला .इनामदार हॉटेलसमोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदाराच्या वडिलांच्या निधनामुळे तक्रारदारांसह त्यांच्या आई, भावांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयात अर्ज केला होता. तक्रारदार कार्यालयास हेलपाटे मारुन नोंदीसाठी पाठपुरावा करीत होता.या कार्यालयात खासगी एजंट म्हणून काम करणाऱ्या अ. रऊफ म. शरीफ शेख (रा. ३९६, न्यू पाच्छा पेठ, लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूलजवळ, सोलापूर) याने नोंदीचे काम करुन देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून इनामदार हॉटेलसमोरील रोडवर ३ हजाराची रक्कम स्वीकारताना पथकाने अटक केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, रवी हाटखिळे, श्याम सु...

"बाळासाहेबांचं ते एक वाक्य.", बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

इमेज
मराठवाड्याला मुंबईशी जोडणाऱ्या जालना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात आज झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एक्सप्रेसचा शुभारंभ केला.यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत रेल्वे, मराठवाड्याचा विकास आणि अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन व बाबरी पतन या विषयांवर सविस्तर भाष्य केले. बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेबांनी एक वाक्य बोलल्यामुळे तेव्हा घरी बसणारे लोक आज बाबरी पाडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असले तरी शिवसेनेचे कुणीही नेते त्याठिकाणी उपस्थित नव्हते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी त्यांचा कारसेवेचा अनुभवही सांगितला. “डॉ. फडणवीस वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत, 'राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे”, अशी टीका सामना दैनिकाच्या अग्रलेखातून दि. २७ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.बाबरी मशीद पाडली ते...

महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

इमेज
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना सरकारनं क्लीनचीट दिली होती.त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानं चर्चा सुरु आहे

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ सोलापुरात दोन गावांतून हाकलला

इमेज
केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी काढण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर जिल्ह्यात दोन गावांतून तीव्र विरोध करून प्रवेश नाकारण्यात आला.बार्शी व करमाळा तालुक्यात हा प्रकार घडला. त्यावेळी गावक-यांचा रोष दिसून आला. बार्शी तालुक्यातील पांढरी गावात विकसित भारत यात्रेचा रथ आला असता तेथे गावकरी एकत्र आले. यावेळी तरूण आणि वयोवृध्द शेतक-यांनी प्रथम मोदी सरकार या नावाच हरकत घेतली. कांदा व इतर पिकांचे दर गडगडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले ? व्यापा-यांचे भले करण्यासाठी शेतक-यांच्या पिकांवर गाढवाचा नांगर फिरविण्यात आला आहे. वाढत्या महागाईत आमचे जागणेच मुश्किल झाले आहे, आशा शब्दांत गावक-यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काहीजणांनी हातात लाकडी दांडके घेऊन विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिला. करमाळा तालुक्यातील पुनवर गावातही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ प्रवेश न देता परत पाठविण्यात आला. रथासोबत सरकारी कर्मचा-यांसोबात भाजपचे कार्यकर्ते होते. परंतु गावक-यांनी शेतीमालाच्या घसरलेल्या भावासह वाढलेली मह...

संपूर्ण जिल्ह्यात चार दरोडे, १४ घरफोड्यांद्वारे धुमाकूळ घालणाऱ्याला पकडले

संपूर्ण जिल्ह्यात चार दरोडे, १४ घरफोड्यांद्वारे धुमाकूळ घालणाऱ्या सम्या उर्फ समीर रवी चव्हाण (रा. कुंभारी, ता. द. सोलापूर) याला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा लावून पकडले.ही कारवाई कुंभारी येथील पुलाजवळ करण्यात आली.यातील सम्या उर्फ समीर चव्हाण या सराईत गुन्हेगाराने पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.पोलिस त्याच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वळसंग गावात तपासाच्या दृष्टीने फिरत होते.  गोपनीय खबऱ्याच्या टीपनुसार सम्या कुंभारी गावात आल्याची माहिती मिळाली.सपोनि. शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने कुंभारी गावात जाऊन पुलाजवळ सापळा लावला. तो टप्प्यात येताच त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्याने त्याने आपले खरे नाव, पत्ता सांगितला.त्याचे पोलिस दप्तरी असलेले रेकाॅर्ड तपासले असता त्याने वैराग, टेंभुर्णी, अकलूज ठाण्यात त्याच्या नावावर चार दरोड्याचे गुन्हे नोंदल्याचे निदर्शनाला आले. तसेच पंढरपूर, करकंब, बार्शी, वै...

अंगणवाड्यांच्या चाव्या ग्रामसेवकांच्या हाती! सोलापूर झेडपी सीईओंनी काढला तोडगा !

इमेज
गावचे सरपंच, अंगणवाडी ज्या प्रभागात आहे तेथील महिला सदस्या, ग्रामसेवक, अंगणवाडीची मुख्यसेविका या समितीच्या मदतीने २५ दिवसांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या आता उघडणार आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळांपासून दूर अंतरावरील अंगणवाड्यांच्या चावी ग्रामसेवकांकडे असणार आहेत. या समितीच्या मदतीने अंगणवाड्या सुरू करण्याचा निर्णय सोलापूर झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे. अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे निर्माण झालेली अडचण दूर करणारी सोलापूर झेडपी राज्यात पहिलीच आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांची संख्या एक लाखांवर असून, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची मुले जिल्ह्यात एक लाख सात हजार आहेत. स्तनदा माता व गरोदर महिलांची संख्या ३७ हजारांपर्यंत आहे. या सर्वांना एकात्मिक बालविकास विभागातर्फे नियमित पोषण आहार दिला जातो. पण, सध्या अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचारी मागील २५ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी (ता. २९) त्यांनी साखळी आंदोलन केले. दरम्यान, स्तनदा माता, गरोदर महिला व स...

कोयता गँगला भिडणाऱ्या रणरागिणीचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार; सीमा वळवी यांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला

इमेज
काही दिवसांपूर्वी वडगाव शेरी भागात कोयता गँगच्या टोळीने कोयते उगारून आणि दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले होते. तेव्हा सीमा वळवी या रणरागिणीने तप्तरता दाखवत एका गुंडाला पकडले.त्यांच्या या शौर्यामुळे पोलीस आयुक्तांकडून हवालदार वळवींचा सत्कार करण्यात आला. कोयता गँगला भिडणाऱ्या पोलीस हवालदार सीमा व‌ळवी यांचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कौतुक केले. वळवी यांचा पोलीस आयुक्तालयात रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. २४ डिसेंबर रात्री अकराच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्यातील हवालदार सीमा वळवी कामावरुन घरी निघाल्या होत्या. तेवढ्यात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या टोळक्याला वळवी यांनी पाहिले. वळवी यांनी तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या एका गुंडाला त्यांनी पकडले. वळवी यांनी आरडाओरडा केल्याने गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांनी पळ काढला. मात्र, चंदननगर पोलिसांनी गुंडांचा पाठलाग करुन त्यांना २० मिनिटांत पकडले. तपासात समेर आले की, रात्री वैमनस्यातून तीन जणांवर कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अनुज जितेंद्र यादव (वय १९), हरि...

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट, पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी कपात

इमेज
तेल कंपन्यांशी बोलणी करत आहेत. यापूर्वी 22 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक महिन्यांपासून बदलले नाही. मागील वेळेस केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात बदल करत पेट्रोलचे दर 13 रुपये तर डिझेलच्या दरात 16 रुपये कपात केली होती.कंपन्यांशी चर्चा पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीसांदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांशी चर्चा सुरु करण्यात आली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 6 रुपये ते 10 रुपये कपात होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून क्रूड आईलच्या दरात घसरण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आईलचे दर 80 डॉलर प्रती बॅरल आहे. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना फायदा झाला आहे. आता हा फायदा सर्वसामान्य लोकांना देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. शिंदे सरकारने केली होती दर कपात राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पेट्रोल, डिझेलवर ल...

जरांगेंच्या मुंबईतील उपोषणासाठी 'या' मैदानची निवड? शिष्टमंडळानं घेतला आढावा

इमेज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याच्या पाहणीसाठी जरांगेंच्या शिष्टमंडळानं मुंबईत जाऊन पाहाणी केली. या पाहणीनंतर ज्या तीन मैदानांचा पर्याय होता त्यांपैकी आझाद मैदान हेच ठिकाण उपोषणासाठी योग्य असल्यानं त्यालाच पसंती असल्याची माहिती कळते आहे.तीन मैदानांचा पर्याय शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बीकेसी मैदान या तीनपैकी एक ठिकाण मुंबईतल्या आंदोलनासाठी विचाराधीन आहे. या तिन्ही मैदानांची पाहाणी शिष्टमंडळाकडून केली जात आहे. यांपैकी दादर येथील शिवाजी पार्क मैदान, यानंतर आझाद मैदान तर बीकेसी मैदानाची पाहणी करण्यात आली. यांपैकी या शिष्टमंडळा शिवाजी पार्क आणि बीकेसीपेक्षा आझाद मैदानचं उपोषणासाठी आणि सहभागी आंदोलकांसाठी जास्त सोयीचं असल्याची चर्चा आहे.अंतिम निर्णय जरांगे घेणार दरम्यान, या सभास्थळांची संपूर्ण पाहाणी केल्यानंतर हे शिष्टमंडळ आंतरावाली सराटीला जाऊन पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्यासमोर सर्व परिस्थिती मांडून मग यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे....तर जरांगे उपोषणावर ठाम मनोज जरांगे हे २० जानेवारी रोजी मुं...

'आमच्या गाड्या अडवल्यास गृहमंत्र्यांच्या घरासमोर बसणार'; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

इमेज
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून २० जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू. मुंबईला जाण्याचा मार्ग कसा? जालना जिल्हा अंतरवाली सराटी येथून सुरूवात बीड जिल्हा शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी अहमदनगर जिल्हा पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव पुणे जिल्हा सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा मुंबई पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान.

मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही : शरद पवार

इमेज
राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ होणार आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील सर्व स्तरातील मान्यवर व्यक्ती हजेरी लावणार आहे. या सोहळ्यासाठी मोदी सरकारने जय्यत तयारी केली आहे.याच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. मात्र, मला सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याबाबतही वक्तव्य केलं. शरद पवार म्हणाले, 'इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी पदयात्रा केली. त्यानंतर दुसरी पदयात्रा काढण्यासाठी सूचना केली होती. त्यामुळे ते करत आहेत. तीन राज्याचा निकाल अपेक्षासारखा लागला नाही. पण आता लोक इंडिया आघाडीला पर्याय म्हणून स्वीकारतील. आम्ही एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेऊ'.राम मंदिरावर शरद पवार काय म्हणाले? 'राम मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे, हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं...

कोरोनाचा कहर! देशातील 7 राज्यांत वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट JN.1; 'या' ठिकाणी सर्वाधिक रुग्ण

इमेज
कोरोनासोबतच त्याचा नवीन सब व्हेरिएंट JN.1 देखील वेगाने पसरत आहे. देशातील संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात 83 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. JN.1 चा सर्वाधिक प्रभाव गुजरातमध्ये दिसून आला आहे.गुजरातशिवाय गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये देखील अनेक रुग्ण आढळले आहेत. केरळला कोरोनाचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4,170 संक्रमित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत, ज्यांची संख्या 3,096 आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत गुजरातमध्ये 34, कर्नाटकात 8, तामिळनाडूमध्ये 4, गोव्यात 18 आणि महाराष्ट्रात 7 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये कोरोनाचे 122 रुग्ण आढळून आले आहेत, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एका 51 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला आधीच अनेक आजार होते. महिलेला श्वास घेण्यासही त्रास होत होता. यासोबतच किडनी आणि शरीराचे इतर अवयवही काम करणे बंद झाले होते. यानंतर ...

त्या' १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोघा डॉक्टरांवर अखेर निलंबनाची कारवाई!

इमेज
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात नेमलेल्या समितीने अहवाल तयार केल्यानंतर यातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपा बंजन आणि सहायक प्राध्यापक डॉ. महेश मोरे यांना अलिकडेच नोटीसा बजावल्या होत्या.या नोटीसींना दोघांनीही समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्यावर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई केल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने रविवारी दिली. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्याआधीही १० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी याच रुग्णालयात उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू ओढवला होता. लागोपाठ घडलेल्या या मृत्यूकांडामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही कळव्यातील या रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. रुग्णालयात प्रचंड अनागोंदी, डॉक्टर आणि कर्मचारी यांची अपुरी क्षमता तसेच रुग्णांच्या संख्येतील वाढ यामुळे एकाच रात्रीत १८ ज...

रविवारी कोरोनाचे ६५६ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू

देशामध्ये रविवारी कोरोनाच्या नवीन व्हायरसचे ६५६ रुग्ण आढळून आलेले आहेत. शनिवारच्या तुलनेमध्ये हा आकडा कमी असला तरी जेएन.१ या विषाणूमुळे भीतीचं सावट निर्माण झालं आहे.

लोकसभा निवडणूक कुणाला जड जाणार? NDA की I.N.D.I.A.? ओपिनियन पोलचा निकाल काय सांगतो?

इमेज
आणि काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि I.N.D.I.A काँग्रेससोबतची आघाडी यांच्यात प्रामुख्याने ही लढत होणार आहे. दरम्यान, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जनमत चाचण्यांचे निकाल समोर आले आहेत.-व्होटरच्या ओपिनियन पोल सर्व्हेनुसार दक्षिण भारत हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्याला भाजपची कामगिरी जोरदार दिसत आहे. तर, तेलंगणामध्ये कॉंग्रेसला यश मिळेल असे सी-व्होटरच्या ओपिनियन पोल सर्व्हे सांगत आहे. कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील एकूण 110 जागांपैकी भाजपला 82 ते 92 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १३ ते २३ आणि इतरांना ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तेलंगणात काँग्रेस तर कर्नाटकात भाजप कॉंग्रेसची सतत असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांपैकी तेलंगणा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, कर्नाटकामध्ये भाजप मुन्स्डी मारेल असे दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 38 टक्के तर भाजपला 21 टक्के मते मिळतील असे सांगण्यात येत आहे. सी व...

मनोज जरांगेंची पाटील यांची मोठी घोषणा! आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण

इमेज
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे.२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले.  सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

200 जेसीबी आणि हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी.; बीडमध्ये मनोज जरांगेचं जंगी स्वागत

इमेज
राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे  यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे.राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे.त्यापूर्वी आज 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करण्यात आली आहे. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या या सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेसाठी तब्बल तीन टन खिचडी, ट्रकभर केळी आणि चार लाख पाणी बॉटल्स वाटप करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव याठिकाणी एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी...

शेअर्स विकल्यानंतर खात्यात लगेच पैसे येणार! गुंतवणूकदारांच्या हितासाठी सेबीचा महत्त्वाचा प्रस्ताव

इमेज
बाजार नियामक सेबी सेटलमेंटबाबत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. SEBI ने 'T+0' ची अंमलबजावणी आणि त्वरित सेटलमेंट यावर एक प्रस्ताव जारी केला आहे. याची अंमलबजावणी झाल्यावर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.जेव्हा एखादा गुंतवणूकदार शेअर्स विकतो तेव्हा त्याला त्याच दिवशी किंवा रिअल टाइममध्ये त्याच्या खात्यात पैसे मिळतील. याशिवाय, शेअर्स खरेदी केल्यानंतर, शेअर्स देखील त्याच दिवशी डीमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. 12 जानेवारीपर्यंत सूचना मागवल्या आहेत सेबीने जारी केलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये असे म्हटले आहे की जर 'T+0' आणि त्वरित सेटलमेंट लागू केले तर तरलतेची समस्या उद्भवणार नाही. T+1 व्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना T+0 आणि त्वरित सेटलमेंटचा पर्याय असेल. बाजार नियामकाने 12 जानेवारीपर्यंत सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत.+0 सेटलमेंटसह, त्याच दिवशी शेअर्स खरेदीदाराला वितरित केले जातील आणि त्याच दिवशी विक्रेत्याला निधी वितरित केला जाईल. झटपट सेटलमेंटमध्ये, तुम्हाला त्वरित शेअर्स मिळतील आणि विक्रेत्यांकडे निधी जमा होईल. SEBI ने T+0 लागू करण्यासाठी मार्च 2024 ही अंतिम मु...

कोरोनाचा आलेख वाढताच! दर तासाला 26 नवे कोरोनाबाधित, 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

इमेज
देशात  पुन्हा एकदा कोरोना संक्रमण  वाढताना दिसत असून यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे  जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोविडच्या JN1 सब-व्हेरियंटचा कहर चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोविडचा JN1 सब-व्हेरियंट वेगाने पसरत आहे. भारतात दर तासाला सुमारे 26 ते 27 कोरोना रुग्ण आढळत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे सर्वत्र नाताळ आणि नववर्षीची धूम पाहायला मिळत असताना वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 22 डिसेंबरला 24 तासांत 640 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,997 वर पोहोचली आहे. तर एका दि...

सहलीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती बंधनकारक! 'एसटी'कडून मिळते ५० टक्के सवलत; वाचा, शाळांसाठी काय आहेत नियम व अटी

इमेज
शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात व त्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात आली आहे., सहलीसाठी विद्यार्थ्यांना सक्ती नको आणि सहलीसाठी येणाऱ्या  विद्यार्थ्याच्या पालकांची संमती बंधनकारक असेल, असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सहलीपूर्वी आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, यासंबंधीचे प्रशिक्षण द्यायलाच हवे, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. सहलीवेळी शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सहलीचे आयोजन केल्यानंतर एसटी महामंडळाची बस भाड्याने घ्यावी. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची हेळसांड किंवा कुचंबना झाल्याची तक्रार पालकांनी केल्यास संबंधित शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापकांवर कठो...

ब्रेकिंग! नागपूर जिल्हा बँक घोटाळा: कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा

इमेज
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे.नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी सुनील केदार यांना कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००२ मध्ये घडलेल्या या बँक घोटाळ्याचा तब्बल २२ वर्षांनी निकाल लागला असून सुनील केदार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. २००२ मध्ये झालेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज (शुक्रवार, २२ डिसेंबर) सत्र न्यायालयात लागला. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह एकूण सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या सहाही आरोपींना न्यायालयाने १२ लाखांचा दंड आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये सुनील केदार  यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी यांच्या नावाचा समावेश आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार, सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले...

आजची रात्र मोठी आहे...! 16 तास असणार अंधार आणि घडणार असं काही की...

इमेज
आज लवकर अंधार पडला ना... तुम्हालाही असंच वाटलं का... तर याचं कारणही समजून घ्या. आजचा दिवस खूप खास आहे. आज दिवस लहान आणि रात्र मोठी आहे. आजची रात्र ही थोडीथोडकी नव्हे तर 16 तासांची आहे.हा एक अतिशय रहस्यमयी दिवस आहे. या रात्रीनंतर काहीतरी घडणार आहे. याचेच हे संकेत आहेत. याला विंटर सोल्सटिक म्हणजेच हिवाळी संक्रांती म्हणतात. या दिवशी पृथ्वीच्या एका टोकाला खूप मोठी रात्र असते, तर दुसऱ्या टोकाला रात्र खूप लहान आणि दिवस मोठा असतो. वैज्ञानिक भाषेत बोलायचं झाल्यास, 21 डिसेंबर ही उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस आहे. तर दक्षिण गोलार्धात याच्या उलट घडतं. तिथं सर्वात लहान रात्र आणि सर्वात मोठा दिवस आहे. आता 21 डिसेंबर ही वर्षातील सर्वात मोठी रात्र का असते? ते जाणून घेऊया. दिवस आणि रात्र प्रदीर्घ असण्याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिला म्हणजे पृथ्वीचा कल आणि दुसरा सूर्याचा कोन. असं म्हणतात की आपला ग्रह पूर्णपणे संतुलित शीर्षासारखा सरळ फिरत नाही. त्याऐवजी त्याचा अक्षीय झुकाव 23.5 अंश आहे. हा कल वर्षभर स्थिर राहतो, परंतु सूर्याच्या सापेक्ष त्याची दिशा पृथ्वीच्या कक्षेनुसार बदलते....

'जे शक्य नाही ते देताच येणार नाही', गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

इमेज
जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा अंतरवली सराटी गावात दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे यांचा समावेश आहे.यावेळी मनोज जरांगे यांनी आई ओबीसी असेल तर मुलांना ओबीसी आरक्षण मिळावं, अशी मागणी केली. यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाने याआधी लेखी स्वरुपात लिहून दिलेल्या आश्वासनाचा दाखला दिला . सरकारच्या शिष्टमंडळाने कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांच्या सगेसायरींना देखील आरक्षण दिलं जाईल, असं लेखी आश्वासन दिल्याचं मनोज जरांगे म्हणाले. पण मनोज जरांगे यांची ही मागणी गिरीश महाजन यांनी स्पष्टच नाकारली. “सरकारच्या शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी गिरीश महाजन यांनी सविस्तर भूमिका मांडली. जे शक्य नाही ते देताच येणार नाही, महाजन स्पष्ट म्हणाले. कायद्याने सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. पत्नीचे नातेवाईक कायद्यात बसत नाहीत. जरांगेंची सगेसोयरेंची मागणी नियमात बसत नाही”, असं गिरीश महाजन स्पष्ट म्हणाले. ‘मागासवर्गीय आयोगाला 360 कोटी दिले’ “विधीमंडळाचं हिवा...

अधिवशेन संपताच सरकारचे मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार, 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर चर्चा

इमेज
नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुटताच राज्याचे काही मंत्री हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर  24 डिसेंबर ही डेडलाईन दिली असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि इतर मंत्री त्यांची भेट घेणार आहेत.मराठा आरक्षणाच्या विषयावर शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या संदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा प्रस्ताव मान्य नसून 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीव मनोज जरांगे ठाम आहेत. 24 डिसेंबर पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नाहीत मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात...

लोकसभेच्या खासदारांना निलंबित करण्याचं सत्र सुरूच, महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह ४९ खासदार निलंबित

इमेज
खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं, त्यावरून आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं, त्यानंतर आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे.आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या आणखी काही विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आज ४१ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत एकूण...

नाफेड, एनसीसीएफ महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार

इमेज
महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती,  एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली.देशातील ६५ ते ७० टक्के कांदा Maharashtra नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. एनसीसीएफने दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड, एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही चंद्रा यांनी सांगितले महाराष्ट्र एनसीसीएफच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ फिरत्या व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूग डाळ आणि तांदूळ देखील अत्यल्प दरात खरेदी करणार अस...

सोलापुरात कांदा दर घसरणीची मालिका सुरूच; प्रशासनाचे नियोजनही कोलमडलेलेच

इमेज
कांद्याची दररोज होणारी उच्चांकी आवक, परिणामी कांदा लिलाव एक दिवसाआड बंद ठेवाण्याचा निर्णय, परिणामी दुसऱ्या दिवशी होणारी कांद्याची वाढीव आवक आणि त्यामुळे सुरू असलेली दर घसरणीची मालिका, त्यात कांदा उतरवून घेण्यासाठी माथाडी कामगारांनी वाढवून घेतलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली अडचण दूर करण्यात सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीला मर्यादा पडल्याचे दिसून येते.नियोजन कोसळल्यामुळे कृषी बाजार समितीच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली आहे. गेल्या १५ दिवसांपासून सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. कांदा उतरवून घेण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्यामुळे तसेच कांदा दरातही घसरण होत असल्यामुळे कृषी बाजार समिती प्रशासनाने कांद्याचा लिलाव दररोज नव्हे तर एक दिवसाआड करण्याचे धोरण पत्करले होते. परंतु लिलावाच्या दिवशी कांदा आवक दुप्पट होत असल्यामुळे अडचण वाढली आहे. यात नियोजनाचा अभाव असताना दुसरीकडे कांदा दर कोसळल्यामुळे शेतकरीवर्गात निराशा आणि संताप व्यक्त होत आहे.  दरम्यान, कांदा आवक, लिलाव आणि दर घसरणीमुळे कृषी बाजार समितीतील वातावरण चिघळत असत...

"बहुमताच्या आधारावर पक्ष आमचाच हा दावा शिंदे गटाला करता येणार नाही, कारण.."

इमेज
शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे.दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे. त्यामुळे कायद्याचे अनेक कंगोरे यातून तपासले जातील यात शंका नाही. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शेड्यूल 10 च्या मुद्द्यावरुनही भूमिका मांडली. देवदत्त कामत म्हणाले, पक्ष आमचा हे मैदानावरच्या घोषणांनी ठरत नाही तर पक्ष घटनेनुसार प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव करावा लागतो. पक्ष नेतृत्वातील बदल याच ठरावाने करता येतात. फुटून गेलेले विधिमंडळ सदस्य सांगतात की, आम्ही पक्षाचे सदस्यत्व सोडलेले नाही. परंतु त्यांच्या सर्व कृती पक्षाविरुद्ध असल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे स्पष्ट दिसते. यावेळी देवदत्त कामत यांनी आज आपली बाजू मांडताना शेड्यूल 10च्या मुद्द्यावर बोट ठवले. बहुमताच्या आधारावर पक्ष आमचाच हा दावा शिंदे गटाला करता येणार नाही. कारण, 2003 साली संसदेने दहाव्या परिशिष्टात केलेल्या सुधारणेमुळे बहुमताच्या दावा करत शिंदे गटाला बचाव करता येणार नाही, असा ...

मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजेंनी बोलावली बैठक

इमेज
मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत एकमताने आवाज उठवावा, यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक बोलावली आहे.१८ डिसेंबरला (सोमवार) ही बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान उद्या होत असलेल्या बैठकीला राज्यातील कोणकोणते खासदार उपस्थित राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संसदेतही मराठा आरक्षण प्रश्नावर राज्यातील काही खासदारांनी प्रश्न मांडला आहे. राज्य विधिमंडळात मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी बोलावलेली बैठक दिल्लीत होत आहे. त्यामुळे भाजपचे किती खासदार या बैठकीला उपस्थित राहतात किंवा त्यांची भूमिका काय असेल, हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

आंतरवाली सराटीमधील बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

इमेज
मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून, या पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीमध्ये  महत्वाचे बैठक बोलवण्यात आली आहे.ओबीसीमधूनच (OBC) आम्हाला मराठा आरक्षण हवे असल्याची भूमिका मांडणारे मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. दरम्यान, काही तासांत या बैठकीला सुरवात होणार असून, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. "दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढणार नाही, तसेच ओबीसी यांचे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.” त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याची भूमिका घेणारे जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.  आंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सरकारचे धोरण स्पष्ट आहे. सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचा आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमि...

शेअर बाजारात धूमाकूळ घालण्यासाठी येत आहेत या 12 कंपन्यांचे IPO. रेकॉर्डब्रेक कमाईची बनू शकते संधी

इमेज
IPO ने सध्या शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. छोट्या ते मोठ्या कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सूचिबद्ध होत आहेत आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी असू शकते. दलाल स्ट्रीट 18 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या धमाकेदार आठवड्यासाठी सज्ज आहे, 12 नवीन IPO लाँच केले जाणार आहेत.या IPO च्या माध्यमातून कंपन्या गुंतवणूकदारांकडून 4,600 कोटी रुपये उभारतील. गेल्या आठवडाभरात कंपन्यांनी 4,000 कोटी रुपये उभे केले होते. कोणत्या कंपन्यांचा IPO येणार आहे? मुथूट मायक्रोफिनचा आयपीओ 18 डिसेंबरला उघडेल आणि 20 डिसेंबरला बंद होईल. ती 760 कोटी रुपयांची आहे आणि त्याची किंमत 277 रुपये ते 291 रुपये प्रति शेअर आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा IPO 18 डिसेंबरला उघडेल आणि 20 तारखेला बंद होईल. 400 कोटी IPO चा प्राइस बँड 340 ते 360 रुपये प्रति शेअर आहे. Motisons Jewellers Limited IPO देखील 18 तारखेला उघडेल आणि 20 तारखेला बंद होईल. 151.09 कोटी IPO ची किंमत 52 ते 55 रुपये प्रति शेअर आहे. Happy Forgings Limited IPO 19 तारखेला उघडेल आणि 21 ला बंद होईल. त्याची योजना बाजारातून 400 कोटी रुपये उभारण्याची आहे. IPO ची किंमत...

सोलापुरातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज आज अर्ध्यावर; जाणून घ्या नेमकं कारण...

इमेज
भारत सरकारच्या गृह शाखेच्या उपसचिव कार्यालयातील वायरलेस मॅसेजवरून सोलापूर शहरातील मुख्य शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडविण्याबाबतच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, परपूज्य शेख नवाब अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह कुवैत राज्याचे अमीर यांचे १६ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण भारतात रविवार १७ डिसेंबर राेजी एक दिवसाचे शोक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे इमारतीवर व ज्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तो रविवार १७ डिसेंबर २०२३ रोजी ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावे.  याशिवाय कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊ नये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार आर. व्ही. पुदाले यांनी पत्र काढले आहे. या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, पेालिस आयुक्त शहर, पोलिस अधीक्षक कार्यालय ग्रामीण, सोलापूर, सह. आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपरिषद, सोलापूर, सर्व मुख्याध...

'हार मानायची नाय'; मनोज जरांगे पाटील 'या' तारखेला जाहीर करणार पुढची भूमिका

इमेज
अंतरवाली सराटी याठिकाणी राज्यभरातल्या सकल मराठा समाजाची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. 24 डिसेंबरनंतर काय भूमिका घ्यायची याविषयी चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील यांनी ही बैठक बोलावली होती..मराठा आरक्षण  प्रश्नी मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी बैठक झाली. या बैठकीत राज्यभरातील मराठा आरक्षण चळवळीत काम करणारे, स्वयंसेवक, उपोषणकर्ते आणि सभेचे नियोजन करणारे मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी हार मानायची नसून आता केवळ गुलालच घ्यायचा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत. आतापर्यंत राज्यभरात 54 लाख मराठ्यांकडे कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहितीही जरांगे यांनी दिलीये. 23 तारखेला भूमिका जाहीर करणार : मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. मात्र, 24 तारखेपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काय करायचं याविषयी चर्चा झाली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकार काय करत आहे याची माहिती जरांगे यांना देण्यात आलीये...

"मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर." मनोज जरांगेंचा अंतरवाली सराटीतून इशारा

इमेज
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रकरणी आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं ही आपली मागणी असून सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. जरांगे म्हणाले की, “आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. १९६७ पूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आधी आरक्षण द्यायला हवं होतं. ओबीसी आरक्षणात सर्वात अगोदर मराठा समाज आहे. ओबीसी आरक्षण त्यानंतर देण्यात आलं. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देव सुद्धा रोखू शकत नाही.” “ओबीसीमध्ये धनगर समाजाला वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळे त्यांना धक्का लागणार नाही. आपण ओबीसीमध्ये आहोत, फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. मराठ्यांना इतक्या हल्क्यात घेऊ नका, मतांसाठी आमच्या पोरांचे मुडदे...

तरुण मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत

इमेज
सोलापूर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे. या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढविण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत.त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरभ राव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. राव मार्गदर्शन करत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, अमित माळी, विठ्ठल उदमले, नामदेव टिळेकर, प्रियंका आंबेकर यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, की निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यात ३६ लाख पेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या कमी दिसत असल्याने प्रशासनाने जिल्ह्याती...

केंद्र शासनाने 'तो' निर्णय बदलला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

इमेज
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हवामानातील बदलांमुळे ऊस पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. यंदा देखील तशीचं परिस्थिती पाहायला मिळत आहे.यावर्षी कमी पावसामुळे उसाचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. परिणामी साखरेचे उत्पादन कमी होणार असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे साखरेचे उत्पादन कमी होणार या भीतीने नुकताच केंद्र शासनाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याला बंदी घातली होती. या निर्णयामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत आले होते.  परिणामी हा निर्णय ताबडतोब मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि साखर कारखानदारांकडून केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आता एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  आता केंद्र शासनाने उसाच्या रसापासून इथॅनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. 17 लाख टनांपर्यंतच्या उसापासून इथेनॉल निर्मिती करण...

'कशी चर्चा करायची तुमच्याशी', महाजनांना ती गोष्ट आठवण करून देत जरांगे पाटीलांनी व्यक्त केली नाराजी

इमेज
अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ, असं तुम्ही सांगितलं आणि तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत.असं असताना कशी चर्चा कार्याची तुमच्याशी?, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातच आज संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा केली. त्यावेळी जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''अंतरवाली सराटीबद्दल आम्ही बोललो होतो, ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, ते 132 हून अधिक आहेत. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. मग आम्ही सांगत आहोत त्यांच्यावरही तुम्ही गुन्हे दाखल करायला हवे. त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी तुम्ही (राज्य सरकार) म्हणालात द्या विषय सोडून तो आता.''म्हणाले, ''अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्...

मंत्री छगन भुजबळांसह आ. गोपीचंद पडळकरांनी OBC सभेकडे फिरवली पाठ, कारण आलं समोर

इमेज
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहेतर दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध करत ओबीसी मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक ओबीसी मेळाव्यांमध्ये आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. मात्र, आज वर्धा जिल्ह्यात होणाऱ्या ओबीसींच्या महाएल्गार सभेला मंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते गोपिचंद पडळकर गैरहजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विदर्भातील पहिली ओबीसी एल्गार सभा वर्ध्यामध्ये होत आहे. वर्धा शहरातील जुन्या आरटीओ ऑफिसच्या मैदानावर सकाळी 11 वाजता ही सभा सुरू होणार होती. मात्र, भुजबळ, पडळकर यांच्यासारख्या नेत्यांनी अचानक दांडी मारल्याने ही सभा सुरू व्हायला दुपारचा एक वाजला. विदर्भातील ही पहिली ओबीसी एल्गार सभा असून सभेला एका लाखांच्या जवळपास ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितले होतं. मंत्री छगन भुजबळ, आ. गोपीचंद पडळकर यांनी फिरवली सभेकडे पाठ या महाएल्गार ...

दोन मोठ्या धार्मिक कार्यक्रमामुळे पंढरपुरात दुसरी आषाढी भरणार; 10 ते 12 लाख भाविक येणार असल्यानं प्रशासनाची तयारी

इमेज
पंढरपूर : एका बाजूला नाताळच्या सुट्ट्या सुरू होत असल्यानं 25 डिसेंबरपासून पंढरपुरात  पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. ज्येष्ठ शिवपुराण महात्म कथाकार प्रदीप मिश्र यांचा 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होत असल्याने देशभरातून 8 ते 10 लाख भाविक पंढरपूर मध्ये येणार आहेत .याचवेळी राधाकृष्ण महाराजांसह देशातील अनेक मान्यवर संत मंडळींच्या उपस्थितीत रस महोत्सव हा दुसरा कार्यक्रम 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात होणार असल्याने यासाठी देखील हजारोंच्या संख्येने मारवाडी समाज पंढरपूरमध्ये येणार आहे. यामुळे 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत पंढरपूर मध्ये आषाढी सारखी गर्दी होणार आहे . या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेसाठी गोपाळपूर भागात 10 पत्राशेड उभारणीचे काम सुरू केले आहे. याशिवाय पोलीस आणि महसूल प्रशासनानेही येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे जादाच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.  उत्तर भारतात अतिशय लोकप्रिय असणारे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण माहात्म्य ऐकण्यासाठी ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. विठुरायाच्या मस्तकी...

"स्‍वार्थासाठी काही पण", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

इमेज
   शिवसेना ठाकरे गटाने आज (दि. १६) धारावीमध्ये मोर्चा काढण्यात आला. धारावीच्या अदानी ग्रुपकडून करण्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलेले आहे.अदानी हटाओ धारावी बचाओ असा नारा देत कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत. या मोर्चासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे विविध नेते सामील झालेले आहेत. या संदर्भाने भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत ठाकरे गटाने धारावीमध्ये काढत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, राणे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'उध्‍दव ठाकरे व त्‍यांच्‍या नादी लागून कॉंग्रेस व इतर पक्ष अदानी उद्योग समुहा विरोधात आता धारावीमध्‍ये मोर्चा काढताहेत. दुसरीकडे उध्‍दव ठाकरेंचे बगलबच्‍चे आदरणीय साहेबांच्‍या जीवावर उठलेल्‍या पाकिस्‍तानातील दाऊदच्‍या साथीदाराबरोबर पार्टीमध्‍ये नाचत आहेत. वा रे उध्‍दव ठाकरे ! मुख्‍यमंत्री असताना अडीच...

एसटीच्या थांब्यावर३० रुपयात जेवण पाणी न दिल्यास हॉटेलवर होणार कारवाई!

इमेज
राज्य परिवहन महामंडळाने खासगी हॉटेलवर अधिकृत थांबे करून थांब्याच्या ठिकाणी हॉटेल मालकाने प्रवाशांना ३० रुपयात चहा व नास्ता तसेच नाथजल ही पाण्याची बाटली देणे बंधनकारक केले असताना, हॉटेलमालक जादा पैसे घेत असल्याचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाचे नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी राज्यभरातील सर्व विभाग नियंत्रकांना लेखी पत्र पाठवून या प्रकाराची पडताळणी करण्याच्या व सेवा देण्यात कुचराई करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस या प्रवाशांना चहा, नास्ता घेण्यासाठी महामंडळाने नियुक्त केलेल्या उपहारगृहावर थांबविल्या जातात. या उपहारगृहात प्रवाशांना केवळ ३० रुपयात चहा-नास्ता व नाथजल ही पाण्याची बाटली देणे बंधनकारक केले आहे. मात्र, बहुतांश उपहारगृहचालक ३० रुपयांत फक्त पाण्याच्या बाटली आणि चहाच देतात. नास्ता देत नाहीत. तसेच नास्ता दिला तर चहा देत नाहीत. ३० रुपयात या तीन वस्तू येत नसल्याचे सांगतात. तर काही हॉटेलचालक ३० रुपयां...

राजस्थानात 'भजन' राज! १४ वे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांनी घेतली शपथ

इमेज
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झालेले सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा यांनी आज राजस्थानचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.जयपूरमधील अल्बर्ट हॉलच्या बाहेर आज दुपारी १ वाजता हा शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या सोहळ्याला उपस्थित आहेत. तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या सोहळ्याला हजर होते. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही उपस्थिती होती. आज शपथविधी सोहळ्यापूर्वी बोलताना भजनलाल शर्मा यांनी म्हटले होते की, मी संत आणि गुरुजींचे आशीर्वाद घेतले. आम्ही पंतप्रधान मोदी यांची गारंटी राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवू. शर्मा यांनी शपथविधीपूर्वी सरल बिहारी मंदिरात संत मृदुलकृष्ण शास्त्री यांची भेट घेतली....